सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक असते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र तरीही व्यसन असणाऱ्यांना त्याचे भान राहत नाही. इतकेच काय सिगारेटच्या पाकीटावरही ती ओढणे आरोग्यासाठी हानिकारक असते असे लिहीलेले असते. मात्र तरीही त्याचा नाद सोडणे सवय असलेल्या लोकांसाठी कठिणच. हे लक्षात घेऊन आता सरकारने एक अनोखा नियम लागू केला आहे. ज्यांना सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन आहे त्यांच्यासाठी आता या उत्पादनांवर एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार आहे. आपले व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी १८००-११-२३५६ हा टोल फ्री क्रमांक अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास व्यक्तीचे मोफत समुपदेशन केले जाणार आहे.
याबरोबरच सिगारेट आणि तंबाखूच्या पाकीटावरील ८५ टक्के भागात हे व्यसन वाईट आहे हे दाखविणारे एक प्रतिकात्मक छायाचित्रही देण्यात येणार आहे. या चित्राचाही व्यसन सोडायचे असणाऱ्यांना सकारात्मक उपयोग होईल असा अंदाज आहे. तसेच यावर काही प्रबोधनात्मक संदेशही देण्यात आले आहेत. तंबाखू हे मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे, तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो असे हे संदेश आहेत. हे सगळे बदल येत्या सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार असून संबंधित कंपन्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतचा अध्यादेश जाहीर कऱण्यात आला असून त्यामध्ये याबाबतची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.
उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा.
उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा.
फळांचे सरबत :- १ अननस , २ संत्री, २ मोसंबी, २ निंबू
कृती:- सर्वांचा रस काढून घ्या. रसाच्या दीडपट साखर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पाक करून घ्या. थंड झाल्यावर वरील रस बॉटल मध्ये भरावा. तो १५ ते २० दिवस सहज टिकतो. आयत्यावेळी थंड पाण्यात घालून सरबत घेता येते. त्यात किंचित मीठ घातले तरी चालेल.
खस सरबत :- साखर आणि पाणी एकत्रित करून गरम करा त्यास चांगली उकळी येऊ द्या. थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात खस इन्सेस आणि रंग घाला. पाहिजे तेव्हा थंड पाण्यात सरबत घालून प्या.
अननसाची लस्सी
साहित्य :- ताक किंवा दही, अननसाचे तुकडे, वेलची पूड, किंचित साखर
कृती :- अननसाचा रस काढून सर्व एकत्रित करून मिक्सर काढा,त्यात बर्फ घालून ग्लास मध्ये लस्सी द्या, त्याला छान सुगंध येतो .
कैरीचे पन्हे :
कैरीची साले काढून किसून घ्या. थंड पाण्यात कुस्करून गाळून घ्या. त्यात साखर वेलचीपूड टाका. किंचित मीठ आणि बर्फ घालून प्यायला द्या
चिंचेचे सरबत !
वाळलेली चिंच घ्यावी त्यांतील चिंचोके काढून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी. काही वेळाने चिंच कुस्करून घ्यावी आणि चिंच काढून घ्यावी. चिंचेच्या पाण्यात साखर,मीठ, सोप आणि जिरे पूड टाकावी व बर्फ टाकून पिण्यास द्यावे.
ॲल्युमिनियमपासून तयार केलेल्या चंदेरी रंगाच्या वेष्टनांचा अन्नपदार्थ शिजवताना उपयोग करणे वा अन्नपदार्थ त्यामध्ये बांधून देणे हे दोन, तीन दशकांपूर्वी उच्चभ्रू-श्रीमंत वर्गामध्ये सर्रास होते. कारण ते पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्यात धन्यता मानतात. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मग उच्च मध्यम वर्ग, पुढे मध्यम आणि कनिष्ठ वर्गातले लोक सुद्धा आजकाल या ॲल्युमिनियम फॉईल्सचा नित्य उपयोग उपयोग करु लागले आहेत. कोण आनंद होतो, घरातल्या स्त्रियांना, त्या आपल्या नवर्याला वा मुलामुलीला त्यांच्या डब्यातले जेवण गरम राहावे म्हणून ॲल्युमिनियमच्या चकचकीत-चंदेरी वेष्टनामध्ये बांधून देतात तेव्हा. मात्र याचा आरोग्याला धोका संभवतो, याची यांना कल्पना असते काय?
ॲल्युमिनियमच्या संपर्कात येणार्यांना कॅन्सर, दमा, हाडांवर विपरित परिणाम होऊन हाडे कमजोर होणे व चेताकोषांवर विपरित परिणाम होऊन स्मृतिभ्रंशाचा धोका, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड, या विकृती संभवतात. मेंदुमधील चेताकोषांमध्ये ॲल्युमिनियमचे सूक्ष्म कण अडकल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले आहे, ज्याचा संबंध स्मृतिभ्रंशाशी( अल्झायमर्सशी) असण्याची शक्यता आहे. एकंदरच मेंदुमधील चेताकोषांच्या वाढीमध्ये व कार्यामध्ये ॲल्युमिनियमच्या कणांमुळे अडथळा येण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करतात. याशिवाय हाडांना सुदृढ ठेवणार्या कॅल्शियमच्या कणांना हाडांपर्यंत पोहोचण्यात ॲल्युमिनियमचे कण अडथळा आणतात, ज्यामुळे एकीकडे रक्तामध्ये नको तितके कॅल्शियम आणि हाडांमध्ये मात्र कॅल्शियमची कमी, परिणामी हाडे कमजोर अशी विचित्र परिस्थिती ओढवते.
या सर्व संशोधनाला विरोध करणारे शास्त्रज्ञ सुद्धा आहेत, ज्यांच्या मते ‘अल्प मात्रेमध्ये शरीरात जाणारे ॲल्युमिनियम बाहेर फेकणे शरीराला शक्य आहे व अत्याधिक मात्रेमध्येच वरील धोके संभवतात’. त्यामुळे आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.
हे तर नक्की आहे की ॲल्युमिनियम फॉईल्स कधीकाळी महाग होत्या आणि आता स्वस्त आणि सहज उपलब्ध आहेत. सहज उपलब्धी आणि स्वच्छतेसाठी अनुकूल या निकषावर समाजाला ॲल्युमिनियम फॉईल्स उपयुक्त वाटत असले तरी पाश्चात्त्यांच्या या गोष्टी स्वस्त आणि मुबलक उपलब्ध झाल्या की मनात शंका उभी राहते. महत्त्वाचं म्हणजे त्याविषयी प्रतिकूल मत व्यक्त करणार्या संशोधकांच्या मतांकडेसुद्धा दुर्लक्ष करता येत नाही. अशा वेळी तारतम्याने नेमकी काय काळजी घ्यायची ते बघू.
* अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम अन्नामध्ये झिरपण्याचा धोका अधिक.
* गरम अन्नपदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये बांधून देणे सुद्धा कटाक्षाने टाळावे.
* मसाले, सॉस, टॉमेटॉ केचप, आंबट फळांचे रस, आंबट फळे, वा आंबट पदार्थ शिजवताना तर ॲल्युमिनियम फॉईल मुळीच वापरु नये, असे संशॊधक सांगतात. आपले जेवण तर मसाल्याशिवाय तयार होत नाही.
* रस्सायुक्त भाज्या, कालवण, सांबार, तळलेले पदार्थ, लोणचं, पापड तसेच अन्य तेलतूपयुक्त अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी यांचा वापर करु नये.
* अम्लीय( ॲसिडीक) पदार्थ ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून देण्याची चूक कधीही करु नये.
* बिर्याणी वगैरे तयार करताना ॲल्युमिनियम फॉईलचे आवरण त्यावर बांधणे धोक्याचे होऊ शकते.
* मायक्रोवेव्ह, ओव्हनमध्ये अन्नपदार्थ तयार करताना त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल्सचा उपयोग करु नये. त्यासाठी अधिक जाडीच्या वेगळ्या शीट्स वापरण्याचा सल्ला दिला जातो, तरीही अधिक तापमानामध्ये ॲल्युमिनियम झिरपण्याचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
* सॅन्डविचसारखे गार पदार्थ गुंडाळायला हरकत नाही असे म्हणतात, पण विषाची परिक्षा घ्यायचीच कशाला?
तोंडाला चव आणणारी-स्वयंपाकघरात हमखास लागणारी
स्वयंपाकघरात नित्य आहारात वापरण्यासाठी चिंच आवश्यक असते. चिंच आमटी आणि भाजीत वापरतात.
पिकलेली चिंच भूक वाढवते. आंबटगोड अशी चव असणारी चिंच आणि चिंचेचं बी, टरफल यांचे औषधी गुणधर्म आहेत.
पिकलेल्या चिंचेचा स्वाद आंबट, गोड आणि तुरट असल्यानं भाजीत किंवा आमटीत वापरल्यानं तोंड स्वच्छ होतं.
चांगली पिकलेली चिंच एक किलो घेऊन ती दोन लीटर पाण्यात चार ते पाच तास भिजत ठेवावी. नंतर कुसकरून ते पाणी गाळून घ्यावं. पाणी अर्ध आटवावं. त्यात दोन किलो साखर मिसळून पाक करून घ्यावा. हे सरबत रात्री प्याल्यानं सकाळी शौचाला साफ होते आणि मलावरोधाची तक्रार/सवय दूर होते.
चिंचेचा कोळ, कांदा रस आणि आल्याचा रस एकत्रित दिल्यास ओकारी, जुलाब, पोटदुखी थांबते.
रक्ती आव, जुलाब विकारात चिंचोके (चिंचेचे बी) पाण्यात वाटून देतात. चिंचोक्यांपासून चिकटवण्यासाठी खळही बनवतात.
चिंचेच्या टरफलापासून चिंचाक्षार बनवतात वेगवेगळ्या वनौषधी आणि या चिंचेच्या क्षारापासून बनवलेल्या शंखवटी नावाच्या गोळ्या पोटदुखीवरचे उत्तम औषध आहे. लिंबू रसाबरोबर या गोळ्या सकाळ, संध्याकाळ २/२ या प्रमाणात घ्याव्या.
अशी ही चिंच स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक तर आहेच, त्याचप्रमाणे तोंडाची चव भागवणारी, आंबटगोड अशी चिंच वेगवेगळ्या गुणधर्मामुळे एक औषध म्हणूनही उपयुक्त आहे.
कमी शुक्राणू व्यक्तींना आजारपणाचा धोका इतरांपेक्षा अधिक असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनात स्पष्ट झाले आहे. संशोधन करण्यात आलेल्या ५,१७७ पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी, चरबीचे प्रमाण २० टक्के अधिक, उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्टेरॉल असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे लैंगिक वैशिष्टय़ांमध्ये वाढ करणारे टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची पातळी कमी असल्याचेही स्पष्ट झाले आहे. संशोधकांनी सांगितले की ज्या व्यक्तींमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते त्यांच्यामध्ये अधिक आरोग्य समस्या असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेची समस्या ही प्रत्येकी तीनपैकी एका जोडप्याची समस्या असल्याचे संशोधकांनी सांगितले.
परंतु नवीन अभ्यासासाठी संशोधकांनी इटलीतील जोडप्यांमधील पुरुषांच्या आरोग्याचा अभ्यास केला. वीर्याची गुणवत्ता ही पुरुषांच्या आरोग्याशी थेट संबंधित असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या अनेक व्यक्तींचा यादरम्यान संशोधकांनी अभ्यास केला. त्यानुसार ही समस्या असलेल्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधूमेह आणि हृदयविकाराचा धोका असल्याचेही संशोधकांनी स्पष्ट केले. या संशोधनात पुरुषांमध्ये १२ पटींनी टेस्टोस्टेरोन या संप्रेरकाची पातळी कमी असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे मांसपेशी आणि स्नायूंच्या आजारांचाही धोका संभवत असल्याचे संशोधकांनी सांगितले.