Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : काही जणांना बसल्या जागीदेखील अचानक चक्कर येण्याचा त्रास येतो. वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास तुम्हांला अनेक त्रास शकतात. परिणामी यामधून अनेक समस्या वाढतात. म्हणूनच चक्करचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.

चक्करचा त्रास कसा कराल कमी ?
चक्करचा त्रास अधिक धोकादायक होऊ नये म्हणून आवळा खाणं फायदेशीर ठरतं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. आवळा शरीरात रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करतात.

कसा कराल आवळ्याचा वापर ?
दोन आवळे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. यामध्ये 2 चमचे धन्याचे दाणे मिसळा. त्यानंतर कपभर पाणी मिसळून हे मिश्रण रात्रभर ठेवा. सकाळी उठल्यावर हे मिश्रण गाळून त्याचे केवळ पाणी प्यावे.

मधाचा करा असा वापर
आवळ्याप्रमाणेच मधदेखील चक्कर येण्याचा त्रास कमी करण्यास मदत करते. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मध मिसळा. हे मिश्रण ग्लासभर पाण्यामध्ये मिसळून प्यायल्यास फायदा होतो.

मुंबई : पूर्वी सायंकाळच्या वेळेस दिवा लावल्यानंतर घरात हामखास धूप केला जात असे. यामुळे घरात प्रसन्न वातावरण राहते सोबतच मच्छरांचा त्रासही दूर राहण्यास मदत होत असे.
आजकाल संध्याकाळची वेळ झाली की डासांना दूर करण्यासाठी टेबलटॉप मशीन वापरतात. मात्र त्यामधील केमिकल घटकांमुळे अनेकांना अ‍ॅलर्जी, सर्दी,खोकल्याचा त्रास होतो. गरजेनुसार रिपलेंट लिक्विड भरून हिटींग मशीनामध्ये टाकल्यास डास दूर राहतात. मग रिपलेंट लिक्विड घरच्या घरी बनवले तर ? घरगुती आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून नॅचरल रिपलेंट लिक्विड बनवले तर सुरक्षित मार्गाने घरातून डासांना पळवणं शक्य होते.

घरच्या घरी कसे बनवाल नॅचरल रिपलेंट ऑईल?
पूर्वी ज्या घटकांचा वापर धूपाकरिता केला जात असे त्याच घटकांच्या मदतीने आता घरच्या घरी नॅचरल रिपलेंट लिक्विड बनवता येऊ शकते. त्यामुळे पहा कसा बनवाल घरच्या घरी नॅचरल रिपलेंट ऑईल

साहित्य -
रिफीलची एक बॉटल
2 मोठे चमचे कडुलिंबाचे तेल
5 कापराच्या वड्या

कसे बनवाल हे नॅचरल रिपलेंट ऑइल ?
कापराच्या वड्यांची बारीक पूड करा. त्यामध्ये कडुलिंबाचे तेल मिसळून रिफिल बॉटलमध्ये मिसळा. तुमच्याकडे मोठी बॉटल असेल तर नारळाचं तेलही मिसळता येईल. रिफिल बॉटलमध्ये टाकण्यापूर्वी तेल नीट मिक्स करा. कापूर आणि कडुलिंबाच्या तेलाचा कोणताक दुष्परिणाम होणार नाही. कडूलिंबामध्ये जे एन्टीप्रोटोजोल कम्पाऊंड असतात त्यामुळे डास दूर होण्यास मदत होते.

कडुलिंबाच्या तेलाऐवजी तुम्ही टी ट्री ऑईलदेखील मिसळू शकता. सुमारे 15 दिवस एक रिलिफ बॉटर वापरता येऊ शकते. यामुळे आरोग्याचं रक्षण होईल सोबतच पैशांचीही बचत होऊ शकते.

मुंबई : दिवसेंदिवस शहरात वाढणाऱ्या सार्वजनिक अस्वच्छतेमुळे डासांची उत्त्पती वाढू लागली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासरख्या जिवघेण्या आजारांचे प्रमाणही वाढले आहे.

मग डासांना दूर करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली केमिकलयुक्त उत्पादनांचा परिणाम उलटा आपल्याच आरोग्यावर होतो. संध्याकाळच्या वेळेस बागेत मुलांना खेळायला पाठवताना बाजारात मिळणाऱ्या क्रिम्सचा सर्रास वापर केला जातो. किंवा घरात येणाऱ्या डासांना घरगुती उपायांनी पळवून लावता येऊ शकते. तर बाहेर मिळणाऱ्या विविध उत्पादनांपेक्षा हे सोपे उपाय नक्की करुन पहा...

-डासांना पळवून लावण्यासाठी कडूलिंब फायदेशीर ठरतं. यासाठी खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा. याचा परिणाम ८ तास राहतो.

-घरात कॉईल ऐवजी कापूर जाळा आणि १५-२० मिनिटे त्याचा धूर होऊ द्या. डास दूर पळून जातील.

-लिंबाचे आणि निलगिरीचे तेल सम प्रमाणात मिक्स करुन शरीरावर लावा. त्यामुळे मच्छर तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाहीत.

-दारात किंवा खिडकीत तुळस असल्यास मच्छर दूर पळून जातात. मच्छरांना घरात प्रवेश करण्यास तुळस प्रतिबंध करते.

-लसणाच्या वासाने डास आजूबाजूलाही फिरकत नाहीत. त्यामुळे लसूण किसून
पाण्यात उकळवा आणि रुममध्ये ठेवा. डास दूर पळतील.

-लव्हेंडरचा सुगंध खूप तेज असतो आणि डास तिथे फिरकत नाहीत. म्हणून घरात लव्हेंडर युक्त रुम फ्रेशनर वापरा.

मुंबई : शरीरावर कोठेही जखम झाली तरी रक्त वाहू लागते. मात्र हे वाहणारे रक्त थांबवायेच कसे, हा प्रश्न आहे. त्यावर हे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. या घरगुती उपायांनी ६० सेकंदात रक्त वाहणे थांबेल. पहा कोणते आहेत ते उपाय...

टी बॅग्स
रक्त थांबवण्याचा हा आश्चर्यकारक उपाय आहे. एक टी बॅग पाण्यात बुडवून जखमेवर लावा आणि १० मिनिटांपर्यंत दाबून धरा. रक्त वाहणे थांबेल.

बर्फ
रक्त थांबवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बर्फ लावणे. जखमेवर बर्फ लावल्याने रक्त लवकर क्लॉट होते आणि दुखण्यावरही आराम मिळेल.

हळद
हळदीत जखम भरण्याची क्षमता असते. जखमेवर हळद लावल्याने रक्त कलॉट होण्यास मदत होते. त्याचबरोबर इंफेक्शनपासूनही संरक्षण होते.

फटकी
फटकीत अनेक मिनरल्स असतात. रक्त लवकर क्लॉट होण्यास मदत होते. यासाठी फटकी थोड्या पाण्यासोबत उगाळा आणि त्यानंतर जखमेवर लावा. रक्त क्लॉट होण्यास मदत होईल.

मीठ
मीठ हा देखील रक्त रोखण्याचा चांगला उपाय आहे. तोंडातील अल्सरपासून रक्त रोखण्यासाठी मीठ उपयुक्त ठरते. मीठाच्या पाण्याने आपण गुळण्या करतो त्याचप्रमाणे जखमेतून येणारे रक्त रोखण्यासाठी देखील मीठाचे पाणी उपयुक्त ठरते.

साखर
साखरेत नैसर्गिक अॅँटीसेप्टीक गुणधर्म असतात. यात पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळे रक्त क्लॉट होण्यास मदत होते.

Dr. Vijay E Chaudhari
Dr. Vijay E Chaudhari
BHMS, Homeopath, 25 yrs, Pune
Dr. Dipak S Kolte
Dr. Dipak S Kolte
MD - Allopathy, Gynaecological Endoscopy Specialist Infertility Specialist, 12 yrs, Pune
Dr. Pallavi U Bhurse
Dr. Pallavi U Bhurse
BAMS, Ayurveda Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Ashwini Bhilare
Dr. Ashwini Bhilare
BDS, Endodontist Root canal Specialist, 9 yrs, Pune
Dr. Aarti Vyas
Dr. Aarti Vyas
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Hellodox
x