छातीत दुखलं की लगेच हृदयविकाराची शंका घेऊन डॉक्टरची भेट घेतली जाते. छातीत दुखणं प्रत्येक वेळी हृदयविकारामुळे असेलच असं नाही, पण म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही.
संध्याकाळचे सहा वाजले होते. मी घरी जायला निघालो होतो. एवढय़ात रवी आणि महेश माझ्या ऑफिसात आले. दोघेही आमच्या संस्थेत पीएचडीसाठी आलेले विद्यार्थी (रिसर्च स्कॉलर) होते.
‘‘डॉक्टर, आम्ही पेशंट म्हणून नाही आलेलो. आम्हाला एक शंका आहे त्याबद्दल विचारायचे आहे.’’ रवीने येण्याचे प्रयोजन सांगितले.
‘‘डॉक्टर, मी २५ वर्षांचा आहे. माझ्या छातीत दुखलं तर ते हृदयविकारामुळे असू शकेल का?’’ महेशने आपली शंका विचारली.
‘‘डॉक्टर, वयाच्या पंचविसाव्या वर्षी हृदयविकार कधी होतो का?’’ रवीने आपला मुद्दा नोंदवला.
मला दोघांच्या प्रश्नांवरून त्यांच्यातल्या वादाची रूपरेषा समजली.
आजकाल २५-३० वर्षांच्या तरुणाला हार्ट अॅटॅक आला ही बातमी ‘ऐकावे ते नवलच’ या सदरात मोडत नाही. क्षणभर हळहळ व्यक्त करून आम्ही ते विसरतो; परंतु आपल्या अंतर्मनात त्याची कुठे तरी नोंद झालेली असते. छातीच्या दुखण्याबरोबर अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हे शब्द डोक्यात पिंगा घालतात आणि त्याचबरोबर त्यांचे छातीत धडकी भरवणारे दर डोळ्यापुढे नाचू लागतात. म्हणूनच कुणी छातीत दुखते म्हटले की धस्स होतं.
रवी, महेशच्या डोक्यात असाच काहीसा विचार असावा. मी त्यांना बसायला सांगितलं.
‘‘रवी, महेश आपण आज फक्त छातीच्या दुखण्यावर बोलू या, चालेल?’’
रवी काही तरी विचारणार एवढय़ात मी त्याला थांबवलं ‘अर्थात हृदयविकाराबद्दलही बोलूच’. मी रवीच्या संभाव्य प्रश्नाचे उत्तर दिले आणि छातीचे दुखणे या माझ्या आवडत्या विषयावर बोलायला सुरुवात केली.
सर्वसाधारणपणे छातीच्या दुखण्याला इतर अवयवांच्या दुखण्याच्या तुलनेत नेहमीच जास्त महत्त्व दिले जाते व त्यासाठी सर्वाधिक वेळा डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. छातीत दुखायला लागले की बहुतेकांच्या मनात क्षणभर का होईना हृदयविकाराची शंका डोकावून जाते. काही जण लगेच डॉक्टरांकडे जाऊन आपल्या शंकेचं निरसन करतात, तर काही जण ‘दुखणे वाढले तर जाऊ डॉक्टरांकडे’ असा पवित्रा घेतात. तर कधीकधी गॅसचं वा स्नायूचे दुखणं असेल असा विचार करून त्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती आढळते.
हृदयविकारासारख्या गंभीर प्रकारापासून ते स्नायूंच्या किरकोळ दुखण्यापर्यंत अनेक कारणांमुळे छातीत दुखण्याचा त्रस होऊ शकतो. छातीचे दुखणे वेगवेगळ्या प्रकाराचे असू शकते. त्यावरून विकाराचा अंदाज करता येतो, परंतु केवळ लक्षणांच्या मदतीने एखाद्या विकाराचा अंदाज वर्तवताना इतर विकारांची शक्यता ठामपणे फेटाळून लावता येत नाही. विकाराचे गांभीर्य हे लक्षणाच्या तीव्रतेवर अवलंबून नसते, त्यामुळे कधीकधी गंभीर दुखण्याकडे दुर्लक्ष आणि किरकोळ आजाराला अवास्तव महत्त्व अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळेच हृदयाच्या ईसीजी आणि तत्सम तपासण्या केल्याशिवाय निदान करता येत नाही. या विषयाची माहिती असलेल्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग डॉक्टर नसेल तेथे रुग्णाला धीर देण्यासाठी व वैद्यकीय मदत मागताना डॉक्टरांना रुग्णाबद्दलची आवश्यक माहिती पुरवण्यासाठी करावा, परंतु रोगनिदान करण्याचा मोह मात्र टाळावा.
छातीत दुखायला लागल्यास ते गंभीर स्वरूपाचे आहे अथवा नाही याविषयी जाणून घेण्यापूर्वी छातीच्या दुखण्यास कारणीभूत विविध विकारांबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊ या.
छातीच्या दुखण्याची कारणमीमांसा करताना सोयीसाठी हृदयाशी निगडित विकारांमुळे छातीत दुखणे आणि हृदयेतर कारणांमुळे छातीत दुखणे असे दोन प्रमुख भाग करता येतील. हृदयाशी निगडित विकारांमध्ये प्रामुख्याने हृदयविकाराचा झटका ऊर्फ हार्ट अॅटॅक आणि हृदयशूळ म्हणजेच अन्जायना यांचा मोठा वाटा आहे. हे दोन्ही विकार हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण होतात. हृदयाशी संबंधित इतर विकारांमध्येसुद्धा छातीत दुखण्याचा त्रास होऊ शकतो; परंतु हार्ट अॅटॅक आणि हृदयशूळ यांच्या तुलनेत या विकारांच्या रुग्णाची संख्या बरीच कमी असते.
नियमित ध्यान केल्याने उतारवयात सचेत राहण्याच्या आणि लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत सुधारणा होत असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे.
हा अभ्यास ‘जर्नल ऑफ कागनेटिव्ह एनहान्समेन्ट’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यात तीन महिने नियमित ध्यान केल्याने लोकांना काय फायदा झाला याचा अभ्यास करण्यात आला, त्याचप्रमाणे सात वर्षे नियमित ध्यान धारणेनंतरही लोकांमध्ये झालेल्या सुधारणेचे मूल्यांकन करण्यात आले. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी नियमित ध्यान करणाऱ्या ३० व्यक्तींच्या संज्ञानात्मक क्षमतेचे मूल्यमापन केले.
मन शांत करणे आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढविण्यासाठी ध्यानाचे प्रकार या लोकांना शिकविण्यात आले होते. यानंतर केवळ ३० दिवसांच्या शिबिरादरम्यान ध्यान करणाऱ्या लोकांच्या गटाचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासाचा भाग म्हणून सहा महिने, अठरा महिने आणि सात वर्षांच्या कालावधीनंतर पाठपुरावा मूल्यांकन करण्यात आले. यावेळी अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांना त्यांनी दैंनदिन आयुष्यात ध्यान करणे सुरू ठेवले की नाही याबाबत विचारणा करण्यात आली.
यातील ४० लोकांनी नियमित ध्यान केल्याची माहिती दिली. यातील ८५ टक्के लोकांनी सात वर्षांमध्ये नियमितपणे दिवसातून एक तास ध्यान केले. यानंतर पुन्हा त्यांच्या प्रतिक्रियेचा वेळ आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता याचे मूल्यांकन करण्यात आले.
यावेळी सात वर्षे नियमित ध्यान करणाऱ्या वृद्धांमध्ये वाढत्या वयानुसार लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेत येणाऱ्या अडचणींची लक्षणे दिसून आली नाहीत.
ध्यान केल्याने लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि प्रतिक्रियात्मक क्षमतेमध्ये सुधारणा होत असल्याचे पुरावे या अभ्यासातून समोर आले आहेत, असे अमेरिकेतील मायामी विद्यापीठाच्या अॅन्थनी झेनेस्को यांनी म्हटले.
मुंबई: आपल्यापैकी अनेक मुला- मुलांची लग्न खोळंबलेली असतात. अशा वेळी त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, माझ्याजवळ जर सर्व गोष्टी आहेत. ज्याचा लग्नासाठी प्रामुख्याने विचार केला जातो. पण, लग्न काही जमत नाही. अनेकांच्या बाबतीत समोरून उगाच नकार मिळत नाहीत. तर, त्याची काही महत्त्वाची कारणेही असतात. त्या कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे समोरच्या व्यक्तिला विचारले जाणारे प्रश्न. जाणून घ्या असे कोणते प्रश्न विचारल्यामुळे लग्नाची बोलणी फिस्कटतात...
या प्रश्नांमूळे मिळतो नकार
१- तूला कसा पार्टनर हवा?
२- तूला किती मित्र आहेत, फेसबूक, व्हाट्सऍपवर तू तूझ्या मित्रांसोबत बोलतेस / बोलतोस काय?
३- तूला किती बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड आहेत?
४- तूला पिरीयड (मासिक पाळी) किती तारखेला येतो?
५- मुलांबद्धल (लग्न झाल्यावर जन्माला येणाऱ्या) तूझे मत काय?
६- आता सांग बरं माझा स्वभाव तूला कसा वाटला?
७- लग्ननंतर मी माझ्या मित्र / मैत्रिणींबसोबत फिरलेले किंवा त्यांना घरी आणलेले चालेल का?
मुंबई : उन्हाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे सनबर्न. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे अनेकदा बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन्स केले जातात. पण वाढत्या उन्हाचा त्वचेवर गंभीर परिणाम होऊ लागतो आणि त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी काही सोप्या उपयांनी तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. पहा कोणते आहेत ते उपाय...
थंड पाण्याने अंघोळ
सनबर्न झाले असल्यास दिवसातून कमीत कमी दोनदा थंड पाण्याने अंघोळ करा. याशिवाय तुम्ही ओल्या टॉवेलचा देखील वापर करु शकता. जर तुम्हाला खाज, इंफेक्शन ही समस्या असल्यास तुम्ही सनबर्न झालेल्या जागी ओला टॉवेल ठेवू शकता. त्यामुळे सनबर्नच्या समस्येवर आराम मिळेल. अंघोळीनंतर मॉश्चराईजर अवश्य लावा. त्यामुळे त्वचेतील आद्रता टिकून राहील.
मॉश्चराईजर
उन्हाळ्यातही शरीर मॉश्चराईजर लावा. कोरफड, काकडी युक्त मॉश्चराईजर वापरा. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन त्वचेला थंडावा मिळतो.
पाणी प्या
उन्हाळात भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डिहाइड्रेशनची शक्यता वाढते. म्हणून शरीर हाइड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.
उन्हापासून संरक्षण करा
उन्हाळ्यात दुपारच्या वेळेस बाहेर जाणे टाळा. यावेळी उन्हाचा प्रखर अधिक असतो. त्यामुळे सनबर्नचा धोका वाढतो.
कॉटनचे कपडे घाला
उन्हाळ्यात शक्यतो कॉटनचे कपडे घाला. कॉटन कमी प्रमाणात ऊन शोषून घेतो. तसेच अंगभर कपडे घालणे फायदेशीर ठरेल.
मुंबई : पालकामध्ये शारिरीक विकासाठी लागणारी सर्व पोषक तत्वे असतात. मिनरल्स, व्हिटामिन आणि अनेक पोषकतत्वांनी भरपूर असलेला पालक सुपर फूड आहे. पालकमध्ये व्हिटामिन ए,सी,ई, के आणि बी कॉम्पेलक्स मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय मँगनीज, कॅरोटीन, आर्यन, आयोडिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम,सोडियम, फॉस्फरस आणि आवश्यक अमिनो अॅसिड असते. पालकांची भाजी अथवा पराठे बनवले जातात. मात्र पालकाचे संपूर्ण फायदे मिळवायचे असल्यास त्याचा जूस प्यावा.
हे आहेत पालकाचा रस पिण्याचे फायदे
पालकामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो.
पालकामध्ये व्हिटामिनचे प्रमाण अधिक असते. पालकाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
पाचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम पालकाचा रस करते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पालकाचा रस प्यायल्याने फायदा होतो.
त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास पालकाचा रस प्यावा. पालकाचा रस प्यायल्याने त्वचा उजळते. केसांसाठी पालकाचे सेवन चांगले.
गर्भवती महिलांनाही पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. पालकाचा रस प्यायल्याने गर्भवती महिलांच्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.
पालकामध्ये असलेले कॅरोटीन आणि क्लोरोफिल कॅन्सरपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय पालकाचा रस प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.
पालकाचा रस बनवण्याची कृती
पालकाचा रस बनवण्यासाठी पालक आणि पुदिन्याची पाने धुवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. त्यानंतर यात पाणी, भाजलेले जिरे, काळे मीठ आणि लिंबू मिसळून प्या.