Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

उच्च रक्तदाब, किंवा हायपरटेंशन एक सामान्य आजार आहे. खासकरून 45 वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला या रोगापासून पीडित राहतात. आजकल युवा देखील या आजारांपासून ग्रसित आहे. उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण तणाव, खराब भोजन, लठ्ठपणा, व्यायामाची कमतरता, उच्च कोलेस्ट्रॉल, असामान्य चयापचय इत्यादी आहे. जर उच्च रक्तदाबाचा उपचार नाही केला तर हा डोकेदुखी, थकवा आणि हृदय रोगांचे कारण बनू शकतो.


जर तुम्ही उच्च रक्तदाबासाठी घरगुती उपाय शोधत असाल तर आम्ही तुमची मदत करू शकतो. आम्ही तुम्हाला असा रामबाण नुस्खा सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही ब्लड प्रेशन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत मिळू शकते.

आवश्यक साहित्य
- ड्राय पिस्ता 3 ते 4


- पाणी 1 ग्लास

पिस्त्यात अंटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन बी 6, पोटॅशियम आणि कॉपर सारखे इतर आवश्यक पोषक तत्व असतात.

तयार करण्याची विधी
एका ग्लास पाण्यात पिस्ता घालून रात्रभर भिजवून ठेवा. दुसर्‍या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट नंतर या पाण्याचे सेवन नरून पिस्ता खाऊन घ्या. उचित परिणाम मिळण्यासाठी ही क्रिया किमान 3 महिन्यापर्यंत सुरू ठेवा.

मधुमेह फार मोठय़ा प्रमाणात पसरलेला आजार आहे. हल्ली तर लहान वयातच मधुमेह होत असल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच ह्या

रुग्णांसाठी आहारविहारांचे नियोजन जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही टिप्स :-

लिंबाचा रस :
मधुमेही रुग्णांना तहान जास्त लागते. या अवस्थेत त्यांनी लिंबाचा रस प्यायला हवा. त्याने त्यांची तहान भागते.

काकडी :
मधुमेही रुग्णांनी थोडा कमी आणि हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे त्यांना सारखी भूक लागते. काकडी खाल्ल्याने भूकशांत होऊ शकते.

गाजर-पालकाचा रस :
या रुग्णांनी डोळ्यांसाठी गाजर आणि पालकाचा रस प्यायला हवा.

बीट : मधुमेही रुग्णांना बीट, दुधी भोपळा, गिलकी, पालक, पपई इत्यादी भाज्यांचा वापर जास्तीत जास्त करायला हवा. बीटाने रक्तात असलेल्या साखरेची मात्रा कमी होऊ लागते. म्हणून बीट भाजी, परोठे, सलाड आदी प्रकारे खावी.

जांभूळ :
मधुमेहावर जांभूळ एक पारंपरिक औषध आहे. या फळांना मधुमेहींचे फळही म्हणतात. या फळाची बी, साल, रस आणि गर सर्व मधुमेहींसाठी गुणकारी आहे. जांभळाच्या बिया एकत्र करून ठेवाव्यात. त्यात जांबोलीन नावाचा घटक असतो. स्टार्चचे साखरेत रूपांतर करण्यापासून तो रोखतो. या बियांची बारीक पूड करून ठेवावी आणि दिवसातून २-३ वेळा पाण्यासोबत घ्यावी. यामुळे साखरेचे प्रमाण कमीहोते.

कारले :
पूर्वीच्या काळापासून कारल्याचा प्रयोग मधुमेहींच्या औषधाच्या रूपात केला जात आहे. याचा कडू रस साखरेचे प्रमाण कमी करतो. मधुमेही रोग्यांना याचा रस रोज प्यायला द्यायला पाहिजे. उकळलेल्या कडुलिंबाचा रस प्यायल्यास चांगले.

मेथी :
मधुमेही रोग्यांनी मेथीदाणे पोटात जाऊ द्यावेत. मेथी दाण्याची पूड आता बाजारापर्यंत आली आहे. या पुडीमुळे मधुमेहावर नियंत्रण राहूशकते. हे चूर्ण सकाळी उपाशी पोटी २ चमचे घ्यायला हवे. काही दिवसांत याचे चांगले परिणाम दिसून येतात.

इतर उपचार :
रोज दोन चमचे कडू लिंबाचा रस, चार चमचे केळीच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ घ्यायला हवा. आवळ्याचा रस ४ चमचे घेतल्यानेसुद्धा फायदा होतो.

जेवण कसलेही असो, पंगतीला तूप वाढले की मगच जेवायला सुरुवात करायची आपली परंपरा आहे. एकंदरीत तूप हा स्वयंपाकघरातील एक अविभाज्य घटक आहे.
जुन्या काळात युद्ध-लढाईत झालेल्या जखमा भरून येण्यासाठी तुपाचा वापर केला जात असे. तूप जेवढे जुने तेवढे गुणकारी.

घृत, अज्या, हवी, सर्पी, घी वगैरे विविध नावांनी ओळखले जाणारे तूप मधुर, अत्यंत बलवान, थंड, पित्तशामक, मेद, मज्जा आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे आहे.

तुपामुळे स्मृती, बुद्धी इत्यादींची वाढ होते. मेंदूवर तुपाचे कार्य होते. तुपाचे वैशिष्ट्य म्हणजे तूप खाल्ल्यावर भूक वाढते. अग्निवर्धक हे तुपाचे श्रेष्ठ कार्य आहे. तूप डोळ्यांना हितकारक आहे.

तुपामुळे स्वरयंत्र सुधारते आणि आवाज उत्तम होतो. तूप योगवाही आणि रसायन गुणधर्माचे आहे.

तूप कोणत्याही रोगात विशेषत: वात-पित्तज विकारात वापरता येते. आयुर्वेदात अनेक औषधिद्रव्ये तुपात सिद्ध करून त्यांचे औषधी पाठ बनवले आहेत.

डोके दुखत असेल तर तूप कोमट करून नाकपुड्यांत थेंब टाकावेत किंवा दुखर्‍या कपाळावर हलकेच मालीश करावे.
शंभर वेळा धुतलेले तूप (शतधौत घृत) त्वचाविकार, जखमा, अंगाला खाज, पायांच्या टाचा फुटणे, अंग फुटणे इत्यादी विकारात उपयुक्त औषध आहे.

तूप किंचित कोमट करून खाल्ल्यास उचकी थांबते. तुपाचे थेंब नाकात टाकल्यास नाकातून रक्त पडणे थांबते.
रात्री झोपताना पेलाभर दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास शौचाला सकाळी साफ होते. तुपामुळे मूळव्याध बरा होतो.

तूप खाल्ल्याबरोबर रूप लगेच येत नसले, तरी तूप खाल्ल्यावर लगेच चरबी (कोलेस्ट्रॉल) वाढते हे चूक आहे. जे नेहमी हिंडतात, फिरतात, व्यायाम करतात त्यांनी अवश्य रोज तूप खावे.

कॅन्सरच्या पेशंटला तूप म्हणजे अमृतासमान औषध. तुपात कॅन्सर पेशींची वाढ थांबवण्याची शक्ती आहे. रोज आहारात वापरले जाणारे तूप औषधी आहे.

आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर साबुदाण्यात अनेक पोषक घटक आहेत. मग, ती साबुदाण्याची खिचडी असो किंवा खीर, सगळेच टेस्टी लागते. तसेच ऍनिमिया, बीपी, पोटाच्या आणि इतर अनेक समस्या दूर होण्यास मदत होतात. साबुदाण्यात लोह, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामिन आणि मिनिरल्स भरपूर प्रमाणात असते.


ऍनिमियाला ठेवते दूर

साबुदाण्यात लोह मुबलक प्रमाणात असते, जे रेड ब्लड सेल्स तयार करते. यामुळे रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.

उच्च रक्तदाब ठिक करते

याच्या सेवनाने रक्ताभिसरण चांगले होते. जेणेकरुन धमन्याचे कार्य सुरळित होते आणि उच्च रक्तदाबाची समस्या दूर होते.
ऊर्जा मिळते

साबुदाणा ब्रेकफास्टमध्ये खाण्यामुळे तुम्हाला अनेक पौष्टिक घटक मिळतात. दिवसभर काम करण्यासाठी तुम्हाला ऊर्जा मिळते.

मासपेशीत वाढ

साबुदाण्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण खूप असते. यामुळे मासपेशी मजबूत होतात तसेच त्याची वाढही होते.
हाडे मजबूत

यामध्ये व्हिटामिन के आणि कॅल्शियम असल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

उपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर आपण पास्ता, पिझ्झा किंवा ब्रेड बनविण्यासाठी मैदा वापरत असाल तर त्याऐवजी रवा वापरणे सुरू करा. याने आपण राहाल कोलेस्टरॉल आणि ट्रांस फॅट्स फ्री. यात भरपूर मात्रेत प्रोटीन आढळतं. रवा लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. रवा आहारात सामील करण्याचे फायदे जाणून घ्या:

मधुमेह: हे मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे कारण याचे ग्लायसेमिक निर्देशांक कमी असल्यामुळे शुगर वाढण्याचा धोका नसतो. मैद्यापेक्षा रवा रक्तात शोषण्यात वेळ घेतो ज्याने शुगर लेवल कमी जास्त होण्याचा धोका नसतो.

लठ्ठपणा: जेव्हा आहार हळू-हळू पचेल तेव्हा भूक लागणार नाही. यात भरपूर मात्रेत फायबर आढळतं ज्यामुळे हे हळू गतीने पचतं जे आपल्यासाठी उत्तम आहे. मुख्य म्हणजे यात फॅट्स आणि कोलेस्टरॉल आणि सोडियम नसतं.

ऊर्जा वाढते: रव्यात कार्बोहाइड्रेट अधिक असल्यामुळे शरीर ऊर्जावान राहतं. ब्रेकफास्टमध्ये रव्याने तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने दिवसभर एनर्जी राहते. रवा आहारात सामील केल्याने हृदय आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते. हे हाडं, मज्जातंतू आणि स्नायूंना निरोगी ठेवण्यास मदत करतं.
संतुलित आहार: रव्यात आवश्यक पोषक तत्त्व आढळतात जसे फायबर, विटामिन बी कॉम्‍पलेक्‍स आणि विटामिन इ, मिनरल्स इत्यादी.

हार्टफ्रेंडली: आहारात रवा सामील केल्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळीत कार्य करत आणि हार्ट अटॅकचा धोका टळतो.

ऍनिमियापासून बचाव: रव्यात आयरनची भरपूर मात्रा आढळल्यामुळे हे शरीरात रक्ताची कमी पूर्ण करतं आणि ऍनिमिया सारख्या रोगापासून बचाव होतो.

Dr. Vijay Jagdale
Dr. Vijay Jagdale
BHMS, Homeopath, 10 yrs, Mumbai
Dr. Sagar Salunke
Dr. Sagar Salunke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 2 yrs, Pune
Dr. Sushant Bagule
Dr. Sushant Bagule
BAMS, Pune
Dr. Rajendra kadam
Dr. Rajendra kadam
BAMS, Ayurveda, 10 yrs, Pune
Dr. Yogesh  Gangurde
Dr. Yogesh Gangurde
BHMS, Family Physician, 10 yrs, Pune
Hellodox
x