मूळव्याध (piles)
मूळव्याध हा मानवी शरीराच्या मूळाशी जी व्याधी होते तो आजार आहे. या रोगास संस्कृतमध्ये अर्श असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत –
1. विनारक्तस्त्राव (मोडाची मूळव्याध)
2. रक्तास्त्रावसहित (रक्तमूळव्याध)
या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्त्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्त्राव झाल्यास व्यक्तीमध्ये रक्ताची कमतरता (अनिमिया) निर्माण होते. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यावर मग संग्रहणी हा रोग पण होउ शकतो. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे.
भारतात आजघडीस (सन २०१७) साधारणतः ४ कोटी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळपूर्वी मूळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागला आहे. मूळव्याधीच्या एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मूळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो.
हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणुन व्यायाम करा त्यामुळे पचन सुधारते व व्यायाम करा.
लक्षण :
- सूज येणे
- अग्निमांद्य
- अन्न न पचणे
- बलहानी
- पोटात गुडगुड आवाज येणे
- पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे
- गुडघेदुखी इत्यादी.
कारणे
संडासला कायम जोर करण्यामुळे आणि कुंथण्यामुळे मूळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतूमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अति तिखट सेवन, सतत बैठे काम, व्यायाम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्या वेळ शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश गुदद्वारावर जोर देणे अशा अनेक बाबी इत्यादी.
उपचार
हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपुर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्या वेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविल्या जातो त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात. ऍलोपॅथी मध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे .या रोगात पथ्य फारच जरुरी आहे :
1. सुरणाचा कंद आणुन त्याची वरची साल काढून टाकावी. आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचर्या करून त्या गाईच्या तुपात परताव्या व खाव्यात. यात मीठ टाकु नये. नंतर अधुन मधुन ही भाजी खात जावी.
2. मीठ खाउ नये. सैंधव मीठ थोडे खावे.
3. रात्री एका वाटीत १ चमचा तुप गरम करुन, पातळ करून त्यात साखर घालावी.त्यात अर्धा वाटी पाणी घालुन ते प्यावे.सकाळी त्रास कमी होतो.
4. ताजे लोणी खावे. ताजे ताक प्यावे(आंबट नव्हे.)
5. रक्त मूळव्याधीवर निरंजनचे फळ आणुन ते पाउण पेला पाण्यात रात्री भिजू घालावे. सकाळी ते फळ त्याच पाण्यात कुस्करुन ते पाणी प्यावे. असे दोन्ही वेळेस करावे.(सकाळी व रात्री)
6. इसबगोल चा भूसा आणुन त्यात पाणी घालुन रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळुन प्यावे.
7. उपचार पद्धतीत शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय असतो.
मूळव्याधीचा त्रास दूर करणारे घरगुती मलम :
मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत भयंकर आहे. हा त्रास वेदनादायी असला तरीही या आजाराबद्दल फारसे खुलेपणाने बोलले जात नाही. परिणामी अनेकांमध्ये या त्रासाची तीव्रता वाढल्यानंतर वैद्यकीय मदत घेतली जाते. फास्टफूट, अरबट चरबट पदार्थ, मसालेदार पदार्थांवर ताव मारण्याची सवय यामुळे केवळ जीभेचे चोचले पुरवले जातात. मात्र खाण्याच्या अशा सवयींमुळे पचनाचे आजर बळावतात. मूळव्याध जडण्यामागेदेखील अशीच कारणं असतात.
मूळव्याधीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी घरगुती उपाय -
सुरूवातीच्या टप्प्यामध्ये मूळव्याधीच्या समस्येकडे लक्ष दिल्यास त्याचे स्वरूप गंभीर होण्याचा धोका कमी असतो. याकरिता काही घरगुती उपायांनी त्यावर मात करता येऊ शकते.
- कडुलिंब -
कडुलिंबाच्या लिंबोळ्या आणा. त्यावरील साल काढून आतील बीज काढा. हे बीज कुटून चिचुक्याऐवढ्या 21 गोळ्या करा. या गोळ्या नियामित दूधासोबत घ्याव्यात.
या उपायादरम्यान आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मांसाहार, पचायला जड असणारे पदार्थ आहारात टाळा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.
- घरगुती मलम -
रूईच्या पानांमधील चीक काढा. यामध्ये हळद मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टचा केवळ एक ठिपका त्रास होत असलेल्या जागी लावा. नियमित सात दिवस हा उपाय करावा. यामुळे मूळव्याधीचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होईल.
महत्त्वाची टीप - हे केवळ घरगुती उपाय आहेत. त्याचा वापर करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. व्यक्तीपरत्वे उपायांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात.