Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : कडक उन्हाळा सुरु झालाय. उन्हाच्या या काहिलीपासून वाचण्यासाठी थंडगार सरबात पिणे सर्वच पसंत करतात. या ऋतूत स्वत:ला ताजेतवाने आणि फिट ठेवण्यासाठी विविध प्रकारचे ज्यूस आणि थंड पेयांचे सेवन तुम्ही करत असाल मात्र यातच बेलाचा तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरु शकतो. बेलाच्या प्रयोगाने सौदर्य तर उजळतेच मात्र आरोग्यही चांगले राहते. बेलाचा रस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसाचा दररोज एक ग्लास बेलाचा रस प्यायल्यास त्याचा परिणाम काही दिवसांतच तुम्हाला शरीरावर दिसू लागेल.

उन्हाळ्यात लघवीचा त्रास होत असेल तर बेलाचा रस प्यावा.

बदलत्या जीवनशैली आणि ऑफिसमध्ये अनेक तास बसून राहिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. कमी वयात लोकांना ही समस्या सतावतेय. यावर जर दररोज बेलाचा रस प्यायल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होतो.

जर एखाद्याला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर बेलाच्या रसाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते.

ज्यांना हृदयासंबंधित रोगांचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दररोज बेलाचा रस प्यावा. या रसात एक ते दोन थेंब तूप मिसळावे.

तोंड आल्यास बेलाचा रस प्यावा.

रक्त साफ नसल्यास अनेक समस्या निर्माण होतात. यावर बेलाचा रस प्यावा याने अनेक फायदे होतात.

ताण ही सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. ही समस्या कधी उग्र रुप धारण करेल हे सांगणं कठीण होतं. जोपर्यंत ताण आपल्या क्षमतेशी जुळणारे असतात तोपर्यंत ते प्रेरणादायी, आव्हानात्मक ठरतात; पण त्यापलीकडे गेले की मग मात्र आपल्या उत्पादकतेवर व कामगिरीवर परिणाम होतो, तसेच शारीरिक व भावनिक आरोग्यावरसुद्धा याचे गंभीर परिणाम होतात.

राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी दीर्घ आजाराला कंटाळून आत्महत्या केली. नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आहे. त्यामुळे ताण, त्यातून येणारं नैराश्य हा विषय पुन्हा एका समोर आला आहे. या ताणाचं वेळीच नियोजन केलं तर नैराश्येच्या गर्तेत सापडण्यापासून माणूस वाचू शकतो. तेव्हा हा ताण म्हणजे काय? त्याचे आपल्यावर कसे परिणाम होतात? हे जाणून घेऊयात.

तणाव आल्यावर शरीरात काय बदल होतो?
ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात तात्काळ एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात. जर तणाव जास्त वेळ टिकला तर कॉरटिसोल नावाचे द्रव्य दीर्घकाळासाठी निर्माण होते. अति, विचित्र आणि विशिष्ट प्रसंगानंतर या द्रव्यामुळे शरीर व मेंदूमध्ये झपाटय़ाने आणि अतिरेकापर्यंत बदल घडतात.
अनेकदा व्यक्तींमध्ये एकदम उत्तेजित किंवा मलूल होणे, हसणे-रडणे, गोंधळल्यासारखे वागणे, इकडे-तिकडे फिरणे, विसरणे किंवा एकटक पाहत राहणे असे अनेक बदल होतात.
काही व्यक्ती ताणातून बाहेरच येत नाहीत. सतत तोच विचार करतात. काहींना त्या प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसते, त्या वेळचा त्रास पुन्हा अनुभवणे, दचकणे असे व्यक्तींसोबत वारंवार घडते. यामुळे भित्रेपणा, उदासीनता, चिडचिड वाढते.

तणाव का येतो?
बऱ्याच वेळा आपण तणावाखाली वावरतो, पण त्याचा उगमच कळत नाही व तणाव अजूनच वाढतो. खासगी तसेच प्रोफेशनल आयुष्यात येणाऱ्या समस्या या ताणाचं प्रमुख कारण ठरतात. याव्यतिरिक्तही काही कारणं आहेत ही कारणं तुम्ही शोधली तर तणावमुक्त होण्याची पहिली पायरी तुम्ही गाठलीच समजा.

तणावाचे नियोजन कसं कराल?
– जवळच्या विश्वासू सहकाऱ्याशी/कुटुंबातील व्यक्तीशी तुमच्या समस्येविषयी चर्चा करा. तो/ती कदाचित तुम्हाला समस्या कशी सोडवावी ते सांगू शकणार नाही, पण त्यामुळे तुम्हाला नक्कीच हलके वाटेल.
– आवश्यक झोप घ्या. रात्री मोबाइल, दूरदर्शन, सोशल साइटवर वेळ घालवू नका. अपुऱ्या झोपेमुळे कामगिरी सुमार होते.
– आवडत्या छंदात मन रमवा. काही नवे शिका. भटकून या
– अचूकपणाचा अतिरेक, नकारात्मक विचार व आपल्या हातात नसलेल्या गोष्टींच्या परिणामांचा विचार टाळा.
– माणूस नैराश्येत असला की या सर्व गोष्टी प्रत्यक्षात आणणं कठीण वाटतं पण एकदा का मानसिक तयारी पक्की केली नैराश्येच्या गर्तेतून शक्य तितक्या लवकर बाहेर पडणं सोप्प होतं.

लंडन : संशोधकांनी केस गळतीवर संभाव्य उपचार पद्धत शोधली आहे. हे औषध प्रामुख्याने ऑस्टियोपोरोसिस या रोगावर उपचार करण्यासाठी विकसित केले होते. या रोगामुळे हाडे कमकुवत आणि ठिसूळ बनतात.

हा अभ्यास पीएलओएस बायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. ब्रिटनमधील मँचेस्टर विद्यापीठातील संशोधकांनी केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दिलेल्या केसांच्या ग्रंथीवर या औषधामुळे वाढीस चालना मिळत असल्याचे आढळून आले. सद्य:स्थितीत पुरुषांमध्ये होणाऱ्या केस गळतीवर केवळ मिनोक्सिडील आणि फिनास्टेराइड ही दोन औषधे उपलब्ध आहेत, परंतु या दोन्ही औषधांमुळे काही प्रमाणात दुष्परिणाम होत असून केसांची वाढ अपेक्षितरित्या होत नसल्याचे आढळले. त्यामुळे रुग्णांना केस प्रत्यारोपण हा एकच उपाय राहतो.

त्यामुळे संशोधकांनी केस गळतीवर नव्या प्रकारचे उपाय शोधण्याची सुरुवात केली. यासाठी प्रथम इम्युनोसप्रेसिव औषध (सायक्लोस्पोरिन) आण्विक कार्यप्रणाली शोधण्यापासून केली.

सायक्लोस्पोरिन हे १९८०पासून प्रत्यारोपण अस्वीकार दडपणे आणि स्वयंप्रतिकारक रोगावर वापरले जात आहे. परंतु यामुळे गंभीर दुष्परिणाम होत असून अवांच्छित ठिकाणी केसांची वाढ होते. संशोधकांनी सायक्लोस्पोरिनने उपचार केलेल्या डोक्यावरील केसांच्या ग्रंथींचे विश्लेषण केले. येथील ठरावीक जीवनसत्त्व अनेक ऊती त्याचप्रमाणे केसांच्या ग्रंथींच्या वाढीत अडथळा निर्माण करतात.

यामुळे हे औषध वापरल्यामुळे अवांच्छित केसांची वाढ का होते हे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे ऑस्टियोपोरोसिस रोगाच्या उपचारासाठी तयार केलेले औषध याच कार्यप्रणालीला लक्ष्य करते. यामुळे केसांच्या ग्रंथींची वाढ होत असल्याचे आढळून आले.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

सध्याचे दिवस म्हणजे वैशाख वणव्याचे दिवस. या काळात शरीराची किंवा त्वचेची कितीही काळजी घेतली तरी अनेक समस्यांना सामोरे जावेच लागते. खरे पाहता सध्याच्या घडीला झाडांची संख्या कमी झाली असून वाहनांची, इमारतींची संख्या वाढली आहे. त्यातच वाहनांमुळे होणा-या प्रदूषणामुळे माणसाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकतर उन्हाची तीव्रता आणि त्यातच वायू प्रदूषण या सा-याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसून येतो. यामध्येच आता शाळांना सुट्टी लागल्यामुळे लहान मुलेही सतत उन्हामध्ये खेळताना दिसून येतात. लहान मुलांना आपण खेळण्यापासून अडवू शकत नाही. मात्र त्यांच्या आहारात काही ठराविक बदल करुन त्यांना होणा-या आजारापासून वाचवू शकतो.

बाह्य परिस्थितीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. या बाह्यपरिस्थितीशी लढा देण्यासाठी आपल्याला शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. जर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण कोणत्याही ऋतूशी सामना करण्यासाठी तयार राहू शकतो. मुख्यत: उन्हाळ्यामध्ये शरारातील पाण्याची पातळी खालावलेली असते. ही पातळी भरुन काढण्यासाठी आहारात काही पेयांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यातही असे काही पेयपदार्थ आहेत जे रोगप्रतिकारशक्ती वाढवून होणा-या आजारांपासून आपले संरक्षण करु शकते.

१. जिंजर लेमन टी : जिंजर लेमन टी हा एकप्रकारे अँटीऑक्सि़डंटचे काम करतो. यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे शराराला तरतरी येऊ काम करण्याचा उत्साह वाढवितो. जिंजर लेमन टी दररोज एक कप प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

२. वॉटरमेलन अॅण्ड मिंट स्मुदी : कलिंगडाचे काही तुकडे आणि पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये बारीक करुन हा ज्युस तयार केला जातो. कलिंगडामध्ये पाण्याची क्षमता जास्त असून पुदिन्याची पाने शरीराला थंडावा देण्याचे काम करतात. हा ज्युस चवीबरोबरच आरोग्यासाठीही लाभदायक असतो.
३. आरेंज ज्युस : आंबट-गोड अशी संत्री चवीबरोबरच आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी पुरवत असतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे बाजारपेठेमध्ये सर्वत्र संत्री दिसून येतात. काही हॉटेलमध्ये वैगरे तर संत्र्यांपासून नवनवीन पदार्थ देखील उपलब्ध असतात. मात्र उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असल्यामुळे शरीराची झीज भरुन काढण्यासाठी ऑरेंज ज्युस महत्वाचे कार्य करते. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेड व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातील रक्ताला क्षारमय करते. त्याचा चांगलाच फायदा होतो.

४. हनी अॅण्ड वॉटर : मध हा शरीरासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. बाह्य त्वचेच्या रक्षणाबरोबरच मध शरीराच्या अंतर्गत स्वच्छता करण्याचेही काम करतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मध फायदेशीर ठरत असून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचे कामही मध करते. यासाठी गरम पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून प्यायल्यास शरीरातील चरबी कमी होते.

५. ग्रीन टी : ग्रीन टी मध्ये सर्वात जास्त अॅटीक्सिडंटस असतात. चहाची ही लहान लहान पाने शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणण्याचे काम करतात. तसेच ग्रीन टी थायरॉईडसारख्या आजारांनाही आपल्यापासून दूर ठेवतो.

म्हणून उन्हाळ्यामध्ये शरीराला उर्जा देण्याबरोबरच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर या पेयांचा समावेश दिवसातून एकदा आपल्या आहारात समावेश करायला हवा. तसेच उन्हाळ्याव्यतिरिक्तही अन्य ऋतूमध्ये या पेयांचे सेवन केल्यास शरीराला फायदाच होणार आहे.

पुर्वीपासून आपण आजीच्या बटव्यातल्या खास गोष्टींचा वापर करत आलेलो आहोत. अगदी लहान मुल असो किंवा वयस्क व्यक्ती, वेळ आल्यावर आजीचा बटवाच आपल्या कामी येतो. कालांतराने या बटव्यामध्ये नवनवीन गोष्टींची भर पडत गेली. केमिकलयुक्त प्रसाधनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती पदार्थांपासून आपण आपल्या सौंदर्यांत भर पाडू शकतो. सध्या अनेक तरुणी सुंदर दिसण्याच्या नादात विचार न करता नवनवीन प्रसाधनांचा वापर करताना दिसतात. काही तरुणी तर यावर भाळून ही प्रसाधने विकत घेतात. मात्र या केमिकलयुक्त प्रसाधानांच्या वापरामुळे त्वचा काही काळ चांगली दिसत असली तरी सततच्या वापराने त्याचे विपरीत परिणाम दिसू लागतात.

प्रवासादरम्यान अनेक वेळा धूळ,माती उडाल्यामुळे हे धुलीकण चेह-यावर जमा होतात. यामुळे त्वचेवरील रंध्रे बंद होऊन त्वचेला ऑक्सिजन घेण्यास अडथळा निर्माण होतो. यामुळे चेह-यावर डाग, पुटकुळ्या येतात. तसचे प्रखर उन्हाचा सतत भडीमार झाल्यामुळेही त्वचा टॅन होते. सूर्यामधून बाहेर पडणा-या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा प्रभाव सरळ आपल्या त्वचेवर होत असतो. यामुळे त्वचेच्या मूळ रंगात बदल होऊन त्वचा काळवंडते. ही काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ करण्यासाठी फळभाज्यांमधली काकडी उपयुक्त ठरु शकते.

१. काळवंडलेली त्वचा तसेच तेलकट त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी अनेक वेळा टोनरचा वापर केला जातो. टोनिंग केल्याने चेह-यावरील अतिरिक्त तेल कमी होऊन चेहरा पुर्ववत होण्यास मदत होते.

२. टोनर हे एक प्रकारचे अॅस्ट्रिंजेट आहे. मात्र बाजारात मिळणारे टोनर केमिकलयुक्त असते. यामुळे चेह-याला त्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त होता. या कारणामुळे बाजारात मिळणा-या टोनरपेक्षा जर घरी असलेल्या साधनांचा वापर करुन टोनिंग केले तर चेह-याची हानी होणारी नाही. टोनिंगसाठी काकडी हा सर्वात्तम पर्याय आहे. काकडीमध्ये अँटीऑक्सि़डंट, अँटी बॅक्टीरिअल, अँटी फंगल याव्यतिरिक्त अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो. ही पोषकतत्वे त्वचेची हानी होण्यापासून वाचवतात.

३. त्वचेला डायड्रेटेड ठेवण्याचे काम काकडी करत असून काकडीमुळे चेह-याचा रंग उजळतो. या काकडीचे टोनर करण्यासाठी प्रथम काकडीचे साल काढून काकडी मिक्सरच्या सहाय्याने बारीक करुन तिच्यातील पाणी गाळणीने वेगळे करावे. हे पाणी स्प्रेच्या बाटलीमध्ये भरुन रोज दिवसातून दोन वेळा चेह-यावर शिंपडल्यास चेह-याचा पोत सुधारण्यासाठी मदत होते.

४. दरम्यान, अवनीन वर्मा यांनी स्पष्ट केलेल्या काही मुद्द्यांनुसार, काकडी, लिंबू आणि मध यांच्या मिश्रणाचे टोनरही उपयुक्त असते. याच्या वापरामुळे चेह-यावरील डाग कमी होतात. तसेच मध नैसर्गिकरित्या ब्लिचचे कामही करते.

५. काकडीचा रस काढल्यानंतर राहिलेला चोथा फेकून न देता त्याचा उपयोग फेसपॅक तयार करण्यासाठीही होऊ शकतो. त्याप्रमाणेच डोळ्यांखालील वर्तुळे कमी करण्यासाठी आयमास्क म्हणूनही वापर करु शकतो. त्यामुळे काकडी केवळ जेवणाची चव वाढविण्यासाठी नसून शारीरिक सौंदर्यात भर घालण्याचेही काम करताना दिसून येते.

Dr. Manish Jawale
Dr. Manish Jawale
MD - Homeopathy, Homeopath, 17 yrs, Pune
Dr. Vijay U. Jadhav
Dr. Vijay U. Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, 15 yrs, Pune
Dr. Rajendra Lahore
Dr. Rajendra Lahore
MS/MD - Ayurveda, Ophthalmologist, 11 yrs, Pune
Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Dr. Harishchandra Chaudhari
Dr. Harishchandra Chaudhari
DNB, Physician, 10 yrs, Pune
Hellodox
x