Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Healthy Living :
Healthy living is a long-term commitment. But there are steps you can take right now that will make your today healthier than yesterday and pave the way for healthy living tomorrow. So why are you waiting? Start following healthy living practices suggested by experts on HelloDox.

रात्री उशिरापर्यंत जागरण करणे आणि सकाळी लवकर न उठणे आरोग्यास हानीकारक असून यामुळे आयुर्मान कमी होण्याचा धोका असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

या अभ्यासात पाच लाख लोकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रात्री जागरण करणाऱ्यांचे आयुर्मान रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठणाऱ्यांच्या तुलनेत दहा टक्क्यांनी कमी असल्याचे आढळले. हा अभ्यास जर्नल क्रोनोबायोलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा असून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ब्रिटनमधील सरे विद्यापीठाचे प्राध्यापक माल्कम वॉन शंटझ यांनी सांगितले. रात्री जागरण करणाऱ्यांच्या आरोग्यविषयक अडचणी समायोजित केल्यानंतरदेखील त्यांच्यामध्ये आयुर्मान दहा टक्क्यांनी कमी असल्याचा धोका आढळून आला.

रात्री जागरण करणाऱ्यांमध्ये मधुमेह, मज्जासंस्थेचा विकार, मानसिक विकारांचे प्रमाण जास्त आढळून आले. रात्री जागरण करणाऱ्या लोकांनी शक्य असल्यास त्यांची कामे लवकर करून घ्यावीत.

त्याचप्रमाणे त्यांचे जैविक घडय़ाळ दिवसाच्या वेळेप्रमाणे कसे चालेल याबाबत अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे, असे वॉन शंटझ यांनी सांगितले.


रात्री जागरण करणाऱ्या लोकांमधील जैविक घडय़ाळ त्यांच्या बाहय़ वातावरणाशी जुळत नसल्याचे अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापिका क्रिस्टन नुटसन यांनी सांगितले. आनुवंशिकता आणि ज्या वातावरणात आपण वाढतो या दोन्ही गोष्टी आपल्या झोपेच्या सवयींवर परिणाम पाडण्यास समान भूमिका बजावतात.

यावर उपाय म्हणून लोकांनी दैनंदिन जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केल्याने मूत्रपिंडाच्या आजारापासून संरक्षण मिळू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

विशेष करून तरुण वयापासूनच मीठ कमी सेवन करण्याची सवय ठेवली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. देशात मूत्रपिंड निकामी होणे हे मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण आहे. स्वयंपाकघराची सूत्रे महिलांकडे असतात तेव्हा त्यांनीच मिठाचा वापर कमी करण्याची आवश्यकता आहे.

२५ ते ३० वयोगटातील मूत्रपिंड रुग्णांची संख्या वाढत असून ती पाच-सहा वर्षांपूर्वी एवढी जास्त नव्हती, असा दावा मुंबईच्या सैफी रुग्णालयाचे मूत्रविकारतज्ज्ञ अरुण दोशी यांनी केला आहे. अतिरक्तदाब हा विकार मूत्रपिंड निकामी होण्यामुळे होऊ शकतो.

किंबहुना ते त्यामागे एक प्रमुख कारण आहे. मीठ आणि रक्तदाब यांचा थेट संबंध आहे. जास्त मीठसेवनाने रक्तदाब वाढतो. रक्तदाब कमी झाला तर अतिरक्तदाब आटोक्यात येऊ शकतो.

आपण आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यात मीठ कमी असले पाहिजे, चीज बटर, साखर व मीठ हे प्रमुख घटक शरीरास घातक आहेत. त्यांचे सेवन कमी केले पाहिजे. उत्तर भारतातून तरुण मुले डायलिसिससाठी येतात, असे अपोलो रुग्णालयाचे डॉ. अमित लंगोटे यांनी सांगितले. लठ्ठपणा व मधुमेह यामुळे मूत्रपिंडाचे विकार होतात असे सांगून ते म्हणाले की, महिलांमध्ये मिठाचा कमी वापर करण्याबाबत जागृती केली पाहिजे. लोणची, पापड, चटणी व जादाचे नमकीन पदार्थ टाळले पाहिजेत.

सैफी रुग्णालयाचे हेमल शहा यांनी सांगितले की, कमी उष्मांक व कमी मीठ असलेला आहार आवश्यक आहे. फळे, भाज्या, कमी मेदाचे दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आवश्यक आहे. कधीच जेवणात जास्तीचे मीठ वाढून घेऊ नका. सॅलडवर मीठ टाकून घेऊ नका.

आदिती शेलार यांनी सांगितले की, वेदनाशामक औषधे व इतर औषधे शक्यतो टाळली पाहिजेत त्यामुळे मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो.

मुंबई : आज ७ एप्रिल म्हणजे विश्व स्वास्थ्य दिवस. आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत स्वास्थ्याच्या अनेक समस्या जडत आहेत. त्याचबरोबर वाढत्या वयासोबत शरीरात अनेक बदल होत असतात आणि योग्य ती काळजी न घेतल्यास आरोग्याच्या नाना विध समस्या जडू लागतात. तसंच यासाठी आपल्या काही चुकीच्या सवयीही कारणीभूत ठरतात. जसं की जेवण्याचा अयोग्य वेळा, व्यायाम न करणे, अनहेल्दी पदार्थांचे सेवन, व्यसने. म्हणून हेल्दी राहण्यासाठी योग्य त्या वयात आवश्यक त्या तपासण्या करणे गरजेचे आहे. पाहुया कोणत्या वयात कोणत्या टेस्ट कराव्यात...

वय वर्ष २०-
प्रत्येक वर्षी रक्तदाबाची तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर उंची आणि वजन नियमित तपासून पहा. दात आणि डोळ्यांचे आरोग्य तपासा. प्रत्येक दोन वर्षांनी एचआयव्हीचे स्क्रीनिंगही करणे आवश्यक आहे. पाच वर्षांनी कोलेस्ट्रॉल तपासणे, काळाची गरज झाली आहे.

वय वर्ष ३०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त मधुमेह, थायरॉयईड, अॅनेमिया आणि लिव्हर यांचे आरोग्य तपासावे. रक्ततपासणी करावी. वर्षातून एकदा हृदयासंबंधित आजारांची तपासणी करायला हवी.

वय वर्ष ४०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त दर पाच वर्षांनी एकदा कार्डिओवरक्युलर इवेल्यूएशन करणे गरजेचे आहे. तर वर्षातून एकदा प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी करणे आवश्यक आहे.

वय वर्ष ५०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त प्रत्येक वर्षी एकदा टाईप टू मधुमेह तपासणी करावी. प्रत्येक वर्षी डोळे, कान याव्यतिरिक्त मानसिक आरोग्य, लिपिड डिसऑर्डरची तपासणी करावी.

वय वर्ष ६०-
वर दिलेल्या तपासण्यांव्यतिरिक्त ऑस्टियोपोरोसिससाठी प्रत्येक वर्षी स्क्रीनिंग. याशिवाय डिमेशिया आणि अलजायमर याची प्रत्येक वर्षी तपासणी करावी.

मुंबई : माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायची सवय होती आणि कालांतराने तीच आपली परंपरा बनली.परंतु, आपल्या या परंपरेमागे काही ज्ञान आहे का ? त्याचे काही फायदे आहेत का ? जाणून घेऊया मातीच्या माठातून पाणी पिण्याचे त्यांनी सांगितलेले फायदे.

नैसर्गिक थंडावा:
लहान लहान छिद्र (सच्छिद्र) असलेल्या मातीच्या माठात पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. उन्हाळ्यात खूप वेळ लोड शेडींग असते किंवा अनेकदा वीजपुरवठा स्थगित होतो. अशावेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रिजमधील थंड पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरण पूरक आहे.

मातीचे गुणधर्म:
माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो.

माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन:
शरीरातील अॅसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. म्हणून जर तुमचं शरीराच्या आतील वातावरण अॅसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर तुमचे आरोग्य उत्तम राहील. माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते. त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते.

कोणतेही हानिकारक केमिकल्स नाहीत:
अधिकतर प्लॉस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिक केमिकल असते. जे आरोग्याला धोकादायक असतात. म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे. कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते. तसंच पाणी दूषित होत नाही.

मेटॅबॉलिझम सुधारते:
मातीचा माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते.

उष्माघाताला आळा बसतो:
उन्हाळ्यात सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी प्या.

घशासाठी चांगले असते:
सर्दी, खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रिजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता. कारण ते पाणी घशासाठी चांगले असते.

योग्य मातीचे मडके (माठ) कसे निवडावे ?
घरासाठी मातीचा माठ विकत घेताना शक्यतो तो हाताने बनवलेला असावा असे पहा. तसंच mica particles युक्त माठ घ्या. त्याला micaceous म्हणतात. Mica हे नैसर्गिक इन्सलेटर असते. त्यामुळे पाणी खूप वेळपर्यंत थंड राहण्यास मदत होते.

सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक असते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र तरीही व्यसन असणाऱ्यांना त्याचे भान राहत नाही. इतकेच काय सिगारेटच्या पाकीटावरही ती ओढणे आरोग्यासाठी हानिकारक असते असे लिहीलेले असते. मात्र तरीही त्याचा नाद सोडणे सवय असलेल्या लोकांसाठी कठिणच. हे लक्षात घेऊन आता सरकारने एक अनोखा नियम लागू केला आहे. ज्यांना सिगारेट आणि तंबाखूचे व्यसन आहे त्यांच्यासाठी आता या उत्पादनांवर एक टोल फ्री क्रमांक दिला जाणार आहे. आपले व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी १८००-११-२३५६ हा टोल फ्री क्रमांक अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास व्यक्तीचे मोफत समुपदेशन केले जाणार आहे.

याबरोबरच सिगारेट आणि तंबाखूच्या पाकीटावरील ८५ टक्के भागात हे व्यसन वाईट आहे हे दाखविणारे एक प्रतिकात्मक छायाचित्रही देण्यात येणार आहे. या चित्राचाही व्यसन सोडायचे असणाऱ्यांना सकारात्मक उपयोग होईल असा अंदाज आहे. तसेच यावर काही प्रबोधनात्मक संदेशही देण्यात आले आहेत. तंबाखू हे मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण आहे, तंबाखूमुळे कर्करोग होऊ शकतो असे हे संदेश आहेत. हे सगळे बदल येत्या सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार असून संबंधित कंपन्यांना त्याप्रमाणे सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतचा अध्यादेश जाहीर कऱण्यात आला असून त्यामध्ये याबाबतची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.

Dr. Vijay Jagdale
Dr. Vijay Jagdale
BHMS, Homeopath, 10 yrs, Mumbai
Dr. Annasaheb Labade
Dr. Annasaheb Labade
BAMS, Ayurveda Family Physician, 19 yrs, Pune
Dr. Reshma P. Ransing
Dr. Reshma P. Ransing
BHMS, Family Physician, Pune
Dr. Nitin Shingare
Dr. Nitin Shingare
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 9 yrs, Pune
Dr. Archana Bhilare
Dr. Archana Bhilare
BDS, Dentist Endodontist, 8 yrs, Pune
Hellodox
x