Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : गोरी आणि नितळ त्वचा मिळवण्यासाठी मुली नानाविध उपाय करत असतात. तासनतास पार्लरमध्ये घालवतात. महागड्या क्रीम्सवर खर्च करतात. अनेकजण मेडिकल ट्रीटमेंट करुन घेतात. मात्र खरंच या सगळ्याची गरज आहे का? आपल्या किचनमध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यांच्या सहाय्याने तुमची चेहरा नितळ आणि गोरा होऊ शकतो.

नारळपाणी - नारळपाणी चेहऱ्यावरील डागांसाठी रामबाण उपाय आहे. सकाळी सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर नारळपाणी लावा. काही वेळाने साध्या पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा कोमल आणि साफ होईल.

जिरे - फोडणीमध्ये जिऱ्याला मोठे महत्त्व असते. मात्र खाण्यासोबतच जिऱ्याचा वापर सौंदर्य वाढवण्यासाठीही होतो. जिरे दूधात वाटून चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा कोमल होईल आणि त्वचाही उजळेल.

दही-दूध - दह्यामध्ये लिंबू मिसळून लावल्याने त्वचा गोरी होते. तसेच चेहरा दुधाने धुतल्यास रंग उजळतो.

लिंबू - लिंबामध्ये मध मिसळून चेहऱ्यावर लावा. काही दिवसांतच तुमची त्वचा उजळेल.

गुलाबजल - गुलाबजलमध्ये लिंबाचा रस मिसळून त्वचेवर लावा. यामुळे चेहरा उजळ होईल.

मुंबई : दह्याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर असते. दह्याला सुपरफूड म्हटले जाते. मात्र याचे सेवन जर तुम्ही लंचमध्ये कराल त्याचा अधिक फायदा होतो. दुधाच्या तुलनेत दही लवकरच पचते. ज्या व्यक्तींचा पोटाचे विकार सतावतात जसे अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. यात पाचनशक्ती सुधारणारे चांगले बॅक्टेरिया असतात. तसेच उच्च प्रतीचे प्रोटीनही असते.

पचनशक्ती वाढते
दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. पचनासाठी दही अतिशय उपयोगी आहे. पचनक्रिया योग्य नसेल तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. दही रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर करते. पोटात होणाऱ्या इन्फेक्शनपासून सुटका मिळते. तसेच ज्यांना कमी भूक लागते त्यांच्यासाठीही फायदेशीर ठरते.

तोंड आल्यास दह्याची मलई त्यावर लावल्याने फायदा होतो. दही आणि मध एकत्र करुन सकाळ-संध्याकाळ सेवन केल्यास तोंड बरे होते.

दररोज दही खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो. कोलेस्ट्रॉलचे अधिक प्रमाण रक्तप्रवाहावर परिणाम होतो यामुळे हार्ट अॅटॅक येण्याची भिती अधिक असते. फॅट फ्री दही रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते. तसेच ब्लड प्रेशनची समस्याही दूर होते.

दह्याचे सेवन दात आणि हांडांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असते ज्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात.

दह्याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

सुंदर केसांसाठी दही अथवा ताकाने केस धुवावेत. आंघोळीआधी दह्याने केसांना चांगले मालिश करा. काही वेळाने केस धुतल्यास कोंडा दूर होतो.

उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा.

उन्हाळा ऋतू सुरु झालाय. तापमानात वाढ व्हायला सुरुवात झालीये. उन्हाळा सुरू होताच प्रकृतीच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. उन्हाळ्यात अनेक आजार होत असल्याने प्रत्येकाने स्वत:चं आरोग्य स्वत: जपलं पाहिजे. उन्हाळ्यात बर्फ टाकलेली शीतपेय पिण्यापेक्षा घरगुती सरबते पिणे कधीही चांगले. उन्हाळ्यात खाली दिलेली सरबत नक्की ट्राय करा.

फळांचे सरबत :- १ अननस , २ संत्री, २ मोसंबी, २ निंबू

कृती:- सर्वांचा रस काढून घ्या. रसाच्या दीडपट साखर घेऊन त्यात थोडे पाणी घालून पाक करून घ्या. थंड झाल्यावर वरील रस बॉटल मध्ये भरावा. तो १५ ते २० दिवस सहज टिकतो. आयत्यावेळी थंड पाण्यात घालून सरबत घेता येते. त्यात किंचित मीठ घातले तरी चालेल.

खस सरबत :- साखर आणि पाणी एकत्रित करून गरम करा त्यास चांगली उकळी येऊ द्या. थंड झाल्यावर गाळून घ्या. त्यात खस इन्सेस आणि रंग घाला. पाहिजे तेव्हा थंड पाण्यात सरबत घालून प्या.

अननसाची लस्सी
साहित्य :- ताक किंवा दही, अननसाचे तुकडे, वेलची पूड, किंचित साखर
कृती :- अननसाचा रस काढून सर्व एकत्रित करून मिक्सर काढा,त्यात बर्फ घालून ग्लास मध्ये लस्सी द्या, त्याला छान सुगंध येतो .

कैरीचे पन्हे :
कैरीची साले काढून किसून घ्या. थंड पाण्यात कुस्करून गाळून घ्या. त्यात साखर वेलचीपूड टाका. किंचित मीठ आणि बर्फ घालून प्यायला द्या

चिंचेचे सरबत !
वाळलेली चिंच घ्यावी त्यांतील चिंचोके काढून घ्यावे नंतर त्यात पाणी घालून भिजत घालावी. काही वेळाने चिंच कुस्करून घ्यावी आणि चिंच काढून घ्यावी. चिंचेच्या पाण्यात साखर,मीठ, सोप आणि जिरे पूड टाकावी व बर्फ टाकून पिण्यास द्यावे.

आपले वय जसे वाढत जाते तसे शरीर थकत असल्याने जास्त काळजी घेणे आवश्यक असते. वयोमानानुसार आहारात बदल केल्यास तुमचे आरोग्य नक्कीच जास्त चांगले राहू शकते. वयानुसार शरीराच्या गरजा, त्याना आवश्यक असणारे पोषण हे वेगवेगळे असते. २० व्या वर्षी खात असलेले पदार्थ आपण ६० व्या वर्षी खाऊ शकूच असे नाही. त्यामुळे विशिष्ट वयानुसार आपल्याला आहारात बदल करावा लागतो. पाहूयात कोणत्या वयात कोणते पदार्थ खाल्लेले चांगले पाहूयात…

वय वर्षे २०

या वयात आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती अतिशय चांगली असते. त्यामुळे या वयात आरोग्याच्या काही समस्या उद्भवल्याच तर हे तरुण त्यातून बरे होण्याची शक्यता जास्त असते. या काळात हाडे आणि मांसपेशी वेगाने तयार होत असल्याने या काळातील आहार अतिशय महत्त्वाचा असतो. या वयात आपले शरीर सूपर अॅक्टीव्ह असल्याने शरीराला प्रथिने, कॅल्शियम, लोह, कार्बोहायड्रेट यांची आवश्यकता असते. त्यामुळे दाणे, सुकामेवा, फळे, पालेभाज्या, दूध, दही, ताक यांचा आहारात आवर्जून समावेश ठेवावा.

वय वर्षे ३०

या वयात करीयर, नोकरी, लग्न अशा अनेक जबाबदाऱ्या व्यक्तीवर आलेल्या असतात. यामध्ये मानसिक आणि शारीरिकही अनेक बदल होतात. या काळात आपण जीवन स्थिरस्थावर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतो. या काळात आपले प्राधान्यक्रम बदललेले असल्याने आपल्यावर बरेच ताण असतात. अशा काळात शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असणारे अंडे, शहाळे, ऑलिव्ह ऑईल, पालेभाज्या, फळे, कमी स्निग्धता असलेले दुग्धजन्य पदार्थ खावेत.

वय वर्षे ४०

या काळात आपल्या आयुष्याचा अर्धा टप्पा आपण गाठलेला असतो. जीवनातील बरेच चढ-उतार पाहिलेले असतात. यानंतर आरोग्याच्या काही तक्रारी निर्माण होण्यास सुरुवात होते. मेटाबॉलिझम, लोहाची कमतरता, रक्तदाब, मधुमेह, हाडांचे दुखणे अशा तक्रारी कमी जास्त प्रमाणात सुरु झालेल्या असतात. या काळात व्यक्तीची पचनशक्ती काही प्रमाणात बिघडलेली असते. तसेच वजन नियंत्रणात राखणे हे एक आव्हान झालेले असते. त्यामुळे या काळात कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली आणि इतर सगळ्या भाज्या खाव्यात. तसेच आहारात लसूण, कांदा, हळद, ऑलिव्ह ऑईल असे हृदयाला तंदुरुस्त ठेवणारे पदार्थ खावेत. ओमेगा ३ या काळात अतिशय उपयुक्त ठरते.

वय वर्षे ५०

मागची इतकी वर्षे धावपळ केल्यानंतर या काळात शरीर बोलायला लागलेले असते. या काळात हाडे आपले अस्तित्त्व दाखवायला लागतात. तसेच आपल्या आवडीच्या गोष्टी खाल्ल्यानंतर अचानक जळजळायला लागते. दात दुखतात, केस पांढरे होतात. त्यामुळे या काळात आहाराकडे लक्ष देणे आवश्यक असते. त्यामुळे या काळात फायबर, झिंक, प्रोटीन, व्हीटॅमिन बी, अंडी, कडधान्ये जास्त प्रमाणात खायला हवे. बाहेरचे खाणे टाळलेलेच बरे.

खूप मेहनत घेऊन आणि घाम फुटल्यानंतरही जर आपलं वजन कमी होत नसेल तर आम्ही येथे असे काही उपाय सांगत आहोत ज्याने आपली कॅलरीज जलद बर्न होऊ लागेल.

नो इलेक्ट्रॉनिक्स
जर आपल्याला झोपण्यापूर्वी निरंतर फोन चेक करण्याची सवय असेल किंवा रात्री नाइट शो बघण्याची किंवा नेट सर्फ करण्याची तो हे तर काम बंद करावे. कारण यातून निघणार्‍या शॉर्ट वेवलेंथ ब्लु लाइट्स आपल्या बॉडीचे चयापचय क्रिया कमी होते. याने आपल्या मेटाबॉलिझममध्ये बदल होतो म्हणून इलेक्ट्रॉनिक्स बंद ठेवा.

नो दारू
रात्री झोपण्याच्या किमान 3 तासापूर्वी दारूचे सेवन करणे टाळावे. झोपताना अधिक कॅलरीज बर्न होती. म्हणून दारू पिऊन लगेच झोपल्यावर आपलं चयापचय क्रिया कमी होईल.

नो हेव्ही फूड
रात्री मसालेदार आणि भरपूर आहार घेतल्याने शरीराला ते पचविण्यासाठी जड जातं, याने चयापचय क्रिया कमी होते. झोपण्यापूर्वी जेवण पचले नाही त्याचं फॅट्समध्ये रूपांतरण होतं.

नो लाइट
पूर्ण पणे अंधारात झोपल्याने आपले शरीर अधिक मेलाटोनिन तयार करू पाईल. याने फॅट्स बर्न होण्यात मदत मिळते. लवकरच चांगली झोप येते.

कुलिंग
कूलिंगमध्ये झोपणारे 7 टक्के जलद गतीने कॅलरीज बर्न करतात. कारण थंड वातावरणातून सामान्य तापमान करण्यासाठी शरीर अधिक मेहनत घेतं ज्याने जलद गतीने कॅलरीज बर्न होऊ लागतात.

झोपण्याची वेळ
कमी झोप घेणार्‍यांचे वजनदेखील जलद गतीने वाढत जातं. म्हणून किमान सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.

Dr. Prasang Bharadwaj
Dr. Prasang Bharadwaj
MBBS, General Medicine Physician General Physician, 3 yrs, Mumbai
Dr. Manisha Dandekar
Dr. Manisha Dandekar
BAMS, Ayurveda, 25 yrs, Pune
Dr. Sachin Kuldhar
Dr. Sachin Kuldhar
BHMS, Gynaecologist Homeopath, 8 yrs, Pune
Dr. Ravindra Borade
Dr. Ravindra Borade
BAMS, Allergist Ayurveda, 11 yrs, Pune
Dr. Amol Pharande
Dr. Amol Pharande
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 14 yrs, Pune
Hellodox
x