Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

लसणामुळे फक्त जेवणच चविष्ट होते असे नाही, लसणामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. जाणून घेऊ की या छोट्या लसणामध्ये कोण कोणते गुण लपलेले आहेत.

एंटीबायोटिक - प्रथम लसणाला सोलून घ्या, लसणाच्या एका कुडीचे ३ ते ४ तुकडे करा. दोन्ही वेळेच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने लसणाचे दोन तुकडे तोंडात ठेऊन चगळा त्यानंतर पाणी प्या. > रोज लसणाचे सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, एंटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.> डोके दुखीसाठी रामबाण उपाय - एका लसणाच्या ४ कुड्या तीस ग्राम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडे गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा डोके दुखणे थांबेल.

दमा दूर करण्यासाठी उपयुक्त - दम्याच्या त्रासावर लसून हे एक उपयुक्त औषध आहे. ३० मिली दुधामध्ये लसणाच्या पाच कुड्या टाकून दुध गरम करा. रोज हे गरम दुध पिल्याने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अद्र्काच्या चहामध्ये थोडा लसण टाकल्याने दमा नियंत्रित राहतो.

मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट म्हणजे मसाले. या मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरलं जाणारं आलं हे जसे पदार्थांची चव वाढवते तसेच ते आरोग्यालाही हितकारी आहे.
आलं किंवा सुकवलेलं सुंठ हे दोन्ही आयुर्वेदीक औषधांमध्ये हमखास वापरले जाते. म्हणूनच आजारपणांना दूर ठेवण्यासाठी आहारात आल्याचा नियमित वापर केल्याने कमी होईल या समस्यांचा धोका.

पित्ताचा त्रास
पित्ताचा त्रास झाल्यानंतर अनेकजण अ‍ॅन्टासिड घेतात. मात्र वारंवार अ‍ॅन्टासिड घेणेही आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यामुळे पित्ताचा त्रास जाणवत असल्यास आल्याचा लहानसा तुकडा चघळत राहिल्याने आरोग्याला फायदा होतो. पित्ताच्या समस्येवर सतत अ‍ॅन्टासिड घेण्याची सवय करते आरोग्यावर 'हा' गंभीर परिणाम

दातदुखी
कच्चं आलं चावून खाल्ल्याने दातांचे आरोग्य सुधारते. दातदुखीपासून आराम मिळतो. आल्यामध्ये अ‍ॅन्टी बॅक्टेरियल एन्झाईम्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे लाळनिर्मितीला चालना मिळते. आल्याचा तुकडा चघळल्याने दातदुखी, हिरड्यांमधील सूज कमी होते. दातदुखीवर फायदेशीर ठरतील स्वयंपाकघरातील हे ४ पदार्थ!

फॅट कमी करते
आल्याचा तुकडा शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतात. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. पचनाचा त्रास आटोक्यात राहतो.

विषारी घटक बाहेर पडतात
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी घाम हे एक माध्यम आहे. आल्याच्या सेवनामुळे घाम निर्माण होणं आणि विषारी घटक बाहेर पडणं या कार्याला चालना मिळते.

रक्तप्रवाह सुधारतो
आल्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि क्रोमियम हे घटक आढळतात. त्यामुळे आल्याच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. हृद्याचे आरोग्यही जपण्यास मदत होते.

रक्तदाब आटोक्यात
उच्च रक्तदाबामुळे हृद्याचे विकार जडण्याचा धोका असतो. आल्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

सर्दी - खोकल्याचा त्रास कमी होतो
आल्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. आल्याचा फयादा सर्दी खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. यामुळे घश्यातील खवखव कमी होते.

मासिकपाळीच्या दिवसातील त्रास कमी होतो
एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, महिलांना मासिकपाळीच्या दिवसामध्ये होणारा पोटदुखीचा, ओटीपोटाजवळ तीव्र वेदना जाणवण्याचा त्रास कमी होतो. अनेकजणी याकरिता पेनकिलर्सचा आधार घेतात. मात्र आल्याचा तुकडा चघळल्याने मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी होण्यास मदत होते. मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?

मुंबई : माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायची सवय होती आणि कालांतराने तीच आपली परंपरा बनली.परंतु, आपल्या या परंपरेमागे काही ज्ञान आहे का ? त्याचे काही फायदे आहेत का ? जाणून घेऊया मातीच्या माठातून पाणी पिण्याचे त्यांनी सांगितलेले फायदे.

नैसर्गिक थंडावा:
लहान लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोड शेडींग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.

मातीचे गुणधर्म:
माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.

माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन:
शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.

कोणतेही हानिकारक केमिकल्स नाहीत:
अधिकतर प्लॉस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.

मेटॅबॉलिझम सुधारते:
मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

उष्माघाताला आळा बसतो:
उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या.

घशासाठी चांगले असते:
सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते.

योग्य मातीचे मडके (माठ) कसे निवडावे ?
घरासाठी मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा असे पहा. तसंच mica particles युक्त माठ घ्या. त्याला micaceous म्हणतात. Mica हे नैसर्गिक इन्सलेटर असते. त्यामुळे पाणी खूप वेळपर्यंत थंड राहण्यास मदत होते.

दारू पिणे चांगले नाही हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत याने आरोग्यावर विपरित परिणाम होतो तसेच यात आढळणारे रसायन शरीराला कमजोर करतात. परंतू हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल की दारूने अनेक समस्या दूर होऊ शकतात. लहान-सहान आजार बरे करण्यात दारू उपयोगी ठरते.

रबिंग अल्कोहल ज्याला आइसोप्रोपिल अल्कोहल आणि शल्यक स्पिरिट नावाने ओळखली जाते, ही शरीरावर घासल्याने अनेक फायदे होतात. हे एक प्रभावी, अँटीसेप्टिक, बॅक्टिेरियारहीत आणि क्लीनिंग एजेंटच्या रूपात काम करते.

पिंपल्स दूर करण्यासाठी
त्वचेवरील घाण स्वच्छ करून कापसाच्या बोळ्यात दारू घेऊन पिंपल्सवर लावा. अल्कोहलचे प्रमाण कमी असावे कारण याने स्किन ड्राय होऊ शकते.

ड्राय लिप्स
हिवाळ्यात तर ओठ फाटू लागतात आणि इतर मोसमातही अनेकदा ड्राय लिप्सची समस्या उद्भवते. कित्येकदा तर ओठातून रक्त येऊ लागतं. अशात नमीसाठी अल्कोहल घासणे करणे योग्य ठरेल.

कान स्वच्छ करण्यासाठी
अल्कोहलने कानातील घाणदेखील स्वच्छ करता येते. व्हाईट व्हिनेगर आणि रबिंग अल्कोहल मिसळून या मिश्रणाचे दोन थेंब कानात घालावे.

नखाची फंगस दूर करण्यासाठी
नखांची फंगस दूर करण्यासाठी अल्कोहलमध्ये कापसाचा बोळा बुडवून त्याने नखांची हलकी मालीश करावी. नंतर 15 ते 20 मिनिटासाठी असेच राहू द्या. नंतर पाण्याने नखं स्वच्छ करून घ्या.
उवांची समस्या दूर करण्यासाठी

केसांमध्ये उवा असणे फारच लज्जास्पद आहे परंतू दारूने ही समस्याही सोडवली जाऊ शकते. एका टबमध्ये पाणी भरून त्यात थोडी दारू मिसळावी. डोकं उलट करून त्यात केस सोडून 5 ते 10 मिनिट सोडावे. आपल्या केसातील उवा मरून जातील. नंतर शैंपूने केस धुऊन टाकावे. उवांपासून सुटकारा मिळेपर्यंत ही प्रक्रिया आठवड्यातून किमान एकदा तरी अमलात आणावी.

सॅनेटाइझरचे काम
ज्या प्रकारे साबण किंवा पाण्याविना सॅनेटाइझरने हात स्वच्छ होतात याच प्रकारे रबिंग अल्कोहलचा उपयोग केला जाऊ शकतो. याने हात चोळल्याने हाताचे बॅक्टिेरिया नष्ट होतात.

आपण फिट एन फाईन असावं असं प्रत्येकालाच वाटते. त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्नही केले जातात. कधी जिमला जात तर कधी घरच्या घरी व्यायाम करत फिट राहण्याचा प्रयत्न अनेक तरुणांकडून होतो. यामध्ये शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही डाएट प्लॅन नाहीतर आणखी काही केले जाते. पण तुम्हाला फिट रहायचे असेल तर काही गोष्टी योग्य पद्धतीने आणि नियमित पाळणे आवश्यक आहे. या गोष्टी केवळ तुमच्या आहारावर नाही तर संपूर्ण जीवनशैलीवर अवलंबून असतात. हे बदल केल्यानंतर नकळत तुम्ही फिट असल्याचे तुम्हाला जाणवेल. पाहूयात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही फिट राहू शकाल…

१. फिट राहण्यासाठी तुमचा दिवस चहा किंवा कॉफीने सुरु न करता एखाद्या फळाने करा. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. याबरोबरच तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुकाही खाऊ शकता.

२. तुमचा नाष्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण या प्रत्येक खाण्यात एक चमचा तूपाचा समावेश करा. तुपामुळे तुमची बद्धकोष्ठतेची तक्रार कमी होईल, त्याचप्रमाणे रक्ताची आणि साखरेची पातळी चांगली राहण्यासाठी आणि अॅसिडिटी कमी होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. याबरोबरच गूळ आणि तूप सोबत खाल्ल्यासही ताण कमी होण्यास मदत होते.

३. व्यायाम करताना ज्या गोष्टी तुम्हाला येत नाहीत त्या करायचा प्रयत्न करा. काही व्यायामप्रकार करायला जास्त अवघड असतात, तरीही ते करायचे सोडून देऊ नये. आपल्या फिटनेससाठी ते कसे जमतील याचा प्रयत्न करत रहावा.

४. आपण दिवसातील बराच काळ विविध तांत्रिक उपकरणांबरोबर असतो. हा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न करावा. हातात सतत असणारा मोबाईल, डोळ्यासमोर असणारा लॅपटॉप यामुळे मानदुखी, शरीराची ठेवण अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या समस्या कमी करायच्या असतील तर उपकरणांचा वापर कमीत कमी होईल याकडे लक्ष द्यायला हवे.

५. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाणे बंद करा. प्रक्रिया केलेले अन्न आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे ताजे आणि शक्यतो घरात तयार केलेले अन्न खाण्याचा प्रयत्न करा.

६. आरोग्य चांगले रहायचे असेल तर पुरेशी झोप आवश्यक असते. व्यक्तीला किमान ७ ते ८ तासांची झोप गरजेची असते. त्यामुळे फिट राहण्यामध्ये झोपेचाही महत्त्वाचा रोल असतो.

Dr. Palavi Gholap
Dr. Palavi Gholap
BAMS, Ayurveda Family Physician, 9 yrs, Pune
Dr. Pawan Sarda
Dr. Pawan Sarda
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Sandeep Awate
Dr. Sandeep Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 15 yrs, Pune
Dr. Varun kumar  PT
Dr. Varun kumar PT
BPTh, Homecare Physiotherapist Physiotherapist, 10 yrs, Pune
Dr. Divya Prakash
Dr. Divya Prakash
MDS, Dentist Implantologist, 6 yrs, Pune
Hellodox
x