Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Diet and Nutrition :
Does the word Diet make you think of unpleasant weight-loss regimen? Forget it, Diet also refers to the food and drink a person consumes daily and the mental and physical circumstances connected to eating. Eating nutrition give you beautiful body not just outside but also inside.

मुंबई : वर्कआऊट केल्यानंतर खूप तहान लागते. तसंच वर्कआऊट करण्यासाठी शरीरात ऊर्जा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वर्कआऊट दरम्यान स्टॅमिना राखण्यासाठी हायड्रेट आणि एनर्जेटीक असणे आवश्यक आहे. अशावेळी तुम्ही बाहेरचे ड्रिंक्स खरेदी करता आणि त्याचा आस्वाद घेता. पण सर्वच ड्रिंक्स हेल्दी असताच असे नाही. त्यात कलर्स, सिथेंटीक एडिटिव्स आणि अनैसर्गिक फ्लेव्हर्सचा वापर केला जातो. त्यामुळेच त्याऐवजी या चार पेयांचे सेवन करणे आरोग्यदायी ठरेल. यामुळे तुम्हाला भरपूर एनर्जी मिळेल आणि फॅट्सही वाढणार नाहीत.

संत्र्याचा रस-
संत्र्याच्या रसात व्हिटॉमिन सी, ई भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुम्हाला एनर्जी तर मिळेलच पण फॅट्सही वाढणार नाहीत. हे अत्यंत आरोग्यदायी ड्रिंक आहे.

केळे व व्हिट ग्रास ड्रिंक-
हे ड्रिंक अतिशय हेल्दी मानले जाते. यातून शरीराला भरपूर ऊर्जा मिळते.

गाजराचा रस-
वर्कआऊटनंतर गेलेली ऊर्जा भरून काढण्यासाठी गाजराचा रस हा उत्तम उपाय आहे.

चॉकलेट शेक-
चॉकलेट शेक टेस्टी असण्याबरोबच त्यामुळे थकवाही कमी होतो.

उन्हाळ्यात नेमके खायचे तरी काय? असा प्रश्न अनेकदा पडतो. उन्हाळा म्हटलं की प्रचंड उकाडा आणि अंगावर येणारा घाम यामुळे अनेकदा चिडचीड होते. त्यामुळे जेवण करणंच काय पण, आयतं गरमागरम पदार्थांचं ताट जरी कोणी पुढे ठेवलं तरी ते खावसं वाटत नाही. अशा वेळी दुपारच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा समावेश आवर्जून करावा याविषयी थोडक्यात.

– उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात हलका फुलका आहार ठेवावा.
– वरण, आमटी, कोथींबीर किंवा आलं पुदिन्याची चटणी ही जेवणात असावी.
– हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. यावेळी वाल, पावटा, छोले, राजमा, हरभरा ही कडधान्ये मात्र टाळावीत.
– मूग, मूगडाळ, तूरडाळ, मसूर, कुळीथाचे पीठ असं आहारात असावी.
– त्याचप्रमाणे काकडी-टोमॅटो-बीट-गाजर-कांदा यांची कोशिंबीरीचा आवश्य आहारात समावेश करून घ्यावा.
– तर कामावर जाणाऱ्यांनी दुपारच्या जेवणात डब्याला पोळी भाजी न्यावी. भाजीमध्ये हिरव्या भाज्या किंवा फळभाज्यांचा समावेश करावा.
– नाश्ता आणि जेवण यांच्या मधल्या काळात फळे खावीत. कलिंगड, खरबूज, जाम अशी फळं खावीत.
– या ऋतूत लक्षात ठेवून दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी अवश्य प्यावे.
– जेवणानंतर एकदम पाणी पिऊ नये तसेच जेवताना फ्रिजमधील थंड पाण्याचा वापर तर कटाक्षाने टाळावा.

रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केल्याने मूत्रपिंडाच्या आजारापासून संरक्षण मिळू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

विशेष करून तरुण वयापासूनच मीठ कमी सेवन करण्याची सवय ठेवली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. देशात मूत्रपिंड निकामी होणे हे मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण आहे. स्वयंपाकघराची सूत्रे महिलांकडे असतात तेव्हा त्यांनीच मिठाचा वापर कमी करण्याची आवश्यकता आहे.

२५ ते ३० वयोगटातील मूत्रपिंड रुग्णांची संख्या वाढत असून ती पाच-सहा वर्षांपूर्वी एवढी जास्त नव्हती, असा दावा मुंबईच्या सैफी रुग्णालयाचे मूत्रविकारतज्ज्ञ अरुण दोशी यांनी केला आहे. अतिरक्तदाब हा विकार मूत्रपिंड निकामी होण्यामुळे होऊ शकतो.

किंबहुना ते त्यामागे एक प्रमुख कारण आहे. मीठ आणि रक्तदाब यांचा थेट संबंध आहे. जास्त मीठसेवनाने रक्तदाब वाढतो. रक्तदाब कमी झाला तर अतिरक्तदाब आटोक्यात येऊ शकतो.

आपण आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यात मीठ कमी असले पाहिजे, चीज बटर, साखर व मीठ हे प्रमुख घटक शरीरास घातक आहेत. त्यांचे सेवन कमी केले पाहिजे. उत्तर भारतातून तरुण मुले डायलिसिससाठी येतात, असे अपोलो रुग्णालयाचे डॉ. अमित लंगोटे यांनी सांगितले. लठ्ठपणा व मधुमेह यामुळे मूत्रपिंडाचे विकार होतात असे सांगून ते म्हणाले की, महिलांमध्ये मिठाचा कमी वापर करण्याबाबत जागृती केली पाहिजे. लोणची, पापड, चटणी व जादाचे नमकीन पदार्थ टाळले पाहिजेत.

सैफी रुग्णालयाचे हेमल शहा यांनी सांगितले की, कमी उष्मांक व कमी मीठ असलेला आहार आवश्यक आहे. फळे, भाज्या, कमी मेदाचे दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आवश्यक आहे. कधीच जेवणात जास्तीचे मीठ वाढून घेऊ नका. सॅलडवर मीठ टाकून घेऊ नका.

आदिती शेलार यांनी सांगितले की, वेदनाशामक औषधे व इतर औषधे शक्यतो टाळली पाहिजेत त्यामुळे मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो.

दहीभात हा आपल्याकडे कधी पोट खराब झाल्यावर किंवा आणखी काही कारणाने केला जाणारा पदार्थ. मात्र दक्षिण भारतात दहीभात ही स्पेशल डिश म्हणून ओळखली जाते. दहीभाताचे आरोग्यासाठी अनेक उपयोग असतात. एकीकडे भातामध्ये असणारे पोटॅशियम, लोह, कार्बोहायड्रेटस, मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन बी असे घटक असतात. तर दुसरीकडे दह्यामध्ये प्रोटीन, अँटीऑक्सिडंटस, प्रोबायोटीक्स, कॅल्शियम आणि इतरही अनेक घटक असतात. त्यामुळे या दोन्हीचे मिश्रण मिळून आरोग्याला अनेक उपयुक्त घटक दहीभातातून मिळतात. उन्हाळ्याच्या दिवसात तर गार दहीभात खायलाही छान वाटतो आणि तोंडाला चवही येते. पाहूयात दहीभात खाण्याचे नेमके फायदे…

पचनशक्ती सुधारण्यास उपयुक्त

आपण खात असलेले अन्न योग्य पद्धतीने पचणे आवश्यक असते. दह्यामध्ये असलेल्या प्रोबायोटीक्समुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते. या घटकामुळे पोटाचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते आणि पचनक्रिया सुधारते. दहीभातामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास, पोटदुखी यांसारखे पोटाशी निगडत आजार दूर होण्यासही मदत होते.

शरीर थंड ठेवण्यास उपयुक्त

दह्यामध्ये असणारी खनिजे शरीर थंड आणि शांत ठेवण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत दहीभात खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. दक्षिण भारत हा उष्ण प्रदेश असल्याने येथील लोक दहीभात खाणे पसंत करतात आणि म्हणूनच हा त्यांच्याकडील प्रसिद्ध पदार्थ समजला जातो.

ताण दूर करण्यासाठी तसेच भिती घालविण्यासाठी फायदेशीर

दह्यामध्ये असणाऱ्या अंटीऑक्सिडंटसमुळे तसेच स्निग्ध पदार्थांमुळे शरीराला फायदा होतो. या घटकांमुळे तुमचा ताण कमी होण्यास तसेच मनातील भिती दूर होण्यास मदत होते. म्हणून तुम्ही दहीभात खाल्लात तर तुमच्या मेंदूची क्रिया अधिक चांगल्या पद्धतीने होते आणि ताण कमी होण्यास फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यासाठी गरजेचे

दहीभातामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. फायबरमुळे तुमचे पोट दिर्घकाळ भरलेले राहते. तसेच यामध्ये कार्बोहायड्रेटसही जास्त असतात त्यामुळेही पोट भरलेले राहते. त्यामुळे तुम्ही दुपारच्या जेवणात दहीभात खाल्लात तर तुमचे पोट रात्रीच्या जेवणापर्यंत भरलेले राहते. त्यामुळे आपले अनावश्यक खाणे बंद होते आणि वजन नियंत्रणात येण्यासही मदत होते.

जेवणात भले आपण कितीही सकस पदार्थांचा समावेश करत असू पण, तरीही जेवणातून शरीरास अपायकारक घटक आपल्या पोटात जात असल्याची बाब समोर आली आहे. आपल्या प्रत्येक जेवणातून प्लास्टिकचे सुमारे १०० अत्यंत सुक्ष्म कण पोटात जात असल्याचं यूकेतील हेरॉयट-वॉट विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका संशोधनांत सिद्ध केलं आहे. दर वीस मिनिटाला हे घटक अन्नातून किंवा श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचं या संशोधनातून म्हटलं आहे.

यासाठी विद्यापीठातील चमूने काही घरातील जेवणाच्या ताटांचं निरिक्षण केलं. या ताटांवर त्यांना प्लॅस्टिकचे लहान कण आढळून आले. दर वीस मिनिटांनी जेवणाच्या ताटावर प्लॅस्टिकचे छोटे छोटे कण जमा होतात. त्याच ताटांतून आपण जेवतो. त्यातूनच हे प्लॅस्टिकचे लहान कण आपल्या पोटात जातात असं शास्त्रज्ञ टेड हेन्री यांनी सांगितले. विचार करायचा झाला तर प्रत्येक जेवणासोबत प्लॅस्टिकचे सरासरी ११४ कण पोटात जातात असं यातून समोर आलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्लॅस्टिकचे छोटे कण घरात प्रवेश करतात. अनेकदा कपडे, घरातील कार्पेट किंवा फर्निचरवर हे कण असतात. काहीवेळा धूळीसोबत हे कण घरात येऊ शकतात अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या संशोधनानुसार वर्षाकाठी प्रत्येक माणसाच्या शरीरात १४ ते ७० हजार प्लॅस्टिकचे कण जमा होतात.

Dr. Pruthviraj  Ugale
Dr. Pruthviraj Ugale
MS/MD - Ayurveda, Ayurveda Diabetologist, 1 yrs, Pune
Dr. Shreya Agarwal
Dr. Shreya Agarwal
BPTh, Physiotherapist, 1 yrs, Pune
Dr. Vijay Hatankar
Dr. Vijay Hatankar
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 21 yrs, Pune
Dr. Mukund Ghodke
Dr. Mukund Ghodke
BAMS, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Sucheta  Mokashi
Dr. Sucheta Mokashi
BDS, Dentist, 3 yrs, Pune
Hellodox
x