छातीत दुखणे
एखाद्या माणसाला जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा त्याच्या छातीमध्ये असह्य वेदना होतात. काही चित्रपटांमध्ये हे दृश्य वारंवार दाखवले जाते. चित्रपटाच्या त्या कथेमध्ये एखाद्या पात्राच्या आयुष्यात धक्कादायक प्रसंग गुदरलेला दाखवला जातो. तेव्हा त्या पात्राला तो धक्का सहन होत नाही आणि ते पात्र छातीत वेदना होऊन हृदयविकाराचा झटका येऊन मृत्युमुखी पडते. अशी दृश्ये वारंवार पाहिल्याने सर्वांच्याच मनामध्ये छातीत दुखणे आणि हृदयविकार यांचा काही दाट संबंध आहे अशी भावना निर्माण होते. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्यामुळे काहीही कारणामुळे छातीमध्ये वेदना व्हायला लागल्या की आता हृदयविकाराचा झटका येतो की काय म्हणून घबराट निर्माण होते. पण डॉक्टरांचे वारंवार असे सांगणे आहे की छाती दुखणे म्हणजे हृदयविकारच होणे असे समजण्याचे काही कारण नाही.
इतरही कारणाने छाती दुखू शकते. पित्त वाढल्याने सुध्दा छाती दुखते. ही छाती दुखणे म्हणजे वेदना नसतात. तर छातीत जळजळ करायला लागते. पोटातील आम्ल उलट्या दिशेने वर सरकायला लागते आणि ते छातीपर्यंत येऊन छातीत जळजळ व्हायला लागते. अशा वेळी छातीत होणार्या वेदना म्हणजे हृदयविकार नव्हे. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणणे आपल्या क्षमतेपेक्षा अधिक वजन उचलण्याचा प्रयत्न केला तरीही छातीत वेदना होतात. या वेदना स्नायूला होत असतात. कारण वजन उचलण्याचा ताण स्नायूवर आलेला असतो. हृदयाचेही दुसरे काही विकार असतात. हृदयाचा प्रत्येक विकार म्हणजे हृदयविकार नव्हे. तेव्हा हृदयविकाराला सोडून हृदयाची इतर दुखणी होतात तेव्हाही छाती दुखू शकते.
न्युमोनिया हा सर्दीमुळे वाढणारा विकार आहे. न्युमोनिया झाल्यानंतरसुध्दा छातीत वेदना होऊ शकतात. हा विकार सर्दीबरोबरच यकृतात जंतू संसर्ग झाल्यामुळे होतो आणि त्यामुळे छातीत वेदना होऊ शकतात. न्युमोनियामध्ये कफ, ताप आणि खोकला एकदम होतो आणि छाती दुखते. जास्त दगदग झाल्यानेसुध्दा छातीत दुखू शकते. त्यामुळे वरील कारणाने होणार्या छातीतल्या वेदना आणि हृदयविकाराच्या झटक्याच्या वेळी होणार्या वेदना यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा होणार्या छातीतल्या वेदना वेगळ्या असतात. अशावेळी छाती वरवर दुखत नाही. तर आतून प्रचंड वेदना होतात. त्या वेदनांचा त्रास घसा, हाताचे दंड आणि एवढेचे नव्हे तर जबड्यांनाही होतो.
छातीच्या दुखण्यावर ‘हे’ घरगुती उपाय एकदा कराच !
बदलत्या जीवनशैलीचे आणि वाढत्या प्रदूषणाचे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. त्यातच सतत उघड्यावरील अन्नपदार्थ, थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे छातीत कफ जमा होण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. छातीत कफ जमा झाल्यास छातीत दुखणे, खोकला येणे, चक्कर येणे यासारख्या आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. यावर वेळीच उपाय न केल्यास काही वेळा कठीण परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे दरवेळी कफावर उपाय म्हणून गोळ्या किंवा सिरप घेण्यापेक्षा कधीतरी आजीबाईच्या बटव्यातील या पदार्थांचा वापर करुन बघायला हवा.
१. गरम पाण्याची वाफ – काही वेळा छातीत कफ जमा झाल्यास छातीत दुखू लागते. यावेळी कोणत्याही औषधांचा वापर करण्यापेक्षा सरळ गरम पाण्याची वाफ घ्यावी. त्यामुळे कफ मोकळा होऊन श्वसनाचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होऊ लागतो. वाफ घेण्यापूर्वी गरम पाण्यात पेपरमेटं अॅसेशिंयल तेलाचे एक-दोन थेंब टाकावेत. या पाण्याची वाफ दिवसातून दोन-तीन वेळा घेतल्यास नक्कीच आराम पडू शकतो.
२ अॅप्पल सायडर व्हिनेगर – अॅप्पल सायडर व्हिनेगरच्या मदतीने कफ कमी होण्यास मदत होते. या व्हिनेगरमध्ये अँटी-बॅक्टेरिअलचे प्रमाण अधिक असल्यामुळे छातीतील संसर्ग कमी होतो. त्यासाठी २ चमचे अॅप्पल सायडर व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळून हे पाणी आठवड्यातून २-३ वेळा घ्यावे या उपायामुळे नक्कीच फरक जाणवून येतो.
३. हळद- हळद ही केवळ स्वयंपाकासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठीच नाही तर आरोग्यविषयक समस्यांवरही उपयुक्त ठरते. हळदीच्या सेवनामुळे घसा साफ होण्यास मदत मिळते. घसा दुखत असल्यास एका गरम पाण्यात एक चमचा हळद मिसळून या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. तसेच हळद घालून गरम दुधात प्यायल्यासही छातीतील कफ कमी होतो.
४. आलं- आजीच्या बटव्यातील महत्वाचा पदार्थ म्हणजे आलं. तिखटं चवीच्या आल्यामध्ये पॉलिफिनोसचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. पॉलिफिनोसमुळे छातीत जमा झालेला कफ मोकळा होतो. तसेच कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास तोदेखील दूर करण्यास मदत होते.
५.कांदा – सतत डोळ्यात पाणी आणणारा कांदा आरोग्यासाठी फार उपयोगी आहे. कांद्यामध्ये असलेला अॅटी-मायक्रोबिअल हा घटक छातीमध्ये झालेला संसर्ग दूर करतो. छातीत दूखत असल्यास कांद्याचे आवर्जुन सेवन करावे. यासाठी एका लिंबूचा आणि एका कांद्याचा रस समप्रमाणात घ्यावा. त्यानंतर गरम पाणी आणि मध यांच्याबरोबर हा रस दिवसातून ३-४ वेळा घ्यावा. यामुळे कफ मोकळा होण्यास मदत होऊन अन्नप्रक्रियाही सुरळीत होते.