Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Published  
Dr. HelloDox Care #
HelloDox Care
Consult
डेंग्यू
#रोग तपशील#डेंग्यू



महानगरांमध्ये पसरलेली डेंग्यूची साथ पाहता वृत्तपत्रे, टीव्ही यामधून या आजाराविषयी बहुतेक सर्वच लोकांना माहिती झाली असेल. मात्र अनेकदा या माहितीमुळे जनजागृतीसोबतच भीतीही पसरते. वास्तविक डेंग्यू हा आजार विषाणूंमुळे पसरत असून तो स्वनियंत्रित आहे. म्हणजे योग्य आहार, द्रवपदार्थ व आराम या त्रिसूत्रीचा उपयोग केल्यास रुग्ण बरा होतो. त्यामुळे या आजाराची भीती न बाळगता योग्य प्रतिबंधात्मक उपाय व उपचारांची अधिक गरज आहे.

लागण कशी होते?
स्वच्छ, साचलेल्या पाण्यात अंडी घालणारा ‘एडीस इजिप्ती’ हा डास डेंग्यूचे विषाणू पसरवतो. हे डास शक्यतो सकाळी व संध्याकाळी चावतात. पावसाळय़ानंतर तापमानात होत असलेल्या चढउतारांमध्ये डेंग्यूच्या विषाणूंची संख्या वाढते आणि त्यामुळे संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढते. डासांनी वहन करून आणलेल्या विषाणूंशी लढण्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमी पडली की डेंग्यूची लागण होते.

विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि मलेरियाचा ताप

या सर्व आजारांची लक्षणे साधारण एकसमान असून सुरुवातीला ताप येतो. त्यामुळे विषाणूजन्य ताप आणि डेंग्यू, मलेरियाचा ताप कसा ओळखावा, असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. विषाणूंमुळे येणारा ताप साधारणपणे दोन ते चार दिवस असतो. या तापामध्ये अंगदुखी, उत्साह कमी होणे, थकवा येणे ही लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. व्यवस्थित आहार, जास्तीत जास्त पाण्याचे सेवन आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन यातून घरच्या घरीच बरे होता येते.

मात्र थंडी भरून ताप येत असेल, काही ठरावीक कालावधीने उदाहरणार्थ दर आठ किंवा १२ तासांनी ताप येणे, उलटी, मळमळ किंवा जुलाब होणे, दम लागणे, अन्नपचन न होणे आदी लक्षणे असल्यास ताप अंगावर न काढता तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावेत. रुग्णाचा रक्तदाब, नाडी तपासून रुग्णाला ग्लुकोजची आवश्यकता आहे का याबाबत डॉक्टर निर्णय घेतात.

आकडी किंवा बेशुद्ध अवस्था, रक्तस्राव, रक्ताची उलटी, हात आणि पायावर लाल पुरळ यायला लागले तर लगेचच या रुग्णांना मोठय़ा रुग्णालयांमध्ये दाखल करणे गरजेचे आहे.

लहान मुले किंवा वयोवृद्ध रुग्णांना खूप जास्त प्रमाणात म्हणजे साधारण १०४-१०५ अंश.सें. ताप आल्यास आकडी येऊ शकते. तेव्हा या वयोगटातील रुग्णांना तापाच्या औषधांसोबत मोकळी हवा आवश्यक असते. त्यामुळे खिडक्या, दारे उघडे ठेवावीत, पंखा लावावा, अंगावर कमीत कमी कपडे घालावेत आणि साध्या किंवा थंड पाण्याने अंग पुसून घ्यावे. जेणेकरून ताप डोक्यापर्यंत पोहोचून आकडी येणार नाही.

डेंग्यू किंवा मलेरियामध्ये घ्यावयाची काळजी

तापाचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ औषधोपचार सुरू करावेत. शारीरिक अवस्थेनुसार आवश्यकता भासल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते. औषधोपचार सुरू असतानाच रुग्णाचे जेवण आणि पाण्याच्या सेवनाकडे नातेवाईकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मलेरियामध्ये रक्तातील साखर कमी होते. तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांच्याबाबत ही काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करणे. बहुतांश वेळा रुग्ण ताप किंवा अन्य त्रास बरे झाले की औषधे घेणे बंद करतात. त्यामुळे मग दाद न देणारा तापही होण्याची शक्यता असते.

तापाचे निदान आवश्यक

विविध जिवाणूंच्या संसर्गाप्रमाणे तापामध्ये विविधता असते. त्यामुळे विषाणूजन्य तापाव्यतिरिक्त लक्षणे आढळल्यास किंवा दोन दिवसांनीही ताप कमी होत नसल्यास डॉक्टरांकडे जाऊन तापाचे निदान करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यातील आजारांमुळे गंभीर अवस्था किंवा मृत्यू होण्याची कारणे

सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ताप अंगावर काढणे, वेळेत औषधोपचार न घेणे. याव्यतिरिक्त अति कमी झालेला रक्तदाब, फुप्फुसामध्ये निर्माण झालेले पाणी, मेंदूतील किंवा इतर महत्त्वाच्या अवयवातील रक्तस्राव, मूत्रपिंड किंवा यकृत निकामी झाल्याने होणारे दुष्परिणाम यांमुळेही मृत्यू ओढवू शकतात. मात्र वेळेत तज्ज्ञांकडे नेऊन उपचार सुरू केल्यास बहुतांश रुग्णांना आराम पडतो.

लक्षणे
डेंग्यूची लक्षणे ही सर्वसामान्य विषाणूसंसर्गाप्रमाणेच असतात. मात्र काही वेळा दोन-तीन दिवसांनी ताप उतरला की असह्य़ डोकेदुखी होऊ लागते, उलटय़ा होतात, अंग मोडून येते, सूज येते. डेंग्यूच्या तापामध्ये सांधे दुखतात, अंगावर चट्टेही उठतात.

उपचार
या आजाराचे निदान जेवढय़ा लवकर होईल, तेवढे चांगले. डेंग्यूवर परिपूर्ण उपचार सापडलेले नाहीत. मात्र डेंग्यूच्या लक्षणांवर उपचार केले जातात. या आजारादरम्यान शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे अत्यावश्यक असते. त्यामुळे पाणी, फळांचे रस यातून दिवसातून दोन ते अडीच लिटर द्रवपदार्थ शरीरात जाणे आवश्यक आहे.

आजार गंभीर स्वरूपाचा असल्यास रक्तदाब कमी होतो. रुग्णांना आयव्ही फ्लुइड (सलाइन) आणि प्लेटलेट्स द्याव्या लागतात. बहुतांश वेळा डेंग्यू बरा होत असला तरी त्यातील हेमोरेजिक प्रकार मात्र प्राणघातक आहे. या प्रकारात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाटय़ाने घसरते. अंतर्गत रक्तस्राव होऊन अवयव निकामी होतात. डेंग्यूच्या या प्रकाराचे प्रमाण कमी आहे. त्यातच उपचार करण्यास उशीर किंवा हयगय झाल्यास प्रकृती गंभीर होते.

प्रतिबंधात्मक उपाय
डासांची संख्या कमी करणे व त्यांना दूर ठेवणे हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. घरात व परिसरात पाणी साचू न देणे, फुलदाण्या, फेंगश्युईची रोपे, नारळाला कोंब यावा म्हणून ठेवलेले पाणी यातही डेंग्यूच्या अळ्या सापडतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करायला हवेत.

Dr. SS Bansal
Dr. SS Bansal
MBBS, Obstetrics and Gynecologist, 32 yrs, Pune
Dr. Neha Dhakad
Dr. Neha Dhakad
BHMS, Homeopath Family Physician, 14 yrs, Bengaluru (Bangalore)
Dr. Abhay Singh
Dr. Abhay Singh
MBBS, Family Physician, 2 yrs, South Delhi
Dr. Krishnath Dagade
Dr. Krishnath Dagade
BAMS, General Physician Family Physician, 28 yrs, Pune
Dr. Prachi Nandode
Dr. Prachi Nandode
BHMS, Homeopath, 18 yrs, Pune