सध्याच्या काळात महिलांमध्येही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढलेले दिसते. स्त्रियांच्या आरोग्यावर, विशेषत: जननक्षमतेवर त्याचे काय परिणाम होतात, ते जाणून घ्यायला हवे.
भारतात सरासरी २०.३ टक्के महिला धूम्रपान किंवा अन्य प्रकारे तंबाखूचा वापर करताना दिसतात. त्यातील ९० टक्के स्त्रिया धूरविरहित तंबाखूचा वापर करताना दिसतात. धूम्रपान अथवा तंबाखू सेवानास सुरुवात होण्याचे सरासरी वय १७.८ वर्षे आहे. २५ टक्के महिला १५ वर्षांखालील आहेत. ग्लोबल अॅडल्ट टोबॅको सर्व्हे (२०१६) यानुसार ही आकडेवारी आहे.
सिगारेट, विडी, तंबाखू, गुटखा, जर्दा, खैनी, मिश्री, मावा हे सर्व तंबाखूयुक्त पदार्थ आहेत. तंबाखूमध्ये ४००० प्रकारची रसायने आढळतात. त्यावर पुढे प्रक्रिया केल्यास (जाळणे, भाजणे, दळणे, वाटणे, मळणे) त्यातून ७००० रसायने निर्माण होतात. ती घातक ठरू शकतात.
तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे रसायन आहे. त्याचे घटक शरीरातील चेतातंतूंच्या टोकाला तयार होणारे रसायन उत्तेजीत करतात. त्यातील एक रसायन सेवन करणाऱ्याला जागृत आणि उत्तेजीत करते. डोपामाइन नावाचे रसायन सेवनकर्त्याला व्यसनाधीन करण्यास कारणीभूत आहे. हेरॉइन नावाच्या नशिल्या पदार्थापेक्षा हा निकोटीत जास्त प्रमाणात व्यसनाधीनता वाढवतो, याचे शास्त्रीय पुरावे आहेत.
स्त्रियांमध्ये धूम्रपानास सुरुवात झाल्याचा इतिहास विलक्षण आहे. १९२०साली अमेरिकेमध्ये स्त्रियांमधील धूम्रपान करणे चुकीचे मानले जाई. सिगारेटच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून त्या आल्या आणि स्त्रियांमधील धूम्रपानास सुरुवात झाली. भारतामध्ये स्त्रियांमधील धूम्रपानाचा इतिहास नोंदलेला नाही; परंतु तंबाखूच्या वापरामुळे गर्भपिशवीच्या ग्रिव्हेचा कर्करोग होतो, हे टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
स्वत:च धूम्रपान करणे तसेच बरोबर असलेल्या व्यक्तीचे धूम्रपानही घातक आहे. धूम्रपान झालेल्या जागेमध्ये (भिंती, कार्पेट, पडदे) रसायनाचा थर साचतो. त्यातील अर्क श्वसनातून, त्वचेतून शरीरात जाऊन नुकसान होऊ शकते,
स्त्रियांसाठी माइल्ट अथवा मेंथॉल किंवा फिल्टरच्या सिगारेट मिळतात. त्या सुरक्षित असतात, या जाहिरातबाजीत काही अर्थ नाही. कोणतेही निकोटिन आणि तंबाखूयुक्त पदार्थ सुरक्षित नाहीत.
धूम्रपानामुळे पुरुषांमध्ये कमी क्षमतेचे वीर्यधातू निर्माण होतात. त्यांची विहार क्षमता बिघडते. याबरोबर गर्भपिशवीला चिकटण्याची गर्भाची क्षमता खालावते व गर्भ रुजत नाही. त्यातून वंध्यत्व येऊ शकते.
गर्भपात, गर्भामध्ये व्यंग असणे, गर्भाची वाढ खुंटणे, मुदतपूर्व प्रसुती, वार सरकून होणारा रक्तस्राव, कामाची क्षमता कमी होणे, रक्तदाब असे अनेक दुष्परिणाम होतात.
तसं तर कोणत्याही प्रकारचं दान हे श्रेष्ठ असतं, पण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे. या दानामुळे एका माणसाचा जीव वाचवला जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्यांनी रक्तदान करायला हवं. आरोग्य चांगलं असलेले व्यक्ती प्रत्येक 3 महिन्याने रक्तदान करु शकतात. चला जाणून घेऊया याबाबत महत्वाच्या गोष्टी....
1) रक्तदान करतेवेळी तुमचं वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावं. आणि तुमचं वजन 45 किलोग्रॅमपेक्षा जास्त असावं.
2) तुम्हाला एचआयव्ही, हेपाटिटिस बी किंवा सी सारखे आजार असू नये.
3) रक्त ज्या जेथून काढलं जातं त्या जागेवर कोणताही निशान किंवा घाव असू नये.
4) हिसोग्लोबिन 12.5 पेक्षा अधिक असावा.
हेही आहे महत्वाचं
1) शरीराचे सगळी अंगे नियमित काम करत असावेत.
2) रक्त देण्याआधी पोटभर नाश्ता किंवा जेवळ केलेलं असावं. रक्तदान करण्यापूर्वी हलकं जेवण घ्यावं.
3) एक ग्लास पाणी पिऊन रक्तदान करावं आणि त्यानंतर हलकं काहीतरी खावं.
4) घाबरल्यासारखं किंवा चक्कर आल्यासारखं झाल्याल एक कप कॉफी घ्यावी आणि आराम करावा.
5) रक्तदान करण्याआधी धुम्रपान करु नये. रक्तदान केल्यावर तीन तासांनी धुम्रपान करु शकता.
6) जर 48 तासांपूर्वी तुम्ही अल्कोहोल सेवन केलं असेल तर रक्तान करु नये.
7) मासिक पाळी आली असल्यास महिलांनी रक्तदान करु नये.
या गोष्टींची घ्या काळजी
1) हिमोग्लोबिन 12.5 पेक्षा अधिक असावा.
2) वजन 45 किलो(महिला), 55 किलो(पुरुष)
3) रक्तदान केल्यानंतर पायी किंवा सायकल चालवत जाऊ नये. साधारण अर्धा तास कोणतही शारीरिक श्रम करु नये.
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत असतात. पण योग्य पद्धती फॉलो न केल्यास वजन कमी करणे कठीण आहे. वजन कमी करण्यात डाएटसोबतच तुम्ही खात असलेलं अन्न कशाप्रकारे शिजवता हेही महत्वाचं आहे. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी अन्न शिजवण्याची योग्य पद्धत.....
स्टीमिंग म्हणजेच वाफेवर शिजवा
पदार्थ वाफेवर शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे सुरक्षित राहतात. भाज्या, तांदूळ आणि डाळ या गोष्टी कमी पाण्यात वाफेवर शिजवा. भाज्या प्रेशर कुकरच्या वाफेवर शिजवणे कधीही चांगले. यात तेल टाकण्याचीही गरज नसते. भाजी अशाप्रकारे शिजवल्यास भाज्यांचा रंग आणि पोषक तत्वे कायम राहतात. याने तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल.
शिजवणे का गरजेचे आहे ?
जनरली आपण अन्न कितीही काळजीपूर्वक शिजवलं तरीही त्यातील 10 ते 15 टक्के पोषक तत्वे नष्ट होतात. पण वेगवेगळे पदार्थ शिजवून खाण्याचे अनेक फायदेही आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते. तर काही खाद्य पदार्थ हे शिजवल्याशिवाय आपण खाऊच शकत नाही.
जेवण बनवण्याची योग्य पद्धत
आपण काय खातो याहीपेक्षा आपण ते कसं तयार करतो आणि कसं शिजवतो हे महत्वाचं आहे. खाद्य पदार्थ दोन प्रकारे खाल्ले जातात. एक म्हणजे कच्चे आणि दुसरा म्हणजे शिजवून. अनेक भाज्या आणि फळे कच्चे खाणेच फायद्याचे असते. पण प्रत्येक गोष्ट कच्ची खाऊ शकत नाही. जेवण स्वादिष्ट करण्यासाठी आपण त्यात वेगवेगळे मसाले टाकून त्या भाजीतील पोषक तत्वे नष्ट करतो.
पोषक तत्वे सुरक्षित राहतात
वाफेवर शिजवण्यात आलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिकता अधिक प्रमाणात असते. पण ते शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. पण वाफेवर भाज्या-पदार्थ शिजवल्यास त्यातील पोषक तत्वे कायम राहतात. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
कुत्रा चावल्यास अजिबात निष्काळजीपणा करुन चालत नाही अथवा तुम्हाला रेबीज होण्याची शक्यता असते. रेबीजला हायड्रोफोबियाही म्हटलं जातं. हे प्राण्यांच्या चावल्याने होणारं व्हायरल जेनेटिक इन्फेक्शन आहे. अनेकांना हे माहीत नसतं की, कुत्रा चावल्यानंतर नेमकं काय करायला हवं. आणि लोक घाबरुन चुकीचे काहीतरी उपाय करतात. तुम्हाला हे माहीत असणं फारच गरजेचं आहे की, कुत्रा चावल्यानंतर काही मिनिटात किंवा काही तासांनी काय करायला हवं.
लगेच करा ही 3 कामे
एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार खालील तीन गोष्टी सर्वातआधी केल्या गेल्या पाहिजे.
1) चावल्याने झालेल्या जखमेवर कपडा बांधू नका. ती जखम मोकळी ठेवा.
2) जखम झालेला भाग पाण्याने धुवून घ्या.
3) 24 तासांत डॉक्टरांना ही जखम दाखवायला हवी आणि इन्फेक्शनपासून बचावासाठी इंजेक्शन घेतलं पाहिजे.
सर्वात महत्वाची बाब
शक्य असल्यास हे माहिती घेण्याचा प्रयत्न करा की, तुम्हाला चावलेल्या कुत्र्याला रेबीज तर नव्हता ना. कारण रेबीज असलेल्या कुत्र्याने तुम्हाला चावा घेतल्यास तुम्हालाही रेबीज होऊ शकतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, रेबीजवर कोणताही उपचार नाहीये. त्यामुळे ही घटना घडल्यानंतर काही दिवस त्या कुत्र्यावर नजर ठेवा. जर काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला तर तुम्हालाही मोठा धोका होऊ शकतो.
कुत्र्याला रेबीज असल्याची लक्षणे
1) जेव्हा कुत्रा त्याची छेडखानी न करता तुमच्या अंगावर येत असेल किंवा त्याला चावण्याची सवय असेल.
2) तो कुत्रा लाकूड, गवत किंवा इतरही वस्तूंना चावत असेल तर...
3) अधिक हिंसक होणे, घरातून पळून जाणे, रस्त्यात जो दिसेल त्याला चावणे
4) रेबीज असलेला कुत्रा हा फाटक्या आवाजात भुंकतो.
काय आहे रेबीज?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, रेबीज लायसो व्हायरस म्हणजे विषाणूपासून होतो. हा आजार केवळ कुत्र्यांच्या चावण्यानेच नाहीतर इतर मांजर, माकड, कोल्हा, डुक्कर यांच्या चावण्यानेही होतो. हा आजार जर एखाद्या मनुष्याला झाला तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. हा आजार झाल्यावर 5 ते 6 दिवसात मृत्यू होतो. त्यामुळेच याचं संक्रमण अधिक वाढू नये म्हणून लगेच यावर उपाय केले जावे.
रेबीज झाल्याची लक्षणे
1) कुत्रा चावल्यानंतर चिडचिडेपणा वाढतो.
2) ताप येणे
3) तोंडातून लाळ बाहेर येणे
4) मासंपेशींमध्ये तणाव वाढणे
कुत्रा चावल्यावर काय करावे उपाय?
तुम्हाला रेबीज असलेल्या कुत्र्याने चावले असेल तर डॉक्टर तुमच्या उपचारासाठी खालील लसी घेण्याचा सल्ला देऊ शकतात.
1) सामान्य खरचटले असेल तर लस घेणं सर्वात प्रभावी ठरतं. जर फार जास्त जखम झाली असेल तर अॅंटी-रेबीज इम्युनोग्लोबुलिन आवश्यक आहे.
2) जास्तीत जास्त प्रकरणात डॉक्टर टाके लावण्यास नकार देतात. कारण याने इतर अंगाना संक्रमण वाढू शकतं.
3) जर पाळीव कुत्र्याने चावले असेल तर तीन लसी घ्याव्या लागतात. एक कुत्र्याने चावल्याच्या एका दिवसानंतर, दुसरा तीन दिवसांनंतर आणि तिसरा सात दिवसांनंतर.
4) जर तुम्हाला मोकाट कुत्र्याने चावले असेल तर तिसऱ्या लसीनंतर एका आठवड्यात तुम्हाला पाच ते सात लसी घ्यावा लागू शकतात.
अक्कल दाढ म्हणजे दातांच्या शेवटी येणारा दात. याला लोक अक्कल दाढही म्हणतात. जेव्हा जवळपास सगळे दात आलेले असतात तेव्हा अक्कल दाढ येते. अनेक लोकांना अक्कल दाढ ही 17 ते 25 वयादरम्यान येते. तर काही लोकांना ही 25 वयानंतरही येते. अक्कल दाढ येतांना फार वेदना होतात. इतक्या की खाणं-पिणंही बंद होतं. या वेदना थांबवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
का होतात अक्कल दाढेत वेदना?
अक्कल दाढेच्या वेदनेवर उपचार करण्याआधी या वेदना का होतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. अक्कल दाढ सर्वात शेवटी येते. ही दाढ बाहेर येत असताना असह्य वेदना होतात. ही दाढ वर येताना इतर दातांना पुश करत वर येते. त्यामुळे हिरड्यांमध्ये वेदना, सूज अशा समस्या होतात.
1) कोमट पाण्याने गुरळा करा
अक्कल दाढ आल्याने हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर कोमट पाण्यात मिठ टाकून गुरळा करा. मिठ घातलेल्या या पाणाने केवळ 2 ते 3 मिनिटेच गुरळा करा. याने वेदना कमी होतील.
2) बर्फाचे तुकडे
जर दातांमध्ये वेदना होत असतील तर बर्फाचे छोटे छोटे तुकडे करुन दातांजवळ ठेवा. याने वेदना आणि हिरड्यांची सूज कमी होईल. सूज आणि वेदना पूर्णपणे बंद होईपर्यंत हा उपाय करा.
3) हिंगाचा वापर
चिमुटभर हिंग मोसंबीच्या रसात मिश्रित करुन कापसाच्या मदतीने अक्कल दाढेजवळ ठेवा. याने वेदना कमी होतील आणि अक्कल दाढेचा इतर दातांवर प्रभावही होणार नाही.
4) लवंगही फायद्याची
लवंगमध्ये दातामधील बॅक्टेरिया आणि किटाणू नष्ट करण्याची क्षमता आहे. अशात अक्कल दाढेमुळे वेदना होत असतील तर त्या दाढेजवळ लवंग ठेवल्यास वेदना कमी होतील.
5) कांद्याने वेदना करा कमी
असे म्हटले जाते की, जे लोक रोज कच्चा कांदा खातात त्यांना दातांच्या समस्या कमी होतात. कांद्यामध्ये दातांमधील किटाणू नष्ट करण्याचे गुण आहेत. जर तुम्हाला अक्कल दाढेचा त्रास होत असेल तर कांद्याचा तुकडा दाताजवळ ठेवून चावा. याने तुम्हाला आराम मिळेल.