Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्‍तस्राव होत

असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.



दाढी करताना प्रथम हा गर गालांना व गळ्याला एक इंचाचा कोरफडीचा तुकडा घेऊन तो चोपडावा. कोरफडीचा उरलेला तुकडा घेऊन

फ्रीजमध्ये ठेवावा व नियमितपणे वापरावा. दाढीपूर्वीचे लोशन दाढीनंतरचे लोशन असे काहीच या प्रकाराने दाढी केल्यास लावावे लागतनाही. दाढी केल्यानंतर चेहरा अगदी उजळ होऊन स्वच्छ होतो.

पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर, हिमदाहावर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे,

चेहर्‍याच्या सौदर्यप्रसाधनांत, तसेच केस धुण्याच्या शँपूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात.



कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत.

यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत
मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यासभूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही

कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे
वाटते.

बहुगुणी हळदीला प्राचीन काळापासून आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. अनेक रोगांवर उपाय म्हणून हळदीचा सर्रास वापर केला जातो. आता हळदीमुळे गर्भाशाच्या मुखाच्या कर्करोगाला प्रतिबंध घालता येतो हे संशोधनाअंती सिध्द झाले आहे.

कोलकात्याच्या चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिटय़ूट (सीएनसीआय) या सरकारी संस्थेत याविषीचे संशोधन करण्यात आले. ह्युमन पॅपिलोमा नावाच्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग होतो. हळदीत सर्क्युमिन नावाचा घटक असून तो या विषाणूंवर प्रभावी उपाय असल्याचा दावा सीएनसीआयने केला आहे. सीएनसीआयने आपल्या पाच वर्षाच्या संशोधनानंतर हा दावा केला असून या संशोधनात 400 महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. यातील काही महिलांना गर्भाशाच्या मुखाचा कर्करोग झाला होता तर काही महिलांना एचपीएव्हीचा संसर्ग झाला होता.

हळदीतून मिळवलेल्या सर्क्युमिनचा वापर करून तयार केलेला मलम आणि कॅप्सुल यातील 280 महिलांना देण्यात आली. त्या महिलांची नियमित तपासणी करून त्यांचा अभ्यास करण्यात आला. ज्या महिलांना एचपीव्हीची लागण झाली होती त्यातून त्या पूर्णपणे बर्‍या झाल्या आणि संसर्गही पूर्णत: थांबल्याचे आढळून आले, अशी माहिती सीएनसीआयचे संचालक जयदीप बिश्वास यांनी दिली.

ज्या महिलांना सर्क्युमिन देण्यात आले नव्हते, त्यांचा संसर्ग वाढल्याचे दिसून आले. आपण दररोज जेवणाद्वारे हळदीचे सेवन करत असतो. मात्र त्या सेवनातून सर्क्युमिन यकृत किंवा रक्त प्रवाहात मिसळत नाही, त्यामुळे त्याने एचपीव्हीचा संसर्ग बरा होत नाही. त्यासाठी सर्क्युमिन हे मलम आणि कॅप्सुलद्वारे घेणे गरजेचे आहे, असे इन्स्टिटय़ूटमधील संशोधक पार्था बसू यांनी सांगितले.

* शरीराच्या जळलेल्या भागावर ताबडतोब कच्चा बटाटा किसून लावल्याने फायदा होतो.

*भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.

*रोज चार शेकलेले बटाटे मीठ आणि काळे मीरे पूड भुरभुरून खाल्ल्याने संधिवात बरा होतो.

* दुखापतीमुळे कुठली त्वचा निळी पडली असेल तर त्यावर कच्चा बटाटा लावावा.

*पित्ताच्या आजारात कच्चा बटाटा फायदेशीर असतो.

*उच्च रक्तदाब असलेल्या रूग्णाने नियमित बटाटे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य राहतं.

*मूत्रखडा विकार असलेल्या रूग्णाला केवळ बटाटे खाऊ घाळून भरपूर मात्रेत पाणी पाजल्यास आराम मिळतो.

केस गळत असेल तर :

त्रिफळा चूर्ण (दर महिन्यात २ चमचे वाढवत जाणे) रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावे. जंत कृमी असेल तर ३ चमचे त्रिफळा चूर्ण, एक चमचा वावडींग पावडर मिक्स करुन ३ दिवस रात्री झोपतांना कोमट पाण्याबरोबर घेणे.

रोज मुठ मुठ फुटाणे खाण्याने हार्ट ऍटकचा त्रास होत नाही.

रोजच्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर करावा म्हणजे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. सीतोपलादी चूर्ण व मध याची पेस्ट करुन चाटण घ्यावे व कोबींच्या पाण्याची वाफ घ्यावी.

चेहऱ्यावर पिंपल्स असेल तर चेहऱ्यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.

या जगामध्ये पूर्णपणे सुखी असा मनुष्य मिळणे कठीणच आहे. काही लोकांजवळ भरपूर धन असते, परंतु शरीर रोगांचे आगार असते. आरोग्य चांगले आहे, शरीर धडधाकट आहे पण घरी आठराविश्व दारिद्य्र आहे, असेही अनेकजण आहेत.


काहीही असले तरी प्रतिकूल परिस्थितीपुढे हतबल न होणे, हेही माणसाचेच वैशिष्ट्य होय. शारीरिक दुर्बलता ही अनुवांशिक किंवा खानदानी असल्याचा अनेकांचा समज असतो. परंतु आशावादी आणि साहसी लोक असे मानत नाहीत. आयुर्वेद, निसर्गोपचार आणि योग यांच्या एकत्रित प्रयत्नातून दुबळ्या शरीराला शक्तीशाली, धडधाकट बनविण्याचे उपाय शोधले गेले आहेत. करून पाहा हे साधे सोपे उपाय...

- अश्वगंधा आणि शतावरी चूर्ण यांचे मिश्रण दरोरोज एक चमचा दुधासोबत झोपण्यापूर्वी घ्या.
- दुधात उकळून रोज 5 खारीक खा.

- एका पेल्यात दोन चमचा मध मिसळून दररोज सेवन करा.

- भोजनात सॅलड, मोड आलेले कडधान्य, फळे आदींचा समावेश करा.

- शक्य झाल्यास चहा, कॉफी, तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि दारू यापासून दूर राहा.

दृढ संकल्प करून वरील नियम पाळत थंडीच्या दिवसात फक्त 90 दिवस व्यायाम करा आणि पाहा तुमच्या शरीरातील दुर्बलता जाऊन तुम्ही धट्टेकट्टे होता की नाही ते.

Dr. Amruta Gite
Dr. Amruta Gite
BDS, Dental Surgeon Dentist, Pune
Dr. Kalpana Dongre Ladde
Dr. Kalpana Dongre Ladde
BAMS, Ayurveda Family Physician, 11 yrs, Pune
Dr. Manish Rawool
Dr. Manish Rawool
MS/MD - Ayurveda, Ayurveda Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Jyoti Kumari
Dr. Jyoti Kumari
BDS, Chest Physician Child Abuse Pediatrician, Ranchi
Hellodox
x