MS/MD - Ayurveda Ayurveda Family Physician 4 Years Experience, Maharashtra
आपल्यापैकी ब-याच जणाांना रात्री काही केल्या झोप येत नाही.
दिवसभराच्या कामाने मन-शरीर थकलां असलां तरी झोप मात्र लागत नाही, मग whats app, fb, you tube असतांच साथीला.....झोप येईपयंत किंवा वा सकाळपर्य़ंत...! झोप लागली नाही की मग दुसरा दिवस डोकां जड होणां, चिडचिड होणां, कामात लक्ष न लागणां यात जातो. रात्र झाली की मग पुन्हा आपण, घड्याळ आणि mobile/ laptop.
खरां तर निद्रा अर्थात झोप हा आयुष्याच्या तीन महत्वाच्या आधाराच्या खांबाांपैकी एक. झोप पुरेशी घेतली जाणां- न जाणां यावर आरोग्य, बुद्धि, आकलन होणे, शक्ती, पुनरुत्पादन क्षमता या गोष्टी अवलांबून आहेत. त्यामुळे झोप न लागणे या गोष्टीकडे पुरेशा गाांभीयााने लक्ष दिले पाहीजे.
वेळेवर झोप यावी यासाठी पुढील उपाय अवश्य करावेत -
१) रात्री म्हशीचे दूध तूप घालून प्यावे. ( रात्रीचे जेवण आणि दूध यात कमीत कमी तासदीड्तासाचे अंतर हवे.)
२) जेवणात दही, तूप यांचा आवर्जून समावेश करावा. (दही रात्री खाऊ नये. दुपारच्या जेवणात, नाश्त्याला दह्याचा समवेश केल्यास त्याबरोबर खडीसाखर, तूप, मुगाचे वरण, आवळा याांपैकी काहीतरी असावे.)
३) सवा शरीराला नियमित मसाज करावा. यासाठी चंदनबलालाक्षादि तेल, बला तेल इ. वापरावे. उपलब्धता नसल्यास तीळाचे तेलही चालेल.
४) डोक्याला आवर्जून तेल लावून मसाज करावा. पाण्याचा तळवयांनाही मसाज करावा.
५) आवडीचे सुगंध , अत्तरे वापरावीत.
६) झोपण्याची जागा प्रसन्न, शांत असावी. गादी-उशी पुरेशी आरामदायी असावी.
७) ठराविक वेळी TV, mobile, tab, laptop बंध करुन कामाच्या- ताणाच्या विषयांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे.
हे सर्व उपाय नियमित करूनही महिन्याभरात उपयोग न झाल्यास वैद्यांचा सल्ल्याने शिरोधारा , शिरोपिचु, नेत्रतर्पण व गरजेनुसार औषधोपचार करावे.