ज्या डोळ्यांमुळे आपण हे सुंदर जग पाहतो, त्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मात्र आपण अनेकदा हलगर्जीपणा करतो. कॉम्प्युटर, मोबाइल किंवा टीव्हीस्क्रिनकडे पाहात राहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. अशावेळेस डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
कॉम्प्युटर हाताळताना सतत कॉम्प्युटरच्या स्क्रिनकडे पाहणे टाळा. अधूनमधून पापण्यांची उघडझाप करणे आवश्यक आहे. दर 30 मिनिटाला 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. सतत कॉम्प्युटरकडे पाहात राहू नका. काही सेंकद इतर लांबच्या वस्तूकडे पाहात जा.
डोळ्यांविषयीची समस्या
डोळे लाल होणे, डोळ्यांना सूज येणे, सतत पाणी येणे यासारख्या समस्या जर तुम्हाला भेडसावत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. यावर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डोकेदुखीचा त्रास होत असल्यास डोळे तपासा. मधुमेही, रक्तदाबाच्या रुग्णांनी वर्षातून एकदा डोळे तपासून घेणे गरजेचे आहे. 40 वर्षांहून अधिक वयोगटातील व्य्रतींनी आय प्रेशर तपासून घेणे गरजेचे आहे.
निरोगी डोळ्यांसाठी टीप्स
व्हिटामिन ए, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटामिन सी यु्क्त पदार्थांचा आहारात समावेश करा. नियमित डोळ्यांचे चेकअप करावे. युवी रे पासून क्षण करणारे सनग्लास वापरावे.
हर्बल टी- कोमोमाईल किंवा पेपरमिंट चहाची काही पाने गरम पाण्यात टाकून ठेवावी. त्या पाण्याने डोळे शेकावेत.
मीठ - एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ टाकून डोळे शेकावे. दिवसातून तीनवेळा असे केल्यास डोळंची खाज आणि जळजळ बंद होते.
नारळाचे तेल- नारळाच्या तेलाच्या गुणांमुळे डोळ्यातील घाण साफ होते. रोज डोळ्यांच्या खाली आणि जवळच्या भागाला नारळाच्या तेलाने मालिश करावे.
ओले कापड- हातामुळेही डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. डोळ्याची जळजळ, वेदना किंवा खाज येत असल्यास स्वच्छ पाण्यात कपडे भिजवून डोळे साफ करावेत. त्यामुळे कोणताही आजार होण्याचा धोका राहात नाही.
बेकिंग सोडा- स्वच्छ पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून ते गरम करावे. थोडे पाणी राहिल्यानंतर त्या पाण्याने डोळे धुवावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
थंड दूध- थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांच्या आसपास फिरवावा. कापसाचा बोळा थंड दुधात भिजवून ठेवू शकतो. रोज हे उपाय केल्यास आराम पडतो.
कोरफड- कोरफड जेलमध्ये चमचा मध-अर्धा कप एल्डरबैरी चहा मिसळावा. दिवसातून दोनवेळा या मिश्रणाने डोळे धुवावेत. त्यामुळे डोळ्यांचा त्रास काही वेळातच कमी होईल.
कच्चा बटाटा- अॅस्ट्रिंजटच्या गुणांनीयु्क्त असलेला कच्चा बटाट्याचा वापर केल्यास डोळ्यातून पाणी येण्याच्या समस्या लवकर बरी होते. बटाट्याची पातळ काप करून ते काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवावेत. त्यानंतर थंड काप 15-20 मिनिटे डोळ्यांवर ठेवावेत. 2-3 दिवस हा उपाय केल्यास डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर होईल.
हर्बल टी- कोमोमाईल किंवा पेपरमिंट चहाची काही पाने गरम पाण्यात टाकून ठेवावी. त्या पाण्याने डोळे शेकावेत.
मीठ - एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ टाकून डोळे शेकावे. दिवसातून तीनवेळा असे केल्यास डोळंची खाज आणि जळजळ बंद होते.
नारळाचे तेल- नारळाच्या तेलाच्या गुणांमुळे डोळ्यातील घाण साफ होते. रोज डोळ्यांच्या खाली आणि जवळच्या भागाला नारळाच्या तेलाने मालिश करावे.
ओले कापड- हातामुळेही डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. डोळ्याची जळजळ, वेदना किंवा खाज येत असल्यास स्वच्छ पाण्यात कपडे भिजवून डोळे साफ करावेत. त्यामुळे कोणताही आजार होण्याचा धोका राहात नाही.
बेकिंग सोडा- स्वच्छ पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून ते गरम करावे. थोडे पाणी राहिल्यानंतर त्या पाण्याने डोळे धुवावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
थंड दूध- थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांच्या आसपास फिरवावा. कापसाचा बोळा थंड दुधात भिजवून ठेवू शकतो. रोज हे उपाय केल्यास आराम पडतो.
कोरफड- कोरफड जेलमध्ये चमचा मध-अर्धा कप एल्डरबैरी चहा मिसळावा. दिवसातून दोनवेळा या मिश्रणाने डोळे धुवावेत. त्यामुळे डोळ्यांचा त्रास काही वेळातच कमी होईल.
कच्चा बटाटा- अॅस्ट्रिंजटच्या गुणांनीयु्क्त असलेला कच्चा बटाट्याचा वापर केल्यास डोळ्यातून पाणी येण्याच्या समस्या लवकर बरी होते. बटाट्याची पातळ काप करून ते काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवावेत. त्यानंतर थंड काप 15-20 मिनिटे डोळ्यांवर ठेवावेत. 2-3 दिवस हा उपाय केल्यास डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर होईल.
खेळण्याबरोबरच धनुष्यबाणाचा वापर, दिवाळीच्या वेळी उडवले जाणारे फटाके, बॅडमिंटन खेळताना डोळ्याला बसलेला शटलचा जोराचा फटका यांसारख्या गोष्टींमुळे डोळ्याला इजा होण्याची शक्यता वाढते. या अपघातांप्रमाणेच कारखान्यातील कामगार, वेल्डिंग करताना योग्य चष्मा न वापरणे यामुळेही डोळ्याला इजा होते.
डोळ्याला होणाऱ्या इजा या अपघाती स्वरुपाच्या असल्या, तरी त्या काही वेळा अतिशय किरकोळ तर काही वेळा डोळ्याची संपूर्ण दृष्टी गमावून बसण्याइतक्या गंभीर स्वरुपाच्या असू शकतात. लहान मुले खेळताना खेळातील धनुष्यबाणाचा वापर करतात. अशा वेळी असा बाण डोळ्याला लागून डोळा फुटून कायमचे अंधत्व येण्याची शक्यता असते. विटी दांडू, क्रिकेट खेळताना डोळ्याला विटी किंवा चेंडू लागणे या काही नेहमीच घडणाऱ्या घटना नाहीत; पण काही वेळा अशा अपघाताने डोळ्याला दुखापत होऊ शकते. दिवाळीच्या वेळी उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे डोळ्याला कायमस्वरुपाची इजा होऊ शकते. दिवाळीत फोडणाऱ्या बॉम्बवर डबा किंवा खोके ठेवल्यामुळे स्फोटानंतर पत्र्याचे तुकडे लागून आजूबाजूच्या लोकांनाही डोळ्याला इजा झाल्याची उदाहरणे आहेत. वरील गोष्टींवर पालकांनी देखरेख ठेवल्यास होणारे डोळ्याचे अपघात टळू शकतात. बॅडमिंटन खेळतानाही डोळ्याला शटलचा जोराचा फटका बसून काही प्रसंगी खूप गंभीर स्वरुपाची इजा पोहोचू शकते.
कारखान्यात लेथवर काम करणाऱ्या कामगारांनी तर विशेष काळजीपूर्वक वागले पाहिजे. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या कारखान्यांतून अशा ठिकाणी काम करताना रोज कमीत कमी १५ ते २० कामगारांच्या डोळ्यात 'बर' जात असतील. हा 'बर' काढल्यानतंर डोळ्याला पट्टी लावल्यामुळे कामगारांना दोन-तीन दिवस कामाला मुकावे लागते; पण याहीपेक्षा वेगाने आणि धातूचे मोठे कण जर बुबुळ छेदून आत गेले, तर बुबुळ फाटणे, त्यातून बाहुली बाहेर येणे, मोतीबिंदू होऊन तो आतल्या आत फुटणे, डोळ्याच्या आतील भागात तीव्र स्वरुपाचा रक्तस्राव होणे किंवा पडद्याला इजा होऊन तो सरकणे इ. गोष्टी संभवतात. अशा वेळी डोळ्याचा एक्स रे अथवा अल्ट्रा साउंड चाचणी करून डोळ्याला किती गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे, हे पाहता येते. फाटलेले बुबुळ शिवून झालेला मोतीबिंदू काढून टाकून आतील धातूचा कण व्हिट्रॅक्टोमी या शस्त्रक्रियेमार्फत काढून टाकून तो सरकलेला पडदा म्हणजे रेटिना परत जागी बसवणे हे एक आव्हान आहे. तीन-चार तासांच्या अतिशय कठीण शस्त्रक्रियेनंतर अशा तऱ्हेने गंभीर दुखापत झालेला डोळा वाचेलच अशी खात्रीही देता येत नाही. कित्येक वेळा अशा डोळ्यांमध्ये सेप्टीक होऊन दृष्टी तर जातेच; पण डोळा अतिशय बारीक होऊन पांढरा पडतो.
वेल्डिंग करताना योग्य तऱ्हेचा चष्मा न वापरल्यामुळे बुबुळाला छोट्याशा जखमा होतात. अशा वेळी रात्री झोपताना प्रचंड वेदना जाणवतात. झोप येणे अशक्य होते. स्वच्छ कापसाच्या घड्या गार पाण्यात घालून डोळ्यावर ठेवल्या असता बराचसा आराम वाटतो. वेदना खूप होत असल्यामुळे वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. साधारणपणे १०-१२ तासांतच डोळ्याला आराम पडून डोळा पूर्ववत होतो. ज्या ठिकाणी असे अपघात होऊन डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी इंडस्ट्रियल प्रोटेक्शन ग्लासेस वापरण्यामुळे वरील अपघात टळू शकतात.
डोळे हे आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. दिवसातला सर्वाधिक काळ आपण डोळ्यांनी विविध गोष्टी पाहत असतो. याच डोळ्यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. प्रदूषण, सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर येणारा ताण, अपुरी झोप ही डोळ्यांचे आरोग्य खराब होते. असे होऊ नये म्हणून आधीपासूनच काळजी घेणे आवश्यक असते. काही झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळीच काही सोपे उपाय केल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोळे येणे, रांजणवाडी येणे यांसारख्या समस्याही उद्भवतात. पाहूयात कोणते उपाय फायदेशीर ठरु शकतात.
कमी प्रकाशात काम करणे
अनेकदा रात्री अभ्यास किंवा ऑफीसचं काम करताना आपण कमी प्रकाशात काम करतो. मात्र कमी प्रकाशात लिखाण किंवा वाचन केल्याने तसेत लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांच्या शिरा ताणल्या गेल्याने डोळे थकल्यासारखे वाटतात. यामुळे डोकेदुखी तसेच डोळ्यांशी निगडीत इतर त्रास होण्याचीही शक्यता असते. अशाप्रकारे डोळ्यावर ताण आल्यास बघण्याचा केंद्रबिंदू अस्थिर होऊ शकतो.
रात्री उशीरापर्यंत जागरण
सध्या अनेकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. ऑफीसमधून उशीरा येणे किंवा इतर कारणांनी रात्री उशीरापर्यंत जागरण होते. यामुळे कमी वयातच प्रिस्बियोपिया म्हणजेच जवळचं न दिसण्याची समस्या वाढते. त्यावर वेळीच उपचार न केल्यास हा त्रास बळावण्याचीच शक्यता जास्त असते.
मोबाईल, लॅपटॉपच्या स्क्रिनमुळे उद्भवणाऱ्या समस्या
मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्ही यांच्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या नाजून भागावर परिणाम होतो. या स्क्रीनच्या रेडिएशनमुळे डोळे लाल होणे, चुरचुरणे, कोरडे होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या उद्भवू शकतात. अशा तक्रारींमुळे अनेकांना चष्माही लागतो. परिणामी हा त्रास इतका वाढतो की डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे वेगवेगळ्या उपकरणांपासून योग्य ते अंतर ठेवूनच उपाय करणे आवश्यक आहे.
खाण्याच्या सवयी
बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. जंक फूड आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा यांमुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होते. या समस्यांमुळे रेटीनल डिजनरेशन तसेच वयस्कर लोकांमध्ये यामुळे मोतीबिंदू आणि लहान मुलांमध्ये मायोपिया यांसारख्या समस्या उद्भवतात.
डोळ्यांचा मेकअप
अनेक महिला आणि मुली जास्तीत जास्त चांगले दिसण्यासाठी डोळ्यात काजळ घालतात, मस्कारा, आय लायनर अशा अनेक सौंदर्यप्रसाधनांचा दैनंदिन वापर करतात. पण ही प्रसाधने चांगली नसल्यास त्यामुळे डोळ्यांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगले दिसणे महत्त्वाचे असतानाच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.