Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Lose Weight :
Are you serious about losing weight? Losing weight improves different aspect of life, helps to get back your self-confidence and get rid of weight related health problems. Well! Now help your body to burn up its fat in healthy ways through Hellodox Health App.

कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन वेगाने घटत असेल तर ते सामान्य किंवा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कोणत्याही प्रयत्नांशिवाय आहे, त्या दिनचर्येत तर वेगाने वजन घटू लागले तर ते आरोग्याच्या असमतोलाविषयी संकेत देत असते. त्याकडे दुर्लक्ष अजिबातच नको. आरोग्याच्या समस्यांमुळे जर व्यायाम, जिम न करता, आहारात कोणतेही बदल न करता दोन-तीन महिन्यांत व्यक्तीचे वजन 5-6 किलोने कमी होऊ शकते. वजनात वेगाने घट होत असेल तर साध्याशा आजारापासून ते गंभीर आजारापर्यंत कोणत्याही आजाराचे संकेत यातून मिळत असतात.


मधुमेह : मधुमेहाची समस्या असेल तर सुरुवातीला वजन अचानक घटू लागते. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा वजन घटते. वजन घटते शिवाय थकवा, लघवी करताना घाम येणे, रात्री झोपताना घाम येणे यासारखी लक्षणे मधुमेहाच्या सुरुवातीला दिसू शकतात.

थायरॉईड : थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकते. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपर थायरॉईडिझममुळे होते. त्याशिवाय मनोवस्थेत बदल, गिळण्याची समस्या, थकवा, श्वास घेण्यात समस्या आणिघाम येणे हीदेखील लक्षणे दिसतात.

कर्करोग : कर्करोग हा घातक आजार जर वेळेवर याचे निदान झाले नाहीत तर हा आजार घातक आणि जीवघेणा ठरु शकतो. कर्करोगाने पीडितांचे वजन वेगाने कमी होते. वजन कमी होत असताना दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर ही कर्करोगाची लक्षणे आहेत.



क्षयरोग : टीबी किंवा क्षयरोग झाल्यासही वजन झपाट्याने कमी होते. क्षय रोगाचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे सतत दोन आठवडे खोकला येतो. क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोलिस जीवाणूंमुळे होतो. वजन कमी होण्याबरोबरच छातीत वेदना, रात्री झोपताना घाम येणे, थकवा इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात.

तणाव : तणाव हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक आजारांचे ते एक कारण आहे. तणावामुळे रात्री झोप लागत नाही, तसेच वेगाने वजन घटते. त्यासाठी मेडिटेशन आणि योग करण्याची गरज आहे.

एचआयव्ही - एड्‌सः एचआयव्ही ही लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग आहे. त्याची शेवटची पायरी म्हणजे एड्‌स. वेगाने वज कमी होणे हे देखील या आजाराशी निगडित आहेत. त्यामुळे वजन कमी होणे दुर्लक्षित करु नका.

इतर काही आजार : इतरही काही आजारांमध्ये वजन वेगाने घटते. पोटाची समस्या, हार्मोन्समधील बदल, सीओपीडी आणि पार्किन्सन्स या आजारांमध्येही वजन कमी होते.

बटाट्यानंतर भेंडी हीच एक अशी भाजी आहे जी अनेक जणांना मनापासून आवडते. वजन कमी करू इच्छित असलेल्यांना भेंडी फायदेशीर ठरेल. पाहू किती गुणकारी आहे भेंडी:

* वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.

*मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

*भेंडीमुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.

*भेंड्यांचे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहर्‍यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.

स्वस्थ आणि निरोगी शरीरासाठी आपल्या जीवनशैलीत महत्वपूर्ण बदल करून, योग्य आहार घेणे गरजेचं आहे. आपल्या शरीराला स्थिर ठेवण्यासाठी ते खूप महत्वाचे आहे. अतिरिक्त वजन आणि चरबीवाढीने बेजार झालेल्या व्यक्तींना देखील स्थिर आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. बैरीयाट्रिक सर्जरीने ते शक्य होत आहे. शरीराची बनावट सजवण्यासाठी लिपोसक्शन किवा टमी टक्ससारखी प्रक्रिया केली जाते. मुळात सर्जरीला पर्याय म्हणून केल्या जाणाऱ्या या प्रकीया घातक असून, बैरियाट्रिक सर्जरीमध्ये याचा समावेश नसतो. त्यामुळे, सर्वप्रथम मी स्पष्ट करू इच्छिते की, शरीराची बनावट पूर्ववत करण्यासाठी केली जाणारीशस्त्रक्रिया आणि अन्य दोन प्रकार एकसारख्या नसून, विज्ञानाचा हा एक निव्वळ भ्रम आहे.
जी लोकं असामान्य रुपात स्थूल आहेत, त्यांना वजन कमी करण्यासाठी बैरियाट्रिक सर्जरी एक वरदान ठरत आहे. ह्या सर्जरीद्वारे गेस्ट्रो-इंटेसटीनस एनाटोमी बदलून वजन कमी करता येते, या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांमध्ये अनेक चांगले परिणाम घडून आले आहेत.

लिपोसक्शन आणि टमी टक्सची प्रक्रिया वजन कमी करण्याची प्रमुख प्रक्रिया नाही. शरीराचा आकार आकर्षक करण्यासाठी या प्रक्रियांचा वापर केला जात असला तरी, लिपोसक्शनमुळे केवळ ६ ते ८ किलोपर्यंत वजन कमी करता येते. मात्र, बैरियाट्रिक सर्जरीनंतर २० ते १०० किलोपर्यत (रुग्णांच्या सुरुवातीच्या वजनावर आधारित) वजन कमी करू शकतात. या व्यतिरिक्त स्थूलपणाशी जोडल्या गेलेल्या, मधुमेह, उच्च रक्तदाब, डाईलीपिडेमिया, पीसीओडी, हृदयविकार, एसिड रिफ्लेक्स, वांझोटेपणा ई.उपचारांमध्येही त्याचा सहयोग होतो.
स्वास्थासाठी वेळापत्रक

 वजन वाढते म्हणून जेवणाला घाबरण्याची काहीच चिंता नाही, केवळ अतिरिक्त खाणे टाळा. घरचे पारंपारिक जेवण दररोज घेत असाल, तर आठवड्यातून एकवेळ बाहेर खालले तरी चालेल.
 दररोज ३० मिनिटे व्यायाम करावा. दररोज शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा किवा दोनदा ४५ मिनिटे व त्याहून अधिक वेळ हा व्यायामासाठी द्यायलाच हवा.
 आपले वजन नियमित तपासा, शरीरात होणाऱ्या बदलांचे परीक्षण करणे महत्वाचे असून, त्यासाठी नियमित डॉक्टरांचे सल्ले घेणे अत्यावश्यक आहे.
 दिवसाअखेर केवळ स्वतःसाठी वेळ द्या, काही मिनिटे स्वतःला इतर सगळ्या गोष्टींपासून स्वीच ऑफ करा. तणावमुक्त होणे खूप महत्वाचे आहे.
 पुरेसं पाणी प्या, फेस असणारे शीतपेय पाण्याला पर्याय असूच शकत नाही.
 वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रियेमुळे दीर्घकाळ फायदा होतो. कारण त्यामुळे रुग्णाची खाण्या-पिण्याची सवय बदलते.

जीवनशैलीत परिवर्तन आल्यामुळे रुग्णाचे आयुष्य कमालीचे बदलून जाते. डायजेस्टीव हेल्थ इंस्टीट्यूटमध्ये आम्ही आमच्या रुग्णांना शस्त्रक्रियेच्याआधी आणि नंतर दीर्घकाळस्वरूपी पथ्य अवलंबणाऱ्या ई-जर्नीवर भर देतो. जेणेकरून रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल दीर्घकाळ घडून येतात, बैरीयाट्रिक सर्जरीविषयी अनेक साधे प्रश्न लोकांना पडतात, त्याचे उत्तर मी खाली दिले आहेत.

बैरीयाट्रिक सर्जरी कोणत्या बीएमआई चाचणीनंतर केली जावी ?
बैरीयाट्रिक सर्जरीचा सल्ला २७:५ – ३२:५ किंवा ३२:५ – ३७:५ ची बीएमआईच्या बरोबर स्थूल असणाऱ्या रुग्णांना दिला जातो.

या शस्त्रक्रियेवेळी किती जखम आणि दुखापत होते?
डायजेस्टीव हेल्थ इंस्टीट्यूटमध्ये आपण सिंगल इंसाईशन लेप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये कुशल आहोत. याचा अर्थ असा की, वजन कमी करण्याची संपूर्ण शस्त्रक्रिया एका कटवर केली जाते. त्यामुळे दुखापत कमी होते, आणि जखमदेखील कोणत्याहीप्रकारचा डाग किवा निशाण मागे न राहता तात्काळ भरून निघते.

बैरीयाट्रिक सर्जरीसाठी वयाची मर्यादा काय असायला हवी?
बैरीयाट्रिक सर्जरीला वयोमर्यादा नाही. १५ वयोगटातील किशोर मुलांवरदेखील शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. परंतु कोणतीही शस्त्रक्रिया ही हाडांचा संपूर्ण विकास झालेल्या रुग्णांचीच करणे अधिक योग्य ठरेल.

अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णाला देखील याचा लाभ घेता येऊ शकेल का?
मधुमेहच्या दुस-या स्तरावर असणारे आणि ५० टक्केच्यावर स्थूल असणारे रुग्ण बैरीयाट्रिक सर्जरी करतात. शस्त्रक्रियेच्या ७ दिवस आधी रुग्णांना कमीत कमी केलेरीयुक्त भोजन करणे अनिवार्य आहे, जेणेकरून रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी डायबेटोलॉजीस्ट / इडोक्रिनोलॉजीस्टला भेटायला हवे. बैरीयाट्रिक सर्जरीनंतर औषधे आणि इन्सुलिनची आवश्यकता कमी होते. आमच्या अभ्यासात असे आढळले आहे की, बऱ्याच रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर ३ ते ६ महिन्यांनी मधुमेह निरोधक उपचाराची आवश्यकताच राहिली नाही.

बैरीयाट्रिक सर्जरीनंतर गर्भधारणा करता येते का?
सर्जरीमुळे स्थूल रुग्णांचे वजन कमालीचे घटते, त्यामुळे लगेच गर्भधारणाची शक्यता वाढते. परंतु त्यासाठी एक वर्ष वाट पाहण्याचा मी सल्ला देईल.

कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन वेगाने घटत असेल तर ते सामान्य किंवा गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये. कोणत्याही प्रयत्नांशिवाय आहे, त्या दिनचर्येत तर वेगाने वजन घटू लागले तर ते आरोग्याच्या असमतोलाविषयी संकेत देत असते. त्याकडे दुर्लक्ष अजिबातच नको. आरोग्याच्या समस्यांमुळे जर व्यायाम, जिम न करता, आहारात कोणतेही बदल न करता दोन-तीन महिन्यांत व्यक्तीचे वजन 5-6 किलोने कमी होऊ शकते. वजनात वेगाने घट होत असेल तर साध्याशा आजारापासून ते गंभीर आजारापर्यंत कोणत्याही आजाराचे संकेत यातून मिळत असतात.

मधुमेह : मधुमेहाची समस्या असेल तर सुरुवातीला वजन अचानक घटू लागते. रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा वजन घटते. वजन घटते शिवाय थकवा, लघवी करताना घाम येणे, रात्री झोपताना घाम येणे यासारखी लक्षणे मधुमेहाच्या सुरुवातीला दिसू शकतात.

थायरॉईड : थायरॉईडच्या समस्येमुळे अचानक वजन कमी होऊ शकते. सर्वाधिक समस्या ही ओव्हर अ‍ॅक्टिव्ह थायरॉईड ग्रंथी म्हणजे हायपर थायरॉईडिझममुळे होते. त्याशिवाय मनोवस्थेत बदल, गिळण्याची समस्या, थकवा, श्वास घेण्यात समस्या आणिघाम येणे हीदेखील लक्षणे दिसतात.

कर्करोग : कर्करोग हा घातक आजार जर वेळेवर याचे निदान झाले नाहीत तर हा आजार घातक आणि जीवघेणा ठरु शकतो. कर्करोगाने पीडितांचे वजन वेगाने कमी होते. वजन कमी होत असताना दिवसभर थकल्यासारखे वाटत असेल तर ही कर्करोगाची लक्षणे आहेत.



क्षयरोग : टीबी किंवा क्षयरोग झाल्यासही वजन झपाट्याने कमी होते. क्षय रोगाचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे सतत दोन आठवडे खोकला येतो. क्षयरोग मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्युलोलिस जीवाणूंमुळे होतो. वजन कमी होण्याबरोबरच छातीत वेदना, रात्री झोपताना घाम येणे, थकवा इत्यादी प्रमुख लक्षणे दिसतात.

तणाव : तणाव हा व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक आजारांचे ते एक कारण आहे. तणावामुळे रात्री झोप लागत नाही, तसेच वेगाने वजन घटते. त्यासाठी मेडिटेशन आणि योग करण्याची गरज आहे.

एचआयव्ही - एड्‌सः एचआयव्ही ही लैंगिक संबंधातून होणारा संसर्ग आहे. त्याची शेवटची पायरी म्हणजे एड्‌स. वेगाने वज कमी होणे हे देखील या आजाराशी निगडित आहेत. त्यामुळे वजन कमी होणे दुर्लक्षित करु नका.

इतर काही आजार : इतरही काही आजारांमध्ये वजन वेगाने घटते. पोटाची समस्या, हार्मोन्समधील बदल, सीओपीडी आणि पार्किन्सन्स या आजारांमध्येही वजन कमी होते.

तुम्ही काळे चणे किंवा फुटाण्यांचे फायदे अनेकदा ऐकले असतील, पण काय तुम्हाला हरभरा खाण्याचे फायदे माहीत आहेत? हरभरा चवीला स्वादिष्ट लागण्यासोबतच आरोग्यासाठीही चांगला असतो. हरभऱ्याचा उपयोग वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो. हरभऱ्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी, फॅट, फायबर, कॅल्शिअम, कार्बोहायड्रेट आणि आयर्नसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे चणे खाल्याने एनर्जी मिळते. त्यासोबतच याने हाडेही मजबूत होतात. जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर हरभरा खाणे फायद्याचे ठरेल. चला जाणून घेऊ हरभरा खाण्याचे आणखीही काही आरोग्यदायी फायदे...

१) हृदय चांगलं राहतं

जर तुम्ही रोज हरभरा खाल तर तुमचं हृदय निरोगी राहील. याच्या नियमीत सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉलची लेव्हल कमी होते. त्यामुळे तुमचं हृदय निरोग आणि चांगलं राहतं.

२) ब्लड शुगरवर नियंत्रण

आजकाल अनेकांना ब्लड शुगरची समस्या असते. जर तुम्ही एक आठवडा अर्धी वाटी हरभरा खाल्यास तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकतं.

३) शारीरिक कमजोरी होते दूर

हरभऱ्यामध्ये प्रोटीन आणि मिनरल्ससोबतच व्हिटॅमिनही अधिक प्रमाणात आढळतात. हे खाल्याने तुमच्या शरीराची कमजोरी दूर होते आणि तुम्हाला एनर्जी मिळते.

४) आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव

हरभऱ्यामध्ये फायबर्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात, जे आतड्यातील बेकार बॅक्टेरियाला नष्ट करतात. आणि आतड्यांच्या कॅन्सरपासून बचाव करतात.

५) हाडे मजबूत होतात

हरभऱ्यांमध्ये व्हिटॅमिन सी अधिक प्रमाणात असतात. रोज नाश्त्यात याचे सेवन केल्यास तुमची हाडे आणखी मजबूत होऊ शकतात.

६) पचनक्रिया सुधारते

एक वाटी हरभरा रोज खाल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. याने तुमची पचनक्रिया सुधारते.

७) त्वचेवर ग्लो येतो

हरभऱ्यांमध्ये क्लोरोफिलसोबतच व्हिटॅमिन ए, इ, सी, के आणि बी कॉम्प्लेक्स आढळतात. या तत्वांचे त्वचेला खूप फायदे आहेतय त्यामुळे चणे खाल्यास त्वचेवर ग्लो येतो.

८) वजन कमी करण्यास मदत

जर हरभरा तुम्ही नियमीत खाल्ला तर तुमचं पोट भरलेलं राहिल. त्यामुळे तुमचा ओव्हर डाएटपासून बचाव होतो. याप्रकारे तुम्ही सहजतेने तुमच्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.

९) वाढतं वय दिसत नाही

हरभऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि मिनरल्स असण्यासोबतच अॅंटीऑक्सिडेंट्सही आढळतात. याने वेगवेगळ्या आजारांना तुम्ही दूर ठेवू शकता आणि तुमचं वाढतं वयही दिसून पडत नाही.

१0) रक्त वाढतं

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर आजच हरभरा खाण्यास सुरुवात करा. हरभऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असतं. त्यामुळे याच्या नियमीत सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता भरुन निघते.

Dr. Rohit Patil
Dr. Rohit Patil
MDS, Dentist Implantologist, 5 yrs, Pune
Dr. Dhanraj Helambe
Dr. Dhanraj Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Dr. Ashwin Prasad
Dr. Ashwin Prasad
BDS, Cosmetic and Aesthetic Dentist Cosmetic Surgeon, 2 yrs, Pune
Dr. Niranjan Vatkar
Dr. Niranjan Vatkar
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 10 yrs, Pune
Dr. Rekha Pohani
Dr. Rekha Pohani
Specialist, Dietitian dietetics, 13 yrs, Pune
Hellodox
x