मुंबई : आपल्या आरोग्यामध्ये पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. दिवसभरातून 3 - 4 लीटर पाणी आपल्या शरीरात जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या शरिरात पाण्याच प्रमाण अधिक असतं. म्हणून अनेकदा डॉक्टर देखील भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. सकाळी उठल्या उठल्या अनेकदा पाणी पिण्याचा सल्ला डायएेशिअन देतात. मग ते पाणी कधी कोमट असतं. तर कधी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा ब्रश न करता पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. थोडंस हे विचित्र वाटेल पण उठल्यावर फक्त चूळ भरून पाणी पिणं हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात.
१) रोज सकाळी ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात केल्याने शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटावरील चरबी कमी होते. वजन घटवण्यास मदत होते.
२) रात्री झोपताना तोंडात लाळ निर्माण होते. सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापूर्वी थेट पाणी प्यायल्यास ही लाळही पोटात जाते. यामुळे शरीराला फायदा होतो. कारण लाळेत असणारे एंझाईम्स पोटातील अनेक समस्यांचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
३) ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
४) रोज सकाळी ब्रश करण्यापूर्वी पाणी प्यायल्याने पोट साफ होण्यास मदत होते. सोबतच बद्धकोष्ठता, अॅसिडीटी (पित्त) अशा समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
५) जे लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पितात त्यांना कप होत नाही. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे जे खाल्ले जाते त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. कप दूर झाल्याने अन्य आजारही पळून जातात.
६) सकाळी पाणी पिल्यामुळे गळा, डोळे, लघवी, किडनी बाबत ज्याकाही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते.
मुंबई: आजच्या रोजच्या धावपळीच्या आणि फास्टफूडच्या जीवनात प्रत्येकालाच काहीना काही आरोग्यादायक समस्या भेडसावत असतात. काही लोक याकडे दुर्लक्ष करतात तर काही याबाबत सजग दिसतात. बाहेरच्या तेलकट आणि जंकफूडमुळे अनेकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो आहे. खासकरुन अनेकांना वाढत्या वजनाने हैराण करुन सोडले आहे. धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही. अशात हे आजारपण कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्य हा एक उपाय आहे.
- मोड आलेल्या मुगामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन सी असतं. ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. तसंच रक्त शुद्ध व्हायला मदत होते. फळं आणि भाज्यांमध्ये मिळतं त्यापेक्षा 100 पट जास्त एंजाईम तुम्हाला मोड आलेले मूग किंवा चणे खाल्यामुळे मिळतं.
- मोड आलेले मूग आणि चणे खाल्ल्यामुळे पचन संस्थाही चांगली होते. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे शरीर चांगलं काम करतं. मोड आलेले मूग आणि चण्यांमुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्याही कमी होतात. चेहऱ्याचे अनेक विकार काही दिवसात यामुळे दूर होतील.
- या कडधान्यांचे एवढे फायदे असले तरी अनेकांना ती नुसती खायला आवडत नाहीत. त्यामुळे त्याला सॅलड बनवूनही तुम्ही खाऊ शकता. पण लक्षात ठेवा मोड आलेल्या या कडधान्यांना शिजवलं किंवा तळलं तर त्यामधली पोषक तत्त्व निघून जातात. त्यामुळे ही कडधान्य उकडून सॅलडसारखीच खा.
- या कडधान्यांना तुम्ही टोमॅटो, कांदा आणि काकडीबरोबरही खाऊ शकता. तसंच त्यामध्ये गरजेनुसार मीठ आणि चाट मसाला टाकून तुम्ही त्याला आणखी चविष्ट बनवू शकता.
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भूकेवर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. वजन घटवण्याच्या नादात उपास मार केली जाते. त्यातून अधिक खाल्ले गेल्यास वजन वाढते आणि परिणाम उलटा होतो. म्हणूनच भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात कशी करावी, हे जाणून घेऊया...
आरोग्यदायी फॅट्सचा आहार वाढवा
अनेकजण फॅटयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश कमी करतात. परंतु फॅट्समुळेच भूकेवर नियंत्रण ठेवता येतं. फॅट्समधून उर्जा मिळते. तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे शोषण सुधारते. पेशींना मजबूत बनवते. त्यामुळे बदाम, अॅव्हॅकॅडो, मासे, ऑलिव्ह ऑईल यांचा आहारात समावेश करा.
फायबर्सचा आहार वाढवा
पचनक्रियेला नियमित करण्यासाठी फायबर्स महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे पाण्याचा अंश टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच आहारात हिरव्या भाज्यांचा,फळांचा समावेश वाढवा. त्यामध्ये कॅलरीजही योग्य प्रमाणात आढळतात. सलाड किंवा फळं खाण्याच्या सवयीमधून शरीराला फायबर्सही मिळतात.
प्रोटीन्सचा आहार वाढवा
तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश वाढवा. यामुळे आहार पोटभरीचा होतो तसेच त्यातील अमायनो अॅसिड भूक नियमित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासाठी अख्या डाळी, मासे, अंडी, यांचा आहारातील समावेश वाढवा.
भूक लागल्यावर च्युईंगम चघळा
वेळी अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी च्युईंग गम चघळणे हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे. यामुळे वजन कमी होत नसले तरीही कमीत कमी कॅलरीज शरीरात जातात. मात्र च्युईंगगम हे शुगर फ्री असेल याची काळजी घ्या.
अनेकजण पाणी शुद्ध करण्यासाठी प्युरिफायरचा पर्याय निवडतात. पण इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता या पाणी शुद्ध करायचे हे पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील.
खासकरुन पावसाळ्यात दूषित पाण्याचा धोका अधिक असतो. दूषित पाण्यामुळे यामधूनच कॉलरा, डायरिया, कावीळची साथ झपाट्याने वाढते. पण इतरवेळीही पाणी शुद्ध करुनचा प्यायला हवं. अनेकजण पाणी शुद्ध करण्यासाठी प्युरिफायरचा पर्याय निवडतात. पण इलेक्ट्रिसिटीचा वापर न करता या पाणी शुद्ध करायचे हे पर्याय तुम्हाला नक्कीच आवडतील.
1) स्वच्छ कापड - अनेक ठिकाणी दुषित पाण्याच्या पुरवठा होण्याची शक्यता असते. अशावेळी मातकट, पिवळसर पाण्याचा प्रवाह होत असेल तर नळाला आधीच पिशवी किंवा स्वच्छ धुतलेले कापड बांधा. यामुळे किमान पाणी गाळून येईल त्यानंतर उकळून तुम्ही पिऊ शकता.
2) नॉन इलेक्ट्रिसिटी प्युरिफायर - सध्या बाजारात इलेक्ट्रिसिटी विनाही पाणी शुद्ध करणारे काही प्युरिफायर्स उपलब्ध आहेत. यामध्ये अॅक्टीव्हेट्स कार्बन आणि UF म्हणजेच अल्ट्राफिल्ट्रेशनच्या मदतीने पाणी स्वच्छ केले जाते.
3) गाळणं - तुम्हांला चांगल्या प्रतीच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरीही किमान पावसाळ्याच्या दिवसात पाणी कपड्याने किंवा गाळणीने गाळूनच मग स्वयंपाकासाठी वापरा.
4) तुरटी - पाणी शुद्ध करण्यासाठी ते भांड्यात भरल्यानंतर त्यावर तुरटी फिरवा. म्हणजे गाळ खाली बसतो. मग उरलेले पाणी गाळून, उकळून पिण्यास सुरक्षित बनवता येते.
5) उकळणं - पावसाळ्याच्या दिवसात पाणी उकळून घेणे फार महत्त्वाचे आहे. यामुळे अनेक बॅक्टेरिया, त्रासदायक जंतू यांच्यापासून बचाव होतो.
आठवड्याचे पाच किंवा सहा दिवस काम करणे म्हणजे अनेकांसाठी कंटाळवाणेच. कित्येक जण तर शुक्रवार किंवा शनिवार कधी येतो याचीच आठवडाभर वाट पाहत असतात. वय वाढेल तसे तुमचे कामाचे दिवस कमी झाले तर किती मज्जा येईल ना? ऐकायला बरी वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात झाली तर…आता तुम्ही म्हणाल असे कसे शक्य आहे? पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ४० वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांनी आठवड्यातील तीनच दिवस काम करावे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इन्स्टीट्यूटमधील तज्ज्ञांनी याबाबत अभ्यास केला आहे. ४० वर्षाच्या वरील लोक आठवड्यातील ३ दिवस काम केले तरच सर्वोत्तम कामगिरी करु शकतात.
या अभ्यासासाठी ४० वर्षावरील ३५०० महिला आणि ३००० पुरुष यांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासकांनी यामध्ये सहभागी झालेल्यांच्या अॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग, मेमरी, एक्सिक्युटीव्ह रिझनिंग यांसारख्या गोष्टींच्या चाचण्या घेतल्या. तसेच या अभ्यासकांनी सहभागींची आकलनविषयक कामगिरीचीही तपासणी केली. या लोकांनी आठवड्यातील २५ तास काम केल्यावर त्यांची कामगिरी ५५ तास काम केल्यावर असणाऱ्या कामगिरीपेक्षा अतिशय चांगली होती असा निर्ष्कर्षही यातून निघाला. यातील एका वरिष्ठ अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार, तुमची बौद्धिक क्षमता ही तुम्ही किती वेळ काम करता यावर अवलंबून असते. जास्त ताण आणि थकवा आल्यास शरीर आणि बुद्धी एका मर्यादेपलिकडे तितकी चांगली कामगिरी करु शकत नाही.
कामाचे तास हे थेट तुमच्या कार्यक्षमतेशी निगडीत असल्याने वयाने मोठ्या व्यक्तींची कार्यक्षमता जास्त तास काम केल्यास कमी होत जाते. आठवड्याला ३० तासांहून जास्त काम करण्याचा मध्यमवयीनांच्या मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामध्ये तुमच्या कामाचे स्वरुपही तुमची कार्यक्षमता ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असेही या अभ्यासकांनी नोंदवले आहे. मात्र सरकारच्या म्हणण्यानुसार वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत कार्यरत राहणे हे नक्कीच फायदेशीर नसते. त्याचबरोबर तुम्हाला आवडणारे काम करणे आणि पुरेशा सुट्ट्या घेणे आवश्यक असल्याचे मतही या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे.