Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान वेगाने व कुठलाही स्पर्श न करताही अचूकपणे करण्यासाठी एक वेगळी पद्धत रोपड येथील आयआयटीच्या वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. या तंत्रात स्तनांपासून परावर्तित होणाऱ्या अवरक्त किरणांच्या मदतीने अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील कर्करोगाच्या गाठी शोधता येतात.

इन्फ्रारेड थर्मोग्राफी नावाचे हे तंत्रज्ञान वेदनारहित, वेगवान असून त्यात शरीराला छेदही द्यावा लागत नाही. ही पद्धत मॅमोग्राफी, अल्ट्रासाऊंड, मॅग्नेटिक रेझोनन्स (चुंबकीय सस्पंदन) या तंत्रांना पूरक आहे, असे विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक रवीबाबू मुलावीसाला यांनी सांगितले.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफीचा वापर केला जात असला तरी त्याला मर्यादा आहेत. त्यात, दाट स्तनांमधील गाठी शोधणे अवघड असते.

दाट स्तनांमध्ये चरबी कमी व ग्रंथींच्या उती मांसल स्तनांपेक्षा जास्त असतात, त्यामुळे अशा परिस्थितीत मॅमोग्राफीला मर्यादा येतात. ग्रंथींच्या भागातील गाठी त्यात कळणे अवघड असते कारण ग्रंथी व गाठीचा भाग यातील घनतेत फरक असतो. मॅमोग्राफीत त्यामुळे गाठ ओळखणे अवघड होते. त्याऐवजी रेडिओलॉजी तंत्राने तेच काम सोपे व अचूक होते.

मुलावीसाला यांनी सांगितले की, मॅमोग्राफीत शरीर हानिकारक आयनीभवन असलेल्या प्रारणांना सामोरे जावे लागते. सध्याचे आयआरटी तंत्रज्ञान हे पारंपरिक मॅमोग्राफीपेक्षा रुग्णस्नेही आहे. या नवीन पद्धतीत औष्णिक प्रेरक स्तनांना लावला जातो व कक्ष तापमानापेक्षा दोन किंवा तीन अंश फरक असलेले तापमान स्तनाभोवती निर्माण केले जाते. यात औष्णिक लहरी स्तनात पसरल्या जातात व त्यातून त्वचेवरील तापमानातील फरक कळतो. त्यातून आत गाठ आहे की नाही हे अचूक समजते कारण या गाठींमुळे वरच्या तापमानात फरक पडत असतो.

मुंबई : उन्हाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. तर आरोग्याच्याही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हा त्रास जास्त कोणाला जाणवत असेल तर तो वर्कींग वुमन्सना. उन्हाच्या तडाख्यात फ्रेश दिसणे, हे मोठे आव्हान असते. पण काही टिप्सच्या साहाय्याने तुम्ही त्वचेच्या समस्या दूर ठेऊ शकता आणि नक्कीच फ्रेश दिसू शकता. तर या काही टिप्स खास वर्कींग वुमन्ससाठी....

१. उन्हाळ्यात तुम्ही जितक्या वेळ्या चेहरा धुवाल तितके चांगले. शक्य असल्यास उन्हाळ्यात तुळस आणि कडूलिंब युक्त फेसवॉश वापरा. त्यामुळे त्वचेच्या अतिरिक्त तेलकटपणापासून सुटका मिळेल. पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. कडूलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ होऊन चमकदार होण्यास मदत होईल.

२. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांनी मॅट मॉश्चराईजरचा वापर करावा. मात्र कामानिमित्त बाहेर फिरावे लागत असेल तर सन्सक्रीमचा अवश्य वापर करा. आठवड्यातून तिनदा स्क्रबचा वापर करा. त्यामुळे मृत त्वचा निघून त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

३. आठवड्यातून एकदा फेसमास्क जरुर वापरा. अनेकदा कामाच्या नादात आपण त्वचेकडे फारसे लक्ष देत नाही. त्यामुळे चेहरा सुंदर व प्रेश दिसण्यासाठी आठवड्यातून एकदा फेसमास्क अवश्य लावा. त्यामुळे त्वचा हेल्दी राहिल.

४. शक्य असल्यास किंवा आवडत असल्यास तुम्ही लाईट मेकअप करु शकता. त्याचबरोबर वेट टिश्यू सोबत ठेवा. घामाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी बॉडी स्प्रे कॅरी करा.

तोंडाला येणारी दुर्गंधी ही आपल्या समाजामधली एक लाजिरवाणी आरोग्य-समस्या आहे. पान-तंबाखु-गुटखा खाणार्या, धूम्रपान करणा-या माणसांबद्दल मी बोलत नसून सर्वसाधारण निर्व्यसनी लोकांबद्दल बोलत आहे. समाजामधील अर्ध्याहून अधिक लोकांच्या तोंडाचे आरोग्य व्यवस्थित नसते, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.” आम्ही नियमितपणे दात घासतो, म्हणजे आमचे मौखिक-आरोग्य उत्तम आहे”, अशाच गैरसमजामध्ये लोक असतात.

मौखिक आरोग्याविषयीच्या लोकांच्या बेफिकीरीचा तोटा त्यांना स्वतःलाच होत असला तरी समाजामधील दोन घटक यामुळे खुश राहतात, एक दंतरोगतज्ज्ञ आणि दुसरे टुथपेस्ट्चे निर्माते. एवढ्या मोठ्या संख्येच्या देशामधील लोक आपल्या तोंडाच्या आरोग्याबद्दल निष्काळजी असतील तर त्याचा फायदा उठवायला व्यापारी पुढे सरसावणारच ना ! भारतीयांचे मौखिक आरोग्य बिघडण्यास तशी अनेक कारणे आहेत, मात्र आयुर्वेदिय पद्धतीने दंत धावन न करता आधुनिक टुथपेस्ट्सचा वापर हे त्यामागचे एक मुख्य कारण असावे अशी शंका येते.

मुळात आपले पूर्वज खैर, करंज, वड, उंबर, पिंपळ, कडूनिंब, बाभूळ, वगैरे झाडाची लहानशी काडी घेऊन ती चावूनचावून अधिक मृदु करुन त्याने आपले दात व हिरड्या साफ करायचे. कडू-तिखट व तुरट चवीच्या या वनस्पती आपल्या गुणांनीच तोंडामधील घातक रोगजंतुंचा नाश करायाच्या, हिरड्या सुदृढ करायच्या व दातांवरील इनॅमलला मजबूत ठेवायच्या. इतकंच नव्हे तर गोडाच्या सेवनाचे शरीरावर होणारे विविध दुष्परिणाम नियंत्रणात ठेवण्याचा तो प्रभावी उपाय होता. कडू-तिखट-तुरट चवीच्या त्या वनस्पतींची वास्तवात आजच्या स्थूलत्व आणि स्थूलत्वजन्य विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या आजच्या समाजाला अधिक गरज आहे.

मात्र पुढे त्या झाडाच्या काडीची जागा ब्रशने घेतली . त्या ब्रशने दातांच्या फटींमध्ये अडकलेले कण सहज काढता येतात ,हे खरे. मग त्या ब्रशवर एखादे लोण्यासारखे मऊ क्रिम असले तर ब्रशने घासताना दात व हिरड्यांना इजा होणार नाही व दात घासणे सोपे जाईल या हेतूने पेस्ट आली. मग त्या टुथपेस्टमध्ये वेगवेगळी केमिकल्स मिसळली गेली. ज्यांचे फायदे कमी आणि तोटे जास्त असल्याचे पुढे पुढे लक्षात आले. पण तोपर्यंत टूथपेस्ट उत्पादकांचा धंदा चांगलाच वधारला होता, तो कसा बंद करणार? मग दातांसाठी फारशा उपयोगी नसलेल्या त्या टूथपेस्टने तोंड सुगंधी होते, असा प्रचार सुरू झाला , जो आज २१व्या शतकातही आपल्याला मूर्ख बनवत आहे !

खरं सांगायचं तर आजची टूथपेस्ट मौखिक आरोग्याकडे नाही, तर शरीर(म्हणजे तुमचे दात व तोंड) कसे आकर्षक भासेल, याकडे अधिक लक्ष देत असल्याने या टुथपेस्टला एक सौंदर्यप्रसाधनच म्हटले पाहिजे.
“दातांसाठी कोणती टूथपेस्ट चांगली?”, हा प्रश्न नेहमीच रुग्णांकडून डॉक्टरांना विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर आहे…कोणतीही ! खरोखरच बाजारात उपलब्ध असणा-या टुथपेस्टच्या कपाटात हात घालून जी टूथपेस्ट तुमच्या हाताला लागेल ती टूथपेस्ट उचला आणि तीच योग्य आहे, असे समजून वापरा. कारण दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये टूथपेस्टची फारशी भूमिका नसतेच मुळी ! “आमच्या टूथपेस्टमध्ये हे आहे आणि आमच्या टुथपेस्टमध्ये ते आहे”, असे कितीही दावे उत्पादकांना करू देत, प्रत्यक्षात तुम्ही दात कसे घासता हे अधिक महत्त्वाचे असते .

सर्वसाधारण लोक बाथरुमच्या टाईल्स घासाव्या त्याप्रमाणे जोरजोरात टूथब्रश दातांवरुन खसाखसा याच पद्धतीने दात घासण्याचे कर्तव्य पार पाडतात व आपले दात स्वच्छ झाले असे समजतात. त्यामुळे दात स्वच्छ झाल्यासारखे वाटले तरी दातांवरचे इनॅमल त्यामुळे हळूहळू निघून जाते. प्रत्यक्षात समाजामधील शेकडा पन्नास लोकांना तरी दात कसे घासावे याचे शास्त्रीय ज्ञान नसते.

दात घासताना ब्रश दातांवरुन आडवा न फिरवता उभा ( वर-खाली) हळुवारपणे फिरवा. त्याशिवाय ब्रश दातांवरुन गोलाकार गतिने हळूवार फिरवणे, दातांच्या फटींच्या कडेने दात वर-खाली घासणे, दातांच्या फटींमधील अन्नाचे कण ब्रशच्या केसांनी प्रयत्नपुर्वक हळुवारपणे काढणे अशाप्रकारे दात घासायला हवे. दातांच्या चारही कोप-यातून ब्रश व्यवस्थित फिरवा. वरच्या रांगेतले मागचे दात व अगदी कोप-यातल्‍या दात आणियांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. सकाळी व रात्री झोपण्यापुर्वी दात घासलेच पाहिजेत, तर मुलांनी सायंकाळीसुद्धा घासणे योग्य. महत्त्वाचं म्हणजे ब्रश दातांवर जोरात दाबू नका, अलगद फिरवा आणि हो, मऊ केसांचा ब्रश वापरा. आत म्हणजे टॉयेलटची टाईल्स नाही जी कडक केसांच्या ब्रशने कशीही घासता येईल. टुथपेस्टमधील केमिकल्सचे प्रमाण पाहता अगदी वाटाण्याच्या आकाराऐवढीच पेस्ट ब्रशवर घ्या, केमिकल्सविरहित वापरलीत तर उत्तम, पण दात नीट घासा आणि व्यवस्थित चूळा भरा.

रात्री झोपताना त्रिफळाच्या काढ्याने गुळण्या करा. सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे आठवड्यातून निदान एकदा कडुनिंबाची काडी चघळण्याची सवय लावा. इतकं केलंत तरी तुमचे दात आणि मौखिक आरोग्य तर सुधारेलच, पण परदेशी टुथपेस्टची खरेदी केल्याने रोजच्या रोज परकियांकडे जाणारा अब्जावधी रुपयांचा प्रवाहसुद्धा आटोक्यात येईल.

रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केल्याने मूत्रपिंडाच्या आजारापासून संरक्षण मिळू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

विशेष करून तरुण वयापासूनच मीठ कमी सेवन करण्याची सवय ठेवली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. देशात मूत्रपिंड निकामी होणे हे मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण आहे. स्वयंपाकघराची सूत्रे महिलांकडे असतात तेव्हा त्यांनीच मिठाचा वापर कमी करण्याची आवश्यकता आहे.

२५ ते ३० वयोगटातील मूत्रपिंड रुग्णांची संख्या वाढत असून ती पाच-सहा वर्षांपूर्वी एवढी जास्त नव्हती, असा दावा मुंबईच्या सैफी रुग्णालयाचे मूत्रविकारतज्ज्ञ अरुण दोशी यांनी केला आहे. अतिरक्तदाब हा विकार मूत्रपिंड निकामी होण्यामुळे होऊ शकतो.

किंबहुना ते त्यामागे एक प्रमुख कारण आहे. मीठ आणि रक्तदाब यांचा थेट संबंध आहे. जास्त मीठसेवनाने रक्तदाब वाढतो. रक्तदाब कमी झाला तर अतिरक्तदाब आटोक्यात येऊ शकतो.

आपण आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यात मीठ कमी असले पाहिजे, चीज बटर, साखर व मीठ हे प्रमुख घटक शरीरास घातक आहेत. त्यांचे सेवन कमी केले पाहिजे. उत्तर भारतातून तरुण मुले डायलिसिससाठी येतात, असे अपोलो रुग्णालयाचे डॉ. अमित लंगोटे यांनी सांगितले. लठ्ठपणा व मधुमेह यामुळे मूत्रपिंडाचे विकार होतात असे सांगून ते म्हणाले की, महिलांमध्ये मिठाचा कमी वापर करण्याबाबत जागृती केली पाहिजे. लोणची, पापड, चटणी व जादाचे नमकीन पदार्थ टाळले पाहिजेत.

सैफी रुग्णालयाचे हेमल शहा यांनी सांगितले की, कमी उष्मांक व कमी मीठ असलेला आहार आवश्यक आहे. फळे, भाज्या, कमी मेदाचे दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आवश्यक आहे. कधीच जेवणात जास्तीचे मीठ वाढून घेऊ नका. सॅलडवर मीठ टाकून घेऊ नका.

आदिती शेलार यांनी सांगितले की, वेदनाशामक औषधे व इतर औषधे शक्यतो टाळली पाहिजेत त्यामुळे मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो.

धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात सध्या सर्वात आवश्यक असूनही मागे राहणारी कोणती असेल तर ती म्हणजे व्यायाम.

उठल्यावर आवरुन ऑफीसला पोहचतानाच अनेकांच्या नाकात दम येत असेल तर ही जिम करणार कधी. रात्री ऑफीसमधून सुटण्याच्या वेळाही उशीराच्या असल्याने व्यायामाला वेळ नाही ही सर्रास केली जाणारी तक्रार. यावर मार्ग काढण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या ऑफीसमध्येच कर्मचाऱ्यांसाठी जिम उपलब्ध करुन दिली.

त्यामुळे वेळेची तक्रार करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय तयार झाला हे नक्की. आता दिवसभरात आपल्याला जमेल त्या वेळात २० मिनिटे जरी व्यायाम केला तरी चालतो असे सांगणाऱ्यांची संख्या वाढू लागली.

पण अशाप्रकारे जिममध्ये केलेला व्यायाम आरोग्यासाठी खरंच फायदेशीर असतो का हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

ऑफिसमधल्या जिममुळे आरोग्य चांगले होण्यास मदत होत नाहीच पण पैसेही विनाकारण वाया जातात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली असून पाहूयात ऑफिसमधल्या जिमबाबतची तथ्ये…

– या सर्वेक्षणासाठी एकूण ३३०० कर्मचाऱ्यांचा अभ्यास कऱण्यात आला. या कर्मचाऱ्यांची त्यांच्या तब्येतीनुसार तसेच त्यांना हव्या असलेल्या व्यायामप्रकारा ६ गटामध्ये विभागणी करण्यात आली होती.

Dr. Surekha Borade
Dr. Surekha Borade
MS/MD - Ayurveda, Yoga and Ayurveda General Physician, 16 yrs, Raigad
Dr. Sanjay  Salve
Dr. Sanjay Salve
MBBS, Orthopaedics, 16 yrs, Pune
Dr. Sayali Khare - Pendse
Dr. Sayali Khare - Pendse
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 3 yrs, Pune
Dr. Rajendra V. Yelwande
Dr. Rajendra V. Yelwande
BAMS, Ayurveda, 38 yrs, Pune
Dr. Chandrashekhar Jadhav
Dr. Chandrashekhar Jadhav
BAMS, Ayurveda Child Abuse Pediatrician, 15 yrs, Pune
Hellodox
x