Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Diet and Nutrition :
Does the word Diet make you think of unpleasant weight-loss regimen? Forget it, Diet also refers to the food and drink a person consumes daily and the mental and physical circumstances connected to eating. Eating nutrition give you beautiful body not just outside but also inside.

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना सुट्ट्या असतात, अनेकजण सहलींचं प्लॅनिंग करतात तर हाच काळ लग्नमौसमांचा असतो. उन्हाळ्यात प्रखर झालेलं उन तुमची भूक मंदावण्याचं कारणं असतं पण एन्जॉयमेंटच्या आनंदात अनेकदा चटपटीत आणि बाहेरचे पदार्थ खाण्याकडे तुमचा ओढा असल्यास आरोग्य बिघडू शकते. उन्हाळ्याच्या दिवसात संतुलित आहाराचा समावेश करणं आवश्यक आहे. या दिवसात डीहायड्रेशनचा त्रास अधिक वाढतो. म्हणूनच आहारात कोणते पदार्थ टाळावेत याबाबतही सतर्क राहणं आवश्यक आहे.

आईस्क्रिम सॅन्डव्हिच -
आईस्क्रिम आणि उन्हाळा हे अतुट नातं आहे. या दिवसामध्ये तुम्ही 'कूल' राहण्यासाठी घरच्या घरी आईस्क्रिम बनवू शकता. किंवा आईस्क्रिम सॅन्डव्हिचची तयारीदेखील घरी करू शकता. मात्र बाजारातील विकतचे आईस्क्रिम सॅन्डव्हिच टाळा. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स अधिक असतात.

तिखट जेवण -
तिखटाचे जेवण उन्हाळ्यात टाळावे. यामुळे शरीरात उष्णता वाढू शकते. मसाल्याच्या पदार्थांमुळे शरीरात मेटॅबॉलिझम वाढते.

मांसाहार -
जड मांसाहार उन्हाळ्याच्या दिवसात टाळावा. मंदावलेल्या पचनसंस्थेच्या कार्यामुळे पचन न झाल्यास डायरियाचा त्रास बळावू शकतो. उन्हाळ्यात मांसाहार जपूनच करावा.

तेलकट पदार्थ -
बर्गर, मीट पॅटीस, फ्राईज यासारखे तेलकट पदार्थ आहारात टाळावेत.

खारट स्नॅक-
खारट स्नॅक्सच्या पदार्थांमध्ये MSG घटक आढळतो. यामुळे भूक आणि वजनही वाढण्याचा धोका असतो.

शिळे पदार्थ -
वारंवार गरम केलेले किंवा नेहमीच शिळे पदार्थ खाणं टाळा. उन्हाळ्यात पदार्थ खराब होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे पचनाशी निगडीत काही आजार बळावण्याची शक्यता असते.

मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास होतो. अशावेळेस मुबलक पाण्यासोबतच आहारात फळभाज्या, फळांचाही योग्य प्रमाणात वापर करणं गरजेचे आहे.
कलिंगड, टरबूज, ताडगोळा, शहाळ्याचं पाणी यासोबतच लिची खाणंही आरोग्यवर्धक आहे. लीची हे पाणीदार फळ आहे. सोबतच त्याला एक मंद सुगंध असल्याने उन्हाळ्यात लिची खाणं आरोग्यवर्धक आहे.

लिचीमध्ये आरोग्यदायी घटक -
लिची या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स,व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्न घटक मुबलक प्रमाणात असतात. लिचीमध्ये नैसर्गिकरित्या गोडवा असल्याने तात्काळ एनर्जी मिळण्यास मदत होते. लिचीमुळे पोटात थंडावा निर्माण होतो.

तात्काळ मिळते उर्जा -
उन्हाळ्याच्या दिवसात थकवा येतो. अशावेळेस लिचीच्या सेवनामुळे त्यामधील नियासिन घटक शरीरातील हिमोग्लोबिन घटक निर्माण करण्यास मदत करतात. यामुळे शरीराला तात्काळ उर्जा मिळते.

कॅन्सरशी सामना -
लीचीमधील किमोप्रोटेक्टिव घटक ब्रेस्ट कॅन्सर सेल्स आणि ट्युमर यांची निर्मिती होण्याचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. सोबतच लीची मधील फ्लेवोनॉईड्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक कॅन्सरचा बचाव करण्यास मदत करतात.

वजन घटवण्यास मदत
वजन घटवणार्‍यांसाठी लीची हे फळं फायदेशीर ठरतं. कपभर लीचीच्या अर्कामध्ये 125 कॅलरीज असतात. यामध्ये फॅट्स कमी असतात. फायबर घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रणात राहतो
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक असणारे पोटॅशियम घटक लिचीमध्ये मुबलक प्रमाणात असतात. कपभर लीचीमध्ये 325 ग्राम पोटॅशियम घटक आढळतात. यामुळे दिवसभरातील 9% गरज पूर्ण होण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक्षमता सुधारते
शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यास लिची हे फळ मदत करते. कपभर लीचीमध्ये सुमारे 136 मिली ग्राम व्हिटॅमिन सी घटक आढळतात. नियमित लिचीच्या सेवनामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

सौंदर्य खुलवते
चेहर्‍यावर पिंपल्सचे डाग असतील त्वचा खुलवण्यासाठी लिची खाणं आरोग्यदायी ठरते. लिचीमध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अ‍ॅन्टी एजिंगचा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.

मुंबई : आपल्याला भूक कमी अधिक लागण्याचा संबंध पचनशक्तीशी असतो. योग ही अशी साधना आहे ज्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य सुधारण्यास नक्कीच मदत होते. त्यामुळे भूक कमी लागण्याच्या समस्येवरही परिणाम करते. म्हणून जर तुम्हाला कमी भूक लागत असेल तर ही योगासने नक्की करा.

पवनमुक्तासन
हे आसन भूक वाढवण्यासाठी आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. या आसनात ४०-५० सेकंद रहा आणि ४-५ वेळा याची आवर्तने करा.

वज्रासन
रक्तप्रवाह, भूक आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी हे उपयुक्त आसन आहे. या आसनात कमीत कमी मिनिटभर रहा आणि रोज करताना हळूहळू वेळ वाढवत न्या.

बद्धकोणासन
भूक न लागण्याची समस्या असेल तर हे आसन करणे फायद्याचे ठरेल. या आसनामुळे बद्धकोष्ठता, अपचन यावर आराम मिळतो. पण हे आसन आपल्या शारीरिक क्षमतेनुसारच करा. नियमित केल्याने त्यावर पकड येईल.

शशांकासन
या आसनामुळे पोट आणि पोट्याच्या स्नायूंना उत्तम मसाज मिळतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

चिन्मय मुद्रा
या मुद्रेमुळे शरीरात रक्तसंचार उत्तमरीत्या होतो. पचनतंत्र सुधारुन भूक वाढवण्यास ही मुद्रा उपयुक्त ठरते. चिन्मय मुद्रा करताना २-३ मिनिटे श्वास घ्या आणि आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या.

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात भूकेवर नियंत्रण मिळवणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. वजन घटवण्याच्या नादात उपास मार केली जाते. त्यातून अधिक खाल्ले गेल्यास वजन वाढते आणि परिणाम उलटा होतो. म्हणूनच भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात कशी करावी, हे जाणून घेऊया...

आरोग्यदायी फॅट्सचा आहार वाढवा

अनेकजण फॅटयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश कमी करतात. परंतु फॅट्समुळेच भूकेवर नियंत्रण ठेवता येतं. फॅट्समधून उर्जा मिळते. तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे शोषण सुधारते. पेशींना मजबूत बनवते. त्यामुळे बदाम, अ‍ॅव्हॅकॅडो, मासे, ऑलिव्ह ऑईल यांचा आहारात समावेश करा.

फायबर्सचा आहार वाढवा

पचनक्रियेला नियमित करण्यासाठी फायबर्स महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे पाण्याचा अंश टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच आहारात हिरव्या भाज्यांचा,फळांचा समावेश वाढवा. त्यामध्ये कॅलरीजही योग्य प्रमाणात आढळतात. सलाड किंवा फळं खाण्याच्या सवयीमधून शरीराला फायबर्सही मिळतात.

प्रोटीन्सचा आहार वाढवा

तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश वाढवा. यामुळे आहार पोटभरीचा होतो तसेच त्यातील अमायनो अ‍ॅसिड भूक नियमित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासाठी अख्या डाळी, मासे, अंडी, यांचा आहारातील समावेश वाढवा.

भूक लागल्यावर च्युईंगम चघळा

वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी च्युईंग गम चघळणे हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे. यामुळे वजन कमी होत नसले तरीही कमीत कमी कॅलरीज शरीरात जातात. मात्र च्युईंगगम हे शुगर फ्री असेल याची काळजी घ्या.


आठवड्याचे पाच किंवा सहा दिवस काम करणे म्हणजे अनेकांसाठी कंटाळवाणेच. कित्येक जण तर शुक्रवार किंवा शनिवार कधी येतो याचीच आठवडाभर वाट पाहत असतात. वय वाढेल तसे तुमचे कामाचे दिवस कमी झाले तर किती मज्जा येईल ना? ऐकायला बरी वाटणारी ही गोष्ट प्रत्यक्षात झाली तर…आता तुम्ही म्हणाल असे कसे शक्य आहे? पण नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, ४० वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांनी आठवड्यातील तीनच दिवस काम करावे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इन्स्टीट्यूटमधील तज्ज्ञांनी याबाबत अभ्यास केला आहे. ४० वर्षाच्या वरील लोक आठवड्यातील ३ दिवस काम केले तरच सर्वोत्तम कामगिरी करु शकतात.

या अभ्यासासाठी ४० वर्षावरील ३५०० महिला आणि ३००० पुरुष यांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासकांनी यामध्ये सहभागी झालेल्यांच्या अॅबस्ट्रॅक्ट रिझनिंग, मेमरी, एक्सिक्युटीव्ह रिझनिंग यांसारख्या गोष्टींच्या चाचण्या घेतल्या. तसेच या अभ्यासकांनी सहभागींची आकलनविषयक कामगिरीचीही तपासणी केली. या लोकांनी आठवड्यातील २५ तास काम केल्यावर त्यांची कामगिरी ५५ तास काम केल्यावर असणाऱ्या कामगिरीपेक्षा अतिशय चांगली होती असा निर्ष्कर्षही यातून निघाला. यातील एका वरिष्ठ अभ्यासकाच्या म्हणण्यानुसार, तुमची बौद्धिक क्षमता ही तुम्ही किती वेळ काम करता यावर अवलंबून असते. जास्त ताण आणि थकवा आल्यास शरीर आणि बुद्धी एका मर्यादेपलिकडे तितकी चांगली कामगिरी करु शकत नाही.

कामाचे तास हे थेट तुमच्या कार्यक्षमतेशी निगडीत असल्याने वयाने मोठ्या व्यक्तींची कार्यक्षमता जास्त तास काम केल्यास कमी होत जाते. आठवड्याला ३० तासांहून जास्त काम करण्याचा मध्यमवयीनांच्या मेंदूच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामध्ये तुमच्या कामाचे स्वरुपही तुमची कार्यक्षमता ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते असेही या अभ्यासकांनी नोंदवले आहे. मात्र सरकारच्या म्हणण्यानुसार वयाच्या ६७ व्या वर्षापर्यंत कार्यरत राहणे हे नक्कीच फायदेशीर नसते. त्याचबरोबर तुम्हाला आवडणारे काम करणे आणि पुरेशा सुट्ट्या घेणे आवश्यक असल्याचे मतही या अभ्यासात नोंदविण्यात आले आहे.

Dr. Amit Murkute
Dr. Amit Murkute
MBBS, Dermatologist Hair Transplant Surgeon, 6 yrs, Pune
Dr. sandeep shivekar
Dr. sandeep shivekar
BHMS, Diabetologist, 10 yrs, Pune
Dr. Aarti Vyas
Dr. Aarti Vyas
BAMS, Ayurveda Panchakarma, Pune
Dr. Sandeep Sandbhor
Dr. Sandeep Sandbhor
MS/MD - Ayurveda, General Medicine Physician, 16 yrs, Pune
Dr. Kirti Dagor
Dr. Kirti Dagor
BAMS, Ayurveda Panchakarma, 11 yrs, Pune
Hellodox
x