डोके दुखी हे एक कॉमन प्रॉब्लम आहे. याचे बरेच कारणं असू शकतात, जसे डोळ्यांची समस्या, अपच, ऊन लागणे, अनियमित मासिक धर्म, सायनास, ताप, रजोनिवृत्ती, निरंतर चिंता, मानसिक तणाव, उशीरा रात्रीपर्यंत जागणे, अनिद्रा, दुखी राहणे, कडक उन्हात फिरणे थकवा, दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन इत्यादी. अशात जास्त पेन किलरचे सेवन केल्याने रिऍक्शनची भिती सदैव राहते. म्हणून जर तुम्ही डोकेदुखीने परेशान असाल तर आम्ही तुम्हाला देत आहे डोकेदुखीपासून लगेचच आराम देण्यासाठी काही घरगुती उपाय ...
1. लवंगांत थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावे. या पावडरला एका बरणीत भरून ठेवावे, जेव्हा कधी डोकं दुखायला लागेल तर या पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करून ती पेस्ट डोक्यावर लावावी. लगेचच डोके दुखीत आराम मिळतो.
2. एका ग्लासमध्ये गरम पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायला पाहिजे. जर गॅसमुळे डोकं दुखत असेल तर लगेचच आराम मिळेल.
3. युकेलिप्टसच्या तेलाने डोक्याची मॉलिश करायला पाहिजे. याने डोकेदुखीत आराम मिळण्यास मदत होते.
4. जर तुम्ही वारंवार होणार्या डोकेदुखीमुळे परेशान असाल तर रोज एक ग्लास गायीच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. आराम मिळेल.
5. कलमी (दालचिनी)ची पूड तयार करून ठेवावी. जेव्हा डोकं दुखण्यास सुरू होईल तेव्हा कलमीच्या पावडरला पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्टला डोक्यावर लावावे, नक्कीच आराम मिळेल.
6. सर्दीमुळे होणार्या डोकेदुखीत धणेपूड आणि साखरेचा घोळ तयार करून त्याचे सेवन केल्याने फायदा होतो.
7. गर्मीमुळे डोकं दुखत असेल तर चंदन पाउडरचे पेस्ट तयार करून कपाळावर लावल्याने डोकेदुखी दूर होईल.
8. नारळाच्या तेलाने 10-15 मिनिट डोक्यावर मसाज केल्याने देखील डोकं दुखीत आराम मिळतो.
9. लसणाची एका कळीचा रस बनवून प्यायल्याने देखील डोकेदुखीवर आराम मिळतो.
10. नेहमी डोकं दुखत असेल तर सफरचंदावर मीठ लावून खायला पाहिजे. त्यानंतर गरम पाणी किंवा दुधाचे सेवन केले पाहिजे. जर तुम्ही हा प्रयोग लागोपाठ 10 दिवसापर्यंत कराल तर डोकेदुखीची समस्या दूर होईल.
* अंगाचा दाह होत असल्यास रिठ्याचा फेस अंगाला चोळल्याने आराम वाटतो.
*पोटात कृमी झाल्याने लहान मुलांचे पोट सतत दुखत राहते. अशा वेळी पाव ग्रॅम रिठ्याचे टरफल गुळातून घाटवल्यास कृमी पडून जातात.
*कफ चिकटून राहत असल्यास तोंडात रिठा धरून थोडा थोडा सा गिळत राहिल्यास कफ पातळ होतो आणि पडून जातो.
* मनुष्य फेफरे येऊन पडल्यास रिठे उकळवलेले पाणी नाकात सोडणे हा उत्तम उपाय आहे.
*कोणत्याही प्रकाराचे विष पोटात गेले तर रिठ्याचे पाणी प्यायला द्यावे. यामुळे उलटी होते आणि विष
*मसालायुक्त शिकेकाई करताना रिठे वापरले जातात. त्यामुळे नैसर्गिक कंडिशनरचे काम होते.
मुंबई : काही जण स्टाईल म्हणून असेल तर काही जणांना डोळ्यांचं आरोग्य जपण्यासाठी नियमित चष्मा वापरणं गरजेचे असते. परंतू नियमित चष्मा वापरणार्यांमध्ये एक समस्या हमखास आढळते. ही समस्या म्हणजे नाकाजवळ दिसणारे काळे डाग. सतत चष्मा वापरणार्यांमध्ये नाकाजवळ काळे डाग दिसण्याची समस्या हमखास आढळते. हा डाग तुमचं सौंदर्यांच्या आड येत असल्यास काही घरगुती उपायांनी हे डाग हटवले जाऊ शकतात हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
1. संत्र्याची साल -
संत्र्याची साल उन्हामध्ये सुकवा. सुकवलेल्या सालीची पूड करा. यामध्ये दूध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट नियमित नाकाजवळ लावा. संत्र आणि दूध दोन्ही त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी मदत करत असल्याने नाकपुडीजवळील काळे डाग दूर होण्यास मदत होईल.
2. लिंबू -
लिंबू नैसर्गिकरित्या क्लिंजर म्हणून काम करते. चमचाभर लिंबाच्या रसामध्ये थोडं पाणी मिसळा. या मिश्रणामुळे नाकपुडीवरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल.
3. बदामाचं तेल -
बदामाचं तेल रात्री झोपण्यापूर्वी नाकपुडीजवळ लावा. सकाळी चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवावा. यामुळे काळे डाग दूर होण्यास मदत होते.
या घरगुती उपायांंसोबतच नाकपुडीवर चष्मांच्या नोझपॅडमुळे पडणारे डाग हटवण्यासाठी ते नियमित आणि काही ठराविक कालांंतराने बदलणं गरजेचे आहे.
तसे तर शारीरिक वेदना सामान्य समस्या आहे, लहान-सहान वेदनांसाठी अनेक लोकं डॉक्टरकडे जायला टाळतात. पण वेदनांमुळे परेशानही असतात. अश्याच काही वेदनांसाठी किचनमध्ये आपल्या वैद्य सापडू शकतो. वाचा किचनमध्ये आढळणारे 5 औषध...
कांदा- कानाच्या वेदनेमुळे त्रस्त आहात, तर घाबरण्यासारखे काही नाही. कांद्याच्या रस काढून कापसाच्या मदतीने कानात दोन ते तीन थेंब टाका. काही वेळेतच आराम मिळेल.
हळद- शारीरिक वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गरमागरम दुधात हळद मिसळून सेवन करा. याव्यतिरिक्त तेल आणि हळद गरम करून शरीरावर लावल्यानेही लाभ मिळेल.
लसूण- हे अॅटी बॅक्टीरिअल आणि अँटी इंफ्लेमेटरी तत्त्वाने भरपूर औषध आहे, ज्याने उष्णताही प्राप्त होते. शारीरिक वेदनेत लसूण सर्वोत्तम विकल्प आहे. याव्यतिरिक्त कानात वेदना होत असल्यास लसणाच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने आराम मिळतो.
लवंग- दात दुखीवर लवंग सर्वोत्तम उपाय आहे. भाजलेल्या लवंगीची पेस्ट किंवा लवंगीचे तेल कापसाने दाताला लावल्याने वेदनांपासून मुक्ती मिळेल.
दालचिनी- याने विशेषतः महिलांना मासिक पाळीदरम्यान होणार्या त्रासापासून मुक्ती मिळते. अधिक रक्तस्त्राव होत असल्यास दालचिनी लाभकारी ठरेल. केवळ दालचिनी टाकून चहा बनवा किंवा तयार चहामध्ये दालचिनी पावडर टाकून सेवन करा.
पावसाळा सुरु व्हायला आता काही दिवसच उरले आहेत. पाऊस म्हटला की, पावसासोबत अनेक आजारही आलेच. त्यामुळे पावसाळ्यात अनेक गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य ठरते. पावसाळ्यात खासकरुन व्हायरल ताप भरणे ही समस्या अनेकांना भेडसावते. अशात या तापाकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. अशावेळी प्रत्येक वेळी डॉक्टरांकडील औषधांबरोबरच घरगुती उपाय देखील करावेत. यासाठी नेमकं काय करावं आणि कोणत्या गोष्टींचा समावेश करून घ्यावेत. काय आहेत हे घरगुती उपाय…
१) तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो.
२) तुळस घालून केलेला चहा प्यायल्यानेही ताप लवकर उतरतो. याने खोकल्यासही आराम मिळतो.
३) पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
४) आल्याचा चहा घेतल्यानेही आराम मिळतो. याने तापासोबत कफही निघून जाईल.
५) थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
६) कांद्याचा आणि लसणाचा रस घेतल्याने अंगात मरलेला ताप देखील कमी होतो.
७) तुळशीचा काढाही तापावर फायदेशीर ठरतो. कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण 5-10 मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो.
८) आहारात सफरचंद, दूध, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.
9) जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुक़डा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.