Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

एखाद्या विषाणूचे देशात अतिक्रमण होणे आणि त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होणे हे आता म्हणावे तितके नवीन नाही. काही वर्षांपूर्वी आलेला स्वाईन फ्लू असो किंवा चिकनगुनिया असो. केरळमध्ये नुकताच निपाह नावाच्या विषाणूची बाधा झाल्याने मागच्या काही तासांत ११ जणांना जीव गमवावा लागला आहे. मानवी जीवनावर अचानकपणे आक्रमण केलेला हा व्हायरस नेमका आला कुठून, त्याची लक्षणे काय आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, त्यावरील उपचार यांबाबत वेळीच माहिती घेणे आवश्यक आहे. सध्या या विषाणूची केरळमध्ये लागण झाली असली तरीही संपूर्ण भारतात त्याचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे केंद्रसरकारने त्याबाबत आवश्यक ती पाऊले उचलली असतील तरीही या विषाणूबाबत विस्ताराने जाणून घेऊया…

१. जनावरे आणि माणूस यांच्यावर वेगाने हल्ला करणारा तसेच गंभीर आजार निर्माण करणारा हा विषाणू आहे.

२. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, १९९८ मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगई येथील निपाह नावाच्या गावात हा विषाणू सापडला होता. त्या गावाच्या नावावरुन त्याचे नाव निपाह ठेवण्यात आले.

३. सुरुवातीला या रोगाची लागण डुकरांमध्ये झाली आणि नंतर तो तेथील शेतकऱ्यांमध्ये पसरला. यावेळी २६५ जणांना त्याची लागण झाली आणि त्याने गंभीर स्वरुप धारण केल्याने सगळ्यांचा मृत्यू झाला.

४. ताप, डोकेदुखी, विस्मरण, आळस येणे ही या विषाणूची लागण झाल्याची प्राथमिक लक्षणे आहेत. तर कोमात जाणे आणि मृत्यू ही त्याची गंभीर लक्षणे आहेत.

५. या आजारावर संशोधन सुरु असले तरीही त्यावर अद्याप कोणतेही उपयुक्त औषध सापडलेले नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.

६. या आजारापासून वाचण्यासाठी झाडावरुन पडलेली फळे तसेच खजूर खाऊ नका असे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबई: आजच्या रोजच्या धावपळीच्या आणि फास्टफूडच्या जीवनात प्रत्येकालाच काहीना काही आरोग्यादायक समस्या भेडसावत असतात. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात तर काही याबाबत सजग दिसतात. बाहेरच्या तेलकट आणि जंकफूडमुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. खासकरुन अनेकांना वाढत्या वजनाने हैराण करुन सोडले आहे. धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही. अशात हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक उपाय आहे.

- मोड आलेल्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तसंच रक्त शुद्ध व्हायला मदत होते. फळं आणि भाज्यांमध्ये मिळतं त्यापेक्षा 100 पट जास्त एंजाईम तुम्हाला मोड आलेले मूग किंवा चणे खाल्यामुळे मिळतं.

- मोड आलेले मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं. मोड आलेले मूग आणि चण्यांमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात. चेहऱ्याचे अनेक विकार काही दिवसात यामुळे दूर होतील.

- या कडधान्यांचे एवढे फायदे असले तरी अनेकांना ती नुसती खायला आवडत नाहीत. त्यामुळे त्याला सॅलड बनवूनही तुम्ही खाऊ शकता. पण लक्षात ठेवा मोड आलेल्या या कडधान्यांना शिजवलं किंवा तळलं तर त्यामधली पोषक तत्त्व निघून जातात. त्यामुळे ही कडधान्य उकडून सॅलडसारखीच खा.

- या कडधान्यांना तुम्ही टोमॅटो, कांदा आणि काकडीबरोबरही खाऊ शकता. तसंच त्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि चाट मसाला टाकून तुम्ही त्याला आणखी चविष्ट बनवू शकता.


शाळेतून १५ मिनिटांची सुटी देऊन विद्यार्थ्यांना शारीरिक व्यायाम शिकविण्याचा उपक्रम ‘द डेली माइल’ या ब्रिटनमधील संस्थेने राबविला असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.

ब्रिटनमधील स्टर्लिग आणि एडिनबर्ग विद्यापीठांतील संशोधकांनी ‘द डेली माइल’ ही संस्था जगभरातील शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यात मोलाची भूमिका बजावत असल्याचे म्हटले आहे. संशोधकांनी नोंदविलेल्या निष्कर्षांवरून ‘द डेली माइल’ ही संस्था कमी शारीरिक हालचाली, संथपणा, लठ्ठपणा या जागतिक पातळीवरील शारीरिक समस्यांविरोधात लढा देते.

‘द डेली माइल’च्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून आले. हा उपक्रम न राबविलेल्या इतर शाळांमधील विद्यार्थ्यांची तुलना केल्यानंतर हे स्पष्ट झाल्याचे स्टर्लिग विद्यापीठातील संशोधक कोलिन मोरान यांनी सांगितले.

‘द डेली माइल’ या संस्थेची स्थापना फेब्रुवारी २०१२ मध्ये एलिन वेली यांनी केली. त्यानंतर सेंट निनियास शाळेत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध शारीरिक उपक्रम राबविले. १५ मिनिटांच्या सुटीत शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांना धावणे, चालणे आणि इतर शारीरिक क्षमता वाढविणाऱ्या व्यायामांसाठी प्रोत्साहन देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर स्कॉटलंड सरकारने ‘द डेली माइल’च्या उपक्रमाला देशात मान्यता दिली. ब्रिटनमध्ये या उपक्रमाला पाठिंबा मिळाला असून नेदरलँड, बेल्जियम या देशांतही या उपक्रमाला मान्यता मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

मुंबई : कडक उन्हाळा सुरु झालाय. उन्हाच्या या काहिलीपासून वाचण्यासाठी थंडगार सरबात पिणे सर्वच पसंत करतात. या ऋतूत स्वत:ला ताजेतवाने आणि फिट ठेवण्यासाठी विविध प्रकारचे ज्यूस आणि थंड पेयांचे सेवन तुम्ही करत असाल मात्र यातच बेलाचा तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरु शकतो. बेलाच्या प्रयोगाने सौदर्य तर उजळतेच मात्र आरोग्यही चांगले राहते. बेलाचा रस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसाचा दररोज एक ग्लास बेलाचा रस प्यायल्यास त्याचा परिणाम काही दिवसांतच तुम्हाला शरीरावर दिसू लागेल.

उन्हाळ्यात लघवीचा त्रास होत असेल तर बेलाचा रस प्यावा.

बदलत्या जीवनशैली आणि ऑफिसमध्ये अनेक तास बसून राहिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. कमी वयात लोकांना ही समस्या सतावतेय. यावर जर दररोज बेलाचा रस प्यायल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होतो.

जर एखाद्याला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर बेलाच्या रसाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते.

ज्यांना हृदयासंबंधित रोगांचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दररोज बेलाचा रस प्यावा. या रसात एक ते दोन थेंब तूप मिसळावे.

तोंड आल्यास बेलाचा रस प्यावा.

रक्त साफ नसल्यास अनेक समस्या निर्माण होतात. यावर बेलाचा रस प्यावा याने अनेक फायदे होतात.

ताण ही सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. ही समस्या कधी उग्र रुप धारण करेल हे सांगणं कठीण होतं. जोपर्यंत ताण आपल्या क्षमतेशी जुळणारे असतात तोपर्यंत ते प्रेरणादायी, आव्हानात्मक ठरतात; पण त्यापलीकडे गेले की मग मात्र आपल्या उत्पादकतेवर व कामगिरीवर परिणाम होतो, तसेच शारीरिक व भावनिक आरोग्यावरसुद्धा याचे गंभीर परिणाम होतात.

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. त्यामुळे ताण, त्यातून येणारं नैराश्य हा विषय पुन्हा एका समोर आला आहे. या ताणाचं वेळीच नियोजन केलं तर नैराश्येच्या गर्तेत सापडण्यापासून माणूस वाचू शकतो. तेव्हा हा ताण म्हणजे काय? त्याचे आपल्यावर कसे परिणाम होतात? हे जाणून घेऊयात.

तणाव आल्यावर शरीरात काय बदल होतो?
ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात तात्काळ एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात. जर तणाव जास्त वेळ टिकला तर कॉरटिसोल नावाचे द्रव्य दीर्घकाळासाठी निर्माण होते. अति, विचित्र आणि विशिष्ट प्रसंगानंतर या द्रव्यामुळे शरीर व मेंदूमध्ये झपाटय़ाने आणि अतिरेकापर्यंत बदल घडतात.
अनेकदा व्यक्तींमध्ये एकदम उत्तेजित किंवा मलूल होणे, हसणे-रडणे, गोंधळल्यासारखे वागणे, इकडे-तिकडे फिरणे, विसरणे किंवा एकटक पाहत राहणे असे अनेक बदल होतात.
काही व्यक्ती ताणातून बाहेरच येत नाहीत. सतत तोच विचार करतात. काहींना त्या प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसते, त्या वेळचा त्रास पुन्हा अनुभवणे, दचकणे असे व्यक्तींसोबत वारंवार घडते. यामुळे भित्रेपणा, उदासीनता, चिडचिड वाढते.

तणाव का येतो?
बऱ्याच वेळा आपण तणावाखाली वावरतो, पण त्याचा उगमच कळत नाही व तणाव अजूनच वाढतो. खासगी तसेच प्रोफेशनल आयुष्यात येणाऱ्या समस्या या ताणाचं प्रमुख कारण ठरतात. याव्यतिरिक्तही काही कारणं आहेत ही कारणं तुम्ही शोधली तर तणावमुक्त होण्याची पहिली पायरी तुम्ही गाठलीच समजा.

तणावाचे नियोजन कसं कराल?
– जवळच्या विश्वासू सहकाऱ्याशी/कुटुंबातील व्यक्तीशी तुमच्या समस्येविषयी चर्चा करा. तो/ती कदाचित तुम्हाला समस्या कशी सोडवावी ते सांगू शकणार नाही, पण त्यामुळे तुम्हाला नक्कीच हलके वाटेल.
– आवश्यक झोप घ्या. रात्री मोबाइल, दूरदर्शन, सोशल साइटवर वेळ घालवू नका. अपुऱ्या झोपेमुळे कामगिरी सुमार होते.
– आवडत्या छंदात मन रमवा. काही नवे शिका. भटकून या
– अचूकपणाचा अतिरेक, नकारात्मक विचार व आपल्या हातात नसलेल्या गोष्टींच्या परिणामांचा विचार टाळा.
– माणूस नैराश्येत असला की या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणणं कठीण वाटतं पण एकदा का मानसिक तयारी पक्की केली नैराश्येच्या गर्तेतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणं सोप्प होतं.

Dr. Sneha Kale
Dr. Sneha Kale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Gynaecologist, 3 yrs, Pune
Dr. Akshay Biyani
Dr. Akshay Biyani
BDS, Dentist Root canal Specialist, 10 yrs, Pune
Dr. Hema Chandrashekhar
Dr. Hema Chandrashekhar
BAMS, Ayurveda Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Sujay Patil
Dr. Sujay Patil
MBBS, General Medicine Physician, 5 yrs, Mumbai
Dr. Abhay Singh
Dr. Abhay Singh
MBBS, Family Physician, 2 yrs, South Delhi
Hellodox
x