Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

मुंबई : पेज थ्री कल्चर जगणाऱ्या सेलिब्रेटी मंडळींचे अनुकरण करणे हे काही आपल्या समाजाला नवे नाही. पण, या उच्चभ्रू मंडळींचे अनुकरण तुम्ही डोळे झाकून करत असाल तर, सावधान. सेलिब्रेटींप्रमाणे हाय हिल्स वापरण्याच्या ट्रेण्डणे सध्या तरूणी आणि महिलांमध्ये जोर धरला आहे. अनेकदा तर, पतीला, बॉयफ्रेण्डला आवडते म्हणूनही हाय हिल्स वापर वापरल्या जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का, हाय हिल्स वापरण्याचा जर अतिरेक झाला तर तुम्हाला विविध व्याधींना सामोरे जावे लागते. म्हणूनच हाय हिल्स वापरण्यापूर्वी ही माहिती जरूर वाचा.

एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, साधारण ५ इंचापेक्षा अधिक उंचीची हाय हिल्स अती प्रमाणात वापरली तर, त्या महिलेला गर्भधारणा होताना समस्या निर्माण होऊ शकतात. अशा महिलांमध्ये गर्भधारणेची गती मंदावते.

शारीरिक त्रासांचे आव्हान
डॉक्टरांच्या मते हाय हिल्स वापरणाऱ्या मुली, महिलांचे पायही तितके मजबूत असावे लागतात. जर तुमचे पाय अगदीच लुकडे असतील, तुमच्या पायाच्या टाचाही अगदीच सडपातळ असतील तर, तुम्हाला या समस्या अधिक प्रमाणात जाणवू लागतात. कारण, तुमचे ओटीपोट पुढच्या बाजूला झुकते जे कमरेच्या दुखण्याला कारणीभूत ठरते. तुमच्या ओटीपोटात शरीराचे अनेक महत्त्वाचे घटक असतात. पण, तुमचे ओटीपोट जेव्हा पुढच्या बाजूला झुकते तेव्हा त्याचा संघर्ष पोटातील इतर घटकांशी होतो. ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता मंदावते. काही केसेसमध्ये तर डॉक्टर महिलांना वांजपणाच्या समस्येला तोंड द्यावे लागते असेही म्हणतात. हाय हिल्सचा महलांच्या मासिक पाळीशीही संबंध येतो. हाय हिस्समुळे मासिक पाळीचे चक्र बदलते. दरम्यान, हाय हिल्स सतत वापरल्याने कंबरदुखी, खांद्यांचे दुखणे, डोकेदुखी, केस गळणे, पाय दुखणे असा त्रास संभवतो.

कमी वयात अधिक परिणाम
हाय हिल्स वापरण्याची फॅशन आजकाल लहान मुलींमध्येही पहायला मिळते. पण, त्याचा त्यांच्या शारीरिक, मानसीक जीवनावरही परिणाम होतो. हाय हिल्स वापरल्यामुळे पायांचे दुखणे, हाडे ठिसूळ होणे, पायांचा, पार्श्वभागाचा आकार बदलणे असा त्रास संभवतो.

'मिटरेसी' कुळातील सदापर्णी, सुगंधी, उंच अशा वनस्पतींपैकी निलगिरी ही उबदार प्रदेशातील वनस्पती आहे. या वनस्पतीपासून सुगंधी
द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात.
संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन
चोळतात.

भाजल्याने त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरी तेलाचा उपयोग होतो.

श्‍वासनलिकेचा दाह आणि जुनाट दम्यावर हे तेल
उत्तेजक असून कफ पातळ करून पाडणारे आहे.

नाकाच्या तक्रारींमध्ये निलगिरी तेल उपयोगी आहे. निलगिरीची मुळे रेचक आहेत. खोडाच्यासालींमध्ये टॅनिन असते.

निलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट अमांश, कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीत केला जातो.

श्‍वासनलिकेच्या
वरच्या भागात संसर्गजन्य विकार आणि काही कातडीचे रोग यांवर निलगिरी तेल उपयुक्त सिद्ध होते. पाणथळ जागेत, सांडपाण्याच्या
दलदलीच्या जागेत निलगिरीची झाडे लावतात.

१) जीवाणू आणि किटाणूंचा नाश करणारे अँटी बॅक्‍टीरियल आणि अँटी व्हायरल तत्त्व कांद्यामध्ये असतात... हे तत्त्व शरीरावर रगडल्याने जीवाणू आणि किटाणूचा नाश होतो आणि तुम्ही इन्फेक्शनच्या आजारांपासून दूर राहू शकता...

२) तुमच्या मनात आहेत तेच चेहर्‍यावर दिसते... तुम्ही नेहमी आनंदी राहणारे व्यक्ती असाल तर तुमचा चेहरा हसतमुख राहील आणि दिवसेंदिवस चेहर्‍यावरील उजळपणा वाढत राहील...

३) कॅल्शिअम शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती व शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असते... हे शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी, ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर या सर्वात असते...

४) तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करून थंड झाल्यावर तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो... हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते...

५) नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप आणि फुप्फुसाशी निगडित आजारा मध्ये फायदा होतो...

६) हळद हे सगळ्यात शक्तीशाली असे नैसर्गिक कॅन्सर विरोधक आहे...

७) रात्री जेवण कमी करावं आणि फळं खावीत... सोबतच योग्य वेळी जेवणाची सवय लावाल, तर लठ्ठपणा कमी करण्यात मदत होईल...

८) जेवणात अधिक खारट पणा ची सवय आपण स्वतःच निर्माण करीत असतो... अधिक प्रमाणात मीठ/सोडियम घेतल्यास हाडे ठिसूळ होत जातात... जास्त सोडियम कॅल्शियमची कमतरता निर्माण करते...

९) वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये... आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे... वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही...

१०) साखर ही वाईट नाही... उगाच साखरेच नाव वाईट आहे... साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते... त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापर करू शकतो...

११) प्रत्येकाने व्यायाम व योगासना चा प्रकाराचा
निवड करताना तो आपल्या देहयष्टीनुसार निवडावा...

१२) सर्वच सजीवांना प्रथिनांची गरज आहे... अर्थात ही गरज प्रत्येकाचे वय, शारिरीक स्थिती, कामाचे स्वरुप यावर अवलंबून आहे...

मुंबई : बाराही महीने मिळणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे केळी. केळी खाण्याचे आरोग्यदाई फायदे आजवर अनेकांनी तुम्हाला सांगितले असतील. पण, तुम्हाला माहिती आहे का, केवळ केळीच नव्हे तर, केळीची सालही तितकीच आरोग्यदाई असते. केळीच्या सालीचे फायदे तुम्ही जर जाणून घ्याल तर, केळी खाण्याऐवजी तुम्ही सालीच खाल. इतकी केळीची साल गुणकारी असते. म्हणूनच जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे.......

वजन घटविण्यासाठी
केळीच्या सालीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे तुम्ही जर रोज एका केळीची साल खाल तर, एक महिन्यात तुमचे वजन २ ते ३ किलोंनी घटलेले पहायला मिळू शकते. ते सुद्धा कोणत्याही व्यायामाशिवाय. सॉल्यूबल आणि इन्सॉल्यूबल असे दोन प्रकारचे फायबर केळीच्या सालीत असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रोलची मात्रा कमी करते.

दृष्टीदोषावर गुणकारी
तुमाला दृष्टीदोषाचा त्रास असेल, त्यामुळे चष्मा वापरण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ल्यूटीन असते. जे डोळयाची नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते.

मन प्रसन्न करण्यासाठी
केळीच्या सालीमध्ये सेरोटोनिन असते जे तुमचे मन प्रसन्न (मूड) करण्यासाठी फायदेशीर ठरते. तैवानच्या विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार सलग तीन दिवस नियमीतपणे २ केळीच्या साली खाल तर तुमच्या शरीरातील सेरोटोनिनच्या हॉर्मोनची मात्रा १५ टक्क्यांनी वाढते.

झोपेवर गुणकारी
जर तुम्हाला योग्य प्रकारे झोप येत नसेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ट्रिप्टोफेन नावाचे एक केमिकल असते. जे तुमची झोप चांगली आणि आरोग्यदाई करण्यासाठी मदत करते.

आंबेहळद हा प्रत्येक घरात असतेच. ही अनेक गुणांनी युक्त असते.
आंबेहळद काहीशी हळदीसारखी असली तरी थोडी उग्र असते. ती पोटात देत नाहीत. शरीरावर चोळण्यासाठी आणि लेप देण्यासाठी आंबेहळद वापरतात.

कोणत्याही कारणाने दुखापत होऊन रक्त साकळले असल्यास आंबेहळद उगाळून कोमट करून लावावी. याने सूज कमी होते त्याचप्रमाणे वेदना शांत होतात.

शरीरातील कोणत्याही भागात गाठ आली असेल तर आंबेहळदीच्या लेपाने ती बसते.

अंगावर खरका उठल्यास आंबेहळद, कडूजिरे गोमूत्रात वाटून लावतात. यामुळे हा त्रास कमी होतो. खरका म्हणजे अंगावर उठलेल्या बारीक पुळय़ा लचकणे, मुरगाळणे, सुजणे यावर त्वरित आराम मिळविण्यासाठी आंबेहळदीचा लेप लावतात. यामुळे ओढ बसून वेदना कमी होतात.

चिमूटभर आंबेहळद आणि मलई एकत्र करून चेहर्‍यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो.

Dr. Kalpesh Wani
Dr. Kalpesh Wani
BAMS, Ayurveda Panchakarma, 8 yrs, Pune
Dr. Tushar Dorage
Dr. Tushar Dorage
MS/MD - Ayurveda, Gynaecologist Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Dr. Nitin Shingare
Dr. Nitin Shingare
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 9 yrs, Pune
Dr. Nikhil N  Asawa
Dr. Nikhil N Asawa
MDS, Implantologist Prosthodontist, 6 yrs, Pune
Dr. Geetanjali Ghule Karad
Dr. Geetanjali Ghule Karad
BHMS, Homeopath, 9 yrs, Pune
Hellodox
x