Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये आणि प्रामुख्याने किनारपट्टीच्या परिसरात राहणार्‍या समाजामाध्ये नारळाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. आहारात नारळ असावा का? याबाबत अनेक समज -गैरसमज आहेत. नारळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी नारळाचा अधिक फायदा होतो. टाळूचं आरोग्य जपण्यासाठी, केसांना नैसर्गिकरित्या चमक आणि मजबुती देण्यासाठी तसेच केसगळतीची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी नारळ फायदेशीर आहे हे तुम्हांला ठाऊक आहे.

केसगळतीचा त्रास आजकाल आबालवृद्धांमध्ये हमखास आढळतो. मग यावर मात करायची असेल तर नारळाचं दूध तुम्हांला फायदेशीर ठरू शकतं. केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत

कसं ठरते फायदेशीर ?
नारळाची मलई आणि दूध केसांसाठी फायदेशीर आहे. टाळूचं पोषण करण्यासोबत नारळाच्या दूधातील प्रोटीन्स घटक, फॅट्स, मिनरल्स केसांना अधिक मजबूत करतात. नारळाच्या दूधामुळे केस मूळासकट मजबूत होण्यास मदत होते. परिणामी केसगळतीवर त्याचा गुणकारी उपाय म्हणून समावेश करणं उपयोगी ठरते.

कसा कराल वापर?

नारळाच्या मलईसह थोडं दूध घ्या. या मिश्रणाचा टाळूवर मसाज करा. तासभर हे मिश्रण टाळूवर तसेच ठेवा. त्यानंतर मिल्क शाम्पूचा किंवा सौम्य शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवावेत. दर पंधरा दिवसांनी हा उपाय करणं केसगळती रोखण्यासाठी तसेच टाळूचं आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मुंबई : हळदीचे दूध अत्यंत आरोग्यदायी आहे. हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. रोगप्रतिकारकशक्ती सुधारते, पचनक्रिया सुरळीत होते, असे इतर अनेक फायदे होतात. तर आज वर्ल्ड मिल्क डे निमित्त जाणून घेऊया का प्यावे हळदीचे दूध...

रोगप्रतिकारकशक्ती सुधारते
हळदीच्या दुधामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. त्याचबरोबर सर्दी-खोकल्याचा त्रास होत असल्यास हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ग्लासभर हळदीचे दूध अवश्य प्या. शारीरिक व्यायाम करणाऱ्यांसाठी हळदीचे दूध फायदेशीर ठरते.

पचनविकार दूर होण्यास मदत
हळदीच्या दूधामुळे पचनक्रिया सुधारते. छातीतील जळजळ, ब्लोटिंग, गॅसेस या समस्या दूर होण्यास मदत होते. तसंच भूक न लागणे, अपचन या समस्या दूर होतात.

आरोग्याच्या इतर समस्यांवर
रोगप्रतिकारकशक्ती कमकूवत असल्याने होणारे आजार दूर करण्यास हळदीचे दूध उपयुक्त ठरते. सांधेदुखी, पचनासंबंधित समस्या, त्वचेच्या समस्या दूर करण्यास हळदीचे दूध फायदेशीर आहे.

शांत झोप येण्यासाठी
निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी हळद घातलेले कोमट दूध झोपण्यापूर्वी प्या. साध्या दूधापेक्षा हळदीचे दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे शरीरातील अमिनो अॅसिडची निर्मिती वाढते. हळदीमुळे रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीरात अमिनो अॅसिड घेण्याचे प्रमाण वाढते. परिणामी शरीर रिलॉक्स होते, मूड शांत होतो आणि शांत झोप लागते.

रक्त शुद्ध होते
हळद डिटॉक्सिफिकेशनचे काम अत्यंत उत्तमरित्या करते. त्यामुळे शरीरातील विषद्रव्ये दूर होतात. कारण ही विषद्रव्ये रक्तवाहिन्यात जमा होऊन इतर आजारांना आमंत्रण देतात. हळदीमुळे रक्तातील लिव्हरचे कार्य सुरळीत होऊन रक्तातील टॉक्सिन्स दूर होतात.

ब-याचदा तुम्ही वजन कमी करण्याचा संकल्प करता मात्र हा संकल्प पुर्ण करणे तुम्हाला काही केल्या जमत नाही.जर तुम्हाला खरंच मनापासून तुमचे वजन कमी व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी Vegan डाएट नक्की ट्राय करा.Vegan फूड खाण्यास चविष्ट असतातच पण त्याचसोबत त्यामुळे तुमचे वजन देखील कमी होऊ शकते.या डाएटसह योग्य पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे तुमचे काही किलो वजन नक्कीच कमी होईल.न्यूट्रीशनिस्ट व PETA India च्या कॅम्पेन कॉर्डिनेटर यांच्याकडून जाणून घेऊयात Vegan फूड ची तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कशी मदत होऊ शकते.तसेच वाचा वजन कमी करायचं ? मग करा या योगसाधना

जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी Vegan Diet करणे का योग्य आहे.

वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये कॅलरीज कमी असतात.

अनेक लोकांच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मांस,अंडी व दूग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो.अशा पदार्थांमध्ये Saturated fat,कॅलरीज व कोलेस्टेरॉल मोठ्या प्रमाणावर असते.प्राण्यांच्या शरीरामध्ये कॅलरीज साठवण्याची व्यवस्था असते ज्यामुळे मांसाहारी पदार्थांच्या सेवनामुळे तुमचे वजन वाढू शकते.एकूण फॅटपैकी मांसामध्ये कमीतकमी २० ते ४० टक्के कॅलरीज असतात.तसेच फळे,भाज्या,शेंगभाज्या व कडधान्यांच्या तुलनेमध्ये लो-फॅट डेअरी प्रॉडक्ट्स मध्ये देखील फॅट व कोलेस्टेरॉल असते.

आरोग्य समस्या कमी होतात.

शाकाहारी(जे मांसाहार व दूग्धजन्य पदार्थांचे सेवन करीत नाहीत) लोकांपेक्षा मांसाहार करणा-या लोकांमध्ये लठ्ठपणा व लठ्ठपणातील विकार जसे की मधूमेह,उच्च रक्तदाब,स्ट्रोक,हार्ट अॅटक,काही प्रकारचे कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणात असतो.काही Vegan आहार घेणा-या लोकांचे अतिवजन असू शकते पण संशोधनानूसार मांसाहार करणा-यापैक्षा हे लोक १८ टक्कांनी बारीक असतात.

vegan फूडमुळे मेटाबॉलिझम सुधारतो.

सर्वसाधारणपणे Vegan आहारामध्ये नैसर्गिकरित्या फॅट व कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रित राखणे सोपे जाते.वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर व कॉम्लेक्स कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे या आहाराच्या सेवनाने मोठ्या प्रमाणावर कॅलरीज बर्न होतात व मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते.American Academy of Dietetics and Nutrition च्या अहवालानूसार Vegan आहार घेणा-या लोकांचे वजन तर कमी असतेच शिवाय अशा लोकांना कॅन्सर,मधूमेह,ह्रदयविकार व उच्च रक्तदाबाची समस्या देखील कमी होते.यासाठी जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी रोज आहारात फायबर्स किती प्रमाणात असावे ?

Vegan वेट लॉस डाएट प्लॅनसाठी प्रमुख मुद्दे-

न्यूट्रीशनिस्टच्या मते लो-फॅट वनस्पतीजन्य आहारामध्ये व्हिटॅमिन्स व मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असून त्यामध्ये cancer-fighting phytochemicals देखील असतात.यासाठी जाणून घ्या या पदार्थांना तुमच्या आहारात कसे समाविष्ट कराल.

1. चिकन ऐवजी mock meat,मीट बर्गर ऐवजी व्हेजी बर्गर व पनीर व अंड्याऐवजी टोफूचा आहारात समावेश करा.
2. तुमच्या आवडत्या भाज्यांमध्ये कमीतकमी क्रीम,लोणी व तूपाचा वापर करा.
3. नास्त्यासाठी अंडे न खाता ओट्स मध्ये बदाम व सोया दूध व ताजी फळे घालून खा.
4. डिनर तयार करण्यासाठी बीन्स व पालक घालून व्हेजीटेबल पास्ता अथवा चायनीज नूडल्स अथवा थाय व्हेजीटेबल करी बनवा.यासाठी वाचा पास्ताप्रेमींसाठी हेल्दी पास्ता बनवण्याच्या काही सोप्या पद्धती
तुमच्या आहारामध्ये फळे,भाज्या,तृणधान्ये,डाळी व सोयाबीनचा समावेश करा.या चविष्ट पदार्थांमुळे तुम्हाला शाकाहार करणे सोपे जाईल.

Vegan वेट लॉस डाएट प्लॅनचा नमुना-

SHARAN (Sanctuary for Health and Reconnection to Animals and Nature) and Vegan च्या संस्थापक डॉ.नंदीता शाह यांच्याकडून वजन कमी कऱण्यासाठी Vegan वेट लॉस डाएट प्लॅनचा नमुना जरुर जाणून घ्या.

चांगल्या परिणामांसाठी हे अवश्य लक्षात ठेवा.

तुमचा आहारातील सर्व गोष्टी वनस्पतीजन्य घटकांपासून तयार गेल्या आहेत याची खात्री करुन घ्या.
प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करा.
कांदा व लसूण शिवाय इतर सर्व भाज्या न सोलता खा.
शक्य असल्यास सेंदीय पदार्थांचा आहारात समावेश करा.तसेच वजन घटवताना अवेळी लागणार्‍या भूकेवर मात मिळवण्यासाठी खास डाएट टीप्स जरुर करा.

मुंबई : बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला सर्वात आधी आईचे दूध दिले जाते. स्तनपानातून बाळाला मिळणारे दूध हे त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे किमान सहा महिने बाळाला केवळ स्तनपान करण्याचा सल्ला दिला जातो. मग बाळासाठी अमृताप्रमाणे असणारे दूध स्तनपानाच्या मार्फत किती वर्ष द्यावे? हा विचार तुमच्या मनात डोकावत असेल तर हा सल्ला नक्की जाणून घ्या.

स्तनपानाचे फायदे
स्तनपान करण्याचे फायदे नवजात बाळाला आणि आईला अशा दोघांनाही होतात. आईचं दूध हे बाळामध्ये डायरिया आणि उलटीचा त्रास कमी करण्यास मदत करते.

बाळाला योग्य प्रमाणात स्तनपानाच्या मार्फत दूध मिळाल्यास भविष्यात लठ्ठपणा आणि इतर समस्यांचा त्रास कमी होण्यास मदत होते. स्तनपान केल्याने स्त्रीयांमधील ब्रेस्ट कॅन्सर आणि अंडाशयाच्या कॅन्सरचा धोका कमी होतो.

कोणत्या काळापर्यंत स्तनपान करावे ?
नॅशनल हेल्थ सर्विसच्या वेबसाईटनुसार, आई आणि बाळ दोन्ही त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि इच्छेनुसार स्तनपानाचा आनंद घेऊ शकतात. WHO च्या अहवालानुसारही स्तनपान हे किमान सहा महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत केले जाऊ शकते.

मुलांना पोषक आहार
रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अ‍ॅन्ड चाईल्ड हेल्थच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार,स्तनपानातून दोन वर्षांनंतर मुलांना अधिक पोषणतत्व मिळतात याबाबत कोणतेही संशोधन नाही. दोन वर्षांनंतर मुलांच्या आहारात सार्‍याच पोषक घटकांचा समावेश करणं आवश्यक आहे.
स्तनपानामुळे बाळ आणि आईमध्ये बॉन्डिंग वाढण्यासही मदत होते. मात्र अनेक महिला विशिष्ट टप्प्यानंतर पुन्हा त्यांच्या कामावर रुजू होतात त्यामुळे स्तनपान किती वर्ष चालू ठेवायचा हा सर्वस्वी आईचा निर्णय असू शकतो.

समज गैरसमज
2016 सालच्या अंतरराष्ट्रीय स्टडीच्या अहवालानुसार, ब्रिटेनमधील महिला जगात सगळ्यात कमी काळ बाळाला ब्रेस्टफिडींग करतात. सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याबाबत महिलांना लाज वाटत असते याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे सरकारकडूनही सर्वजनिक ठिकाणी खास कक्ष उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नको अॅसिडिटीला आमंत्रण!

'दिवसभराच्या धावपळीमुळे मी खूप दमतो', 'सतत मला एक प्रकारचा थकवा जाणावतो', 'मला अजिबात उत्साही वाटत नाही. असं का होतंय आणि या साऱ्यातून बाहेर येण्यासाठी मी काय करू?', असं माझ्याकडे येणारा प्रत्येकजण विचारत असतो. मी अगदी शांतपणे त्यांना त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल विचारते आणि आपोआपच उत्तर समोर येतं. 'माझी जेवणाची वेळ कधीच ठरलेली नसते', 'कामाच्या धावपळीत दुपारी पटकन काही तरी खातो आणि रात्रीचं जेवण हे टीव्ही समोर होतं. मधल्यावेळेत भूक लागली की मग काहीही अरबटसरबट खाल्लं जातं', असे अनेकजण आपल्या खाण्याच्या सवयींबद्दल बोलतात आणि याच सवयी अनेक समस्यांना आमंत्रण देणाऱ्या ठरतात. या वेगवान अनियमित आणि अनिश्चित जीवनशैलीमुळे अॅसिडिटी नावाच्या राक्षसानं आपलं डोकं वर काढलं आहे. आजच्या घडीला शहरातील सत्तर टक्के लोकांना अॅसिडिटीचा त्रास होतो.

अॅसिडिटी म्हणजे नेमकं काय?

पचनक्रिया सुरळीतपणे पार पडत नाही. अपचनामुळे अनेक रसायनांची निर्मिती होते आणि ही अॅसिड्स शरीराला हानी पोहोचवू शकतात. आपल्या खाण्याच्या सवयी आणि आरोग्यदायी जीवन यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे खाणं हा एक आनंददायी अनुभव असायला हवा. बाकी सगळं बाजूला ठेवून जेवताना संपूर्ण लक्ष खाण्यावर केंद्रित करा. चवीनं खा. तुम्हाला सकारात्मक फरक जाणवू लागेल आणि तुमचं शरीर, मन आणि आत्मा एकाचवेळी तृप्त होईल.

अॅसिडिटीची लक्षणं कोणती?

अपचनाचा त्रास

पोटात गॅस होणं

छातीत दुखणं

हृदयाजवळ जळजळ जाणवणं

काहीही खावंसं न वाटणं

टीप-टॉप राहण्यासाठी विशेष टीप्स :

- वजन खूप जास्त असेल तर ते कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वजन नियंत्रणात असणं खूप महत्त्वाचं आहे.

- शांत वातावरणात जेवणाचा मनसोक्त आस्वाद घ्या. कंटाळत किंवा रागात जेवू नका.

- सावकाश आणि नीट चावून खा. तुमचं पूर्ण लक्ष खाण्याकडे असू द्या.

- अतिप्रमाणात तिखट किंवा तेलकट पदार्थांचं सेवन केल्यानं शरीराला हानी पोहोचू शकते.

- तळलेले पदार्थ, मसालेदार जिन्नस, मिरच्या, पापड, दुग्धपदार्थ जिभेचे चोचले पुरवत असले तरीसुद्धा आरोग्यासाठी चांगले नसतात, हे लक्षात असू द्या.

- भूक लागल्यावर खाल्लं पाहिजे आणि त्याचप्रमाणे पोट भरल्यावर थांबलंही पाहिजे.

- एकदम पोटभर जेवू नका. पोटातली थोडी जागा रिकामी ठेवा.

- जेवण झाल्यावर थोडा वेळ शांत बसा. हा वेळ स्वतःसाठी राखून ठेवा.

- काहीही खाल्ल्यावर लगेचच झोपणं पूर्णपणे चुकीचं आहे.

- दिवसभरात दोन कप चहा किंवा कॉफी घ्यायला काहीच हरकत नाही. या कॅफेनयुक्त पेयांचं अति प्रमाणात सेवन करत असाल तर मग होणाऱ्या परिणामांची जबाबदारी घ्यायलाही तयार राहा.

- कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होत असेल तर स्वतः डॉक्टर बनण्याच्या भानगडीत पडू नका. वेळीचं वैद्यकीय सल्ला घ्या.

शब्दांकन - गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज

Dr. Yatin Bhole
Dr. Yatin Bhole
DNB, Pediatrician, 9 yrs, Pune
Dr. Sumit Patil
Dr. Sumit Patil
BAMS, Family Physician General Physician, 15 yrs, Pune
Dr. Aarti Vyas
Dr. Aarti Vyas
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Dr. Pradnya Shirke
Dr. Pradnya Shirke
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Infertility Specialist, 17 yrs, Pune
Dr. Sachin Sutar
Dr. Sachin Sutar
BAMS, Family Physician Physician, 8 yrs, Pune
Hellodox
x