Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Diet and Nutrition :
Does the word Diet make you think of unpleasant weight-loss regimen? Forget it, Diet also refers to the food and drink a person consumes daily and the mental and physical circumstances connected to eating. Eating nutrition give you beautiful body not just outside but also inside.

सध्याचे दिवस म्हणजे वैशाख वणव्याचे दिवस. या काळात शरीराची किंवा त्वचेची कितीही काळजी घेतली तरी अनेक समस्यांना सामोरे जावेच लागते. खरे पाहता सध्याच्या घडीला झाडांची संख्या कमी झाली असून वाहनांची, इमारतींची संख्या वाढली आहे. त्यातच वाहनांमुळे होणा-या प्रदूषणामुळे माणसाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एकतर उन्हाची तीव्रता आणि त्यातच वायू प्रदूषण या सा-याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना दिसून येतो. यामध्येच आता शाळांना सुट्टी लागल्यामुळे लहान मुलेही सतत उन्हामध्ये खेळताना दिसून येतात. लहान मुलांना आपण खेळण्यापासून अडवू शकत नाही. मात्र त्यांच्या आहारात काही ठराविक बदल करुन त्यांना होणा-या आजारापासून वाचवू शकतो.

बाह्य परिस्थितीचा परिणाम व्यक्तीच्या आरोग्यावर होत असतो. या बाह्यपरिस्थितीशी लढा देण्यासाठी आपल्याला शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. जर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपण कोणत्याही ऋतूशी सामना करण्यासाठी तयार राहू शकतो. मुख्यत: उन्हाळ्यामध्ये शरारातील पाण्याची पातळी खालावलेली असते. ही पातळी भरुन काढण्यासाठी आहारात काही पेयांचा समावेश करणे गरजेचे आहे. त्यातही असे काही पेयपदार्थ आहेत जे रोगप्रतिकारशक्ती वाढवून होणा-या आजारांपासून आपले संरक्षण करु शकते.

१. जिंजर लेमन टी : जिंजर लेमन टी हा एकप्रकारे अँटीऑक्सि़डंटचे काम करतो. यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे शराराला तरतरी येऊ काम करण्याचा उत्साह वाढवितो. जिंजर लेमन टी दररोज एक कप प्यायल्याने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

२. वॉटरमेलन अॅण्ड मिंट स्मुदी : कलिंगडाचे काही तुकडे आणि पुदिन्याची पाने मिक्सरमध्ये बारीक करुन हा ज्युस तयार केला जातो. कलिंगडामध्ये पाण्याची क्षमता जास्त असून पुदिन्याची पाने शरीराला थंडावा देण्याचे काम करतात. हा ज्युस चवीबरोबरच आरोग्यासाठीही लाभदायक असतो.
३. आरेंज ज्युस : आंबट-गोड अशी संत्री चवीबरोबरच आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी पुरवत असतात. सध्या उन्हाळा असल्यामुळे बाजारपेठेमध्ये सर्वत्र संत्री दिसून येतात. काही हॉटेलमध्ये वैगरे तर संत्र्यांपासून नवनवीन पदार्थ देखील उपलब्ध असतात. मात्र उन्हाळ्यात शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असल्यामुळे शरीराची झीज भरुन काढण्यासाठी ऑरेंज ज्युस महत्वाचे कार्य करते. संत्र्यात ९७ टक्के पाणी, ११ टक्के साखर आणि कार्बोहायड्रेड व प्रथिने असतात. या सर्व खनिजांमुळे संत्रे शरीरातील रक्ताला क्षारमय करते. त्याचा चांगलाच फायदा होतो.

४. हनी अॅण्ड वॉटर : मध हा शरीरासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ आहे. बाह्य त्वचेच्या रक्षणाबरोबरच मध शरीराच्या अंतर्गत स्वच्छता करण्याचेही काम करतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मध फायदेशीर ठरत असून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचे कामही मध करते. यासाठी गरम पाण्यामध्ये एक चमचा मध टाकून प्यायल्यास शरीरातील चरबी कमी होते.

५. ग्रीन टी : ग्रीन टी मध्ये सर्वात जास्त अॅटीक्सिडंटस असतात. चहाची ही लहान लहान पाने शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणण्याचे काम करतात. तसेच ग्रीन टी थायरॉईडसारख्या आजारांनाही आपल्यापासून दूर ठेवतो.

म्हणून उन्हाळ्यामध्ये शरीराला उर्जा देण्याबरोबरच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर या पेयांचा समावेश दिवसातून एकदा आपल्या आहारात समावेश करायला हवा. तसेच उन्हाळ्याव्यतिरिक्तही अन्य ऋतूमध्ये या पेयांचे सेवन केल्यास शरीराला फायदाच होणार आहे.

एडिबल फ्लावर्स म्हणजे ज्या फुलांचे आपण सेवन करू शकतो. एडिबल फुलांना कच्चे किंवा शिजवून कुठल्याही प्रकारे सॉस किंवा डिश सोबत खाऊ शकतो.
गुलाब
गुलाबाची सर्वच प्रजाती खाण्यायोग्य असते. याच्या पानांचा प्रयोग सलाड, आइसक्रीम आइसक्रीम , मिठाई, गुलाब-जल, जॅम-जेली, सरबत किंवा जेवणात गार्निशिंग करण्यात केला जातो.

मेरी गोल्ड
याला कॅडेंडुलासुद्धा म्हणतात. गोल्डन-ऑरेंज रंगाचे पान असलेले ह्या फुलांची चव चटपटी , थोडी तिखट आणि केसर प्रमाणे असते. याला तुम्ही सूप, पास्ता, भाताच्या डिशेज, सलाड इत्यादीच्या गार्निशिंगसाठी प्रयोग करू शकता.

जेस्मीन (मोगरा)
याचा पारंपरिक उपयोग चहाला सुंगधित करण्यासाठी व इत्र इत्यादीत केला जातो.

चमेली
चवीला गोड असणारे हे फूल दिसायला फारच सुंदर असतात. याचा प्रयोग शॅपेन, चॉकलेट, केक, कस्टर्ड, सरबत आणि जेली इत्यादीत केला जातो.

गुलदाउदी
लाल, पिवळे, सफेद आणि नारंगी रंगांच्या या फुलांचा प्रयोग सलाड आणि सिरक्यात फ्लेवर वाढवण्यासाठी केला जातो.

एडिबल फुलांचा प्रयोग करताना खाली दिलेल्या गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे-

कुठल्याही फुलांचा जेवणात तेव्हाच वापर करावा जेव्हा तुम्हाला याबद्दल पूर्ण खात्री झाली असेल की ते फुलं वापरायला काहीच हरकत नाही आहे.

भोजनामध्ये प्रयोग करण्यासाठी फुलांना अशा कुठल्याही दुकानातून खरेदी नाही करावी जेथे कीटनाशक औषधांचा वापर केला गेला असेल.

जर फुलांचे सेवन पहिल्यांदाच करत असाल तर एकाच प्रकारचे फुल घ्यावे, कारण जास्त प्रकारचे फुलं घेतले तर त्याचा परिणाम तुमच्या पचन क्रियेवर होतो.

गुलाब, ट्यूलिप, इंग्लिश डेजी, मेरी गोल्ड इत्यादी फुलांच्या पानांचा पांढरा भाग कडवट असतो, म्हणून प्रयोग करण्या अगोदर त्याला काढून द्यावे.

मुंबई : अनेक घरांमध्ये अजूनही तांब्या-पितळ्याची भांडी जपून ठेवलेली आहेत. पूर्वी तांब्या-पितळ्याच्या भांड्यांचा वापर स्वयंपाकघरात प्रामुख्याने केला जात असे. मात्र आता कालानुरूप त्यामध्ये बदल झाला आहे.

तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी -
तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी साठवणं हे आरोग्यदायी समजले जाते. नियमित पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. मात्र जेवणासाठी तांब्याचा भांड्याचा वापर करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते.

तांब्याच्या भांड्यामध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत?
पाण्याचा साठा तांब्याच्या भांड्यांमध्ये साठवणं फायदेशीर असले तरीही दही,दूध, लिंबूपाणी यासारखे आंबट आणि अ‍ॅसिडिक पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये साठवू नका.

का ठरते त्रासदायक?
दूध, दही किंवा त्यासारखे आंबट पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्याने किंवा त्याचे सेवन करणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. दह्यामध्ये कॅल्शियम,मॅग्नेशियम,प्रोटीन, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम यासारखे घटक असतात.
जेव्हा तांब्याच्या भांड्यामध्ये दह्यासारख्र पदार्थ साठवले जातात तेव्हा त्यामधील घटकांची तांब्यासोबत रिअ‍ॅक्शन होते. परिणामी हे सारे पदार्थ विषारी होतात.

कोणत्या आजाराचा धोका ?
तांब्याच्या भांड्यातून अशाप्रकारचे पदार्थ खाणं आरोग्याला त्रासदायक ठरते. तांब्याच्या भांड्यातून अशाप्रकराचे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास, काविळ, डायरिया, उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणं हितकारी असलं तरीही त्यामध्ये कोणतेही कापलेले फळ साठवू नका. तसेच फळांचा रस पिऊ नका.

उन्हाळ्यात सूर्याच्या झळांमुळे अंगाची लाही लाही होते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो. अशक्तपणा वाढतो. जेवढे काम करतो, त्यापेक्षा जास्त दमायला होते. घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. त्यामुळे थकवा अधिक जाणवतो. उन्हाळ्यात भूक कमी होते आणि अपचनाचे विकार वाढतात. त्यामुळे कफविकार वाढू न देणारे, पचन वाढविणारे आणि शरीरातील पाण्याचा समतोल राखणारे पदार्थ खायला हवेत. त्यामुळे रात्रीचे जेवण कसे असावे याविषयी थोडक्यात.

– उन्हाळ्यात रात्रीचे जेवण हलके असावे.

– जेवणात वरण -भात, तूप, लिंबू असावे.

– ज्यांना भात आवडता नाही त्यांनी पोळी भाजी, आमटी किंवा ज्वारी बाजरीची भाकरी खावी.

– शक्यतो जेवणात हिरव्या भाज्या असाव्यात.

– मूगाची खिचडी किंवा ताकही रात्रीच्या जेवणात असलं तरी चालेल.

– जेवणाच्या सुरुवातीला भाज्यांचे गरमा-गरम सूप घ्यायला हरकत नाही.

– रात्रीच्या वेळी शक्यतो मांसाहार टाळावा. जर असेलच तर तरी पचनाच्या दृष्टीने पालेभाजीही जेवणात असावी.

– साजूक तूप जेवणात वापरावं.

– जेवणानंतर लगेच आइस्क्रीम खाणे टाळावे. खायचेच असेल तर जेवण व नाश्ता यांच्या मधल्या काळात किंवा जेवण झाल्यावर किमान दीड ते दोन तासांनी खावे. आइस्क्रीम थंड असल्याने पचनक्रिया मंदावते.

आंबा, फणस, काजू, खरबूज, कलिंगड बरोबरच या काळात रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. वर्षांतून एकदा मिळणाऱ्या या फळांचं उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावं. ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे फळ आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. करवंद ही नैसर्गिकरीत्या जंगलात वाढलेली असतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात म्हणूनच ती वेगवेगळ्या विकारांवर गुणकारी मानली जातात.

करवंदामध्ये असणारे औषधी गुणधर्म
– करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो.
– करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच. जर रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
– करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
– करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
– उन्हाचा त्रास होत असेल यामुळे, शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.
– करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
– अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
– आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तर करवंदाचे सरबत थोड्याथोड्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
– करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
– करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असते.

Dr. Niranjan Vatkar
Dr. Niranjan Vatkar
MDS, Cosmetic and Aesthetic Dentist Dental Surgeon, 10 yrs, Pune
Dr. Virag  Kulkarni
Dr. Virag Kulkarni
BAMS, Ayurveda Panchakarma, 14 yrs, Pune
Dr. Niket Lokhande
Dr. Niket Lokhande
MDS, Dentist Root canal Specialist, 14 yrs, Pune
Dr. Yogesh Gholap
Dr. Yogesh Gholap
BAMS, Ayurveda General Physician, 12 yrs, Pune
Dr. Kalpesh Wani
Dr. Kalpesh Wani
BAMS, Ayurveda Panchakarma, 8 yrs, Pune
Hellodox
x