Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

रोजच्या धावपळीत भूक लागली म्हणून कुठलेही खाद्यपदार्थ खाणे आरोग्यासाठी मानवणारे नसते. आपल्या शारीरिक गरजेनुसार पाहिजे तेच खाणे केव्हाही चांगले. नियमबाह्य खाणेपिणे आपल्या शरीराला परवडणारे नसते. चांगले आणि वाईट गुण लक्षात घेऊन आहार घेतल्यास नकोसा वाटणारा लठ्ठपणा टाळता येऊ शकेल.

आजकालच्या जीवनशैलीचा विचार केल्यास आरोग्यदायी खाद्यसंस्कृती अंगीकारणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपापली शरीररचना किंवा रेग्युलर हेल्थ चेकअप करून शरीराच्या आवश्यकतेनुसार आहारात त्यात्या गोष्टींचा समावेश करण्याची गरज आहे. कारण, कोणत्याही गोष्टींचा आहारात समावेश करायचा असेल, तर त्याची गरज, फायदेतोटे लक्षात घेऊनच व्हावा. उगाचच डोळे बंद करून एखाद्या गोष्टींचा समावेश आहारात करणे चुकीचे आहे. चांगले, वाईट गुण लक्षात घेऊन खाल्ल्यास आपल्या शरीरावर भविष्यातील परिणाम टाळता येणे शक्य आहे.
वाचण्यात येणारी पुस्तके, आर्टिकल, बातम्यांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे समर्थन करण्यापेक्षा किंवा दिलेल्या माहितीचा एकाच बाजूचा विचार करू नये. सर्वांगाने विचार करून आवश्यकतेनुसार बदल करणे गरजेचे आहे. तो न केल्यास वेगवेगळ्या आरोग्यसमस्येला तोंड द्यावे लागते. त्यामध्ये सद्य:स्थितीत महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर आजार म्हणजे फॅटी लिव्हर. याबद्दल बºयाच लोकांच्या मनात फारच शंकाकुशंका आहेत. दैनंदिन जीवनशैलीत बदल करून नियमित व्यायाम, वजनावर नियंत्रण, योग्य औषधोपचार घ्यावा. अल्कोहोलवर नियंत्रण, कमी कर्बोदके असणाºया पदार्थांचे सेवन व संतुलित आहाराचा समावेश केल्यास फॅटी लिव्हरची तक्रार आपण नक्कीच कमी करू शकतो.

लिव्हर हा एक आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. म्हणूनच त्याला ‘फादर आॅफ आॅर्गन’ म्हणतात. लिव्हर हा पित्त निर्माण करतो. तो डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करतो. नॅचरल रेंजपेक्षा लिव्हरच्या कोशिकांमध्ये फॅटचे प्रमाण जेव्हा वाढत जाते, तेव्हा फॅटी लिव्हर ही गंभीर समस्या भेडसावत जाते. त्यामध्ये फॅटी लिव्हरचे मुख्यत: दोन प्रकार आढळतात.

१. अल्कोहोल फॅटी लिव्हर

२. नॉन अल्कोहोल फॅटी लिव्हर

रोजच्या आहारात ज्यांचे अल्कोहोलचे प्रमाण जास्त आढळते तसेच अल्कोहोलमध्ये शर्करा आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असले, तर फॅटी लिव्हरची शक्यता असते. त्यामुळे अल्कोहोलिक लोकांना हा धोका जाणवणार आहे.२नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा आहारात असलेले खूप जास्त कर्बोदके तसेच साखर तसेच खूप प्रमाणात फळे यामुळे होतो. वजन कमी करण्याच्या नादात किंवा खूप जास्त फॅटलॉस करण्याच्या नादात खूप लोक अतिक्रश डाएट करतात. त्यामुळे जेवणाऐवजी जास्त प्रमाणात केलेल्या फ्रूट डाएटमुळे व फळातील फ्रूक्टोझमुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते. आजार पूर्णपणे बरा होत नाही; पण त्याची तीव्रता कमी करू शकतो.
मुख्यत: जेव्हा फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते, तेव्हाच साधारणत: पुढील लक्षणे आढळतात. थकवा, पोटदुखी, वजन कमी होणे, भूक कमी लागणे. त्यामुळे कोणतीही लक्षणे आढळली तर थेट डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, परंतु यावर योग्य उपचार किंवा निदान न झाल्यास लिव्हरला इजा होऊन सॉरेसेस होऊ शकतो. त्याचप्रमाणे पिलिया (कावीळ) सारखे आजार होऊन खूप जास्त प्रमाणात लिव्हरला सूज होऊ शकते. त्यामुळे योग्य वेळेत

१. शारीरिक परीक्षण

२. रक्ततपासणी

३. अल्ट्रासाउंड टेस्टद्वारे इमेजिंग परीक्षण

४. लिव्हर बायोप्सीद्वारे तपासणी करून घ्यावी.

ऋतू बदलतोय. जूनच्या पहिल्या आठवड्यात नेहमी असं भरून आल्यासारखं, रिझल्टची धाकधूक असल्यासारखं, टेन्शन आल्यासारखं वाटतं. उकाडाही असतो आणि मळभ दाटून येऊन पाऊस कधीही येईल याची एक आसवजा धास्तीही असते. म्हणून याकाळात मंद, उदास वातावरण असतं. मळभ येतं. एकदम उदास वाटतं. आळसही येतो. अनेकदा एकदम डिप्रेस वाटून रडू येऊ शकतं. ही सगळी वातावरणाची कृपा आहे असं मानलं तरी, अशी काही लक्षणं असतील तर किंवा दरवर्षी हवा बदलली की आपल्याला हमखास सर्दीखोकला होत असेल तर आपल्या आहाराविहारात काही बदल करायला हवेत. पूर्वीच्या काळी रीतिभातीतून ऋतूप्रमाणे आहारबदल होत असे. आता आपण त्या साऱ्याकडे जुनाट म्हणून लक्ष देत नाही आणि आहारात योग्य बदल न केल्यानं ऋतूबदल त्रास देऊ शकतो.
त्यावर उपाय काय?
उपाय म्हणून आपण काही गोष्टी करू शकतो.

१) व्हिटॅमिन डी
आपल्याकडे उदंड सूर्यप्रकाश असूनही अनेक स्त्री-पुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. स्त्रियांमध्ये तर जास्तच. त्यावर उपाय काय? खरं तर रोज सकाळी १० मिनिटं तरी किमान कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला हवा. उन्हात जायला हवं. त्यामुळे सूर्योदयानंतर लगेच काही काळ उन्हात फिरून या, खुर्ची टाकून बसा. त्यानं डी जीवनसत्त्व तर मिळेलच. फ्रेश वाटेल. हे जीवनसत्त्व फारच कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं औषध घ्या.

२) प्रो बायोटिक
फार मोठा वाटतो हा शब्द. त्या साठीची औषधंही बाजारात ढिगानं मिळतात. म्हणजे काय तर आपल्या पोटात पचनाला मदत करणाºया हेल्दी बॅक्टेरियांची आतड्यांना मदत होणं. ते आतड्यात असणं. त्यासाठीची औषधं घेण्यापेक्षा आहारात दह्या-ताकाचा वापर करावा. शक्यतो दही सकाळच्या जेवणात, नास्तयात घ्यावं. त्यानं पचनशक्ती चांगली राहते.

३) झिंक
झिंक सप्लिमेण्ट प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करते. घरचा गुळाचा शिरा, साधा शिरा, पौष्टिक सुकामेवा, मनुका यातून हे मिळू शकतं. पण इन्फेक्शन सतत होत असतील तर डॉक्टरच्या सल्ल्यानं झिंक सप्लिमेण्टची औषधं घेऊ शकतात.

४) आयर्न
लोह. रक्तवाढीसाठी आवश्यक. नाचणीचं पीठ, गुळाचा शिरा, बीट, राजगीरा लाडू असं खरं तर या काळात खायला हवं. आणि शक्यतोवर लोखंडी कढईतच भाज्या करायला हव्या. त्यातून लोह पोटात जातं. आपलं हिमोग्लोबिन तपासून घ्यावं. ते फारच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.

५) नास्ता
हा सगळ्यात सोपा उपाय. या काळात आणि पुढे पावसाळ्यातही भरपेट नास्ता चुकवायचा नाही. गरमागरम, घरचं, पोळीभाजी, पोहेसांजा, असं खाल्लेलं उत्तम. शक्यतो आंबवलेले पदार्थ टाळावेत. सकाळी पोटभर नास्ता केला तर त्यानं आपली एनर्जी लेव्हल चांगली राहते, मूडही चांगला राहतो दिवसभर. याकाळात अ‍ॅडमिशनची धावपळ असते तेव्हा घरातून निघतानाच भरपेट नास्ता आणि सोबत घरचा जेवणाचा डबा असणं उत्तम. एवढं केलं तरी आपण पावसाच्या स्वागताला सज्ज होतो.

भारतामध्ये स्त्रिया त्यांच्या आरोग्याबाबत फारशा जागृत नाहीत. त्यामुळेच कॅन्सरसारखे अनेक गंभीर आजार अंतिम टप्प्यावर आल्यानंतर समजतात. अशापैकी एक म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर. एकूण सर्व्हायकल कॅन्सरच्या रूग्णांपैकी एक चतुर्थांश रूग्ण केवळ भारतामध्ये आढळतात. म्हणूनच या आजाराबाबत समाजात जनजागृती आणि स्त्री आरोग्याकडे प्रामुख्याने पाहण्याची गरज वाढली आहे.

भारतात गोळा केले जातात सॅनिटरी पॅड्स

भारतीय समाजात अजूनही मासिकपाळी या विषयाबाबत फार खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेक तरूण मुली आणि स्त्रियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ग्रामीण भागात वैद्यकीय सोयींचा अभाव आणि मासिकपाळीदरम्यान कापड वापरण्याची पद्धत असल्याने अशा भागामध्ये स्त्रीया सर्व्हायकल कॅन्सरबाबत चाचणी करायला लाजतात. परिणामी अनेक स्त्रियांना वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे.

कशी केली जाते चाचणी

स्त्रिया सर्व्हायकल कॅन्सर संबंधी चाचणी करायला लाजत किंवा टाळत असल्याने आता वैद्यकीय सेवा त्यांच्यापर्यंत पोहचवून या गंभीर आजाराचा धोका ओळखण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याकरिता महिलांनी मासिकपाळी दरम्यान वापरलेली कापडं प्लॅस्टिक बॅगेमध्ये बंद करून आरोग्यसेविकांमार्फत डॉक्टरांच्या हवाली केले जातात. त्यानंतर ही कापडं -20 सेल्सियसमध्ये साठवली जातात. पॅड्समधून ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) ओळखता येतो. हा व्हायरस सर्व्हायकल कॅन्सरला कारणीभूत ठरतो. ग्रामीण भागात अशाप्रकारे कॅन्सरचा धोका ओळखणं सोयीस्कर आहे.

सोयी सुविधांचा अभाव

महिलांमध्ये जननेंद्रिय स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक सोयी सुविधा ग्रामीण भागात नाहीत. परिणामी मासिकपाळीच्या दिवसात त्यांना पुरेसा आराम, स्वच्छ स्वच्छतागृह आणि स्वच्छ पॅड्स/ कापडं न मिळाल्याने त्रास अनेक आजारांना आमंत्रण मिळते.

काय आहेत सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणं

अनियमित मासिकपाळी ,

सतत होणारी पाठदुखी आणि ओटीपोटीच्या भागाजवळ होणार्‍या वेदना हे सर्व्हायकल कॅन्सरचे सुरवातीच्या टप्प्यातील लक्षण आहे.

मलविसर्जनातून रक्त जाणे.

थकवा जाणवणे - मासिकपाळी दरम्यान रक्त गेल्याने कमजोर वाटणे किंवा सतत थकवा जाणवणे हे सर्व्हायकल कॅन्सरचे लक्षण आहे. त्यामुळे 'त्या' दिवसां व्यतिरिक्तदेखील तुम्हांला कमजोर वाटत असेल तर सर्व्हायकल कॅन्सरची चाचणी करा.

एकाच पायाला येणारी सूज हे सर्व्हायल कॅन्सरमधील एक महत्त्वाचे लक्षण आहे. त्यामुळे वारंवार आणि अचानक पायावर येणार्‍या सूजेकडे दूर्लक्ष करू नका.
मोनोपॉजच्या टप्प्यानंतरही योनीमार्गातून रक्त जात असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सर्व्हायकल कॅन्सरची शक्यता दूर करा.

HPV व्हायरसचा संसर्ग झाल्यास शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी भूकही मंदावते.

वारंवार आणि अत्यंत वेदनादायी पोटदुखी हे सर्व्हायकल कॅन्सर अंतिम टप्प्यात असल्याचे एक लक्षण आहे.

घरी जेवण्याचा मूड नसला, सुट्टी असली किंवा मुलांनी हठ्ठ केला की आपण लगेच पिझ्झा ऑर्डर करतो. आणि अर्ध्या तासात घरी येणारा पिझ्झा खूप चव घेऊन खातो परंतू जंक फूड म्हणून पिझ्झा धोकादायक असला तरी त्याहून धोकादायक पिझ्झा बॉक्स आहे हे जाणून आश्चर्य वाटत असलं तरी हे विचार करण्यासारखे आहे.

पिझ्झा बॉक्स कागदाने तयार केलेला असतो हा विचार करून त्याने आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकत नाही अशी आमची समजूत असते. परंतू काय आपल्याला माहीत आहे की हा बॉक्स अनेक प्रकाराच्या मटेरिअल आणि केमिकलने तयार केलेला असतो.

धोकादायक रिसाइकल्ड मटेरिअल ने तयार केलेल्या या बॉक्समध्ये गोंद, हाइज आणि विषारी शाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पिझ्झा गरम राहावा म्हणून वापरलं जातं आणि गरम पिझ्झ्यासोबत हे केमिकलही आमच्या पोटात जातात.

पिझ्झा बॉक्समध्ये ऑइल, चीज किंवा फॅट्स शोषले जाऊ नाही म्हणून एका प्रकाराची कोटिंग केली जाते. या कोटिंगमुळे ही कर्करोग होण्याची शक्यता असते. यात डीआयबीपी अर्थात डायिसोबायटील फेथलेट नावाचे केमिकल आढळतं ज्याने प्रजनन विकासावर विपरित परिणाम टाकतं. हे शरीरात एन्डोक्रायनाइनला नुकसान पोहचवतं.

विशेषज्ञांप्रमाणे या बॉक्स तयार करताना वापरण्यात येणार्‍या वस्तूंमध्ये परफ्लूरोकाइलिल एथिल आढळतं जे शरीरात अनेक वर्ष राहतं आणि यामुळे कर्करोग साखरे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गरम पिझ्झा खाण्याचा शौक आम्हालाच महागात पडू शकतो कारण अधिक वेळ पिझ्झा गरम राहावा यासाठी डिलेव्हरीपूर्वी त्याला 60 ते 65 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केलं जातं. गरम पॅकेजिंगमुळे यात केमिकल मिसळतात आणि पिझ्झा विषारी होऊन जातं.

उन्हाळा असो किंवा हिवाळा भरपूर पाणी पिण्याचा सल्ला हमखास दिला जातो. घरातील वरिष्ठ मंडळी, तज्ञ हे नेहमी भरपूर पाणी पिण्यास सांगतात. उन्हाळ्यात तर पाण्याची गरज अधिक वाढते. पण तुम्हाला हे माहित आहे का? की गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. पाहुया गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यास काय होऊ शकते....

हायपोट्रिमियाचा धोका
शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक झा्ल्याने सोडिअमचे प्रमाण जलद गतीने वाढते. त्यामुळे डोक्याला सूज येऊ शकते. सुज वाढल्यास हायपोट्रिमियाचा धोका वाढतो.

पचनक्रिया प्रभावित होते
भरपूर पाणी प्यायल्याने अन्नपचनास मदत होते. पण पाण्याच्या अतिरिक्त प्रमाणामुळे अन्नपचनासाठी मदत करणारा पाचन रस काम करणे बंद करतो. त्यामुळे अन्न उशिरा पचते आणि पोटासंबंधित विकार जडण्याची शक्यता उद्भवते.

हार्टअॅटकचा धोका
अनेकदा अधिक पाणी प्यायल्याने हृदयविकार किंवा हार्टअॅटकचा धोका वाढतो. बायपास सर्जरी झालेल्या रुग्णांना कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

किडनीची समस्या
अधिक पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव पडतो. यामुळे किडनीची समस्या होऊ शकते. कारण अधिक पाणी प्यायल्याने किडनीला क्षमतेपेक्षा अधिक काम करावे लागते.

झोप कमी येते
अधिक पाणी प्यायल्याने रात्री नीट झोप येत नाही. वारंवार लघवीला जावे लागते. मधुमेहींना रात्री कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. कारण अधिक पाणी प्यायल्याने मधुमेहींना रात्री बरेचदा लघवीला जावे लागते.

किती पाणी गरजेचे?
स्वस्थ शरीराला पाण्याचे संतुलित प्रमाण आवश्यक असते. सामान्य दिनचर्या असल्यास एका दिवसात कमीत कमी ८ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. जर तुम्ही अधिक शारीरिक श्रम असलेले काम करत असाल तर त्यानुसार शरीरात पाण्याचा इनटेक वाढवा.

Dr. Sheetal Jadhav
Dr. Sheetal Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, Pune
Dr. Pratima Kokate-Ghode
Dr. Pratima Kokate-Ghode
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diet Therapeutic Yoga, 9 yrs, Pune
Dr. Surbhi Agrawal
Dr. Surbhi Agrawal
Specialist, Diabetologist General Physician, 8 yrs, Nagpur
Dr. Nitin B. Bhise
Dr. Nitin B. Bhise
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 21 yrs, Pune
Dr. Supriya Jagtap
Dr. Supriya Jagtap
BHMS, Family Physician Homeopath, Pune
Hellodox
x