Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

पावसाळ्यात प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा 'भुट्टा' सध्या वर्षभरात कधीही उपलब्ध होतो. मक्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आपल्याला माहीत आहेत. पण मक्याच्या पीठाचे म्हणजेच, कॉर्न फ्लोरही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अनेक ठिकाणी तर मक्याच्या पीठापासून चपात्या तयार करण्यात येतात. अशातच पंजाबमधील मक्केकी रोटी आणि सरसों का सार संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. याशिवाय मक्याच्या पीठापासून तयार करण्यात आलेले पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. मक्याच्या पीठामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. याशिवाय यामध्ये ग्लूटन असत नाही त्यामुळे याचं सेवन शरीराला डायबिटीज आणि हायपरटेंशन यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव करतो. जाणून घेऊया मक्याच्या पीठाचे आरोग्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या फायद्यांबाबत...

मक्याच्या पीठाचे आरोग्यदायी फायदे खालीप्रमाणे :

डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी

मक्याच्या पीठामध्ये व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड मुबलक प्रमाणात असतं, त्यामुळे याचं सेवन डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. मक्याचे सेवन केल्याने डोळ्यांचं आरोग्य राखण्यास मदत होते.

एनीमियापासून बचाव

मक्याच्या पीठामध्ये आयर्न असतं त्यामुळे याचं सेवन केल्याने एनीमियाच्या समस्येपासून सुटका होते. मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने रक्ताची कमतरता होत नाही आणि शरीरामध्ये हिमोग्लोबिनचा स्तरही योग्य राहत नाही.

बद्धकोष्ट दूर करण्यासाठी

मक्याच्या पीठाचं सेवन केल्याने शरीरामध्ये मुबलक प्रमाणात फायबर पोहोचत नाही. ज्यामुळे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचा स्तरही सामान्य राहतो. त्यामुळे बद्धकोष्टाची समस्या दूर राहते.

वजन कमी करण्यासाठी

मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा मिळते. तसेच सतत भूक लागत नाही, ज्यामुळे तुम्ही ओव्हरइटिंग करण्यापासून वाचता. यामुळे वजन वाढण्याची समस्या होत नाही.

हायपरटेन्शन दूर ठेवतं

दररोज मक्याच्या पीठाचं सेवन केल्यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळतं. ज्यामुळे हायपरटेन्शनची समस्या दूर होते. तसेच ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं.

टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताह उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.

आज संपूर्ण जगभरामध्ये 'जागतिक वसुंधरा दिवस' साजरा करण्यात येत आहे. खरं तर एका दिवसापुरता वसुंधरा दीन साजरा करून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी प्रत्येक दिवशी आपली जबाबदारी ओळखून वागणं गरजेचं असतं. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राखणं, वातावरण प्रदूषणविरहीत ठेवण्यासाठी प्रयत्न करणं यांसारख्या गोष्टी आचरणात आणल्यामुळे पर्यावरण उत्तम राखण्यास मदत होते. पण तुम्हाला माहीत आहे का? सध्या मानवाने प्रदूषणाची एवढी हानी केली आहे की, आपण सर्वचजण प्रदुषित वायूमध्ये श्वास घेत आहोत. जे आपल्याला अनेक आजारांच्या विळख्यात अडकविण्यासाठी तयार आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, संपूर्ण जगभरामध्ये 102 असे आजार आहेत, ज्यांमध्ये 85 आजार होण्यामागील मुख्य कारण हे प्रदूषण आहे. अशातच पृथ्वीवर शांत आणि हेल्दी जीवन जगण्यासाठी वायू आणि जलप्रदूषणापासून बचाव करण्यासाठी काही उपाय करणं फायदेशीर ठरतं.

कोण-कोणते आहेत आजार?

मलेरिया, कॅन्सरचे काही प्रकार, पोटासंबंधिच्या समस्या आणि श्वसनाशी संबधित इन्फेक्शन, अस्थमा यांसारखे आजार प्रदूषित वातावरणात राहिल्याने होतात. पर्यावरण विशेषज्ञांनुसार, वातावरणामध्ये पसरणाऱ्या प्रदूषणामुळे मानवाच्या आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत. जर वाढत्या प्रदूषणावर वेळीच आळा घालण्यात आला नाही तर यामुळे इतरही अनेक परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

जल प्रदूषण अत्यंत घातक

स्वच्छ पाण्यासाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने काही मानकं तयार केली आहेत. त्यांच्यानुसार, 100 ते 150 स्तर टीडीएस असणारं पाणी स्वच्छ असतं. तुमच्या घरामध्ये जर आरओ (रिवर्स ऑसमोसिस) किंवा यूवी सिस्टिम असेल तर त्या तपासून घ्या. अनेकदा मिनरल वॉटर किंवा सप्लाय करण्यात आलेलं पाणी देखील पूर्णपणे शुद्ध नसतं. यामध्ये शरीराला नुकसान पोहोचवणारे जीवाणू गियार्डिया (Giardia) असतात. अनेकदा कंपन्या पाणी स्वच्छ करण्यासाठी नदी, नाले, तसेच भूमिगत स्त्रोत इत्यांदीमधून पाणी आणतात. हे पाणी स्वच्छ करण्यासाठी कोएगुलेंट (coagulants) केमिकल वापरण्यात येतं. हे केमिकल पाण्यामध्ये असणारे घाण स्वच्छ करतात. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायी असतं.

वायु प्रदूषणामुळे वाढतात श्वसनाचे विकार

आपल्याला जगण्यासाठी श्वास घेणं अत्यंत गरजेचं असतं. परंतु आपण प्रत्येक दिवशी प्रदूषित वातावरणामध्ये श्वास घेत असू तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. यामुळे अनेकांना श्वसानाच्या अनेक विकारांचा सामना करावा लागतो. हवेमध्ये अस्तित्वात असलेलं कार्बन मोनोऑक्साइड एखाद्या विषाप्रमाणे असतं. अशातच आपल्याला हा प्रयत्न करणं गरजेचं असतं की, घरातून बाहेर पडताना चांगल्या गुणवत्तेचा मास्क नक्की वेअर करा.

कचऱ्याचा ढिगारा

आसपास जमा झालेली घाण आणि कचऱ्यामुळे वातावरण खराब होतं. वर्तमानमध्ये सर्वात जास्त प्रयोग करण्यात येणार प्लास्टिक अत्यंत हानिकारक आहे. अनेक संशोधनांमधून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, जर आपल्या आजूबाजूचं वातावरण दूषित असेल तर यामुळे अनेक आजार होतात. गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांवरही या सर्व गोष्टींचा परिणाम होत असतो.

आहारामुळेही होतो परिणाम

शरीराला स्वस्थ आणि उर्जावान बनायचं असेल तर पौष्टिक आहाराचं सेवन गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही प्रदूषित वातावरणामध्ये पौष्टिक आहाराचं सेवन करत असाल तर यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकंपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

पावसाळा सुरू झाला की निसर्गामध्ये एक नवं चैतन्य निर्माण होतं. वातावरणातील हलका गारवा सुखकारक असला तरीही साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने काळजी घेणं आवश्यक आहे. प्रामुख्याने लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांनी या काळात काळजी घेणं आवश्यक आहे.

गरोदर स्त्रीयांसाठी नाजूक असलेल्या या काळामध्ये इंफेक्शन झाल्यास आईसोबतच गर्भावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी या दिवसांमध्ये विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

दूषित पाणी, उघड्यावरचे अन्न,डास यांच्यामुळे पावसात अनेक साथीचे आजार पसरतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया, लेप्टोपासून अगदी हेपिटायटीसचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे या इंफेक्शनपासून बचावण्यासाठी काही एक्सपर्ट टीप्स लक्षात ठेवणं गरजेचे आहे.

गरोदर स्त्रियांनी कशी घ्यावी काळजी ?
हात स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. नियमित हात स्वच्छ केल्याने इंफेक्शनचा धोका कमी होतो. WHO च्या अहवालानुसार, सुमारे 40-60 सेकंद हात स्वच्छ धुणं आवश्यक आहे. नकळत आपला अनेक ठिकाणी स्पर्श होत असतो. त्यामुळे बॅक्टेरियाचे इंफेक्शन वाढते.

गरोदरपणाच्या काळात खाण्या-पिण्यावर बंधनं येतात. अशावेळेस खाण्याची इच्छा नसते. त्यावेळेस नेहमीचं जेवण जेवण्याऐवजी अनेकजण फळांच्या सेवनावर अधिक भर देतात. मात्र पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून फळं विकत घेताना काळजी घ्या. खाण्यापूर्वी ती स्वच्छ धुवून घ्यावीत.

कच्च्या भाज्यांचे सलाड आहारात घेताना काळजी घ्या. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करा. गरोदरपणात 'या' पदार्थामुळे वाढतो मधुमेहाचा धोका

साचलेल्या पाण्यातून चालणं टाळा. पावसात भिजून घरी पोहचल्यानंतर पाय नीट स्वच्छ करा. पायांतील बोटांमधील भागही स्वच्छ करा.

जर तुम्ही खूप वेळ फक्त बसून काम करता. कोणताच ब्रेक घेत नाही तर तुमचं स्वास्थ बिघडण्याची दाट शक्यता आहे. सतत बसून राहण हे तुमच्या शरीरासाठी खूप घातक आहे.

यामुळे संशोधनाची अधिक गरज आहे. अमेरिकेतील रियो ग्रांदे वॅलीमध्ये युनिर्व्हसिटी ऑफ टेक्सासच्या लिंडा इयानेसने माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, खूप वेळ बसल्यामुळे वेगवेगळे आजार होतात. याबाबत जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.

खूप वेळ बसण्याचे दुष्परिणाम आहे. जगभरात एकूण मृत्यूंपैकी 4 टक्के लोकांचा मृत्यू हा फक्त दिवसातून 3 ते 4 तास बसल्यामुळे होत असल्याचं समोर आलं आहे.

सतत बसून राहण, टीव्ही पाहणे, तसेच खूप वेळ कॉम्प्युटरवर काम करणं हे अतिशय घातक आहे. एकाच कामासाठी तुम्ही एकाचवेळी 3 तास बसून काढले तर ते तुमच्या शरीरासाठी घातक आहेत.

54 देशांमध्ये याचे संशोधन करण्यात आले. जगभरातील 3.8 टक्के लोकांचा मृत्यू हा एकाचवेळी 3 तासाहून अधिक वेळ बसल्यामुळे होतो. याचा अर्थ या सवयीमुळे वर्षातून 4.33 लाख लोकांचा मृत्यू होते.

व्यसन हे दारूचे असो, सिगारेट अथवा तंबाखूचे, त्याचा आपल्या शरीरासह मनावर विपरीत प‍रीणाम झाल्याशिवाय राहत नाही. नशा केल्याने आपले गुण नष्ट होतातच तर आत्मा आणि शरीर या दोघांनाही हळू- हळू नष्ट होत असतात. दारू हे 'स्लो पॉयझन' असे जरी आपण गंमतीने म्हणत असलो तरी ते खरे आहे.

पहिल्यादा दारू पिणार्‍यापैकी 15 ते 25 टक्के लोक व्यसनी होत असतात. ही फार वाईट सवय आहे. आजच्या आधुनिक जीनवात दारूने सहजरित्या प्रवेश केला आहे. आज स्त्री, पुरुष, युवावर्ग, वृध्द या सगळयांना ती प्रिय असते मात्र दारु कोणावर प्रेम करत नाही. या गोड विषाला सोडण्याच भलाई आहे, नाही तर तुमच्याकडे पश्चाताप करण्यासाठी ही वेळ शिल्लक राहणार नाही. दारु, सिगारेट व तंबाखू सोडण्‍याचे सहज व सोपे उपाय आम्ही आपल्यासाठी देत आहोत. ते पुढील प्रमाणे...

1. सफरचंदाचा रस वेळोवेळी पिल्याने तसेच जेवनात सेफचा उपयोग केल्याने दारू पिण्याची सवय सुटते.

2. उकडलेले सफरचंद दिवसातून तीन- चारदा सेवन केल्याने दारूची सवय सुटते.

3. एका हळदीचे बारीक-बारीक तुकडे करावे जेव्हा पण सिगारेट, तंबाखू खाण्‍याची इच्छा झाली तेव्हा हळदीचे तुकडे तोंडात टाकून आराम चघळावे. काही दिवसात विडी, सिगारेट व तंबाखूची सवय सुटते.

4. सिगारेट सोडण्यासाठी दालचीनीला बारीक वाटून शहदामध्ये टाकून जेव्हा सिगारेट ओढण्याची इच्छा झाला तेव्हा मिश्रण बोटाने चाखावे.

5. कांद्याचा रस 25 ग्रॅम दिवसातून एकदा नियमित सेवन केल्यास तंबाखू खाण्‍याची सवय सुटते.

6. चरस, गांजा, दारू यांची कोणालाही जास्त नशा झाली असल्यास 60 ग्रॅम अंगुर वाटून पाण्यासोबत गाळून घ्यावे. यामध्ये कालीमिर्च, जीरे यांची पूड व मीठ टाकून पिण्यास द्यावे. लवकरच दारूची झिंग उतरते.

7. एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये लींबू पिळावा. हे मिश्रण दिवसातून अनेक वेळा घेतल्याने दारूची नशा कमी होते.

Dr. Chhaya Helambe
Dr. Chhaya Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Dr. Smita  Patil
Dr. Smita Patil
BHMS, Homeopath, 15 yrs, Pune
Dr. Anjali Awate
Dr. Anjali Awate
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Mandar Phutane
Dr. Mandar Phutane
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 10 yrs, Pune
Dr. Rekha Pohani
Dr. Rekha Pohani
Specialist, Dietitian dietetics, 13 yrs, Pune
Hellodox
x