Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

जवळपास ९० टक्के लोकांना कधीतरी कंबरदुखीचा त्रास होतो आणि ३० टक्के लोकांना कटिजवळील कण्यात विकृती झाल्याने पायांमध्ये वेदना होऊ लागतात. खरे तर, हाडांचे सांधे, अस्थिबंध (दोन हाडांना जोडणारे ऊतक) आणि स्नायू अशा गुंतागुंतीच्या रचनेमुळे पाठीच्या कण्याला इजा होणं कठीण असते. पण त्याची काळजी घ्यायला हवी. स्नायूंची कार्यक्षमता नीट ठेवायला हवी. सांध्यांचे वंगण नीट ठेवायला हवं. दुर्दैवानं, पाठीच्या सगळ्यात जास्त समस्या बहुतांश लोक पाठीच्या कण्याची नीट देखभाल करत नाही म्हणून उद्भवतात. दीर्घकालीन कंबरेचं दुखणं असलेले सर्वाधिक लोक नोकरी करणारे आहेत. आणि थेट परिणाम म्हणजे त्यांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. राष्ट्रीय संख्याशास्त्राच्या अंदाजानुसार पाठदुखीमुळे उत्पन्नात मोठं नुकसान होते. कंबरदुखी हे डॉक्टरांकडे जाण्यासाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेलं कारण आहे.

पाठदुखीचे प्रकार

कंबर/कटी दुखणं

कंबर किंवा पाठीच्या खालचा भाग म्हणजे नेमके पाठीच्या किंवा कण्याच्या मध्यभागी, कंबर आणि कंबरेच्या किंचित वरील भाग. बरेचदा या दुखण्यामुळे खोकला किंवा शिंकणं यातनामय होतं. लचकल्यानं किंवा मुरगळल्यानं होणाऱ्या वेदना मध्यभागी नसतात तर मध्यरेषेपासून एका बाजूला असतात. या वेदना जास्त वेळ ताणणं किंवा बसणं, उभं राहणं किंवा वजन उचलणं याच्याशी संलग्न असतात. गतिहीन, बैठी जीवनशैली, सवय आणि सराव नसलेल्या गोष्टी करणं याचा परिणाम असतो. व्यवसायाशी संबंधित शरीरस्थितीमुळे हे उद्भवतं.

श्रोणी तंत्रिका शूल (सायटिका)

सायटिकामुळे होणारी वेदना तीक्ष्ण, तीव्र असते. नितंब किंवा श्रोणीपासून सुरू होऊन पायापर्यंत प्रवास करते. त्यात बधिरपणा असू शकतो. सुई किंवा टाचणी टोचल्यासारखी वेदना होऊ शकते किंवा पायात अशक्तपणाही येऊ शकतो. कण्याची नस दाबली गेल्याने होणाऱ्या वेदनेचं रूप म्हनजे सायटिका. याचं पायाचं दुखणं हे पाठीच्या दुखण्यापेक्षा वाईट असते. खरं तर सायटिका हे लक्षण आहे, निदान नाही. ‘स्लिप्ड’ डिस्क हे सायटीकाचं सगळ्यात सामान्य कारण असलं, तरी इतर अनेक परिस्थितींमुळे अशा वेदना होऊ शकतात. यांमध्ये, लंबर स्पाँडिलोसिस, लंबर कॅनल स्टेनोसिस, स्पाँडिलोलिस्थेसिस, ट्युमर्स आणि वाहिन्यांमध्ये व्यंग यांचा समावेश आहे.

चिकित्सीय मूल्यमापन

दोन मणक्यांमध्ये असलेली डिस्क सरकल्याने, डिस्कच्या मागील बाजूनं मणक्याच्या देठाखालून जाणारी नस दबते. सायटिकाचा रुग्ण अस्वस्थ असतो आणि ते त्याच्या हालचालीतून आणि झोपायच्या स्थितीवरून लक्षात येते. असे रुग्ण सायटिकानं परिणाम झालेल्या श्रोणी आणि गुडघा वाकवून त्याला ताणलेल्या नसेला थोडं शिथिल करत तिरपे झोपतात. हालचाल केल्यानं, खोकल्यानं, शिंकल्यानं किंवा ताण पडल्यास त्या वेदना खूप तीव्र होतात. पाठीचं दुखणं असलं तरी दुष्परिणाम झालेली नस पायातून जाते तशा वेदना पाठीकडून पायाकडे सरकत जातात हे वैशिष्ट्य. नसेचं मूळ किती दाबलं गेलं आहे यावर रुग्णाच्या नसेसंबंधीच्या तक्रारी, जसं बधिरपणा किंवा पायात, पावलात झिणझिण्या असतात आणि अशक्तपणाही असू शकतो. लोअर कॅनल स्टेनोसिसमध्ये उभे राहिल्यावर आणि चालल्यावर दोन्ही पोटऱ्यांच्या स्नायूंत वेदना होतात आणि झोपल्यावर कमी होतात. सायटिकाची एका पायातील वेदना झोपल्यानं नेहमी कमी होत नाही. मोठी डिस्क सरकून मेरुपुच्छही (कॉडा इक्विना) दाबल्या गेले तर त्यात मूत्रमार्ग आणि आतडीच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो.

चेतासंस्थेशी संबंधित तपासणी : जेव्हा कण्याचे तज्ज्ञ अशा रुग्णाची तपासणी करतात तेव्हा त्यामध्ये चेतासंस्थेचा किती संबंध आणि समावेश आहे हे एका क्रमाने पाहिलं जाते.

मोटर तपासणी : विशिष्ट स्नायू समूहातील स्नायू बारीक किंवा कमी झालेत का याची तपासणी केली जाते. यानंतर विविध स्नायूंमधील शक्ती तपासली जाते. एल ५ नसेचा गंभीर समावेश असेल तर टाच आत वळणारे स्नायू लुळे पडल्याने पाऊन योग्य कोनात टाकता किंवा ठेवता येत नाही (फूट ड्रॉप). गंभीर प्रकरणांमध्ये दुष्परिणाम झालेल्या पायातील वेदना दुसरा पाय उचलला की पुन्हा उत्पन्न होतात.

संवेदनासंबंधीची तपासणी : विशिष्ट नसेचा समावेश आहे का याविषयीची माहिती विशिष्ट संवेदी भाग तपासून मिळते.

'न्यूमोनिया' हा शब्दच भीतीदायक आहे. त्यातही लहान बाळांना न्यूमोनिया झाला की, त्यांचे आई-बाबा एकदम घाबरून जातात. न्यूमोनिया प्रसंगी चिंताजनक ठरतो हे खरं असलं तरी त्याला प्रतिबंध करणं शक्य आहे आणि उपचारही शक्य आहेत. योग्य काळजी आणि वेळीच सुरू केलेले उपचार हाच न्यूमोनियावरील उपाय असून त्यामुळे या आजारासंबंधी आपल्या मनात असलेली भीती आधी दूर करायला हवी. न्यूमोनिया म्हणजे फुफ्फुसांमध्ये झालेला संसर्ग. हा संसर्ग विषाणूजन्य, जीवाणूजन्य किंवा बुरशीजन्य (फंगल) असू शकतो. यातील विषाणूजन्य न्यूमोनिया अधिक प्रमाणात आढळतो. आपल्या फुफ्फुसात हवेच्या लहान-लहान पिशव्या असतात. न्यूमोनियामध्ये या पिशव्यांमध्ये संसर्ग होऊन सूज येते आणि त्यात 'कफ' जमतो. श्वास घेण्यास त्रास होणं, खोकताना किंवा श्वास घेताना छातीत दुखणं ही न्यूमोनियाची सामान्य लक्षणं आहेत.

पाच वर्षांच्या आतील बालकांमध्ये न्यूमोनियापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीकरण हा सर्वांत चांगला उपाय आहे. 'न्यूमोकोक्कल' लस तसंच 'एचआयबी' लस (हिमोफिलिस इन्फ्लूएन्झा) लस जीवाणूजन्य न्यूमोनियाचा प्रतिबंध करते, तर विशिष्ट प्रकारच्या विषाणूजन्य न्यूमोनियावर 'एच १ एन १' लस (स्वाईन फ्लू) घेण्याचा फायदा होतो. न्यूमोकोक्कल व एचआयबी लशी मोठ्या माणसांना- विशेषतः ६५ वर्षांच्यावरील किंवा इतर आजार असलेल्या व्यक्तींनाही जरूर द्याव्यात.

गेल्या काही वर्षांत न्यूमोनिया लसीकरणाबद्दल जनजागृती वाढल्यामुळे न्यूमोनियाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. म्हणजे न्यूमोनिया ही समस्या खरं तर सोडवण्याजोगी आहे. तरीही जागतिक आरोग्य परिषदेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार जागतिक स्तरावर दर वीस सेकंदांना एक बालक या संसर्गानं मृत्यूमुखी पडतं. लसीकरणाबरोबरच पुरेशी स्वच्छता पाळणं आणि बालकांना संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींपासून दूर ठेवणं आवश्यक आहे. बालकाला वारंवार सर्दी-खोकला किंवा अॅलर्जीचा त्रास होत असेल तर घरात हवा शुद्ध करण्याचं यंत्र (एअर प्युरिफायर) बसवून घेण्याचाही फायदा होईल.

ज्या लहान मुलांना वारंवार सर्दी, खोकला होतो, ताप येतो, त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. ताप, सर्दी, खोकला यातून प्रत्येक वेळी न्यूमोनिया होईलच असं मुळीच नाही, परंतु बालकांना वेळीच डॉक्टरांकडे घेऊन जाणं, आजाराचा प्रकार व तीव्रतेची खात्री करून घेणं आणि लवकर उपचार सुरू करणं गरजेचं ठरतं. त्यामुळे सर्दी-तापासारखा साधा आजार बळावून पुढे आजाराचं पर्यवसान न्यूमोनियात होणं टाळता येईल. त्यामुळे बाळाला दिसणाऱ्या लक्षणांमध्ये न्यूमोनियासारखी शंका आढळल्यास लगेच बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.

म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण असे नेहमी म्हणतो. न्यूमोनियाच्या बाबतीत सुद्धा बालकांची जेवढी काळजी घ्यावी लागते, तितकीच वृद्ध आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींचीही काळजी घेणं आवश्यक ठरतं. ज्या वयस्कर मंडळींना श्वसनमार्गाचा किंवा फुफ्फुसांचा जुनाट आजार असतो (उदा. काळा दमा- 'क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज') किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर काही आजार असतात त्यांना श्वसनमार्गाचा संसर्ग झाल्यावर पुढे न्यूमोनिया होण्याची शक्यता अधिक असते. बुरशीजन्य न्यूमोनिया सामान्यतः कमी आढळतो. काही इतर आजारांमध्ये रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. (उदा. केमोथेरपीवर असलेले रुग्ण किंवा मधुमेही रुग्ण) अशा रुग्णांमध्ये बुरशीजन्य न्यूमोनिया उद्भवण्याची शक्यता असते.

काहींमध्ये खूप पाणी पिण्याची सवय असते तर काहीजण ऋतूमानानुसार शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवतात. मात्र उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये काही अतिरिक्त घटकांचं प्रमाण वाढवणं गरजेचं असतं. त्याचा विचार प्राधान्यानं केला जात नाही. उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यायलं पाहिजे असं सांगितलं जातं. परंतु, केवळ पाणी पिऊन उपयोग नाही. कारण उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातून सोडियमही निघून जात असतं. म्हणून पाण्यासोबत मीठही योग्य प्रमाणात शरीरात जायला हवं. त्यामुळे पाणी किंवा लिंबू पाणी प्यायचं असेल तरी चिमूटभर मीठ टाकूनच प्यायलं पाहिजे. विशेषत: मधुमेहींनी ही बाब लक्षात ठेवायला हवी.

सोडियमचं प्रमाण कमी झाल्यास मळमळते, डोकेदुखी वाढते. भूक मंदावते, गोळे येतात. हे विकार टाळण्यासाठी पाण्यासोबत शरीरात मीठही जाणं महत्त्वाचं असतं हे सर्वांनीच लक्षात ठेवलं पाहिजे. शहरांमधली सध्याची एकूण जीवनशैली पाहता बाहेर खाण्याचं प्रमाण बरंच आहे. बऱ्याचदा बाहेरचे पदार्थ हे अर्धवट तळून ठेवलेले असतात. ऑर्डर आली की ते पुन्हा तळून तुम्हाला देण्यात येतात. अर्धवट तळलेल्या पदार्थांमध्ये जंतू वाढतात. उन्हाळ्यात आणि साधारण जुलै महिन्यात अन्न दूषित करणाऱ्या जंतूंचं प्रमाण बरंच असतं. त्यामुळे बाहेर खाणं शक्यतो टाळावं. त्याचप्रमाणे तहान शमवण्यासाठी बऱ्याचदा गाड्यांवर मिळणारी फळे, बाहेरचं लिंबू पाणी प्यायलं जातं. परंतु, उघड्यावर ठेवलेल्या पदार्थजंतूंना आमंत्रण देतात आणि बाहेरच्या लिंबू सरबतात वापरला जाणारा बर्फ बहुधा दूषित असतो. त्यामुळे फळे, लिंबू सरबत अवश्य प्या, पण घरी आणून. कलिंगड, संत्र, डाळींब या फळांचं या कालावधीत सेवन करायला हवं. शहाळ्याचं पाणीसुद्धा आवर्जून प्यावं. यात इलेक्ट्रोलाइट्स भरपूर असतात. त्यामुळे उष्ण वातावरणाचा शरीराला सामोरं जाता येतं.

उन्हाळा हा नाजूक वयोगटांसाठी म्हणजेच १० वर्षांखालील आणि ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी काहीसा धोकादायक असतो. या काळात त्यांना हीट स्ट्रोक येण्याची शक्यता असते. हीट स्ट्रोकमध्ये शरीराची तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा निकामी होते आणि ती व्यक्ती बेशुद्ध पडते. त्यामुळे दुपारी १२ ते २च्या दरम्यान बाहेर पडू नये. त्याचप्रमाणे बाहेर पडताना संपूर्ण शरीर झाकलेलं असावं. याच्याशीच संबंधित अजून एकभाग म्हणजे लहान मुलांना ताप वगैरे आला तर बर्फाच्या पाण्याची पट्टीकपाळावर न ठेवता संपूर्ण अंग साध्या पाण्यानं पुसून काढावं. उन्हाळ्यात होणारा अजून एक विकार म्हणजे बद्धकोष्ठता. पाणी कमी होणं हेच यासाठी कारणीभूत असतं. त्यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढवणारी फळं वगैरे अवश्य खावीत. पण त्यांच्या स्वच्छतेकडेही तेवढेच लक्ष पुरवण्यात यावं. अल्सर असलेल्या व्यक्तींना उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात मसालेदार पदार्थांपासून अल्सर असलेल्या व्यक्तींनी तसंच सामान्य प्रकृती असलेल्या व्यक्तींनीही लांबच राहावं. मसाल्याच्या पदार्थांमुळे शरीरातील आम्ल वाढते आणि त्याचा प्रकृतीवर विपरीत परिणाम होतो. तात्पर्य, उन्हाळ्यात योग्य आहार घेऊन विकारांना टाळता येऊ शकतं.

खरबूज खाण्यात जितका लज्जतदार लागते तितकाच तो सौंदर्याच्या दृष्टीनेही महत्वाचा आहे. खाण्यासोबतच तुम्ही खरबूज त्वचेवर लावल्यास तुम्हाला 'इस्टंट ग्लो' मिळेल. त्याचा फेसपॅक लावल्यानंतर तुम्ही काही मिनिटातच उजळल्याचा अनुभव घेऊ शकाल.


खरबूजाचा रस आणि दही

खरबुजात मोठ्या प्रमाणावर पाण्याची मात्रा असते. त्यामुळे त्याला कापल्यानंतर बऱ्यापैकी रस निघतो. त्यातून निघणारा रस एका वाटीत एकत्र करून घ्यावा. जितका रस निघेल तितक्याच मात्रेत त्यात दही मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणाचा लेप चेहरा आणि मानेवर चांगल्या पद्धतीने लावावा. सुमारे १५ मिनिटांपर्यंत हा लेप तसाच राहू द्यावा. त्यानंतर चेहरा धुवावा. हा लेप लावल्यामुळे तुमचा चेहरा उजळल्यासारखा वाटू लागतो. उन्हामुळे आलेले काळे डाग काही प्रमाणात कमी होतात. तुम्ही सातत्याने जलतरण करीत असाल, तर हा फेसपॅक तुम्ही हमखास वापरलाच पाहिजे. त्यामुळे त्वचेवरील काळे डाग, काळवटपणा कमी होईल. खरबुजाप्रमाणे त्याच्या बियादेखील उपयुक्त आहेत. बियांपासून तयार करण्यात आलेला फेसपॅक लावल्याने त्वचेची सखोल स्वच्छता होते. या मिश्रणात असलेल्या दह्यामुळे त्वचा मुलायम होते. इतकेच नव्हे तर चेहऱ्यावर त्यामुळे तजेलादेखील येतो. दह्यातील अनेक पदार्थ त्वचेसाठी मॉइश्चरायजरप्रमाणे काम करतात.


मधासह खरबूज

मध हे त्वचेसाठी अमृततूल्य आहे. त्याने फायदे अनेक आहेत. त्यामुळे त्याला बहुगुणी म्हणून ओळखले जाते. खरबुजाच्या रसात मध कालवावे. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावावे. १५ ते २० मिनिटानंतर चेहरा धुवावा. तीव्र उन्हामुळे तुमच्या चेहऱ्यावर जळल्यासारखे डाग पडले असतील, तर ते कालांतराने कमी होण्यासाठी हे फेसपॅक उपयुक्त आहे. घामामुळे येणारे मुरूम, पुटकुळ्या आणि तारूण्यपिटिकांवर हा फेसपॅक उत्तमप्रकारे काम करतो. धूळ-मातीमुळे अनेकदा चेहरा काळवंडतो. त्यामुळे त्वचेवरील सुक्ष्म छीद्र बंद होतात. ते उघडण्यासाठी या फेसपॅकमुळे मदत होते. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर जमा झालेली अस्वच्छता दूर होण्यास मदत होते.


असे होतील फायदे

- चेहरा थंड ठेवण्यास मदत होते.

- सनस्क्रीमसारखे काम करते.

- चेहऱ्यावरील काळे डाग दूर करते.

- त्वचेला आतपर्यंत स्वच्छ करते.

- त्वचा उजळण्यास मदत होते.


मधाचा उतारा

त्वचेवर मध वापरल्याने त्यावरील डाग दूर होतात. त्वचेतील मृतपेशीपासून मुक्तता मिळते. नव्या पेशी तयार होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 'सनबर्न'मुळे जे डाग पडतात, ते कमी होण्यासाठी मध सहाय्यक ठरते. वातावरणात असलेल्या हानीकारक किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदातरी चेहऱ्यावर मधाने मसाज करावा.


खरबूज अन् दूध

चेहऱ्यावरील काळसर डाग दूर करण्यासाठी हे मिश्रण फायदेशीर ठरते. या मिश्रणातील दूध हे चेहऱ्यासाठी डाग दूर करण्याचे सर्वोत्तम साधन ठरते. त्यासाठी खरबुजाच्या रसात थोडे दूध मिसळावे. त्यानंतर कापसाच्या सहाय्याने हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. किंचित मसाज करावा. त्यानंतर चेहरा धुवावा. तीव्र उन्हात फिरल्याने त्वचा लवकर काळी पडते. चेहऱ्यावर डाग पडतात. त्वचा भाजल्यासाखी होते. हे सर्व दूर करण्यासाठी खरबुजाचा रस आणि दुधाचे मिश्रण गुणकारी उपाय आहे.

--

खरबूज, काकडी

काकडीतील महत्त्वाचे घटक चेहरा थंड ठेवण्यासाठी मदत करतात. खरबूज आणि काकडीच्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील सर्व डाग नष्ट होतात. परंतु ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. हा पॅक वापरत राहिल्याने कालांतराने हे डाग नष्ट होतात. चेहऱ्याला नवीन तजेला देण्यासाठी आणि चेहरा उजळण्यासाठी हा पॅक लाभदायक आहे. उन्हातील तीव्र किरणांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही हा पॅक त्वचेला वाचवितो.

घरून ऑफीसला जाण्याच्या घाईत आपले जेवण व्यवस्थित होत नाही. मग अशावेळी अनेक जण फळं कापून नेतात. परंतु आपण जेव्हा ही फळे खाण्यासाठी काढतो, त्यावेळी ती तपकिरी दिसतात किंवा काळवंडलेली असतात. मग अशी फळे खाण्याची ईच्छाच होत नाही. तुम्ही देखील अशा समस्येला दररोज तोंड देत असाल तर येथे काही उपयुक्त टिप्स आहेत ज्यामुळे यापुढे फळं काळी पडणार नाहीत.


बरेचदा तुम्ही अनुभवलेले असेल की तुम्ही सफरचंद कापता. त्यानंतर ते हवाबंद डब्यात किंवा फ्रीजमध्ये ठेऊन देतात. कालांतराने ते कापलेले सफरचंद बाहेर काढले की त्याचा रंग बदललेला असतो. फळांमध्ये असलेल्या लोहामुळे ही प्रक्रिया होते. असे बहुतांश फळांसोबत होते, की ती कापल्यानंतर काही वेळाने तपकिरी किंवाबरेचदा तुम्ही अनुभवलेले असेल की तुम्ही सफरचंद कापता. त्यानंतर ते हवाबंद डब्यात किंवा फ्रीजमध्ये ठेऊन देतात. कालांतराने ते कापलेले सफरचंद बाहेर काढले की त्याचा रंग बदललेला असतो. फळांमध्ये असलेल्या लोहामुळे ही प्रक्रिया होते. असे बहुतांश फळांसोबत होते, की ती कापल्यानंतर काही वेळाने तपकिरी किंवा काळी पडतात. वास्तविकतेत ज्यावेळी आपण फळं कापतो त्यावेळी त्यातील 'इंटरनल सेल्स'ला नुकसान होते. हे सेल्स जेव्हा हवेच्या संपर्कात येतात त्यावेळी रासायनिक क्रिया होते व त्यांचा रंग बदलतो.


सेल्स जेव्हा हवेच्या संपर्कात येतात त्यावेळी रासायनिक क्रिया होते व त्यांचा रंग बदलतो.

लिंबाचा रस

फळं कापल्यानंतर त्यावर थोडा लिंबाचा रस मिसळावा. त्यामुळे फळे तपकिरी, काळपट होणार नाहीत. लिंबाचा रस पिळल्यानंतर तुम्ही फळांना फ्रीजमध्येही ठेऊ शकता.

रबरबॅण्ड वापरा

कापलेल्या फळांना एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीत ठेवावे. त्यानंतर या पिशवीचे तोंड रबरबॅण्डने अगदी घट्ट बंद करावे. त्यातून किंचितही हवा जाणार नाही याकडे लक्ष द्यावा. त्याने फळं ताजी राहतील.

सिट्रस अॅसिड चूर्ण

फळांना तपकिरी होण्यापासून वाचविण्यासाठी त्यावर सिट्रस अॅसिडची पावडर टाकावी. हा उपाय केल्याने फळांना १० ते १२ तासांपर्यंत ताजे ठेवाता येते. हा उपाय फळांना तपकिरी व काळवंडण्यापासून पूर्णपणे वाचवितो. बाजारात ही पावडर सहजपणे मिळेल. त्याने फळांची चवही बदलणार नाही.

प्लास्टिक रॅपिंग

कापलेल्या फळांना प्लास्टिक रॅपिंग केले जावे. असे केल्याने फळं चार ते पाच तास ताजी राहतात. त्यासाठी बाजारात प्लास्टिक रॅपिंग पॅकेट मिळतात किंवा अॅल्यूमिनियम फॉइलही वापरता येईल. जेणेकरून फळं ताजी राहतील.

मिठाचे पाणी

ताज्या फळांना तपकिरी होण्यापासून वाचविण्यासाठी मिठाच्या पाण्यात तीन ते पाच मिनिट कापलेली फळं भिजवावी. त्यामुळे त्यांच्या रंगात कोणताही बदल होणार नाही.

थंड पाणी

तुम्ही फळं कापली असतील तर त्याला हवा लागू देऊ नये. या फळांना काही वेळेसाठी थंड पाण्यात भिजवावे. लक्षात ठेवा ही फळं पाण्यात पूर्णपणे भीजणे गरजेचे आहे. अन्यथा काही भाग तपकिरी होईल. त्यानंतर ही फळं हवाबंद डब्यात ठेवावी. त्यामुळे ती सुमारे तीन ते चार तास ताजी राहतील.

Dr. Nilima  Pawar
Dr. Nilima Pawar
BHMS, General Physician Homeopath, 12 yrs, Pune
Dr. Sandeep Darunde
Dr. Sandeep Darunde
BAMS, Optician Ophthalmologist, 3 yrs, Pune
Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Vipul Jaiswal
Dr. Vipul Jaiswal
MS/MD - Ayurveda, Ayurveda General Physician, 11 yrs, Pune
Dr. Rahul Pawargi
Dr. Rahul Pawargi
BAMS, Family Physician General Physician, 19 yrs, Pune
Hellodox
x