जगात इतकी माणसे आहेत पण प्रत्येकाचे हास्य वेगळे आहे. प्रत्येकाच्या हास्याचे वेगळे वैशिष्ट्य आहे. काही माणसे तर त्यांच्या हास्यासाठी ओळखली जातात. मग दात असो किंवा ओठांची ठेवण यामुळे प्रत्येकाचे स्माईल काही खास आहे. याव्यतिरिक्त हास्याबद्दल तुम्हाला अजून काय माहित आहे ? मग जाणून घ्या हास्याबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी.
हसल्याने endorphins ची निर्मिती होते:
जेव्हा तुम्ही हसता, अगदी जबरदस्तीने हसलात तरी शरीरात endorphins या फील गुड हार्मोनची निर्मिती होते. त्यामुळे मूड चांगला होतो.
हसल्यामुळे रक्तदाब कमी होतो:
हसल्यामुळे endorphins च्या पातळीत वाढ होते आणि रक्तदाब कमी होतो. म्हणजे हसणे निरोगी आयुष्यासाठी फायदेशीर आहे.
१९ प्रकारच्या स्माईल्स आहेत:
स्मितहास्यापासून खूप आनंदी हसण्यापर्यंत एकूण १९ प्रकारच्या स्माईल्स आहेत.
हसल्याने चेहऱ्याला उत्तम व्यायाम मिळतो:
जर तुम्हाला थोडीफार डबल चीन जाणवत असेल तर फक्त हसा. हसण्याने २६ स्नायूंवर परिणाम होतो. त्यामुळे जबडा, चेहऱ्याचे स्नायू यांना चांगला व्यायाम मिळतो.
स्माईल सप्लिमेंट्स तोंडाचे आरोग्य सुधारते:
फक्त त्वचा आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी नव्हे तर चांगल्या हास्यासाठी देखील काहीजण स्माईल सप्लिमेंट्स घेतात. त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेन्ट असल्याने इम्म्युनिटी सुधारते आणि तोंडाचे संपूर्ण आरोग्य उत्तम राहते.
वाढत्या वयोमानासोबत किडनीचं आरोग्यदेखील खालावते. त्यामुळे अरबट चरबट खाण्यावर आणि जीवनशैलीशी निगडीत आजारांवर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे. अन्यथा क्रोनिक किडनी डिसीजचा धोका बळावतो.
डायलिसिसच्या त्रासातून मुक्तता
किडनीचं कार्य खालावल्यानंतर शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी अनेकदा क्रोनिक किडनी डिसीजच्या रुग्णांना डायलिसीसची मदत घ्यावी लागते. मात्र डायलिसिस ही वेदनादायी आणि खर्चिक प्रक्रिया आहे. किडनीविकाराच्या रुग्णांना 'रेनाडिल' ठरणार नवी आशा
मुंबईत घडला चमत्कार
मुंबईमध्ये 59 वर्षीय सुहासिनी धोके या महिलेला गेल्या 9 वर्षापासून मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यानंतर कालांतराने त्यांना क्रोनिक किडनी डिसिजचा त्रास होण्यास सुरूवात झाला. या स्थितीचा सामना करण्यासाठी त्यांना कायम डायलिसीसची मदत घ्यावी लागली.
स्टेरॉईड थेरपीची मदत
जसलोक हॉस्पिटल्सचे डॉ. ऋषी देशपांडे यांनी त्यांच्यावर उपचार केले. क्रोनिक किडनी डिसीजचा त्रास आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी रेनल बायोप्सी आणि स्टेरॉईड थेरपी करण्याचे ठरवले. डॉक्टरांच्या प्रयत्नांनाही यश मिळाले. हळूहळू क्रेटानिनचं प्रमाण आटोक्यात आलं. डायलिसिसची आवश्यकताही आठवड्याला 3 वेळेस वरून 2 वेळेस आणि कालांतराने नाहीशी झाली. आता सुहासिनींना डायलिसिसची मूळीच गरज नाही.
आपल्याकडे हंमागी फळे भाज्या येतात. सध्या उन्हाळा चालू आहे आणि हा हंगाम आहे कलिंगडाचा. बाजारात तुम्हाला लाल, रसदार कलिंगड पाहायला मिळतील. उन्हाळ्यात याचा आहारात भरपूर समावेश करा. कारण त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पाहुया काय आहेत फायदे...
-कलिंगडात पोटॅशियम आणि मॅग्नेशिअम असल्याने रक्तदाब वाढत नाही. त्याचबरोबर पोटाच्या समस्याही दूर होतात.
-कलिंगड खाणाऱ्यांना हृदयासंबंधित आजार होत नाहीत, असे तज्ञांचे मत आहे. कारण कलिंगडामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.
-उन्हाळ्यात ऊनामुळे त्वचा खूप खराब होते. त्यासाठी देखील कलिंगड फायदेशीर ठरते. कलिंगडात लोयकोपिन अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
-कलिंगड खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामुळे खूप वेळ काही खाल्ले जात नाही. परिणामी वजन कमी करण्यास मदत होते.
-कलिंगडात अनेक व्हिटॉमिन्स असतात. जे आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. यातील व्हिटॉमिन ए शरीराची रोगप्रतिकारकशक्ती आणि डोळ्यांसाठी उत्तम ठरते.
अनेकदा लोकं हेल्दी डायटच्या नावावर कच्च्या भाज्या खातात. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, पोटॅशियम, फायबर्ससह इतर पोषक तत्त्व भरपूर प्रमाणात असतात. आणि भाज्या उकळून किंवा शिजवून सेवन केल्याने त्यातील पौष्टिक तत्त्व नष्ट होतात हे खरं असले तरी प्रत्येक भाजी आपण कच्ची खाऊ शकत नाही. जाणून घ्या कोणत्या अश्या भाज्या आहे ज्या कच्च्या खाऊ नाही.
वांगी
कच्चे वांगी खाण्याचा प्रयत्न करू नये. वांग्यांमध्ये सोलानिन नामक तत्त्व मोठ्या प्रमाणात आढळतं. कच्चे वांगी खाल्ल्याने पोटात गॅसची समस्या होऊ शकते. म्हणून वांगी शिजवून खावे.
गाजर
गाजरामध्ये बीटा कॅरोटीन आढळत ज्याने बॉडी व्हिटॅमिन ए मध्ये कन्वर्ट करते. गाजर शिजवल्यावर कॅरोटीनचे प्रमाण वाढतं. शरीरात पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता वाढवण्यात तसेच स्किनला पोषण मिळण्यासाठी ये आवश्यक तत्त्व आहे.
बटाटे
बटाट्यांमध्ये आढळणारे स्ट्रार्च पचण्यात समस्या बनू शकतात म्हणून बटाटे उकळून किंवा शिजवून खावे.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये आढळणारे लाइकोपीनमुळे याचा रंग लाल असतो. यामुळे प्रोस्टेट कँसर आणि हार्टच्या समस्यांपासून सुटकारा मिळतो. टोमॅटो शिजवल्यावर त्यात आढळणारे टच सेल वाल्स ब्रेक डाउन होतात आणि लाइकोपीन रिलीज करतात. यामुळे हे शरीरात शोषले जातात.
ब्रोकली
ब्रोकली आणि कोबीत कठोर घटक आढळतात. या भाज्या चांगल्यारीत्या शिजवून न खाण्याने पचण्यात समस्या येते.
बींस
बींसमध्ये फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, सोडियम, फोलेट्स, फोटो पोषक घटक, व्हिटॅमिन आणि इतर पोषक तत्त्व आढळतात. उकळून खाल्ल्यास हे सर्व पोषक तत्त्व आपल्याला मिळू शकतात. मधुमेहावर उकळलेले बींस उपयोगी ठरतात. 5 मिनिट बींस उकळून त्यावर मीठ आणि काळ्या मिर्याची पूड घालून खाऊ शकता.
पालक
पालक अनेकदा सलॅड म्हणून खाण्यात येतं. कच्चा पालक खाणे धोकादायक ठरू शकतं. पालक शिजवल्यावर त्यात आढळणार्या आयरन आणि मॅग्नेशियम तत्त्वांमध्ये वाढ होते.
रताळे
रताळ्यांमध्ये आयरन, फोलेट, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स इतर आढळतं, याने इम्यून सिस्टम मजबूत होतं. रताळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारे कार्बोहाइड्रेट शरीरासाठी आवश्यक असतं. याचे दुप्पट गुण मिळवण्यासाठी रताळे उकळून खावे.
हर्बल टी- कोमोमाईल किंवा पेपरमिंट चहाची काही पाने गरम पाण्यात टाकून ठेवावी. त्या पाण्याने डोळे शेकावेत.
मीठ - एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ टाकून डोळे शेकावे. दिवसातून तीनवेळा असे केल्यास डोळंची खाज आणि जळजळ बंद होते.
नारळाचे तेल- नारळाच्या तेलाच्या गुणांमुळे डोळ्यातील घाण साफ होते. रोज डोळ्यांच्या खाली आणि जवळच्या भागाला नारळाच्या तेलाने मालिश करावे.
ओले कापड- हातामुळेही डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. डोळ्याची जळजळ, वेदना किंवा खाज येत असल्यास स्वच्छ पाण्यात कपडे भिजवून डोळे साफ करावेत. त्यामुळे कोणताही आजार होण्याचा धोका राहात नाही.
बेकिंग सोडा- स्वच्छ पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा मिसळून ते गरम करावे. थोडे पाणी राहिल्यानंतर त्या पाण्याने डोळे धुवावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
थंड दूध- थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून तो डोळ्यांच्या आसपास फिरवावा. कापसाचा बोळा थंड दुधात भिजवून ठेवू शकतो. रोज हे उपाय केल्यास आराम पडतो.
कोरफड- कोरफड जेलमध्ये चमचा मध-अर्धा कप एल्डरबैरी चहा मिसळावा. दिवसातून दोनवेळा या मिश्रणाने डोळे धुवावेत. त्यामुळे डोळ्यांचा त्रास काही वेळातच कमी होईल.
कच्चा बटाटा- अॅस्ट्रिंजटच्या गुणांनीयु्क्त असलेला कच्चा बटाट्याचा वापर केल्यास डोळ्यातून पाणी येण्याच्या समस्या लवकर बरी होते. बटाट्याची पातळ काप करून ते काहीवेळ फ्रीजमध्ये ठेवावेत. त्यानंतर थंड काप 15-20 मिनिटे डोळ्यांवर ठेवावेत. 2-3 दिवस हा उपाय केल्यास डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दूर होईल.