Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

स्ट्रेच मार्क्स हे शरीरासाठी हानिकारक नसतात. मात्र शरीरावरील स्ट्रेच मार्क्समुळे हवे तसे कपडे घालायला मिळत नाहीत, अशी अनेकांची प्रामुख्याने तक्रार असते. गर्भावस्थेनंतर महिलांना स्ट्रेच मार्क्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. पोट, पाठ, छाती आणि हातांवर स्ट्रेच मार्क येतात. अचानक वजन वाढल्यामुळे आणि कमी झाल्याने तसेच टीनएजर्समध्ये होणाऱ्या हार्मोन चेंजेंसमुळेदेखील स्ट्रेच मार्क्स येतात. महिला आणि तरूणींना तर हमखास स्ट्रेच मार्क्सच्या समस्यांना सामोरे जावे .

स्ट्रेच मार्क्ससाठी अनेक उपचार आहेत, मात्र ते पूर्णतः गायब होत नाहीत. लेझर ट्रिटमेंटसोबत ट्रेटिनोईन आधारित क्रीम, जेल आणि लोशनच्या मदतीनं स्ट्रेच मार्क कमी होण्यास मदत मिळू शकते. स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत, यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा. वजन नियंत्रणात राहील अशा जीवनशैलीचे अनुसरण करावे. गर्भवती महिलांनी अधिकाअधिक पाणी प्यावे. नियमित व्यायाम करावा. तेलकट त्वचेऐवजी कोरड्या त्वचेवर लवकर स्ट्रेच मार्कची समस्या निर्माण होते. आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानुसार डाएट फॉलो करावा.


व्हिटॅमिन ई

व्हिटॅमिन ई ला ब्यूटी व्हिटॅमिन असं देखील म्हटलं जातं. डॅमेज स्किन सेल्स रिपेअर करून स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी व्हिटॅमिन ई फायदेशीर ठरतं. त्यामुळे आपल्या आहारामध्ये बदाम पालक यांचा समावेश करा कारण यामध्ये व्हिटॅमिन ई चे प्रमाण हे अधिक असते.

व्हिटॅमिन ए

व्हिटॅमिन ए शरीरासाठी फायदेशीर असल्याने आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए चा समावेश करा. गाजर, फिशमध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण हे अधिक असते.

व्हिटॅमिन सी

स्ट्रेच मार्क्सच्या समस्येपासून सुटका हवी असेल तर आहारात व्हिटॅमिन सी चा समावेश नक्की करा. लिंबू, आवळा, संत्र, द्राक्ष खा.

व्हिटॅमिन के

व्हिटॅमिन के बाबत फार कमी लोकांना माहीत आहे. मात्र त्याचा देखील आहारात समावेश करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन के हे स्ट्रेच मार्क्स हटवण्यासोबतच डार्क सर्कल्सही दूर करतात.

नियमितपणे व्यायाम केल्याने शरीरासंदर्भातील अनेक तक्रारी दूर होतात. लठ्ठपणामुळे देखील स्ट्रेच मार्क्सची समस्या उद्भवते. त्यामुळे व्यायाम केल्याने लठ्ठपणावर नियंत्रण मिळवता येते आणि स्ट्रेच मार्क्सवर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.

जर नियमितपणे तुम्ही ब्रश करूनही तुमच्या तोंडाची दुर्गंधी येत असेल तर वेळीच याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे. तज्ज्ञांनुसार, सतत तोंडाची दुर्गंधी येत असेल तर टाइप २ डायबिटीस, लंग्स, लिव्हर आणि किडनी संबंधी आजार असण्याचेही संकेत आहेत.

लंग्स इन्फेक्शनमुळेही अनेकदा सतत तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे वेळीच टेस्ट करावी. (Image

लिव्हर इन्फेक्शनमुळे इनडायजेशनची समस्या होऊ लागते. अशात तोंडाची दुर्गंधी येऊ लागते. (Image

टाइप - २ डायबिटीस झाल्यावर शरीरात ग्लूकोजचं प्रमाण कमी होत असल्याने तहान जास्त लागते. तोंड कोरडं पडू लागतं. सोबतच शरीरात मेटाबॉलिज्म बदल होऊ लागतात. त्यामुळेही तोंडाची दुर्गंधी येते.

किडनी डिजीजमुळे शरीराक मेटाबॉलिक बदल होऊ लागतो. त्यामुळे तोडांची दुर्गंधी येऊ लागते.

हिरड्यांच्या काही समस्या असेल तर पेरिओडोन्टिक नावाचा आझार होतो. यानेही तोंडाची दुर्गंधी येऊ लागते.

लाळ आपल्या तोडांला स्वच्छ ठेवते. पण जेव्हा लाळ कमी तयार होते तेव्हा जेरोस्टोमिया किंवा तोंड कोरडं पडण्याची समस्या होऊ लागते. आपल्या लाळेत अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे तोंडात बॅक्टेरिया जास्त होतात. पण तोंड कोरडं पडत असेल आणि लाळ पुरेशी तयार होत नसेल तर बॅक्टेरियाचं प्रमाण वाढू लागतं आणि तोंडाची दुर्गंधी येऊ लागते.

दिवसेंदिवस बिघडती लाइफस्टाईल आणि चांगला आहार मिळत नसल्याने लहान मुलांचा शारीरिक विकास वेगाने प्रभावित होत आहे. याच कारणामुळे लहान मुलींची उंची सुद्धा योग्य पद्धतीने वाढत नाही. वयाच्या मानाने लहान मुला-मुलींची उंची कमीच राहते. तेच अनेकदा उंची तर कमी असतेच सोबतच वजनही जास्त असतं. यामागे एक नाही तर अनेक कारणे असतात. पण काही सवयींवर लक्ष देऊन आणि काही नैसर्गिक उपाय उपाय फॉलो करून तुम्ही तुमच्या लहान मुलांची उंची वाढवू शकता.

उंची कमी असण्यामागे भलेही आनुवांशिक किंवा मेडिकल कारण असेल, पण योग्य वेळेत उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. चला जाणून घेऊ उंची वाढवण्याचे काही नैसर्गिक उपाय.

सर्वातआधी आहारात करा सुधार

उंची वाढवण्यासाठी सर्वातआधी गरजेचं आहे की, लहान मुलांचा आहार हा न्यूट्रीएंट्सने भरपूर असावा. त्यांच्या डाएटमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, कॅल्शिअम, झिंक, मॅग्नेशिअम आणि फॉस्फोरसचं असणं फार गरजेचं आहे. त्यांना जास्तीत जास्त प्रोटीन द्या, जसे की, चिकन, पनीर, सोयाबीन, फिश, अंडी. यासोबतच हिरव्या भाज्या, सलाद आणि बीन्सचा सुद्धा समावेश करा. त्यांच्या दुधासोबतच त्यांना बदाम, शेंगदाणे, वेगवेगळी फळंही खायला द्या.

स्ट्रेचिंग अ‍ॅन्ड सायकलिंग

लहान मुलांना फिजिकली अ‍ॅक्टिव ठेवणं सुरू करा. त्यांना स्ट्रेचिंग करायला सांगा आणि सायकलिंग सुद्धा करायला सांगा. त्यासोबतच त्यांना अ‍ॅरोबिक्स, टेनिस, क्रिकेट, फुटबॉल आणि बास्केटबॉलसारखे खेळण्यास प्रोत्साहन द्या. तसेच खांबाला लटकण्याची सवयही त्यांना लावा.

रोज योगाभ्यास

रोज त्यांच्या सूर्यनमस्कार करून घ्या. योगाभ्यास केल्याने त्यांचे मसल्स फ्लेक्झिबल होतील आणि स्ट्रेचिंगमुळे उंची वाढण्याचीही शक्यता अधिक असते. तसेच उंची वाढवण्यास त्रिकोणासन, भुजंगासन, सुखासन, वृक्षासन, नटराजासन ही आसने सुद्धा फायदेशीर ठरतात.

योग्य पोश्चर

लहान मुलांचं पोश्चर योग्य असणं फार गरजेचं आहे. कारण अनेकदा पोश्चर चुकीचा असल्याने हाडेही प्रभावित होतात. त्यामुळे त्यांचा उठण्या-बसण्याची आणि उभे राहण्याची पद्धत यावर लक्ष द्या. जेणेकरून त्यांचं पोश्चर योग्य होईल आणि उंची कमी होणार नाही.

चांगली झोपही महत्त्वाची

लहान मुलांना लागलेली मोबाइल आणि टीव्हीची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण अनेकदा लहान मुलं झोपेकडे दुर्लक्ष करून मोबाइल बघत बसतात. त्यामुळे त्यांच्यात हार्मोनचं बॅलन्स बिघडतं. अनेकदा तर पिट्यूरिटी ग्लॅंड सुद्धा या हार्मोन्समुळे प्रभावित होते.

(टिप : वरील लेखात देण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ माहितीसाठी देण्यात आले आहेत. याकडे प्रोफेशनल सल्ला म्हणून बघता येणार नाही. वरील कोणत्याही टिप्स फॉलो करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)

हल्ली प्रत्येकजण आपल्या वाढत्या वजनाच्या समस्येने हैराण आहे. खरं तर वाढत्या वजनाची वेगवेगळी कारणं असतात. पण त्यातल्यात्यात जर लक्षात घ्यायचं झालं तर, आपल्या वाढत्या वजनासाठी आपला दिनक्रम आणि काही सवयी जबाबदार असतात. ज्याबाबत आपल्याला काही माहीत नसतं. आपल्यापैकी बऱ्याचजणांना या सवयी असतात, ज्यांमुळे आपलं वजन सतत वाढत असतं आणि त्याबाबत आपल्याला पुसटशी कल्पनाही नसते. वजन वाडल्यामुळे आपलं शरीर लठ्ठ दिसू लागतं, पण त्याचबरोबर शरीर अनेक आजारांच्या जाळ्यातही अडकतं. अशातच वजन वाढणं ही एक गंभीर समस्या आहे. त्यामुळे आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की, तुम्हाला अशा कोणत्या सवयी आहेत. ज्या वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. तुम्ही या सवयी जर वेळीच बदलल्या तर वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच तुम्ही आजारांपासूनही स्वतःचा बचाव करू शकता. जाणून घेऊया वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सवयींबाबत...

वजन वाढवणाऱ्या सवयी :

झोप कमी घेणं

जर तुम्ही झोप पूर्ण करत नसाल तर, तुमची ही सवयदेखील वजन वाढविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. पूर्ण झोप न घेतल्यामुळे शरीरामध्ये वजन वाढवण्याऱ्या हार्मोन्सचा स्तर वाढतो. ज्यामुळे वजन वाढतं. अशातच जवळपास 7 ते 8 तासांसाठी झोपणं गरजेचं असतं.

एक्सरसाइज न करणं

तुम्ही व्यायामापासूनजेवढं लांब पळाल तेवढी तुमच्या आरोग्याची हानी होईल. त्यामुळे दररोज एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. एक्सरसाइज केली नाही तर शरीरातील कॅलरी बर्न होणार नाही आणि फॅट्सचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.

डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता

आरोग्य जपण्यासाठी हेल्दी डाएट घेणं अत्यंत आवश्यक असतं. जर तुम्ही आहारामध्ये प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करत नसाल तर, त्यामळेही तुमच्या शरीराचं वजन वाढतं. जेवणामध्ये दूध, दही किंवा अंड्यांचं सेवन अवश्य करा. असं केलं नाही तर, शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस स्लो होते आणि वजन वाढू लागतं.

टिव्ही पाहताना खाणं

जर तुम्हाला टिव्ही किंवा लॅपटॉपवर काम करताना खाण्याची सवय असेल तर तुमचं वजन वाढू शकतं. आता तुम्ही म्हणाल, टिव्ही पाहण्याचा आणि वजन वाढण्याचा काय संबंधं? तर संबंध आहे. तुम्ही जेव्हा टिव्ही पाहताना काहीही खाता. तव्हा तुम्ही ओव्हर इटिंग करता. तसेच अनेक लोकांना टिव्ही पाहताना जंक फूड खाण्याची सवय असते. यामुळे शरीरातील फॅट्स वाढतात. त्यामुळे जवताना फक्त जेवणाकडेच लक्ष द्या.

पाणी न पिणं

जर तुम्ही दिवसभरामध्ये 3 लीटरपेक्षा कमी पाणी पित असाल तर त्यामुळे तुमचं शरीरातून नको असलेले पदार्थ बाहेर टाकणं कठिण होतं. ज्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म प्रोसेस स्लो होते आणि तुमचं वजन वाढतं.

नाश्ता स्किप करू नका

जर तुम्ही सकाळच्यावेळी नाश्ता करत नसाल तर त्यामुळ तुमच्या शरीराचं वजन वाढू शकतं. कारण असं न केल्याने शरीराचं मेटाबॉलिजम रेट कमी होतो आणि फॅट बर्न होण्याची प्रोसेस स्लो होते. त्यामुळे सकाळच्यावेळी हेल्दी नाश्ता करा.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. आपली प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.

होळी म्हटलं की रंग हे आलेच. या रंगात रंगण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र हे रंग बऱ्याचदा तुमच्या त्वचेचं, केसांचं नुकसान करू शकतात. तुम्ही अगदी ऑरगॅनिक रंग वापरत असलात तरी सूर्यप्रकाशात आणि रंगांच्या पाण्यात तुमचा बराच वेळ जाणार आहे. पण, काळजी करू नका. अशा काही टिप्स आहेत, ज्यामुळे होळीची धमाल केल्यानंतरही तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहील.

एसपीएफ: एसपीएफ किंवा त्याहून अधिक क्षमतेच्या लोशनचे संरक्षण तुमच्या त्वचेला द्या. त्यामुळे त्वचा मॉईश्चराइज होईल आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासून तिचे संरक्षण होईल. रंग, धूळ आणि उष्णतेचा सामना तुमच्या त्वचेला करावा लागणार आहे. त्यामुळे, यापासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करणं महत्त्वाचं आहे. चेहरा, मान, हात आणि रंग लागेल अशा शरीराच्या अन्य सर्व भागांना नीट लोशन लावा.

नारळाचे तेल: नारळाच्या तेलामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड राहते आणि रंग त्वचेत कमी प्रमाणात झिपरतात. शिवाय, त्वचा आणि केसांवर संरक्षक कवच असल्यास रंग धुवून काढणेही सोपे होते. त्वचेला अधिक मॉइश्चराइज करण्यासाठी तुम्ही नारळाचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र करून लावू शकता.

लिप बाम: ओठांच्या भेगांमध्ये रंग अगदी सहज जातात. चांगल्या दर्जाच्या लिप बामचे ४ ते ५ कोट्स लावून ओठांना नीट घासून घ्या आणि ओठ मऊ व मॉइश्चराइज्ड राहतील, याची काळजी घ्या.

हँड क्रीम: होळीमध्ये सर्वाधिक दुर्लक्ष होतं ते हातांची काळजी घेण्याकडे. नखांमध्ये रंग चटकन अडकून बसतात आणि ते काढणं अगदी अशक्य होऊन जातं. नखांमध्ये रंग अडकू नयेत आणि क्युटिकल्सचे नुकसान होऊ नये यासाठी भरपूर हँड क्रीम लावा. नखं लहानच ठेवा. शिवाय, होळीच्या आधी अॅक्रॅलिक किंवा जेल नेल्सचा वापर टाळा.

शॉवर जेल: शरीरावर लागलेले रंग धुवून काढण्यासाठी कोणत्याही तीव्र साबणाऐवजी नैसर्गिक शॉवर जेलचा वापर करा. अंग घासण्याचा स्पंज किंवा इतर साधनांचा वापर करतानाही जरा जपून.

शॅम्पू: केसांना पूर्णपणे वाचवणे अशक्य आहे. पण, हा त्रास कमी करता येईल. त्यासाठी सौम्य कडिंशनिंग असणारा माइल्ड स्वरुपातील शॅम्पू वापरून केसांमधील मॉइश्चर संरक्षित ठेवा. सारखे केस धुवू नका. त्याऐवजी, केस धुण्यामध्ये काही काळाचे अंतर ठेवा. त्यामुळे, त्वचेतून निर्माण होणारे नैसर्गिक तेल धुवून जाणार नाही आणि केस कोरडे होणार नाहीत.

फेस स्क्रब: मृत त्वचा काढून टाकणे आणि बंद झालेली छिद्रे मोकळी करण्यासाठी होळीनंतर दुसऱ्या दिवशी फेस स्क्रब वापरा. चेहऱ्यावर हळुवारपणे गोलाकार लावा. शरीराच्या इतर भागांवरही स्क्रबचा वापर करता येईल. कोमट पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा.

फेस मास्क: होळीमध्ये अनेक प्रकारची रसायने आणि इतर घटकांचा तुमच्या त्वचेशी संपर्क होतो. त्यामुळे, त्वचेला आराम देण्यासाठी तुम्ही हर्बल फेस पॅक वापरू शकता. त्वचेवर हळुवार मालिश करा आणि मास्क १० ते १५ मिनिटं राहू द्या. मास्कमुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल, कमी झालेले माइश्चरायझर पुन्हा निर्माण होईल आणि त्वचेची स्वच्छता होईल. एक-दोन वेळ मास्क लावल्यास त्वचा पुन्हा पुर्ववत होत असल्याचे तुम्हाला जाणवेल.

Dr. DHOLARIYA JAYANTILAL
Dr. DHOLARIYA JAYANTILAL
MD - Allopathy, Family Physician, 8 yrs, Ujjain
Dr. C  L Garg
Dr. C L Garg
MBBS, Family Physician General Medicine Physician, 46 yrs, Pune
Dr. Pallavi U Bhurse
Dr. Pallavi U Bhurse
BAMS, Ayurveda Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Atul Patil
Dr. Atul Patil
MS/MD - Ayurveda, Proctologist Ayurveda, 9 yrs, Pune
Dr. Yogesh  Lohade
Dr. Yogesh Lohade
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Hellodox
x