Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : आज ७ एप्रिल म्हणजे विश्व स्वास्थ्य दिवस. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वास्थ्याच्या अनेक समस्या जडत आहेत. त्याचबरोबर वाढत्या वयासोबत शरीरात अनेक बदल होत असतात आणि योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्याच्या नाना विध समस्या जडू लागतात. तसंच यासाठी आपल्या काही चुकीच्या सवयीही कारणीभूत ठरतात. जसं की जेवण्याचा अयोग्य वेळा, व्यायाम न करणे, अनहेल्दी पदार्थांचे सेवन, व्यसने. म्हणून हेल्दी राहण्यासाठी योग्य त्या वयात आवश्यक त्या तपासण्या करणे गरजेचे आहे. पाहुया कोणत्या वयात कोणत्या टेस्ट कराव्यात...

वय वर्ष २०-
प्रत्येक वर्षी रक्तदाबाची तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उंची आणि वजन नियमित तपासून पहा. दात आणि डोळ्यांचे आरोग्य तपासा. प्रत्येक दोन वर्षांनी एचआयव्हीचे स्क्रीनिंगही करणे आवश्यक आहे. पाच वर्षांनी कोलेस्ट्रॉल तपासणे, काळाची गरज झाली आहे.

वय वर्ष ३०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त मधुमेह, थायरॉयईड, अॅनेमिया आणि लिव्हर यांचे आरोग्य तपासावे. रक्ततपासणी करावी. वर्षातून एकदा हृदयासंबंधित आजारांची तपासणी करायला हवी.

वय वर्ष ४०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त दर पाच वर्षांनी एकदा कार्डिओवरक्युलर इवेल्यूएशन करणे गरजेचे आहे. तर वर्षातून एकदा प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी करणे आवश्यक आहे.

वय वर्ष ५०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त प्रत्येक वर्षी एकदा टाईप टू मधुमेह तपासणी करावी. प्रत्येक वर्षी डोळे, कान याव्यतिरिक्त मानसिक आरोग्य, लिपिड डिसऑर्डरची तपासणी करावी.

वय वर्ष ६०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त ऑस्टियोपोरोसिससाठी प्रत्येक वर्षी स्क्रीनिंग. याशिवाय डिमेशिया आणि अलजायमर याची प्रत्येक वर्षी तपासणी करावी.

आपले वय जसे वाढत जाते तसे शरीर थकत असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक असते. वयोमानानुसार आहारात बदल केल्यास तुमचे आरोग्य नक्कीच जास्त चांगले राहू शकते. वयानुसार शरीराच्या गरजा, त्याना आवश्यक असणारे पोषण हे वेगवेगळे असते. २० व्या वर्षी खात असलेले पदार्थ आपण ६० व्या वर्षी खाऊ शकूच असे नाही. त्यामुळे विशिष्ट वयानुसार आपल्याला आहारात बदल करावा लागतो. पाहूयात कोणत्या वयात कोणते पदार्थ खाल्लेले चांगले पाहूयात…

वय वर्षे २०

या वयात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती अतिशय चांगली असते. त्यामुळे या वयात आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्याच तर हे तरुण त्यातून बरे होण्याची शक्यता जास्त असते. या काळात हाडे आणि मांसपेशी वेगाने तयार होत असल्याने या काळातील आहार अतिशय महत्त्वाचा असतो. या वयात आपले शरीर सूपर अॅक्टीव्ह असल्याने शरीराला प्रथिने, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट यांची आवश्यकता असते. त्यामुळे दाणे, सुकामेवा, फळे, पालेभाज्या, दूध, दही, ताक यांचा आहारात आवर्जून समावेश ठेवावा.

वय वर्षे ३०

या वयात करीयर, नोकरी, लग्न अशा अनेक जबाबदाऱ्या व्यक्तीवर आलेल्या असतात. यामध्ये मानसिक आणि शारीरिकही अनेक बदल होतात. या काळात आपण जीवन स्थिरस्थावर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. या काळात आपले प्राधान्यक्रम बदललेले असल्याने आपल्यावर बरेच ताण असतात. अशा काळात शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणारे अंडे, शहाळे, ऑलिव्ह ऑईल, पालेभाज्या, फळे, कमी स्निग्धता असलेले दुग्धजन्य पदार्थ खावेत.

वय वर्षे ४०

या काळात आपल्या आयुष्याचा अर्धा टप्पा आपण गाठलेला असतो. जीवनातील बरेच चढ-उतार पाहिलेले असतात. यानंतर आरोग्याच्या काही तक्रारी निर्माण होण्यास सुरुवात होते. मेटाबॉलिझम, लोहाची कमतरता, रक्तदाब, मधुमेह, हाडांचे दुखणे अशा तक्रारी कमी जास्त प्रमाणात सुरु झालेल्या असतात. या काळात व्यक्तीची पचनशक्ती काही प्रमाणात बिघडलेली असते. तसेच वजन नियंत्रणात राखणे हे एक आव्हान झालेले असते. त्यामुळे या काळात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली आणि इतर सगळ्या भाज्या खाव्यात. तसेच आहारात लसूण, कांदा, हळद, ऑलिव्ह ऑईल असे हृदयाला तंदुरुस्त ठेवणारे पदार्थ खावेत. ओमेगा ३ या काळात अतिशय उपयुक्त ठरते.

वय वर्षे ५०

मागची इतकी वर्षे धावपळ केल्यानंतर या काळात शरीर बोलायला लागलेले असते. या काळात हाडे आपले अस्तित्त्व दाखवायला लागतात. तसेच आपल्या आवडीच्या गोष्टी खाल्ल्यानंतर अचानक जळजळायला लागते. दात दुखतात, केस पांढरे होतात. त्यामुळे या काळात आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात फायबर, झिंक, प्रोटीन, व्हीटॅमिन बी, अंडी, कडधान्ये जास्त प्रमाणात खायला हवे. बाहेरचे खाणे टाळलेलेच बरे.

युटिलिटी डेस्क: मोसंबीचा ज्यूस सर्व हवामानांमध्ये प्यायला जातो. मात्र उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या अधिक असते. कदाचित तुम्हाला मिहिती नसेल की, मोसंबीचा ज्यूस किती फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटामीन सी आणि पोटेशिअम, जिंक, कॅल्शियम, फायबर आढळतो. यासोबत यामध्ये कॉपर आणि आयरनही काही प्रमाणात असतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कॅलोरी आणि फॅट खुप कमी असते. हे पिण्याचे खुप फायदे आहे मात्र यामध्ये आढळणारे पोषकांमुळे हे काही लोकांनी प्यायलाच हवे.

आयुर्वेदिक डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, मोसंबीचा उपयोग पोषक आहाराच्या रूपामध्ये होतो. 15 दिवसांपर्यंत फ्रिजच्या बाहेर ठेवले जावू शकते. हे लिंबूच्या प्रजातीचेच फळ आहे. मात्र, हे त्याहून अनेक पट्टींने लाभदायक मानले जाते. या ज्यूसला जर कमीत कमी साखरेशिवाय किंवा विना पाण्याविना घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते. साखर टाकल्याने त्यामधील कॅलोरीजची क्वांटिटी वाढते. पोटदुखी, त्वचा संबधी आजार, सांधेदुखी ने पिडित लोकांनी प्यायला हवे. याने अपचनाचा विकारही दुर पळवला जावू शकतो.

मुंबई : पालकामध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असलेला पालक सुपर फूड आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. पालकांची भाजी अथवा पराठे बनवले जातात. मात्र पालकाचे संपूर्ण फायदे मिळवायचे असल्यास त्याचा जूस प्यावा.

हे आहेत पालकाचा रस पिण्याचे फायदे
पालकामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो.

पालकामध्ये व्हिटामिनचे प्रमाण अधिक असते. पालकाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात.

पाचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम पालकाचा रस करते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पालकाचा रस प्यायल्याने फायदा होतो.

त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास पालकाचा रस प्यावा. पालकाचा रस प्यायल्याने त्वचा उजळते. केसांसाठी पालकाचे सेवन चांगले.

गर्भवती महिलांनाही पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पालकाचा रस प्यायल्याने गर्भवती महिलांच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.

पालकामध्ये असलेले कॅरोटीन आणि क्लोरोफिल कॅन्सरपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय पालकाचा रस प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.

पालकाचा रस बनवण्याची कृती
पालकाचा रस बनवण्यासाठी पालक आणि पुदिन्याची पाने धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर यात पाणी, भाजलेले जिरे, काळे मीठ आणि लिंबू मिसळून प्या.

साधारण दोन-एक दशकांपूर्वी ’नॉन-स्टीक’या विशिष्ट प्रकारचे तवे उपलब्ध झाले. दिसायला आकर्षक, वापरण्यास-धुण्यास सोपे असे हे तवे गृहिणींना खूप आवडले.त्यानंतर नॉन-स्टीक पद्धतीची भांडी बाजारात आली. उपरोक्त फायद्यांबरोबरच अन्न शिजवताना कमी तेल लागणे व इंधनाची बचत होणे हे फायदे ह्या नॉन-स्टीक भांड्यांचे होते. ही भांडीसुद्धा आरंभी खूप महाग होती. त्यामुळे नॉन-स्टीक भांडी वापरणे, ही काही काळ तरी श्रीमंतांची मिजास होती. एखाद्या मध्यमवर्गीय गृहिणीने नॉन-स्टीक भांडी घरी आणली की तिची शेजार-पाजारच्या स्त्रियांमध्ये कॉलर टाईट होत असे, यावरुन त्यांच्या किमतीचा अंदाज यावा. पण नंतर काय झाले कोणास ठाऊक, ही नॉन-स्टीक भांडी स्वस्त झाली. इतकी स्वस्त की एका भांड्यावर दुसरे भांडे मोफत मिळू लागले. मुळात पाश्चात्त्यांकडून आलेल्या वस्तू स्वस्त झाल्या की यामागे काहीतरी काळेबेरे आहे, अशी शंका येऊ लागते. काय आहे, या नॉन-स्टीक भांड्यांमागचे गौडबंगाल?

नॉन-स्टिक भांडी तयार करताना एका विशिष्ट केमिकलचा वापर केला जातो, ते म्हणजे परफ्लोरो ओक्टॅनॉइक ॲसिड(पीएफओए). पीएफओए हे आरोग्यासाठी घातक असे केमिकल आहे. वास्तवात नॉन-स्टीक भांड्यामधील ही केमिकल्स स्थिर अवस्थेमध्ये शरीराला तशी घातक नाहीत. मात्र जेव्हा तुम्हीं या नॉन-स्टीक भांड्यांना अन्न शिजवण्यासाठी म्हणून अति-उष्णता देता व जेव्हा त्या भांड्याचे तापमान साधारण २६० अंश सेल्सिअस (५०० अंश फरनहाईट) एवढ्या उष्णतेपर्यंत पोहोचते तेव्हा त्यामधील केमिकल्सचे विघटन सुरू होते व ते भांडे विषारी वायू फेकू लागते. दुर्दैवाने हे विषारी घटक नॉन-स्टिक भांड्यांच्या प्रेमात पडलेल्या घरातल्या गृहिणीच्या शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणात शिरतात. नॉन-स्टिकच्या केमिकल्समधून निघणारे विषारी घटक कोणत्या आजारांना आमंत्रण देऊ शकतात?

पीएफओए चे आरोग्याला घातक गुणधर्म पुढीलप्रमाणे – कार्सिनोजेनिक अर्थात कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते, गर्भिणीने शोषल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम करू शकते; जसे जन्मतः बाळाचा आकार तुलनेने लहान असणे-नंतरच्या वाढीच्या टप्प्यांमध्ये उशिर होणे-वगैरे, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या वाढीवरही परिणाम करू शकते, थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात बाधा आणून थायरॉइड हार्मोनच्या स्रवणामध्ये बिघाड निर्माण करू शकते, रक्तामधील चरबीचा चयापचय बिघडवू शकते(जे पुढे जाऊन अनेक आजारांना कारणीभूत होऊ शकते). उंदरांमध्ये केलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे लिव्हर(यकृत), पॅन्क्रीआ(स्वादुपिंड) किंवा टेस्टीज(वृषण) या अवयवांच्या कॅन्सरला कारणीभूत होऊ शकते, माशांमध्ये केल्या गेलेल्या संशोधनामध्ये पीएफओए हे ऑक्सिडेटिव स्ट्रेसला कारणीभूत होते: अर्थात शरीरामध्ये ऑक्सिडेशनचे प्रमाण वाढवून रक्तामध्ये घातक फ्री-रॅडिकल्सचे प्रमाण वाढवते (फ्री-रॅडिकल्स हाय ब्लडप्रेशर, हार्ट अटॅक-डायबिटीस,कॅन्सर एवढंच नव्हे तर वार्धक्यालाही आमंत्रण देतात), स्त्री-उंदरांवर केलेल्या एका संशोधनामध्ये पीएफओए रक्तामधील इन्शुलिनचे प्रमाण वाढवते. (आता लक्षात आले असेल तुमच्या, नॉन-स्टिक भांडी इतकी स्वस्तात किंवा अन्य खरेदीवर मोफत सुद्धा का मिळू लागली ते!)

हे वाचल्यावर मनात प्रश्न उभा राहतो की आपण एवढ्या उष्णतेपर्यंत नॉन-स्टिक भांडी तापवतो का? याचे ठाम उत्तर देणे कठीण आहे. मात्र कडधान्य-मांस यांसारख्या कठीण कवच असलेल्या पदार्थांना शिजवण्यास वेळ लागतो; त्यासाठी अधिक उष्णता लागते. खाद्य-तेल शिजवण्यासही अधिक उष्णता लागते, मात्र २६० हून कमी रिफाईन्ड करडईचे तेल तापवण्यास मात्र २६० अंश सेल्सिअसहून अधिक उष्णता लागते. अधिक वेळ अन्न शिजवण्याची सवय असणा-या गृहिणी नॉन-स्टिक भांडे अधिक उष्णतेपर्यंत तापवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण २ ते ५ मिनिटे तापवलेले नॉनस्टिक भांडेसुद्धा विषारी वायू फेकायला सुरुवात करते, असा संशोधकांचा अंदाज आहे. रिकामे भांडे नुसतेच तापवणेही घातक होऊ शकते. २०० अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पोहोचल्यावर पीएफओमधील विषारी वायुंमुळे पक्षी मरतात, असे संशोधन सांगते. मानवास होणा-या एका फ्लूच्या लक्षणांमागे पीएफओए कारणीभूत असावा, अशीही शास्त्रद्न्यांना शंका आहे.

वाचकहो, भाज्या शिजवण्यासाठी शरीराला लोह पुरवणार्‍या लोखंडाच्या कढया, आपल्या कुंभारांना अर्थार्जन करुन देणारे मातीचे तवे ( मातीचे पॅन्ससुद्धा आता उपलब्ध आहेत), किंवा स्टेनलेस स्टीलची भांडी असे सुरक्षित पर्याय स्वयंपाकासाठी वापरणे योग्य होईल. “आमची नॉन-स्टिक भांडी पीएफओए पासून बनवलेली नाहीत”,असा प्रचार काही निर्माते आता करताहेत. जे निर्माते या केमिकलचा वापर करत नसतील, त्यांना हा लेख लागू होत नाही. पण यापूर्वी आपण वापरलेली (किंवा आजही वापरत असलेली) नॉन स्टीक भांडी या घातक केमिकल्सपासून बनवलेली होती वा आहेत, याचा हा अप्रत्यक्ष पुरावा नाही का!कोणतीही स्वयंपाकोपयोगी खरेदी करताना त्यामधून नेमकी कोणती केमिकल्स शरीरामध्ये जाणार आहेत, याची माहिती घेण्याची सवय लावा वाचकहो!

Dr. Rajesh  Tayade
Dr. Rajesh Tayade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 10 yrs, Pune
Dr. Annasaheb Labade
Dr. Annasaheb Labade
BAMS, Ayurveda Family Physician, 19 yrs, Pune
Dr. Varshali Mali
Dr. Varshali Mali
MBBS, Gynaecologist Obstetrician, 6 yrs, Pune
Dr. Pawan Sarda
Dr. Pawan Sarda
BAMS, Family Physician, 10 yrs, Pune
Dr. Chhaya Helambe
Dr. Chhaya Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Hellodox
x