जायफळ चहा, कॉफी, दुधात व मिठाईत स्वादासाठी वापरतात हे सर्वश्रुत आहे; पण याचा औषधीतदेखील मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. मोठे वजनदार, टणक जायफळ उत्तम प्रतीचे असते. जायफळ अनेक वर्षे तुपात ठेवले असता खराब होत नाही. जायफळापासून तेल निघते. या स्थिर तेलास ‘जातिफळ-नवनीत’म्हणतात.
जायफळ कफवातशामक, शोथहर, वेदनास्थापन, उत्तेजक, कुष्ठघ्न, दुर्गंधीनाशक व वातशामक आहे.
जायपत्रीपासून बनविलेल्या तेलात “जावंत्रिका तेल’ (बांडा साबू) म्हणतात. बाजारात याच्या साबणासारख्या वड्या मिळतात.
झोपताना तुपात उगाळलेल्या जायफळाचा लेप मस्तकावर करण्याने शांत झोप लागते.
डोकेदुखीत दुधात उगाळून मस्तकावर लेप करावा.
पोटदुखी, मोडशी, जुलाबात भाजलेल्या जायफळाची पूड, दूध वा पाण्यातून कैफ येईल इतक्याच प्रमाणात घ्यावी.
डोकेदुखी तसेच बाळंतपणातील कंबरदुखीत पाण्यात अगर दारूत उगाळून लेप करतात.
तुपात उगाळलेल्या 1 ग्रॅम जायफळाचे लेपात 2 थेंब मध व 2 चिमटी खडीसाखरपूड घालून दिवसातून तीन वेळा घेण्याने पांढरी आव, अतिसारास आराम पडतो.
जायफळ भाजून तितकाच गूळ घालून 1/1 ग्रॅमच्या गोळ्या बनवून दर 10 मिनिटांनी 1/1 गोळी जुलाब थांबेपर्यंत घेत जावी. फार लवकर आराम पडतो.
जायफळ तांदळाच्या धुवणात उगाळून घेण्याने उचकी थांबते.
राईच्या तेलात जायफळाचे तेल मिसळून मालीश करण्याने बरेच दिवसाचे जखडलेले सांधे मोकळे होतात.
कामोत्तेजना, स्तम्भन, रजोरोध आदी विकारात हितकर.
अतिसारात जायफळ उगाळून बेंबीवर लेप करतात.
चर्मरोगावर जखम लवकर सुकण्यासाठी पाण्यात उगाळून लेप करावा.
पाव जायफळाचे चूर्ण कोमट पाण्यातून घेण्याने चांगली झोप लागते.
व्रण भरून येण्यासाठी वस्त्रगाळ चूर्णांचे तिळाचे तेलात खलून केलेले मलम वापरतात.
कापसाच्या बोळ्यात पूड घालून दाताखाली धरण्याने दातातील कीड मरते व ठणका थांबतो.
मोठ्या प्रमाणावर घेणे मादक असते
तेलकट त्वचा असणार्यांमध्ये अॅक्ने, पिंपल्स, ब्रेकआऊट्सचा त्रास हमखास जाणवतो. त्यामुळे तेलकट त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अंड्याचा आहारात समावेश केल्याने शरीराला बळकटी मिळते. त्याप्रमाणे केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठीदेखील अंड फायदेशीर आहे. त्वचेसाठी अंड्यातील पांढरा विशेष फायदेशीर आहे.
कसा कराल फेसपॅक?
अंड आणि लिंबू -
अंड्याचा पांढरा भाग वेगळा काढा. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण चेहर्यावर लावा. दहा मिनिटं हा फेसपॅक चेहर्यावर नैसर्गिकरित्या सुकू द्यावा. यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.
या फेसपॅकमुळे चेहर्यावरील तेल कमी होण्यास मदत होते. सोबतच चेहर्यावरील ग्लो वाढतो.
हा फेसपॅक नियमित आठवड्यातून 2-3 वेळेस चेहर्याला लावल्यास अधिक फायदेशीर ठरते.
अंड आणि लिंबाच्या रसाप्रमाणेच अंड्याच्या पांढर्या भागामध्ये आरारूट पावडर मिसळून फेसपॅक बनवणेदेखील फायदेशीर आहे. हा फेसपॅकदेखील त्वचेचे क्लिन्जिंग करण्यास फायदेशीर ठरते.
अंड आणि आरारूट पावडर
एका अंड्याच्या पांढर्या भागात दोन लहान चमचे आरारूट पावडर मिसळा. हे मिश्रण एकत्र करून 10-15 मिनिटं चेहर्यावर लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा.
मातृत्वाच्या टप्प्यावर जेव्हा स्तनपान करण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक आई आपल्या आहाराबाबत जागरूक होते. आपल्या बाळाला पुरेसं दूध मिळावं व आपल्याला ही उत्साही, आरोग्यदायी वाटावं असं प्रत्येकीला वाटत. अशाच स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी काही पोषक अन्नपदार्थ...
जर्दाळू:
जर्दाळू खाल्ल्याने स्त्रियांच्या शरीरात दुधाची निर्मिती अधिक प्रमाणात होते. ताजे जर्दाळू खाणे उत्तम ठरेल. पण हवाबंद डब्यातील जर्दाळू विकत घेणार असाल तर शुगर सिरप ऐवजी नैसर्गिक रसात पॅक केलेले जर्दाळू विकत घ्या.
खजूर:
लोह आणि कॅल्शिअमने युक्त असे खजूर खाल्याने दुधाच्या निर्मितीत वाढ होते. रोज अर्ध्या कप खारीक खाल्याने तुमची दिवसभराची गरज भागवली जाते.
कोबीची पाने:
स्तनपान करत असताना बाळाला पोषकतत्त्व पुरवण्यासाठी शरीराला अधिक कॅलरीजची गरज भासते. कोबीच्या पानात अधिक प्रमाणात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि के असते. आहारात पालेभाज्या जरूर घ्या. मधल्या वेळेत कोबीच्या पानांचे चिप्स खाल्ल्याने काहीतरी वेगळे खाल्ल्याचा आनंद नक्की मिळेल.
भोपळा आणि त्यासारख्या अन्य भाज्या:
दुधीभोपळा, भोपळा, शिराळ यांसारख्या भाज्या दूध निर्मितीस मदत करतात. त्याचबरोबर यात भरपूर पौष्टीक घटक असून पचनास ही हलक्या असतात.
मेथी:
यात मुबलक प्रमाणात लोह आणि कॅल्शिअम असल्याने स्तनपान करणाऱ्या स्त्रियांसाठी उत्तम आहे. कारण यामुळे दूध निर्मितीस चालना मिळते. तसंच यात galactagogues असल्याने स्त्रिच्या शरीरात दूध तयार होण्यास मदत होते. मेथीचे दाणे इतर भाज्यांवर घालून खा किंवा ग्लासभर पाण्यात मेथीचे दाणे भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या.
तूप:
तुपामुळे दूध निर्मितीचे कार्य अधिक सक्रिय होते. तसेच त्यातून अनेक पोषकघटक मिळतात ज्यामुळे हाडं मजबूत होतात. तुम्ही काही भाज्या तेलाऐवजी तुपात बनवू शकता.
उन्हाळ्यानंतर पावसाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. पावसात भिजणे, मस्ती करणे प्रत्येकालाच आवडते. पण पावसाचा आनंद लूटत असताना अनेक आजार, इंफेक्शनला निमंत्रण मिळते. पण काही ठराविक गोष्टींची काळजी घेतल्यास इंफेक्शनपासून सुरक्षित राहू शकाल. तर मान्सूनचा आनंद लुटताना या गोष्टींची खबरदारी घ्या...
हातांची स्वच्छता
अधिकतर आजारांचे कारण अस्वच्छता असते, हे आपण जाणतो. पावसाळ्यात तर याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या.
खाण्या-पिण्याच्या सवयी
पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ खाणे महागात पडू शकते. त्यामुळे या मौसमात नेहमी घरात शिजवलेल्या ताज्या, गरम अन्नाचा आस्वाद घ्या. पचनतंत्र बिघडू नये म्हणून आहारात भात, दही, ताक, दूध, केळे, जिरं, आलं किंवा कांदा यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
काय खावू नये?
एरव्ही पोष्टीक ठरणाऱ्या पालेभाज्या पावसाळ्यात खाणे टाळावे. कारण त्यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो. तळलेले पदार्थांचे प्रमाण कमी करावे. तर मीठाचा वापरही नियंत्रणात असावा.
शरीराची स्वच्छता
पावसाळ्यात पावसाचे पाणी आणि घाम त्वचेवर राहील्याने इंफेक्शनचा धोका वाढतो. त्यामुळे दिवसातून दोनदा अंघोळ करणे योग्य ठरेल. त्याचबरोबर अंग पुसण्यासाठी कोरडा टॉवेल वापरावा. कारण या मौसमात फंगल इंफेक्शन होण्याची संभावना असते.
अनेकदा मधुमेहामुळे डोळे, किडनी आणि हृदयाला नुकसान पोहचल्यावरच हा आजार असल्याचे निष्पन्न होते. सुरुवातीला याचा पत्ताही आपल्याला लागत नाही. शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करणाऱ्या या आजाराचे लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन त्यावर उपचार करता येतात. शरीरात होणारे हे बदल मधुमेहाचा संकेत देतात. पाहुया काय आहेत याची लक्षणे...
वारंवार लघवी येणे
जेव्हा शरीरात ब्लड शुगरचे प्रमाण वाढते तेव्हा वारंवार लघवी येते. शरीरात जमा झालेली शुगर मुत्राद्वारे शरीराबाहेर टाकली जाते.
खूप तहान लागते
ब्लड शुगरने पीडित व्यक्तीला सारखी तहान लागते.
भूक वाढते
शरीरात साखरेचे प्रमाण वाढल्याने सारखी भूक लागते. तुम्हालाही हे लक्षण दिसताच एकदा ब्लड शुगर तपासून पहा.
वजन कमी होणे
भूक वाढूनही वजन मात्र कमी होत असल्यास ब्लड शुगर जरुर तपासा.
थकवा येणे
दिवसभर आळसावलेले वाटणे, थोडेसे काम केल्याने थकवा जाणवणे किंवा रात्रभर झोपूनही झोप पूर्ण झाल्यासारखी न वाटणे. ही लक्षणे मधुमेहाचा इशारा देतात. तेव्हा याकडे दुर्लक्ष करु नका.
कोणत्याही कामात मन न लागणे किंवा एकाग्रता कमी होणे
ब्लड शुगर अधिक असलेल्या व्यक्तीचे मन कोणत्याही कामात लागत नाही. कोणत्याही कामात एकाग्र करणे त्यांना अवघड होते.
अंधूक दिसणे
मधुमेहाचा सर्वात अधिक प्रभाव डोळ्यांवर पडतो. त्यामुळे व्यक्तीला कमी दिसू लागते. ब्लड शुगरमुळे डोळ्यांच्या पडद्यांना नुकसान पोहचते.
जखम उशिरा ठीक होणे
भाजी कापताना बोट कापल्यास किंवा शेव्हींग करताना कट गेल्यास ते लवकर ठीक होत नाही? मग हे ब्लड शुगर वाढल्याचे लक्षण आहे.
त्वचेची समस्या
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने त्वचेच्या समस्या तोंड वर काढू लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स खूप जलद गतीने वाढू लागतात.