Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

स्वयंपाकघरात आपण रोज जे टॉवेल हात पुसण्यासाठी वापरत असतो, त्यामुळे घातक जीवाणूंचा प्रसार होऊन काही वेळा विषबाधेचा धोका निर्माण होतो, असे भारतीय वंशाच्या संशोधकाने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. एकूण ४९ टॉवेल यात तपासण्यात आले. त्यात जीवाणूंची वाढ जास्त प्रमाणात दिसून आली. कुटुंबातील जास्त सदस्य हे टॉवेल भांडी पुसणे, हात पुसणे, गरम भांडी पकडणे, साफसफाई करणे यासाठी वापरत असतात. त्यावर एका वापरातच बरेच जीवाणू येतात. टॉवेल ओले असल्याने त्यावर जीवाणू अधिक असतात. कोरडय़ा टॉवेलवर ते कमी असतात.

४९ टॉवेलमध्ये ३६.७ टक्के कोलीफॉर्म, ३६.७ टक्के एंटरोकॉकस, १४.३ टक्के एस ऑरियस जीवाणूंच्या वाढीस अनुकूल होते. स्वयंपाकघर व इतर कारणांनी होणारा जीवाणूंचा प्रसार यात तपासण्यात आला असे मॉरिशस विद्यापीठाच्या सुशीला बिरानजिया यांनी सांगितले.

कुटुंबाच्या सवयी व कुटुंबाचा आकार तसेच रचना यावर जीवाणूंचा प्रसार अवलंबून असतो. १०० टॉवेल महिनाभराच्या वापरानंतर तपासले असता त्यावर वेगवेगळे जीवाणू आढळून आले. एस ऑरियस जीवाणूचे प्रमाण कमी सामाजिक व आर्थिक गटांच्या कुटुंबात जास्त दिसून येते. बहुवापराचे टॉवेल व ओले टॉवेल यात इशरेशिया कोली जीवाणू जास्त प्रमाणात आढळून आले. कोलिफॉर्म व एस ऑरियस जीवाणू मांसाहार करणाऱ्या कुटुंबात जास्त दिसून येतात.

इशेरिशिया कोलाय हा जीवाणू अनारोग्यकारक सवयी दाखवतो कारण तो विष्ठेतून पसरत असतो. यातून र्सवकष परिणाम म्हणून विषबाधा होण्याची शक्यताही असते अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

लस गर्भवती महिलांना विविधं रोगांपासून प्रतिकार करण्यासाठी शक्ती प्रदान करतात, जी अन्यथा गरोदरपणाच्या काळात संकुचित झाल्यास गंभीर ठरू शकते. शिवाय नवीन जन्मणाऱ्या बाळाला ही रोगप्रतिकार शक्ती प्रदान करते. टिटॅनस टॉक्साइड ही गर्भवती महिलांस २४ आठवडयानंतर नियमितपणे देण्यात येणारी लस आहे. ही लस दोन वेळा ४ आठवडे द्यावी.

इतर लस गर्भधारणेदरम्यान सुरक्षित आहेत, त्यामध्ये हेपटायटीस बी लसी, रेबीज व्हॅकिन, डिप्थीरिया आणि इन्फ्लुएंझा लसींचा समावेश आहे.
गर्भ समागमाच्या सैद्धांतिक जोखीमांमुळे गर्भधारणेदरम्यान प्रतिबंधात्मक लक्षणे दिसतात. ज्यामध्ये मेसल्स, मम्प्स, रूबेला (एमएमआर), व्हॅरिसेला (चिकन पॉक्स), बीसीजी (टीबी), पिवळे लस आणि पोलिओची लस यासारखी लस समाविष्ट आहेत. लसीकरण झालेल्या स्त्रीला कमीत कमी ४ आठवडे गरोदर न राहण्याचा सल्ला द्यावा.

हॅपीटायटीस लस

संसर्गग्रस्त लसीचा धोका जास्त प्रमाणात संक्रमण होण्याची शक्यता असताना गर्भवती महिलेला हिपॅटायटीस लस मिळणे आवश्यक आहे. याची नियमितपणे शिफारस केली जात नाही.

हॅपीटायटीस बी लस

तीन डोस- ०,१,६ महिने, लसीकरण न केल्यास गर्भधारणेदरम्यान दिली जाऊ शकते. विशेषत: उच्च जोखमीच्या प्रकरणांमध्ये गर्भाधारणेच्या काळात दिलेली इन्फ्लूएन्झा लस गर्भवती महिलेचा विषाणूंपासून संरक्षण करते. शक्यतो इमर्जन्सी नसल्यास ही लस १२ आठवड्यांनंतर द्यावी. यामुळे बाळामध्ये इन्फ्लूएन्झाच्या संक्रमणांचादेखील ६ महिने प्रतिबंध होईल, जोपर्यंत बाळाला इन्फ्लूएन्झासाठी कोणतीही लसीकरण प्राप्त होत नाही तोपर्यंत ही लस आईला प्राणघातक एच 1 एन 1 विषाणु संसर्गापासूनदेखील रक्षण करते ज्यामध्ये न्यूमोनियामुळे महिलेचा मृत्यू ही होऊ शकतो. ही इन्फ्लूएंझाची लस दरवर्षी बदलली जाते. प्रत्येक वर्षीच्या संवेदनाक्षम इन्फ्लूएंझा विषाणूंवर ही लस अवलंबून असते. जून आणि ऑक्टोबर दरम्यान लस देण्याची शिफारस केली जाते.

डी-टॅब लस

डिप्टीरिया, टिटॅनस आणि पार्टीसिस डी-टॅब लसीकरण दिले जाऊ शकते. २० आठवड्यांनंतर गर्भधारणा झाल्यानंतर २८ आठवड्यांनंतर एक इंजेक्शन द्या. यामुळे अर्भकाचे ६ महिन्यापर्यंत रक्षण होऊ शकते

अॅन्टी-आरएच-डी लस

RH -VE महिलेचा पार्टनर RH +VE (अप्रत्यक्ष कूंबची टेस्ट केल्यानंतर) असल्यास गर्भधारणेच्या २८ आठवड्यात अँटि-आरएच-डी लसची शिफारस केली जाते. तसेच बाळाचे रक्तगट RH +VE असल्यास डिलीव्हरीनंतर पुनरावृत्ती केली जाऊ शकते. यामुळे भविष्यात गर्भपात होण्यास प्रतिबंध होतो.
(इरिथोब्ल्लास्टोस्फेटलीस प्रतिबंध)

प्रवास लस

ही प्रवासी लस ३ रोगांसंबंधित आहे, पिवळा ताप, जपानी तापरोग आणि टायफाईड ताप विरोधात आहे.

पीतज्वर

सीडीसीने गर्भधारणेदरम्यान पिवळा ताप टाळावा अशी शिफारस केली जाते. जर एखाद्या स्त्रीला स्थानिक परिस्थितीत प्रवास करणे आवश्यक असेल, तर तिला ही लस दिली जाते. तथापि, लसीकरण न झाल्यास गर्भवती नसलेल्या स्त्रिया ४ आठवड्यासाठी गर्भनिरोधक वापरतात.

जपानी एन्सेफलायटीस

जपानी तापरोग- यासंबंधी गर्भधारणेदरम्यानचा पुरेसा अभ्यास उपलब्ध नाही. म्हणूनच सावधगिरी बाळगली पाहिजे, फक्त गर्भवती महिलांनी स्थानिक भागात प्रवास केला पाहिजे.

विषमज्वर

साधारणपणे स्त्रियांना एमएमआर लसी व प्रसूतीनंतर चिकन पॉक्स विरूद्ध लस दिली जाऊ शकते कारण स्तनपानवेळी ती सुरक्षित आहे. सर्वसाधारणपणे, गर्भवती स्त्रियांना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. साबण आणि पाण्याने नियमितपणे आपले हात स्वच्छ करा. तसेच संवेदनाक्षम किंवा गर्दीच्या भागात मास्कचा वापर करावे. हे सर्व गर्भवती महिलांमध्ये संसर्ग टाळण्यास मदत करेल.

नवजात शिशूची त्वचा नाजूक असते. अशा वेळी तुम्हाला बाळाच्या त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. त्याच्या त्वचेसाठी कोणते प्रॉडक्ट योग्य आहे आणि कोणते अयोग्य, याचा निर्णय तुम्हाला खूप विचारपूर्वक घ्यावा लागेल. कारण, प्रत्येक कॉस्मेटिक प्रॉडक्टध्ये केमिकल असतात. यामुळे बाळासाठी योग्य प्रॉडक्ट निवडणे आवश्यक आहे.

* तुम्ही पहिल्यांदाच बाळाला शॅम्पू किंवा साबणाने आंघोळ घालत आहात. त्या साबणाने बाळाला इजा होईल, अशी भीती तुम्हाला वाटत असेल, तर पहिल्यांदा एकाच जागी साबण लावा. बाळाची त्वचा लाल पडली किंवा तेथे खाज येऊ लागल्यास तत्काळ साबणाचा वापर थांबवा.

* सहा महिन्यांपेक्षा लहान बाळांना साबणाच्या वडीने चोळून आंघोळ घालू नका. साबणआपल्या हाताला लावून मग बाळाला आंघोळ घाला. त्यामुळे बाळाच्या त्वचेवर साबणाच्या चोळण्याचे निशाण पडणार नाहीत.
* सुगंधुक्त साबणाचा वापर करा. ज्या साबणाला वास येतो, त्यात जास्त केमिकल असतात. त्यामुळे कमी सुगंधाचा, सुगंधुक्त साबणाचा वापर करावा.

* बाळाच्या त्वचेला खूप जास्त चोळण्याची गरज नसते. कारण, त्यांच्या त्वचेवर धूळ जमा होत नाही. तुम्ही फक्त मालिश करा आणि आंघोळ घाला.

* तीन वर्षांपर्यंतच्या बाळाला बबल्स बाथ देऊ नये. यामुळे त्याच्या मूत्र मार्गात संक्रण होण्याची भीती असते.

झोप ही गोष्ट प्रत्येकालाच अत्यंत प्रिय असते. त्यामुळेच मग सुट्टीच्या दिवशी अगदी तासन्‌ तास अंथरुणात लोळत राहणे अनेकांची सवय असते. मात्र तुम्हाला हे माहितीय का? की, शनिवार, रविवार म्हणजेच आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी भरपूर झोपल्यामुळे आपलं आयुष्य वाढण्यास मदत होते. झोप या विषयावर संशोधन करणार्‍या एका आंतरराष्ट्रीय टीमच्या जर्नल ऑफ स्लीप रिसर्चमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

अनेकदा कामाच्या धावपळीत आठवड्याभरात झोप पूर्ण होत नाही आणि त्याचाच परिणाम हा आरोग्यावर होत असतो. झोपेवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, जे लोक दररोज सहा किंवा सात तास झोपतात त्यांच्या तुलनेत पाच किंवा त्यापेक्षा कमीतास झोपणार्‍यांना लवकर मृत्यू येण्याचा धोका हा अधिक असतो.

तसेच सुट्टीच्या दिवशी जे लोक अधिक तासांची पुरेशी झोप घेतात त्यांचं आयुष्य वाढण्यास मदत होते. मात्र ज्याप्रमाणे पाच तासांपेक्षा कमी तास झोपणं जसं आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असतं. तसेच पुरेशा झोपेपेक्षा जास्तीची झोप घेणंही महागात पडू शकतं. स्वीडनध्ये जवळपास 40,000 लोकांचा या संशोधनासाठी अभ्यास केला गेला.

लवकर निजे लवकर उठे त्यास आरोग्य लाभे हे वचन आपण लहानपणी ऐकलेले असते. घरातील आजी-आजोबा रात्री लवकर जेवत असल्याचेही पाहिले असेल. आजही खेडेगावात रात्री 8 च्या सुमारास जेवतात. पण शहरात परिस्थिती वेगळी आहे. शहरांतील बरेचजण रात्री 10 आणि त्यानंतर जेवतात. नाईटशिफ्टमुळे काहींच्या जेवणाच्यावेळा अनिश्चित असतात. मात्र, आरोग्यशास्रानुसार रात्री उशिरा जेवण करणे हे अयोग्य मानले गेले आहे.

चयापयच क्रियेवर परिणाम- चयापचय क्रिया वेगवान असेल तर शरीरातील चरबी वेगाने जळून आपण सडपातळ राहू शकतो. मंद वेग असलेल्या चयापचय क्रियेच्या व्यक्तींध्ये चरबीचे ज्वलन होण्याची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे काही व्यक्ती जाड होतात. रात्री उशिरा जेवल्यामुळे जास्त कॅलरीज पोटात जाऊन आपली झोप पूर्ण होत नाही. परिणामी आपले वजन वाढते.

स्थूलता वाढते : रात्री उशिरा भूक लागल्यावर बर्‍याचदा हवे ते खाल्ले जाते. त्यावेळी वजन वाढेल याचा विचार केला जात नाही. यामुळे चयापचयाच्या वेगात बदल होतो. दिवसा जेवतो, तेव्हा शरीराची काही ना काही हालचाल होत राहाते. पणरात्री झोपताना चयपचयाचा वेग कमी होतो. त्यामुळे रात्री उशिरा आपण जे काही खाऊ ते अत्यंत कमी वेगाने पचते आणि त्यामुळे वजन वाढते.
पित्तप्रकोप : रात्री उशिरा जेवल्यास पित्तप्रकोप किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण होते. छातीत जळजळ होते. खूप रात्री जेवल्यास त्याचे पचन योग्यप्रकारे होत नाही आणि अन्न पचण्यासाठी आवश्यक आम्ल पुन्हा अन्ननलिकेत जाते. त्यामुळे अपचन होते. सातत्याने हे होत राहिल्यास गरगरणे, अस्वस्थ वाटणे, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्‌भवतात.

उच्च रक्तदाब : रात्री उशिरा जेवल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदयाच्या आजाराला आमंत्रण मिळते. म्हणूनच रात्रीच्या जेवणाची वेळ सांभाळणे गरजेचे आहे.
रात्री उशिरा जेवल्याने झोपेशी निगडित समस्याही निर्माण होतात. रात्री उशिरा जेवणार्‍या लोकांमध्ये चिडचिडेपणावाढू शकतो.

Dr. Vinay Sachdeva
Dr. Vinay Sachdeva
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 5 yrs, Pune
Dr. Komal Khandelwal
Dr. Komal Khandelwal
BAMS, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Sheetal Gulhane
Dr. Sheetal Gulhane
BAMS, Ayurveda Dermatologist, 10 yrs, Pune
Dr. Jayashree Suryavanshi
Dr. Jayashree Suryavanshi
BAMS, Garbh Sanskar Diet Therapeutic Yoga, 21 yrs, Pune
Dr. Varshali Mali
Dr. Varshali Mali
MBBS, Gynaecologist Obstetrician, 6 yrs, Pune
Hellodox
x