Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Blood Pressure :
Blood Pressure is a silent killer. High blood pressure can quietly damage your body before actual symptoms get visible. Left uncontrolled, you may end up with disability, poor quality of life or even fatal heart attack. Read the symptoms & signs for this silent killer.

तणावग्रस्त आणि झपाट्याने बदलत जाणार्‍या आपल्या लाईफस्टाईलचा आरोग्यावर गंभीरपणे परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढता ताणताणाव रक्तदाबाची समस्या वाढवण्यामागील एक कारण आहे. हा त्रास कमी करण्यासाठी केवळ औषध उपचार पुरेसे नाहीत. कारण एका टप्प्यानंतर औषधोपचारांचेही साईड इफेक्ट्स दिसतात. त्यामुळे तुम्हांलाही उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यावर मात करण्यासाठी काही नैसर्गिक उपायांचीही मदत होऊ शकते.

उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नैसर्गिक उपाय -
स्ट्रेन्थ ट्रेनिंग -
स्ट्रेन्थ ट्रेनिंगमुळे रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते. वेट ट्रेनिंग, क्रन्चेस अशा व्यायाम नियमित करणं फायदेशीर ठरते.

स्विमिंग -
स्विमिंगदेखील एक उत्तम व्यायामप्रकार आहे. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी स्विमिंग हा उत्तम कार्डिओ व्यायामप्रकार आहे.


ब्रिस्क वॉकिंग -
30 मिनिटांचा ब्रिस्क वॉकिंग हा व्यायामप्रकार उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी उत्तम व्यायामप्रकार आहे.

ट्रेड मिल -
उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी ट्रेड मिलवर चालणं फायदेशीर आहे. 10 मिनिटं ट्रेड मिलवर चालायला सुरूवात करा. हळूहळू तुमचा वेग वाढवा.

योगा -
नियमित योगासनं केल्यानेही उच्च रक्तदाबाचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. योगासनाचा अभ्यास कोणीही आणि कुठेही करू शकतो त्यामुळे योगासनं करणं हा सोयीस्कर मार्ग आहे. यामध्ये पुरेशी काळजी घेतल्यास इजा होण्याचा धोका कमी होतो.

घरच्या घरी व्यायाम -
घरच्या घरी रश्शी उड्या मारणं, मेडिसीन बॉलसोबत व्यायाम करणं, हलकेच स्ट्रेचिंग करणं अशा व्यायामप्रकारांमुळे उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

मसाज -
उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी व्यायामापूर्वी वॉर्म अप करणं आणि व्यायामानंतर शरीराला थंड होण्यासाठी पुरेसा वेळ देणं गरजेचे आहे. वाढलेली हृद्याची धडधड पुन्हा सामान्य स्वरूपात आणण्यासाठी त्याची मदत होते.

मश्रुममध्ये बरेच महत्त्वपूर्ण खनिज आणि जीवनसत्त्व असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयरन आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. त्याशिवाय मश्रुममध्ये कोलीन नावाचा एक खास पोषक तत्त्व असतो, जो स्नायूंमध्ये सक्रियता आणि स्मरणशक्ती कायम ठेवण्यासाठी फारच फायदेशीर असतो.

1. मश्रुममध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते.

2. मश्रुममध्ये उपस्थित तत्त्व रोग प्रतिरोधक क्षमतेला वाढवतात. याने सर्दी पडसं सारखे आजार वारंवार होत नाही. मश्रुममध्ये उपस्थित सेलेनियम इम्यून सिस्टमच्या रिस्पॉन्सला उत्तम बनवतो.

3. मश्रुम विटामिन डी चा चांगला पर्याय आहे. हे व्हिटॅमिन हाडांच्या मजबुतीसाठी फारच गरजेचे आहे. मश्रुमाचे सेवन नियमित केले तर आमच्या आवश्यकतेचे 20 टक्के व्हिटॅमिन डी आम्हाला मिळून जात.

4. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कार्बोहाइड्रेट्स असतात, ज्याने वजन आणि ब्लड शुगर लेवल वाढत नाही.

5. मश्रुममध्ये फारच कमी मात्रेत कोलेस्टरॉल असल्यामुळे याचे सेवन केल्याने बर्‍याच वेळेपर्यंत भूक लागत नाही.
त्या शिवाय मश्रुम केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फार फायदेशीर आहे. काही स्टडीत असे आढळून आले आहे की मश्रुमच्या सेवनामुळे कँसर होण्याची आशंका कमी असते.

हायपर टेंशनशी लढत असलेले लोक, आपल्या लाइफस्‍टाइलमध्ये जर थोडेही बदल केले तर त्यांना ह्या समस्येपासून लवकरच सुटकारा मिळू शकतो. तसेच औषधांचे देखील सेवन करावे लागणार नाही.

डॉक्‍टर्सचे मानने आहे की हायपर टेंशनने लढत असणारे लोक, नियमित रूपेण सक्रिय राहिल्या पाहिजे, फिरणे आणि आनंदी राहिल्याने त्यांना ह्या आजारापासून दूर करण्यास मदत मिळेल. उच्‍च रक्‍तदाबाला दूर करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला जंक फूडचे सेवनाला लगाम लावावी लागणार आहे आणि घरातील तयार केलेले अन्नाचे सेवन करणे गरजेचे आहे. प्रयत्न असा असायला पाहिजे की मीठाचा वापर कमीत कमी करावा. कमी मीठ, वाढललेल्या रक्तदाबाला कंट्रोलमध्ये करते आणि तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते.

मीठ कमी करण्याशिवाय, तुम्हाला काही प्राकृतिक उत्‍पादनांचे सेवन देखील करायला पाहिजे, यामुळे रक्‍तदाब नियंत्रणात रहील. यामध्ये
प्राकृतिक उपायम्हणजे वेलची आहे. हो खरच आहे, वेलची फक्त स्वादच नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. याची चव हलकी गोड असते तर तुम्ही याला भात शिवजताना देखील घालू शकता. वेलचीमध्ये एंटीऑक्‍सीडेंटपण असतात जे शरीराला फिट ठेवतात.

वेलचीचा प्रयोग कसा करावा ?
तुम्ही चहा तयार करताना देखील वेलचीची पूड करून घालू शकता. भात किंवा पुलावमध्ये देखील तुम्ही वेलचीचा वापर करू शकता. पाचन क्रियेल दुरुस्त ठेवते आणि माउथफ्रेशनरचे देखील काम करते.

ज्या लोकांचा रक्‍तदाब फार जास्त वाढतो त्यांनी रोज किमान चार वेलचीचे सेवन केले पाहिजे. जर तुम्हाला खाण्यात टाकायची नसेल तर तुम्ही चावून खाऊ शकता.

घाबरू नका, पण काळजीही घ्या!

डॉक्टरांकडे तुम्ही रोजच्या तपासणी गेलेले असताना मध्ये जर तुमचे ब्लडप्रेशर वाढलेले मिळाले तर काय करावे? ब्लडप्रेशर वाढलेले आहे, म्हणून घाबरुन जाऊ नये. कारण ब्लडप्रेशर वाढले आहे,म्हणजे लगेच तुम्हाला काही त्रास झाला; असे सहसा होत नाही.मात्र त्याकडे दुर्लक्ष मात्र अजिबात करु नये. महत्त्वाचे म्हणजे “आत्ता मी चालून आलो म्हणून, आज जरा ऑफ़िसमध्ये वादावादी झाली म्हणून, आज घरी थोडे भांडण झाले म्हणून ब्लडप्रेशर वाढले असेल ’, अशाप्रकारे या किंवा त्या कारणामुळे ब्लडप्रेशर वाढले असेल असे तर्क लढवत बसू नका.
आता प्रश्न हा आहे की खरोखरच तुम्हाला उच्च-रक्तदाबाचा (हाय-ब्लडप्रेशरचा) त्रास आहे का?

एकाच तपासणीमध्ये रक्तदाब वाढलेला मिळाला म्हणून सहसा उपचार सुरु केला जात नाही. अर्थात ब्लडप्रेशर मर्यादेच्या बाहेर वाढलेले असेल ; म्हणजे सिस्टॉलिक(वरचा आकडा) १८०च्या वर आणि डायस्टॉलिक (खालचा आकडा) १२० च्या वर असेल; तर मात्र ताबडतोब उपचारांची गरज लागेल. कसेही असले तरी तुम्हाला त्वरित औषधांची गरज आहे वा नाही याचा निर्णय तुमचे डॉक्टर घेतीलच.

अन्यथा एकाच वेळी ब्लडप्रेशर तपासून तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण आहात, हा निर्णय घेता येत नाही. तुम्हाला हाय-ब्लडप्रेशरचा त्रास आहे, हे निश्चित करण्यासाठी नियमितपणे काही दिवस ब्लडप्रेशर तपासायला हवे. आपल्याला खरोखरच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे का याची खात्री करुन घेण्यासाठी वेगवेगळ्या वेळी म्हणजे कधी सकाळी तर कधी सायंकाळी, तर कधी उशिरा रात्री याप्रकारे काही दिवस ब्लडप्रेशर तपासावे. कारण ब्लडप्रेशर कोणत्या वेळी वाढते व कोणत्या वेळी वाढत नाही हे जाणून घेणे उपचाराच्या दृष्टीनेही महत्त्वाचे असते. तसेच ब्लडप्रेशर वेगवेगळ्या जागी; कधी एका डॉक्टरांकडे तर कधी दुस~या डॉक्टरांकडे किंवा शक्य असल्यास कधी घरी सुद्धा तपासावे.

नियमितपणे ब्लडप्रेशर तपासल्यानंतर जर ब्लडप्रेशर वाढलेलेच मिळत असेल तर मात्र आपल्या भविष्यासाठी (खरं तर जीवितासाठीच) ती धोक्याची घंटा वाजली आहे असे समजून उपचाराकरिता तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे, कारण उपचार न केलेला उच्च रक्तदाब हे अनेक गंभीर आजारांमागचे मूळ कारण असते.

मुंबई : जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्ताने २० ते ३० या वयोगटातील तरुणांमध्ये एक सर्वेक्षण करण्यात आले. यातून असे दिसून आले की, तब्बल ४३ टक्के तरुणांना रक्तदाबाची सामान्य पातळी माहीतच नसते. गेल्या काही वर्षांत उच्च रक्तदाब आणि त्याच्याशी संबंधित आजार असलेल्या तरुणांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. असे असूनही तरुण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

या सर्वेक्षणानुसार ३० ते ६० या वयोगटातील ३० टक्के व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. आॅनलाइन सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ५०० व्यक्तींपैकी १९४ व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांच्यापैकी २४ व्यक्ती २०-३० या वयोगटातील आणि १५० व्यक्ती ३० ते ५० या वयोगटातील होत्या. यांच्यापैकी केवळ २३ व्यक्ती दर महिन्याला त्यांचा रक्तदाब तपासून घेतात. रक्तदाबाची सामान्य पातळी ९० ते १४० आहे आणि ५०० जणांपैकी केवळ २१८ व्यक्तींनाच ही आकडेवारी माहीत होती.

याविषयी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रतीक सोनी यांनी सांगितले की, आजच्या विकसनशील देशांमध्ये जीवनशैली, ताण, कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण आणि खानपानाच्या सवयी बदलल्या पाहिजेत. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत थोडी तरी शिस्त पाळणे आवश्यक आहे.

Dr. Chhaya Helambe
Dr. Chhaya Helambe
BAMS, Ayurveda Family Physician, 20 yrs, Pune
Dr. Rajendra kadam
Dr. Rajendra kadam
BAMS, Ayurveda, 10 yrs, Pune
Dr. Kusum Garudkar
Dr. Kusum Garudkar
MS/MD - Ayurveda, Family Physician Ayurveda, 23 yrs, Pune
Dr. Neha  Khandelwal
Dr. Neha Khandelwal
BHMS, Homeopath Family Physician, 5 yrs, Pune
Dr. Abhay Jamadagni
Dr. Abhay Jamadagni
MS/MD - Ayurveda, Ayurveda, 8 yrs, Pune
Hellodox
x