ग्रीन टी हे एक नैसर्गिक फॅट बर्नर असून त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. ग्रीन टी पिताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.
आज आपण बराच काळापासून आपल्या डोक्यात घर करून बसलेल्या ग्रीन टीबद्दलच्या समज-गैरसमजांबाबत जाणून घेणार आहोत. त्यामागचं वास्तवही जाणणार आहोत.
ग्रीन टी हे आजकाल हेल्थ ड्रिंक म्हणून खूप प्रसिद्ध झालं आहे. अगदी जिम ट्रेनरपासून डाएटिशनपर्यंत आणि ऑफिसमधल्या सहकाऱ्यापासून शेजारच्या मैत्रिणीपर्यंत सगळे जण ग्रीन टी पिण्याचा सल्ला देत असतात. हा ग्रीन टी कसा घ्यावा, किती घ्यावा आणि कधी घ्यावा याबाबत मात्र प्रत्येकाच्या मनात बरेच प्रश्न असतात. कित्येकदा गैरसमजही असतात. ग्रीन टीचा उपयोग आणि तो घेण्याची योग्य पद्धत या विषयी...
आपल्याला सर्वांना माहीत आहे, की ग्रीन टी हे एक नैसर्गिक फॅट बर्नर असून त्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स असतात. ग्रीन टी पिताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात.
> दिवसाला साधारणपणे तीन ते चार कप ग्रीन टी घ्यावा म्हणजे त्याचे फायदे मिळू शकतात. जास्त प्रमाणात घेतल्यानं फायद्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते. उदा. पित्त वाढणं, मळमळ होणं, झोप न लागणं इत्यादी.
> बनवण्याची कृती - सर्वप्रथम पाणी उकळावं. गॅस बंद करून त्यात ग्रीन टी पावडर किंवा ग्रीन टी डीप सॅशे टाकून झाकण ठेवावं आणि दोन मिनिटं ते मुरू द्यावं. चवीला किंचित लिंबू, आलं नाहीतर पुदिना किंवा गवती चहा घातला तरी चालेल; परंतु साखर किंवा दूध मात्र अजिबात घालू नये.
> ग्रीन टीची चव थोडी वेगळी असल्यामुळे कित्येकांना आवडत नाही आणि खासकरून गरम ग्रीन टी पिणं त्यांना अवघड वाटू शकतं. ज्यांना गरम प्यायला आवडत नाही, त्यांनी गार करून प्यायला तरी चालेल.
> ज्यांना उग्र चव आवडत नाही, त्यांनी सुरुवातीला कमी प्रमाणात ग्रीन टी वापरावा किंवा एक लीटर पाण्यात एक कप ग्रीन टी घालून तो विरघळवून घ्यावा. हे पाणी बाटलीत भरून दिवसभर थोडेथोडं प्यावं.
> ग्रीन टी कधीही प्यायला तरी चालतो. पण संध्याकाळी उशिरा तो पिणं टाळावं. ग्रीन टीमुळे उत्साह वाढू शकतो; कारण ते मेंदूला उत्तेजन देणारे पेय आहे. रात्री प्यायल्यानं झोपेवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
> साधारणपणे दोन जेवणाच्यामध्ये ग्रीन टी घ्यावा. वजन कमी करण्यासाठी म्हणून घ्यायचा असेल, तर काही आहारतज्ज्ञ तो जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर घ्यायला सांगतात. यामुळे चरबीचं आणि काही पोषक घटकांचे शरीरात होणारं शोषण कमी होऊ शकतं.
गणपती बाप्पा आज घरांमध्ये विराजमान झाले आहेत. त्यांचा सर्वात आवडतीचा पदार्थ म्हणजे मोदक. आज प्रत्येकाकडे उकडीचे मोदक असणारच. गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हमखास असणारा एक पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक. उकडीचे मोदक चवीला जितके स्वादिष्ट तितकेच आरोग्यालाही फायदेशीर आहे. जाणून घ्या उकडीच्या मोदकाचे हे आरोग्यदायी फायदे.
वजन घटवण्यास मदत - वेट लॉसच्या मिशनवर आहात म्हणून गोड खाणं टाळत असाल तरीही मोदक त्याला अपावाद ठरू शक्तो. कारण मोदकामध्ये फॅट्स आणि आवश्यक पोषणद्रव्य मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका नसतो. उकडीच्या मोदकाने पोट तृप्त होते सोबतच मनही शांत राहण्यास मदत होते.
कमी कोलेस्ट्रेरॉल - उकडीच्या मोदकामध्ये कोलेस्ट्रेरॉल कमी प्रमाणात असते. नारळ आणि सुकामेवा यामधील आरोग्यदायी घटक वाईट कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करतात तर चांगले कोलेस्ट्रेरॉल वाढवतात.
रक्तदाब आटोक्यात - नारळामधील काही घटक हृद्याचे आरोग्य जपण्यास मदत करतात. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही फायदेशीर ठरतात.
सांधेदुखी - गुडघ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी तूप हे प्रभावी औषध आहे. मोदकामध्ये तूपाचा समावेश असल्यास सांध्याच्या दुखण्याचे त्रास आटोक्यात ठेवण्यात मदत होते.
पोटाचे आरोग्य सुधारते - बद्धकोष्ठतेसारख्या समस्येचा त्रास कमी करण्यास उकडीचे मोदक फायदेशीर आहेत. मोदकातील पुरणामध्ये तूप असते. यामुळे आतड्यांजवळील घातक, टाकाऊ घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
गोडाचे पदार्थ हे अनेकांचा विकनेस असतो. अति गोड खाल्ल्याने वजन वाढण्यासोबत अनेक आजारांचा धोका बळावण्याची शक्यता असते. रसगुल्ला हा देखील अशाच गोड पदार्थांपैकी एक! पश्चिम बंगालमधील ही मिठाई महाराष्ट्रातही चवीने खाल्ली जाते. पण केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीदेखील रसगुल्ला फायदेशीर आहे.
रसगुल्ला आरोग्यदायी -
रसगुल्ल्यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, लॅक्टोअॅसिड आणि केसिन घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रसगुल्ला केवळ स्वादिष्ट नव्हे तर आरोग्यालाही फायदेशीर आहे.
रसगुल्ल्याचे आरोग्यदायी फायदे -
काविळच्या रूग्णांसाठी रसगुल्ला फायदेशीर आहे. रोज पांढरे रसगुल्ले खाल्याने काविळीचा त्रास लवकर कमी होण्यास मदत होते.
युरिन इंफेक्शनचा त्रास कमी करण्यासाठी रसगुल्ला सकाळ - संध्याकाळ खाणं आरोग्यदायी आहे.
डोळ्यात जळजळ होत असल्यास रसगुल्ला खाणं फायदेशीर ठरू शकते. हा त्रास समूळ नष्ट करायला मदत होऊ शकते.
तुम्हांला थकवा जाणवत असल्यास रसगुल्ला खाऊन तुम्हांला तात्काळ रिफ्रेश वाटू शकत.
रसगुल्ला हा दूधापासून तयार केला जातो. त्यामुळे दूधातील कॅल्शियम घटक शरीरात हाडांना मजाबुती देण्यासाठी फायदेशीर ठरते.
सणाच्या दिवसांत किती ही नाही म्हटलं तर जास्त खाणं हे होतंच. कधी उत्साहाच्या भरात तर कधी आग्रहाखातर आपण एक घास किंवा गोडाधोडाचे पदार्थ अधिकच खातो. या सगळ्या गोष्टी दिवाळीच्या पहिल्या पाच दिवसांत तर आवर्जून होतातच. कारण या दिवसांत तुम्हाला दिवाळीचा फराळ आणि मिठाई हे पदार्थ अधिक आकर्षित करतातच. पण अशावेळी मनात कोणताही विचार न आणता दिवाळी मस्त आनंदाने साजरी करा. आणि त्यानंतर शरीर डिटॉक्स करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सुचवणार आहोत.
1) लींबू
लींबूमध्ये योग्य प्रमाणात विटामीन सी असतं. लींबूमुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच लींबू तुम्ही पचनशक्ती देखील चांगली करतं. लिंबाची साल देखील अँटी ऑक्सिडेट्स असते यामुळे डिटॉक्सिफिकेशन अधिक होते.
2) कोथिंबीर
कोथिंबीरमुळे देखील पचनशक्ती चांगली होते. यामुळे कोलेस्ट्रॉल देखील चांगला राहतो. कोथिंबिरीमुळे शरीरातील लेड आणि मरकरीचे प्रमाण कमी होऊन त्याचे डिटॉक्स होते. कोथिंबीर तुम्ही सलाड, डाळ आणि कढीमध्ये भरपूर प्रमाणात टाकून खावू शकतात.
3) टॉमेटो
टॉमेटो तुमच्या शरीरातील डिटॉक्स अतिशय चांगल्या प्रमाणात करतात. सणाच्या दिवसांत जेवण अधिक झाल्यावर शरीरात समतोल राखण्यासाठी पुढच्या जेवणात टॉमेटोचा वापर अधिक करावा.
4) दही
एक वाटी दही कायमच शरीरासाठी चांगल असतं. दह्यामध्ये प्रोबायॉटिक्स असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील पचनशक्ती सुधारते. कारण यामध्ये उपयुक्त बॅक्टेरिया असतात ज्याने अन्न पचनास मदत होते.
भारतीय खाद्यसंस्कृती मसाल्याच्या पदार्थांशिवाय अपूर्णच आहे. तेजपत्त्याची पानं आरोग्यदायी आहेत. त्यामुळे केवळ आहारात पदार्थांची चव वाढवण्यासाठी नव्हे तर औषधी गुणधर्मासाठी त्याचा फायदा होतो. तेजपत्त्यामध्ये कॉपर, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम घटक मुबलक प्रमाणात असतात.
फायदेशीर तेजपत्त्याचं पान
तेजपत्त्यांच्या पानांमध्ये अॅन्टीऑक्सिडंट घटक असतात. यामुळे कॅन्सर, हृद्याचे आरोग्य जपयला मदत होते. तेजपत्त्यांच्या पानांचा रस शरीरातील अनेक दुखणी कमी करण्यास मदत करतात.
कसा बनवाल तेजपत्त्याचं हेल्दी ड्रिंक
साहित्य -
3 मोठी तेजपत्त्याची पानं
2 लिंबू
अर्धा लीटर पाणी
हेल्थ ड्रिंक बनवण्यासाठी तीन तेजपत्त्याची पानं स्वच्छ धुवून ठेवा. त्यानंतर लिंबाचे 7-8 तुकडे करावेत. भांड्यामध्ये अर्धा लीटर पाणी उकळा. त्यामध्ये तेजपत्त्याची पानं आणि लिंबू मिसळा. हे मिश्रण उकळा. एक उकळी आल्यानंतर हे मिश्रण गाळून थंड करुन प्यावे.
कसासाठी फायदेशीर
तेजपत्त्याच्या पानांमध्ये दाहशामक आणि अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे शरीरातील सूज कमी होते. सोबतच शरीराचे दुखणे कमी करायला मदत होते.