Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

मुंबई : उन्हाळा म्हणजे आंबा आणि फणस यांचा मौसम आहे. शरीरात उष्णता वाढू नये म्हणून काही सकारात्मक बदल करणं गरजेचे आहे. कारण शरीरातील उष्णता आणि सोबतच तीव्र ऊन यामुळे त्वचेचे नुकसान होते.

उन्हाळ्याच्या दिवसात यामधूनच घामोळ्यांचा त्रास वाढू शकतो. पूर्ण बाह्यांचे कपडे घातले तरीही घामामुळे त्वचेवरील छिद्र बंद होतात वेळीच घामोळ्यांच्या त्रासाकडे लक्ष दिले नाही तर हिट स्ट्रोकचा त्रास वाढण्याची शक्यता असते. या समस्येमध्ये शरीराचे तापमान संतुलित राखणे कठीण होते. म्हणूनच हा एक्सपर्ट सल्ला नक्की लक्षात ठेवा.

घामोळ्यांचा त्रास टाळण्यासाठी काय कराल ?
उन्हाळ्याच्या दिवसात सैलसर आणि सुती कपड्यांचा समावेश करा. प्रवास करताना ज्या कपड्यांमध्ये तुम्हांला कम्फर्टेबल वाटेल अशाच कपड्यांची निवड करा. घाम आल्यानंतर ताबडतोब कपडे बदला. उष्णता आणी घामामुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता वाढते. त्वचेला रॅश येणे, घाम येणे हा त्रास हमखास वाढतो.

थेट उष्ण वातावरणात जाणं टाळा. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर कष्टदायक व्यायाम करणं टाळा. यामुळे घाम येण्याचं प्रमाण वाढते. तसेच घामोळ्यांचा त्रासही वाढू शकतो. या दोन तासाच्या वेळेत उन्हात मूळीच विनाकारण फिरू नका !

घराबाहेर पडण्यापूर्वी छातीजवळ, पाठीवर भरपूर घामोळ्यांपासून बचाव करणारी पावडर मारा. घामोळ्यांचा त्रास असलेला भाग थंड आणि शुष्क राहील याची काळजी घ्या. बाहेरून आल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करा.
तुम्हांला घामोळ्यांचा त्रास होत असेल तर त्यावर कोरफडीचा गर /लोशन किंवा बर्फ लावणंदेखील फायदेशीर ठरेल.सनबर्नपासून सुटका मिळवण्याचे 5 सोपे उपाय!

कॅलॅमाईन लोशन किंवा डॉक्टरांनी सुचवलेली सौम्य स्टिरॉईड क्रीम्स त्वचेला होणारी जळजळ किंवा खाज कमी करण्यास फायदेशीर ठरतात. पण ऑईल बेस्ड प्रोडक्ट्स वापरू नका. यामुळे खाज किंवा घाम अधिक वाढू शकते.

घामोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी स्टिरॉईड घेणं तुम्हांला त्रासदायक वाटत असेल तर काही घरगुती उपायांची मदत घ्या. मुलतानी माती, चंदन किंवा कडूलिंबाचा पॅक काहीवेळ त्वचेवर लावल्यास थंडावा निर्माण होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात घरच्या घरी ओटमिल पाण्यात मिसळून आंघोळ करणंदेखील फायदेशीर ठरते. वाढत्या उन्हाळ्यात 'कूल' राहण्यासाठी असा करा 'वाळ्या'चा वापर

नियमित मुबलक पाणी पिण्याची सवय ठेवा. यामुळे तुम्ही हायड्रेटेड रहाल.पाण्यासोबतच ताज्या फळांचा रस, ग्लुकोज, व्हिटॅमिन सी युक्त ड्रिंक्स यांचा आहारात समावेश वाढवा. तसेच उन्हाळाचा त्रास टाळण्यासाठी कोल्ड ड्रिंक्स , कार्बोनेटेड बेव्हरेजेस पिणं टाळा. यामुळे डिहायड्रेशनचा त्रास वाढतो.

मुंबई : आज ७ एप्रिल म्हणजे विश्व स्वास्थ्य दिवस. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वास्थ्याच्या अनेक समस्या जडत आहेत. त्याचबरोबर वाढत्या वयासोबत शरीरात अनेक बदल होत असतात आणि योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्याच्या नाना विध समस्या जडू लागतात. तसंच यासाठी आपल्या काही चुकीच्या सवयीही कारणीभूत ठरतात. जसं की जेवण्याचा अयोग्य वेळा, व्यायाम न करणे, अनहेल्दी पदार्थांचे सेवन, व्यसने. म्हणून हेल्दी राहण्यासाठी योग्य त्या वयात आवश्यक त्या तपासण्या करणे गरजेचे आहे. पाहुया कोणत्या वयात कोणत्या टेस्ट कराव्यात...

वय वर्ष २०-
प्रत्येक वर्षी रक्तदाबाची तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उंची आणि वजन नियमित तपासून पहा. दात आणि डोळ्यांचे आरोग्य तपासा. प्रत्येक दोन वर्षांनी एचआयव्हीचे स्क्रीनिंगही करणे आवश्यक आहे. पाच वर्षांनी कोलेस्ट्रॉल तपासणे, काळाची गरज झाली आहे.

वय वर्ष ३०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त मधुमेह, थायरॉयईड, अॅनेमिया आणि लिव्हर यांचे आरोग्य तपासावे. रक्ततपासणी करावी. वर्षातून एकदा हृदयासंबंधित आजारांची तपासणी करायला हवी.

वय वर्ष ४०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त दर पाच वर्षांनी एकदा कार्डिओवरक्युलर इवेल्यूएशन करणे गरजेचे आहे. तर वर्षातून एकदा प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी करणे आवश्यक आहे.

वय वर्ष ५०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त प्रत्येक वर्षी एकदा टाईप टू मधुमेह तपासणी करावी. प्रत्येक वर्षी डोळे, कान याव्यतिरिक्त मानसिक आरोग्य, लिपिड डिसऑर्डरची तपासणी करावी.

वय वर्ष ६०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त ऑस्टियोपोरोसिससाठी प्रत्येक वर्षी स्क्रीनिंग. याशिवाय डिमेशिया आणि अलजायमर याची प्रत्येक वर्षी तपासणी करावी.

मुंबई : माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायची सवय होती आणि कालांतराने तीच आपली परंपरा बनली.परंतु, आपल्या या परंपरेमागे काही ज्ञान आहे का ? त्याचे काही फायदे आहेत का ? जाणून घेऊया मातीच्या माठातून पाणी पिण्याचे त्यांनी सांगितलेले फायदे.

नैसर्गिक थंडावा:
लहान लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोड शेडींग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.

मातीचे गुणधर्म:
माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.

माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन:
शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.

कोणतेही हानिकारक केमिकल्स नाहीत:
अधिकतर प्लॉस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.

मेटॅबॉलिझम सुधारते:
मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

उष्माघाताला आळा बसतो:
उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या.

घशासाठी चांगले असते:
सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते.

योग्य मातीचे मडके (माठ) कसे निवडावे ?
घरासाठी मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा असे पहा. तसंच mica particles युक्त माठ घ्या. त्याला micaceous म्हणतात. Mica हे नैसर्गिक इन्सलेटर असते. त्यामुळे पाणी खूप वेळपर्यंत थंड राहण्यास मदत होते.

जेवणात भले आपण कितीही सकस पदार्थांचा समावेश करत असू पण, तरीही जेवणातून शरीरास अपायकारक घटक आपल्या पोटात जात असल्याची बाब समोर आली आहे. आपल्या प्रत्येक जेवणातून प्लास्टिकचे सुमारे १०० अत्यंत सुक्ष्म कण पोटात जात असल्याचं यूकेतील हेरॉयट-वॉट विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एका संशोधनांत सिद्ध केलं आहे. दर वीस मिनिटाला हे घटक अन्नातून किंवा श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचं या संशोधनातून म्हटलं आहे.

यासाठी विद्यापीठातील चमूने काही घरातील जेवणाच्या ताटांचं निरिक्षण केलं. या ताटांवर त्यांना प्लॅस्टिकचे लहान कण आढळून आले. दर वीस मिनिटांनी जेवणाच्या ताटावर प्लॅस्टिकचे छोटे छोटे कण जमा होतात. त्याच ताटांतून आपण जेवतो. त्यातूनच हे प्लॅस्टिकचे लहान कण आपल्या पोटात जातात असं शास्त्रज्ञ टेड हेन्री यांनी सांगितले. विचार करायचा झाला तर प्रत्येक जेवणासोबत प्लॅस्टिकचे सरासरी ११४ कण पोटात जातात असं यातून समोर आलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्लॅस्टिकचे छोटे कण घरात प्रवेश करतात. अनेकदा कपडे, घरातील कार्पेट किंवा फर्निचरवर हे कण असतात. काहीवेळा धूळीसोबत हे कण घरात येऊ शकतात अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या संशोधनानुसार वर्षाकाठी प्रत्येक माणसाच्या शरीरात १४ ते ७० हजार प्लॅस्टिकचे कण जमा होतात.

चुकीच्या जीवनशैलीमुळे सध्या बहुतांश जणांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी पोटाचा वाढता घेर किंवा लठ्ठपणा हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. पुरूष आणि महिला दोघांसाठी महत्त्वाची समस्या असणाऱ्या या लठ्ठपणावर मात करण्यासाठी मग वेगवेगळे उपाय अवलंबले जातात. आहारात केलेले बदल, जिमला जाणे, बाजारात मिळणारी सप्लिमेंटस वापरणे असे उपाय अवलंबले जातात. पण जीवनशैलीत काही ठराविक गोष्टींचा अवलंब केला तरीही वाढलेल्या कॅलरीज घटण्यास मदत होते. पाहूयात कोणत्या गोष्टीं केल्यास त्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकतात…

व्यायाम करा

व्यायामामुळे शरीरातील कॅलरीज जळण्यास मदत होते. त्यामुळे दिवसातील ठराविक वेळ विशिष्ट व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना शरीरावर वाढलेली चरबी घटविण्यासाठी अशाप्रकारच्या व्यायामाची आवश्यकता असते. तुमचे स्नायू जितके कमजोर असतील तितकी तुम्हाला अधिक व्यायाम करण्याची आवश्यकता असते हे वेळीच लक्षात घ्यायला हवे.

न्याहरी चुकवू नका

सकाळची न्याहरी करणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. अनेकदा कामाच्या गडबडीत किंवा ऑफीसला जाण्याच्या घाईत ती करणे राहून जाते. पण असे केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे इतर कोणत्याही खाण्यापेक्षा सकाळची न्याहरी सर्वात जास्त महत्त्वाची असते.

भरपूर चाला

चालणे हा शरीरात वाढलेल्या कॅलरीज घटविण्यासाठी एक उत्तम उपाय ठरतो. नियमित चालल्याने शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढतो आणि घामाद्वारे कॅलरीज शरीराबाहेर पडायला मदत होते. म्हणून नियमितपणे अर्धा तास चालणे उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. विशेष करुन रात्रीच्या जेवणानंतर रोज अर्धा तास चालणे खाल्लेले अन्न पचण्यास मदत करते, त्यामुळे नकळत कॅलरीज जळण्यास मदत होते.

पुरेसे पाणी प्या

शरीराचे सगळे कार्य सुरळीत चालण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. पाण्यामुळे रक्ताभिसरण तसेच खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होण्यास मदत होते. शीतपेये पिणे म्हणजे शरीरात पाणी जाणे असे होत नाही, त्यामुळे पाणी कॅलरीज जळण्यासाठी आवश्यक असतात. यामुळे शरीरात तयार झालेल्या टॉक्सिन्सचा विनाश होण्यास मदत होते.

वेळेवर झोपा

रात्री लवकर झोपणे आरोग्यासाठी चांगले असते. तुम्ही रात्री वेळेत झोपल्यास तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच शरीरातील वाढलेली चरबी कमी होण्यासही मदत होते. त्यामुळे रात्री लवकर झोपावे. ‘लवकर निजे, लवकर उठे तया आरोग्य संपत्ती लाभे’ अशी म्हणही आपल्याकडे प्रचलित आहे.

Dr. Sushma Todkar
Dr. Sushma Todkar
BDS, Dentist Root canal Specialist, 20 yrs, Pune
Dr. Sujeet Ranjane
Dr. Sujeet Ranjane
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune
Dr. Shrikant Choudhari
Dr. Shrikant Choudhari
MS/MD - Ayurveda, General Surgeon, 6 yrs, Pune
Dr. Shivdas Patil
Dr. Shivdas Patil
BAMS, Family Physician, 8 yrs, Pune
Hellodox
x