Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

मुंबई : आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे. मसाले फक्त स्वाद वाढवत नाहीत तर ते स्वास्थ्यपूर्ण देखील आहेत. तुम्ही जिरा राईस आवडीने खात असाल पण त्यातील जिऱ्याचे महत्त्व तुम्हाला माहित आहेत का? जिऱ्यात असलेल्या आरोग्यदायी गुणधर्मांमुळे स्वास्थ्यासंबंधिच्या अनेक समस्या दूर होतील. जिरे शरीराच्या सर्व अवयवांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज आहारात जिऱ्याचा समावेश केल्यास त्याचे अनेक लाभ मिळतील. १० दिवस रोज जिरे खाल्याने अनेक फायदे होतील. याचा परिणामही लगेचच जाणवू लागेल.

-पचनतंत्र सुधारते. पोटांच्या समस्या दूर होतात.
-गॅस, वात या समस्या नष्ट होतात. बद्धकोष्ठतेवर हे अत्यंत लाभदायक आहे.
-पिंपल्स, काळे डाग यावर लाभदायी ठरते.
-जिऱ्यात व्हिटॉमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे त्वचेचे आरोग्य राखले जाते.
-व्हिटॉमिन ई मुळे त्वचेवरील एजिंगचा परिणाम कमी होतो.
-जिऱ्यात त्वचेसंबंधित आजार एग्जिमा ठीक करण्याचे गुणधर्म असतात.
-हाताला घाम येत असल्यास जीरं पाण्यात उकळवा आणि पाणी थंड करा. तहान लागल्यावर पाणी प्यायल्याने आराम मिळेल.
-३ ग्रॅम जिरे आणि १५ मि. ग्रॅम फटकी फटक्यात बांधून गुलाबपाण्यात भिजत ठेवा. डोळे दुखी लागल्यास किंवा लाल झाल्यास त्यावर हे फडके ठेवा.
-दह्यात भाजलेल्या जिऱ्याचे चुर्ण घालून खाल्यास डायरियावर आराम मिळतो.
-जिऱ्यात लिंबाचा रस आणि मीठ घाला. त्यामुळे उलटीसारखे वाटणे, मळमळणे यावर आराम मिळेल.
-जिऱ्यात थोडे व्हिनेगर घालून खाल्यास उचकी बंद होते.
-जिऱ्यात गुळ घालून त्याच्या गोळ्या बनवा. त्या मलेरियावर लाभदायी ठरतात.
-एक चिमुटभर कच्चे जिरे खाल्याने अॅसिडीटीपासून सुटका होते.
-मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी एक छोटा चमचा जिरे दिवसातून दोनदा पाण्यासोबत घ्या. नक्कीच फायदा होईल.

आता सणावाराच्या दिवसात नटण्या-सजण्याबरोबर मेंदीचा वापर आवर्जून करण्याकडे स्त्रियांचा कल असतो. सौंदर्यसाधनेमध्ये मेंदीचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. मेंदीच्या पानातील रंगद्रव्यामुळे तसेच फुलातून मिळणार्‍या सुगंधी द्रव्यांमुळे मेंदीला व्यापारी महत्त्वही आहे.

मेंदीमध्ये अनेक औषधी गुणतत्त्व आहेत. मेंदीच्या खोडाच्या सालीच्या अर्कामुळे त्वचारोग, पांढरे कोड आदी विकार दूर होतात.

मेंदीच्या सालीच्या काढय़ाने मुतखडा दूर करता येतो. मेंदीच्या पानांचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे किंवा त्वचेचा दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतो.

मेंदीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोत्सारक गुणधर्म आहे. घसादुखी असल्यास गुळण्या करताना पाण्यात मेंदीची पाने घातली जातात.

पायांची आग शमवण्यासाठी, शरीरातली अतिरिक्त ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी, डोकेदुखी थांबवण्यासाठी मेंदी डोक्याला किंवा पायाला लावतात.

मेंदीच्या पानांचा, सालींचा अर्क क्षयविकार दूर करण्यासाठी उपयोगात येतो. मेंदीच्या फुलातून टीरोझसारखे सुगंधी द्रव्य प्राप्त होते. यालाच हीना किंवा मेंदीतेल म्हणतात.

लसणामुळे फक्त जेवणच चविष्ट होते असे नाही, लसणामध्ये असे बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहेत. जाणून घेऊ की या छोट्या लसणामध्ये कोण कोणते गुण लपलेले आहेत.

एंटीबायोटिक - प्रथम लसणाला सोलून घ्या, लसणाच्या एका कुडीचे ३ ते ४ तुकडे करा. दोन्ही वेळेच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने लसणाचे दोन तुकडे तोंडात ठेऊन चगळा त्यानंतर पाणी प्या. > रोज लसणाचे सेवन केल्यास टीबी होत नाही. लसून हे किटाणुनाषक आहे, एंटीबायोटिक औषधांसाठी हा एक चांगला विकल्प आहे, लसणामुळे टीबीचे किटाणू नष्ट होतात.> डोके दुखीसाठी रामबाण उपाय - एका लसणाच्या ४ कुड्या तीस ग्राम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडे गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा डोके दुखणे थांबेल.

दमा दूर करण्यासाठी उपयुक्त - दम्याच्या त्रासावर लसून हे एक उपयुक्त औषध आहे. ३० मिली दुधामध्ये लसणाच्या पाच कुड्या टाकून दुध गरम करा. रोज हे गरम दुध पिल्याने दम्याचा त्रास कमी होण्यास मदत होईल. अद्र्काच्या चहामध्ये थोडा लसण टाकल्याने दमा नियंत्रित राहतो.

उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला अधिक पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये यासाठी तुम्ही सतत लिक्वीड घेत असता. मात्र या ऋतूत काही फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे ज्या शरीरासाठी लाभदायक असतात. या भाज्यांपैकी एक म्हणजे काकडी. उन्हाळ्यात काकडीचे सेवन शरीरासाठी चांगले मानले जाते. यात व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी फायदेशीर असते.

पाचनतंत्र सुधारते
काकडीमध्ये आढळणारे पाणी आणि फायबर शरीरातील पाचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत करतात. जर तुम्हाला गॅस, बद्धकोष्ठतेचा त्रास आहे तर एक ग्लास काकडीचा रस प्यायल्याने आराम मिळतो.

डिहायड्रेशनपासून बचाव
काकडी ब्रेडमध्ये टाकून तुम्ही सँडविच म्हणूनही खाऊ शकता. अनेकांना फळ खाण्यापेक्षा फळाचा रस प्यायला आवडतो. तुम्हालाही फळ खाणे आवडत नसेल तर फळांचा रस काढून प्या. काकडीचा रसही तुम्ही पिऊ शकता. काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते ज्यामुळे डिहायड्रेशनपासून बचाव होतो.

कॅन्सरपासून होतो बचाव
काकडीत असणारे प्रोटीन शरीराला कॅन्सरशी लढण्याची शक्ती देतात. तसेच कॅन्सरपासून बचावही होतो. कॅन्सरच्या पेशी वाढण्यास रोखतात. त्यामुळे याला कॅन्सरविरोधी फळ म्हटले जाते. काकडीच्या सेवनाने कॅन्सरचा धोका कमी होतो.

मुख दुर्गंधी दूर होते
काकडी दातांनी तोडून थोडा वेळ तोंडात ठेवल्यास मुख दुर्गंधी दूर होते. काकडी चावून खाल्ल्याने तोंडातून येणारी दुर्गंधी दूर होते. दुर्गंधी पसरवणारे बॅक्टेरिया काकडी खाल्ल्याने नष्ट होतात.

चेहऱ्यावर तजेला येतो
काकडीचा वापर सुंदरता वाढवण्यासाठी केला जातो. जर उन्हामुळे चेहरा काळवंडला असेल तर काकडीचा पॅक लावून दूर केला जाऊ शकतो. यामुळे त्वचा उजळ होते. काकडी त्वचेसाठी टोनिंगचे काम करते.

दररोज या वेळेस खा दोन काकड्या
दररोज कमीत कमी दोन काकड्या खाल्ल्या पाहिजेत. सकाळी भरपूर नाश्ता करा. दुपारच्या जेवणात शक्य असेल तर एक काकडी खा. जर हे शक्य नसेल तर रात्रीच्या जेवणात कमीत कमी दोन काकड्या खाल्ल्या पाहिजेत. यामुळे तुम्ही चपाती अधिक खाणार नाही. पाचनशक्ती वाढेल यासोबतच वेगाने वजन कमी होण्यास मदत होईल.

मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट म्हणजे मसाले. या मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरलं जाणारं आलं हे जसे पदार्थांची चव वाढवते तसेच ते आरोग्यालाही हितकारी आहे.
आलं किंवा सुकवलेलं सुंठ हे दोन्ही आयुर्वेदीक औषधांमध्ये हमखास वापरले जाते. म्हणूनच आजारपणांना दूर ठेवण्यासाठी आहारात आल्याचा नियमित वापर केल्याने कमी होईल या समस्यांचा धोका.

पित्ताचा त्रास
पित्ताचा त्रास झाल्यानंतर अनेकजण अ‍ॅन्टासिड घेतात. मात्र वारंवार अ‍ॅन्टासिड घेणेही आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यामुळे पित्ताचा त्रास जाणवत असल्यास आल्याचा लहानसा तुकडा चघळत राहिल्याने आरोग्याला फायदा होतो. पित्ताच्या समस्येवर सतत अ‍ॅन्टासिड घेण्याची सवय करते आरोग्यावर 'हा' गंभीर परिणाम

दातदुखी
कच्चं आलं चावून खाल्ल्याने दातांचे आरोग्य सुधारते. दातदुखीपासून आराम मिळतो. आल्यामध्ये अ‍ॅन्टी बॅक्टेरियल एन्झाईम्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे लाळनिर्मितीला चालना मिळते. आल्याचा तुकडा चघळल्याने दातदुखी, हिरड्यांमधील सूज कमी होते. दातदुखीवर फायदेशीर ठरतील स्वयंपाकघरातील हे ४ पदार्थ!

फॅट कमी करते
आल्याचा तुकडा शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतात. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. पचनाचा त्रास आटोक्यात राहतो.

विषारी घटक बाहेर पडतात
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी घाम हे एक माध्यम आहे. आल्याच्या सेवनामुळे घाम निर्माण होणं आणि विषारी घटक बाहेर पडणं या कार्याला चालना मिळते.

रक्तप्रवाह सुधारतो
आल्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि क्रोमियम हे घटक आढळतात. त्यामुळे आल्याच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. हृद्याचे आरोग्यही जपण्यास मदत होते.

रक्तदाब आटोक्यात
उच्च रक्तदाबामुळे हृद्याचे विकार जडण्याचा धोका असतो. आल्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

सर्दी - खोकल्याचा त्रास कमी होतो
आल्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. आल्याचा फयादा सर्दी खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. यामुळे घश्यातील खवखव कमी होते.

मासिकपाळीच्या दिवसातील त्रास कमी होतो
एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, महिलांना मासिकपाळीच्या दिवसामध्ये होणारा पोटदुखीचा, ओटीपोटाजवळ तीव्र वेदना जाणवण्याचा त्रास कमी होतो. अनेकजणी याकरिता पेनकिलर्सचा आधार घेतात. मात्र आल्याचा तुकडा चघळल्याने मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी होण्यास मदत होते. मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?

Dr. Amit Patil
Dr. Amit Patil
MD - Allopathy, Gynaecological Endoscopy Specialist Gynaecologist, 11 yrs, Pune
Dr. Sagar Salunke
Dr. Sagar Salunke
MS/MD - Ayurveda, Ayurveda Panchakarma, 2 yrs, Pune
Dr. BHARAT SARODE
Dr. BHARAT SARODE
MBBS, Addiction Psychiatrist Educational Psychologist, 25 yrs, Pune
Dr. Rahul Pherwani
Dr. Rahul Pherwani
BHMS, 22 yrs, Pune
Dr. Sonali wagh
Dr. Sonali wagh
BAMS, Ayurveda, 9 yrs, Pune
Hellodox
x