Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

टूथपेस्ट आणि हात धुण्याच्या साबणांमध्ये आढळणारा एक सामान्य घटक प्रतिजैविक प्रतिरोधक जिवाणूंच्या वाढीस हातभार लावू शकतो, असे एका अभ्यासात आढळले आहे. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातील जिआनहुआ गुओ हे या अभ्यासाचे प्रमुख असून दोन हजारांहून अधिक वैयक्तिक वापराच्या प्रसाधन उत्पनांमध्ये आढळणाऱ्या ट्रायक्लोसॅन या घटकावर हा अभ्यास केंद्रित करण्यात आला होता.

प्रतिजैविकांचा अतिवापर किंवा गैरवापर केल्याने जिवाणूंमधील प्रतिरोधक क्षमता वाढत असल्याचे सर्वज्ञात आहे. परंतु रसायनांच्या वापरानेदेखील जिवाणूंमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमता वाढीस लागत असल्याचे संशोधकांना समजले.

रुग्णालयासमान किंवा अधिक प्रतिजैविक प्रतिरोधक जिवाणूंची संख्या रहिवासी क्षेत्रातील सांडपाण्यामध्ये असते, असे गुओ यांनी सांगितले. त्यानंतर ट्रायक्लोसॅन यासारखी बिगर प्रतिजैविक, रसायनांमुळे प्रतिजैविक थेट प्रतिकार करू शकतात का, याबाबत आम्ही विचार करण्यास सुरुवात केली. ही रसायने दररोज मोठय़ा प्रमाणात वापरली जातात, त्यामुळे यांचे अवशेष वातावरणात पसरले जातात. ज्यामुळे विविध औषधांचा प्रतिकार केला जाऊ शकतो.

या संशोधनामुळे वैयक्तिक वापराच्या प्रसाधन उत्पादनांमध्ये आढळून येणारा ट्रायक्लोसॅन या घटकामुळे प्रतिजैविक प्रतिरोधक क्षमतेत वाढ होत असल्याचे पुरावे समोर आले आहेत, असे त्यांनी म्हटले.

हे संशोधक म्हणजे अशा प्रकारच्या रसायनांच्या संभाव्य प्रभावाचे पूनर्मूल्यांकन करण्याबाबतचा इशारा असल्याचे क्वीन्सलँड विद्यापीठाचे झिगुओ युआन यांनी म्हटले. एफडीआयकडून जिवाणूविरोधी सांबणांमध्ये ट्रायक्लोसॅन घटक वापरण्यास बंदी घातली आहे. इतर देशांमध्ये अशाच प्रकारच्या धोरणाचा अवलंब करण्यात आला आहे का, याबाबत स्पष्ट पुरावे समोर येऊ शकले नसल्याचे युआन यांनी सांगितले.

अक्कल दाढ म्हणजे दातांच्या शेवटी येणारा दात. याला लोक अक्कल दाढही म्हणतात. जेव्हा जवळपास सगळे दात आलेले असतात तेव्हा अक्कल दाढ येते. अनेक लोकांना अक्कल दाढ ही 17 ते 25 वयादरम्यान येते. तर काही लोकांना ही 25 वयानंतरही येते. अक्कल दाढ येतांना फार वेदना होतात. इतक्या की खाणं-पिणंही बंद होतं. या वेदना थांबवण्यासाठी काही खास घरगुती उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

का होतात अक्कल दाढेत वेदना?

अक्कल दाढेच्या वेदनेवर उपचार करण्याआधी या वेदना का होतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. अक्कल दाढ सर्वात शेवटी येते. ही दाढ बाहेर येत असताना असह्य वेदना होतात. ही दाढ वर येताना इतर दातांना पुश करत वर येते. त्यामुळे हिरड्यांमध्ये वेदना, सूज अशा समस्या होतात.

1) कोमट पाण्याने गुरळा करा

अक्कल दाढ आल्याने हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर कोमट पाण्यात मिठ टाकून गुरळा करा. मिठ घातलेल्या या पाणाने केवळ 2 ते 3 मिनिटेच गुरळा करा. याने वेदना कमी होतील.

2) बर्फाचे तुकडे

जर दातांमध्ये वेदना होत असतील तर बर्फाचे छोटे छोटे तुकडे करुन दातांजवळ ठेवा. याने वेदना आणि हिरड्यांची सूज कमी होईल. सूज आणि वेदना पूर्णपणे बंद होईपर्यंत हा उपाय करा.

3) हिंगाचा वापर

चिमुटभर हिंग मोसंबीच्या रसात मिश्रित करुन कापसाच्या मदतीने अक्कल दाढेजवळ ठेवा. याने वेदना कमी होतील आणि अक्कल दाढेचा इतर दातांवर प्रभावही होणार नाही.

4) लवंगही फायद्याची

लवंगमध्ये दातामधील बॅक्टेरिया आणि किटाणू नष्ट करण्याची क्षमता आहे. अशात अक्कल दाढेमुळे वेदना होत असतील तर त्या दाढेजवळ लवंग ठेवल्यास वेदना कमी होतील.

5) कांद्याने वेदना करा कमी

असे म्हटले जाते की, जे लोक रोज कच्चा कांदा खातात त्यांना दातांच्या समस्या कमी होतात. कांद्यामध्ये दातांमधील किटाणू नष्ट करण्याचे गुण आहेत. जर तुम्हाला अक्कल दाढेचा त्रास होत असेल तर कांद्याचा तुकडा दाताजवळ ठेवून चावा. याने तुम्हाला आराम मिळेल.

अनेकांना दातदुखीचा त्रास होतो. कॅव्हिटीमुळे दातदुखीची समस्या निर्माण होते हे खरे असले तरी यामागे इतर काही कारणेही असू शकतात.

* दातांमध्ये टोचल्यासारखे दुखत असेल आणि काही खाल्ल्यावर किंवा चावल्यावर वेदनांमध्ये वाढ होत असेल तर हे जंतूसंसर्गाचे किंवा दात तुटल्याचे लक्षण असू शकते. अशावेळी तातडीने दंततज्ज्ञांना भेटायला हवे. दातांच्या वेदनेचे कारण शोधून काढण्यासाठी क्ष-किरण चाचणी केली जाते.

* दातांच्या आरोग्याशी संबंधित नसणार्‍या काही कारणांमुळेही दातदुखी निर्माण होऊ शकते. सायनससारख्या त्रासामुळे दात दुखू शकतात.

* संवेदनशीलता हे दातांच्या वेदनेचे एक कारण असू शकते. गोड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर दातांमध्ये झिणझिण्या आल्यासारखे वाटत असेल तर तुमचे दात संवेदनशील झाले आहेत, असे समजावे. दातांवरचे आवरण निघून गेल्यास, विरळ झाल्यास किंवा हिरड्यांच्या समस्येमुळे दात संवेदनशील बनू शकतात. या समस्येवरचा उपाय शोधणे गरजेचे आहे.

* दातदुखी असताना तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. खूप अस्वस्थ वाटत राहते. म्हणूनच कॅव्हिटी किंवा जंतूसंसर्गअसेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे.

Dr. Sujeet Ranjane
Dr. Sujeet Ranjane
BAMS, Ayurveda Panchakarma, 9 yrs, Pune
Dr. Mayur Ingale
Dr. Mayur Ingale
MBBS, ENT Specialist, 4 yrs, Pune
Dr. Bhushan Khedkar
Dr. Bhushan Khedkar
Specialist, Dietitian dietetics, 8 yrs, Pune
Dr. Pratibha Labade
Dr. Pratibha Labade
BAMS, Ayurveda Immuno Dermatologist, 19 yrs, Pune
Dr. Hitesh Karnavat
Dr. Hitesh Karnavat
BAMS, Ayurveda Infertility Specialist, 12 yrs, Pune
Hellodox
x