Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

अधिक उपवास केल्यास शारीरिक व्याधी उत्पन्न होतात. यामुळे गॅसेस, अल्सर, डोकेदुखी उद्भऊ शकते. याशिवाय रक्ताची कमी भरून निघते.

आपल्या आवडीचे जेवन घ्या, मात्र चरबीयुक्त जेवनाचे सेवन कमी प्रमाणात करा. आपण दररोज दोन अंडी घेत असल्यास एक घ्या.

आपल्या व्यंजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेनिस, क्रिकेट, फूटबॉल यासारखे खेळ खेळण्यास चांगला परिणाम जाणवतो. यामुळे चरबी कमी होते.

आवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात.

आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवनानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा.

आहारात कडधान्ये, पालेभाज्या, फळे भरपूर घ्या. गव्हाचा आटा वापरा, बटाटे सालीसकट खा, भरपूर द्रव्यपदार्थ घ्या.

आहारात हिरव्या भाज्या, ब्रेड, तांदूळ, दूध, दही, मास, अंडी, मासळी, फळे यामुळे पदार्थाचे सेवन करा. यामुळे शरीरास लागणारे व्हिटॅमिनमिळते.

एकमेकांचे कपडे वापरू नयेत. दुसर्‍यांचा कंगवा, टॉवेल व इतर वस्तू उपयोगात आणू नये. त्याने त्वचेच्या तक्रारी उद्भवतात.

एकाचवेळी खूप जेवनापेक्षा थोडे थोडे जेवावे ते पुर्ण पचते व आरोग्याला फायदेशीर असते.

एखादा दिवस जेवनाऐवजी फक्त एक वाटी कोबी, मोड आलेली कडधान्ने, एक वाटी, ग्लासभर ताक, मुळा, गाजर, टमाटर, काकडी, कोणतेहीएखादे फळ घ्यावे.

काकडी, कांदा, गाजर, मुळा, बीट, तोंडली यांचे सेवन जास्त करावे, यापासून क जीवनसत्व प्राप्त होते.

पायांना भेगा पडल्यास बर्‍याच वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे पायांचे सौंदर्यही नष्ट होते. म्हणूनच या त्रासाकडे दुर्लक्ष करता कामा नये. काही घरगुती उपायाने भेगांना पायबंद घालणे शक्य आहे.

झोपताना पाय स्वच्छ धुवून हर्बल डेव्हलपर क्रीम लावल्यास त्वचा मऊसर होऊन भेगांचा त्रास कमी होतो.

कडूलिंबाचा पाला कुटून, रस काढून पायांना लावल्यास भेगा कमी होतात.

लोणी, आंबेहळद आणि मीठ हे तिन्ही एकत्र करून रोज पायांना लावल्यास आराम पडतो.

बोरिक पावडर, जैतून तेल, व्हॅसलिन हे एकत्रित करून भेगांमध्ये भरावे.

चंदन उगाळून लेप लावल्यासही भेगा कमी होतात. ग्लिसरिन, गुलाबपाणी, लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश केल्यास भेगा कमी होतात.

हळदीमध्ये कोमट तेल टाकून ते मिश्रण भेगांमध्ये भरल्यासही हा त्रास कमी होतो.

भेगा पडू नयेत, यासाठी आंघोळ करताना रोज पायांचे तळवे प्युमिक स्टोनने घासावेत.

आठवड्यातून एकदा बदाम आणि तिळाचे तेल समप्रमाणात घेऊन तळव्यांना मालीश करावे. घरातही चप्पल वापरावी.

बाहेर पडताना तळपायाचा मातीशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. या सर्व उपायांनी पायांचे सौंदर्य जपणे सहज शक्य आहे.

एखाद्या विषाणूचे देशात अतिक्रमण होणे आणि त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होणे हे आता म्हणावे तितके नवीन नाही. काही वर्षांपूर्वी आलेला स्वाईन फ्लू असो किंवा चिकनगुनिया असो. केरळमध्ये नुकताच निपाह नावाच्या विषाणूची बाधा झाल्याने मागच्या काही तासांत ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. मानवी जीवनावर अचानकपणे आक्रमण केलेला हा व्हायरस नेमका आला कुठून, त्याची लक्षणे काय आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, त्यावरील उपचार यांबाबत वेळीच माहिती घेणे आवश्यक आहे. सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे केंद्रसरकारने त्याबाबत आवश्यक ती पाऊले उचलली असतील तरीही या विषाणूबाबत विस्ताराने जाणून घेऊया…

१. जनावरे आणि माणूस यांच्यावर वेगाने हल्ला करणारा तसेच गंभीर आजार निर्माण करणारा हा विषाणू आहे.

२. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, १९९८ मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगई येथील निपाह नावाच्या गावात हा विषाणू सापडला होता. त्या गावाच्या नावावरुन त्याचे नाव निपाह ठेवण्यात आले.

३. सुरुवातीला या रोगाची लागण डुकरांमध्ये झाली आणि नंतर तो तेथील शेतकऱ्यांमध्ये पसरला. यावेळी २६५ जणांना त्याची लागण झाली आणि त्याने गंभीर स्वरुप धारण केल्याने सगळ्यांचा मृत्यू झाला.

४. ताप, डोकेदुखी, विस्मरण, आळस येणे ही या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत. तर कोमात जाणे आणि मृत्यू ही त्याची गंभीर लक्षणे आहेत.

५. या आजारावर संशोधन सुरु असले तरीही त्यावर अद्याप कोणतेही उपयुक्त औषध सापडलेले नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

६. या आजारापासून वाचण्यासाठी झाडावरुन पडलेली फळे तसेच खजूर खाऊ नका असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई : तुमच्याही कंबरेजवळील भाग अधिक सुटू लागल्याचे तुम्हाला जाणवते का? कारण आजकाल ही समस्या अगदी सामान्य झाली असून अनेकजण त्यामुळे त्रस्त आहेत. यासाठी फक्त जंक फूड कारणीभूत नसून अनेक गोष्टी जबाबदार आहेत. आपली गुंतागुतीची आणि धावपळीची जीवनशैली देखील याला जबाबदार ठरते.

पुरेशी झोप न घेणे:
अपुऱ्या झोपेचा परिणाम कंबरेजवळील चरबी सुटण्यावर होतो. पुरेशी झोप न घेणे हे दिवसाला ३०० अधिक कॅलरीज घेण्यासमान आहे.

तुमची बॉडी अँपल शेप असल्यास:
जर तुमची बॉडी अँपल शेप असेल तर मांड्या, पार्श्वभागाऐवजी कंबरेजवळील भाग सुटण्याची शक्यता अधिक असते. जर तुम्हाला जेनेटीकरित्या असा त्रास असेल आणि तुमची अँपल शेप बॉडी असेल तर त्यापासून सुटका मिळवणे काहीसे कठीण आहे.

तुम्ही दिवसभर बसून असल्यास:
दिवसभर बसून राहिल्याने वजन वाढते. विशेषतः शरीराच्या खालच्या भागाचे ( lower body) वजन अधिक वाढते. जर तुमचे काम बैठ्या स्वरूपाचे असेल तर मध्ये मध्ये ब्रेक घ्या आणि थोडं फिरून या.

अयोग्य फॅट्सचे सेवन:
मटण, दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या सॅच्युरेटेड फॅट्सच्या अति सेवनाने visceral fat वाढीस लागते आणि कंबरेजवळील भागात जमा होऊ लागतात.

तणावग्रस्त असल्यास:
जर तुम्ही तणावग्रस्त असाल तर तुमच्या कंबरेजवळ अधिक फॅट्स जमा होण्याची शक्यता जास्त असते. cortisol हे स्ट्रेस हार्मोन कंबरेभोवती visceral fat जमा होण्यास कारणीभूत ठरते.

रात्री उशिरा जेवण्याची सवय:
जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तर झोपेत फॅट्सचे ऊर्जेत रूपांतर करणे शरीराला कठीण जाते. त्यामुळे चरबी वाढते. तसंच अपचन, अॅसिडिटी सारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते.

मुंबई : पेज थ्री कल्चर जगणाऱ्या सेलिब्रेटी मंडळींचे अनुकरण करणे हे काही आपल्या समाजाला नवे नाही. पण, या उच्चभ्रू मंडळींचे अनुकरण तुम्ही डोळे झाकून करत असाल तर, सावधान. सेलिब्रेटींप्रमाणे हाय हिल्स वापरण्याच्या ट्रेण्डणे सध्या तरूणी आणि महिलांमध्ये जोर धरला आहे. अनेकदा तर, पतीला, बॉयफ्रेण्डला आवडते म्हणूनही हाय हिल्स वापर वापरल्या जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का, हाय हिल्स वापरण्याचा जर अतिरेक झाला तर तुम्हाला विविध व्याधींना सामोरे जावे लागते. म्हणूनच हाय हिल्स वापरण्यापूर्वी ही माहिती जरूर वाचा.

एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, साधारण ५ इंचापेक्षा अधिक उंचीची हाय हिल्स अती प्रमाणात वापरली तर, त्या महिलेला गर्भधारणा होताना समस्या निर्माण होऊ शकतात. अशा महिलांमध्ये गर्भधारणेची गती मंदावते.

शारीरिक त्रासांचे आव्हान
डॉक्टरांच्या मते हाय हिल्स वापरणाऱ्या मुली, महिलांचे पायही तितके मजबूत असावे लागतात. जर तुमचे पाय अगदीच लुकडे असतील, तुमच्या पायाच्या टाचाही अगदीच सडपातळ असतील तर, तुम्हाला या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागतात. कारण, तुमचे ओटीपोट पुढच्या बाजूला झुकते जे कमरेच्या दुखण्याला कारणीभूत ठरते. तुमच्या ओटीपोटात शरीराचे अनेक महत्त्वाचे घटक असतात. पण, तुमचे ओटीपोट जेव्हा पुढच्या बाजूला झुकते तेव्हा त्याचा संघर्ष पोटातील इतर घटकांशी होतो. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता मंदावते. काही केसेसमध्ये तर डॉक्टर महिलांना वांजपणाच्या समस्येला तोंड द्यावे लागते असेही म्हणतात. हाय हिल्सचा महलांच्या मासिक पाळीशीही संबंध येतो. हाय हिस्समुळे मासिक पाळीचे चक्र बदलते. दरम्यान, हाय हिल्स सतत वापरल्याने कंबरदुखी, खांद्यांचे दुखणे, डोकेदुखी, केस गळणे, पाय दुखणे असा त्रास संभवतो.

कमी वयात अधिक परिणाम
हाय हिल्स वापरण्याची फॅशन आजकाल लहान मुलींमध्येही पहायला मिळते. पण, त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसीक जीवनावरही परिणाम होतो. हाय हिल्स वापरल्यामुळे पायांचे दुखणे, हाडे ठिसूळ होणे, पायांचा, पार्श्वभागाचा आकार बदलणे असा त्रास संभवतो.

Dr. Smita  Patil
Dr. Smita Patil
BHMS, Homeopath, 15 yrs, Pune
Dr. Pratibha Labade
Dr. Pratibha Labade
BAMS, Ayurveda Immuno Dermatologist, 19 yrs, Pune
Dr. Nitin B. Bhise
Dr. Nitin B. Bhise
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 21 yrs, Pune
Dr. Vivek  Sahu
Dr. Vivek Sahu
MD - Homeopathy, 17 yrs, Pune
Dr. Suchita Tupdauru
Dr. Suchita Tupdauru
BSMS, Homeopath, 18 yrs, Pune
Hellodox
x