कच्ची पपई खायला आपल्यातील अनेकांना आवडत नाही. मात्र कधी पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. खासकरुन तुमच्या यकृतासाठी उत्तम असते. कावीळ झालेली असल्यास व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. त्यावेळेस कधी पपई खाणे फायद्याचे ठरू शकते.
कच्च्या पपईत मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व 'अ', 'ई' आणि 'क' असते. ही जीवनसत्त्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. सर्दी आणि पडसे यांचा कोणाला त्रास असेल कच्ची पपई खावी. मूत्रसंबंधी समस्यांचेही कधी पपई निराकरण करू शकते.
शरीरावर अनेक नको असलेले केस उगवतात. हे अनावश्यक केस खराब दिसतात. दरवेळी वॅक्स आणि शेव्हिंग करण्याऐवजी पपईचा वापर करावा. हा उपाय कोणत्याही दुखापतीशिवाय होतो.
कच्च्या पपईत असणारे पैपिन नावाचे एंझाईम हे शक्तीवर्धक असते आणि शरीराची ताकद वाढवण्यासही मदत करते.
आपल्या शरीरावर त्यातही पोटावर जमणारी चरबी ही आरोग्यासाठी घातक असते , मोठे पोट (कंबरेचा घेर मोठा) असणाऱ्याला वेगवेगळ्या आजारांचा धोका संभवतो, हे आपल्याला ऐकून ऐकून माहीत झाले आहे. मात्र पोटावरील चरबी अनारोग्यास आमंत्रण देते म्हणजे नेमके काय करते हे आपल्याला माहीत नसते. ते जाणून घेऊ.
· मोठे पोट असणाऱ्याला सर्वाधिक धोका संभवतो, तो म्हणजे ’इन्सुलिन-रेसिस्टन्स’चा! ‘इन्सुलिन-रेसिस्टन्स’मध्ये शरीर-कोष इन्सुलिनला जुमानत नाहीत व त्यामुळे रक्तामध्ये साखर वाढत जाते. शरीराला अधिकाधिक इन्सुलिनची निर्मिती करावी लागते व रक्तात वाढलेले हे इन्सुलिनचे प्रमाण केवळ मधुमेहच नव्हे तर हार्ट अटॅकलाही आमंत्रण देते.
· पोटावरील चरबी रक्तामध्ये काही रसायने (केमिकल्स) सुद्धा सोडते, ज्यामुळे शरीर ’मेटाबोलिक सिन्ड्रोम’ या विकृतीच्या दिशेने पुढे जाते.
· पोटावरील चरबीमुळे असे काही हाॅर्मोनल परिणाम होतात की ज्यामुळे त्या व्यक्तीचे स्वतःच्या भुकेवर व खाण्यावरही नियंत्रण राहत नाही.
· पोटावरील चरबी रक्तामध्ये फॅटी-ॲसिड्स (मेद-अाम्ले) सोडते,या फ़ॅटी-ॲसिड्सचेच रुपांतर घातक एलडीएल ( वाईट) कोलेस्टेरॉलमध्ये होते, ज्याचे सूक्ष्म कण रक्तवाहिनीमध्ये रुतून अडथळा (ब्लॉक) तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
· याशिवाय पोटावरील चरबीमुळे रक्तामध्ये अशी काही केमिकल्स स्रवतात ,ज्यांमुळे सूज-प्रक्रिया (inflammatory process) सुरू होते. शरीरामध्ये सूज-प्रक्रिया ही जखम वगैरे भरण्यापुरती तात्पुरती असते, मात्र पोटावरील चरबीमुळे कधीच न थांबणारी अशी सूज-प्रक्रिया सुरू होते.
ही सूज-प्रक्रिया एलडीएल (LDL cholesterol)च्या कणांना एकप्रकारे गंजवून अधिक घातक बनवते.हेच एलडीएलचे कण रक्तवाहिनी चिंचोळी करतात व रक्तवहनामध्ये अडथळा तयार करतात.
एकंदरच पोटावरील चरबी हा आरोग्याला किती भयंकर धोका आहे,हे तुमच्या लक्षात आले असेलच! पुढचे संपूर्ण शतक भारताला ’मोठ्या पोटांच्या’ या समस्येला तोंड द्यायचे आहे.
निद्रानाश, नैराश्य आणि मधुमेह यांसारख्या समस्या आनुवंशिक असण्याची संभावना संशोधकांनी वर्तवली आहे.
झोपेच्या समस्यांना कारणीभूत ठरणारी विशिष्ट जनुके संशोधकांना आढळून आली असून निद्रानाश, त्याचप्रमाणे नैराश्यासारखे मानसिक विकार, मधुमेह यांमध्ये आनुवंशिक दुवा आढळून आला आहे. निद्रानाशामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. हा अभ्यास ‘मॉलीक्युलर सायकीयाट्री’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
दीर्घकाळ निद्रानाशाने त्रस्त असणाऱ्यांना दयविकार आणि मधुमेह होण्याची संभावना असते. त्याचप्रमाणे त्यांच्यात मानसिक विकार उद्भवण्याची शक्यता असते. यापूर्वी झालेल्या अभ्यासांमध्ये झोपेबाबत गुणधर्म स्पष्ट केले असून यामध्ये निद्रानाशाचा समावेश आहे. या विकारासाठी नव्या उपचार पद्धती विकसित करण्यासाठी निद्रानाशाबाबत अधिक माहिती आवश्यक आहे, असे अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील म्युरे स्टाईन यांनी सांगितले. या अभ्यासासाठी संशोधकांनी ३३,००० सैनिकांचे ‘डीएनए’ नमुने गोळा केले होते. यासाठी युरोपीय, आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकी वंशातील सैनिकांचे वेगळ्या गटात वर्गीकरण करण्यात आले होते. अभ्यासात मिळालेल्या परिणामांची तुलना यापूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासातील परिणामांशी करण्यात आली. यामध्ये मधुमेह आणि निद्रानाश यांच्यामध्ये जनुकीय संबंध असल्याचे आढळले. यावेळी युरोपीय वंशातील लोकांमध्ये आनुवंशिकतेने नैराश्याचा धोका असल्याचेदेखील आढळून आले.
मानवी शरीरातून टाकाऊ घटक बाहेर टाकण्याचे मुख्य काम मूत्रसंस्था (किडनी) करते, हे आपण पाहिले.मूत्रपिंडात असलेल्या असंख्य सूक्ष्म गाळण्यांमधून पाणी व टाकाऊ घटक गाळल्यानंतर शरीरात मूत्राची निर्मिती होते. वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालू राहत असल्याने अंदाजे वयाच्या तिशी-चाळीशीनंतर नैसर्गिकरित्या किडनीचे कार्य मंदावते. तिशीनंतर दर दहा वर्षांनी किडनीचे कार्य दहा टक्क्यांनी मंदावतजाते, असे दिसते. मात्र त्या आधीच्या टप्प्यातच किडनीवर अतिरिक्त ताण दिला जात असेल, तर किडनीविकार लवकर बळावण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच शाळांमध्ये अधिक प्रमाणात व स्वच्छ अशी स्वच्छतागृहे असावीत आणि मुलांना मधल्या सुटीत लघवीला आवर्जून पाठवावे, असा आग्रह असतो.
अभ्यासाच्या किंवा कामाच्या ताणाखाली, चित्रपट-नाटक पाहताना, पुस्तक वाचताना लघवीचा आवेग रोखला जातो. असे वारंवार घडत असेल तरी त्याचा किडनीवर ताण येतो. किडनीची काळजी घेण्यासाठी दहा उपाय नक्की करून पाहा.
१) रोज भरपूर पाणी प्या - नियमित भरपूर पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राहते व विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासही मदत होते. पाण्यामुळे शरीरात रक्त योग्य प्रकारे प्रवाहित राहते. तसेच पचनक्रिया व शरीराचे तापमान योग्य राखण्यास पाणी सहायकारी ठरते. म्हणूनच नियमित दीड ते दोन लिटर पाणी दिवसभरात पिणे आवश्यक आहे. अधिक काटेकोर सांगायचे तर साधारणतः तुम्हाला जेवढी लघवी होते, त्याहून अर्धा लिटर पाणी अधिक प्या.
२) योग्य आहार घ्या - तुम्ही काय आहार घेता, यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते. जर फ़ास्टफूड, जंकफूड यासारखे अपायकारी अन्नपदार्थ अधिक प्रमाणात व वारंवारखाल्ल्यास त्याचा दुष्परिणाम किडनीवर निश्चितच दिसून येतो.म्हणूनच योग्य व सकस आहार निवडा. आहारात कलिंगड, संत्रे, लिंबू यासारखी फळे आणि शतावरी, लसूण, मासे यांचा समावेश असावा. रोजचा दिवस लिंबाचा रस घातलेले कोमट पाणी पिऊन सुरू झाला तर तुमच्या किडनीचे आरोग्य सुधारण्यास खूप मदत होईल.
३) मूत्राचा आवेग रोखू नका - रक्त गाळून त्यातील टाकाऊ घटक शरीराबाहेर टाकण्याचे काम किडनी करीत असते. हे शरीरातील टाकाऊ घटक व अतिरिक्त पाणी मूत्राशयात साठून राहतात. अंदाजे दीडशे-दोनशे मिलिलिटर मूत्र मूत्राशयात साचल्यानंतर लघवीची इच्छा निर्माण होते. अशा वेळेस लघवी अडवून ठेवू नका. लघवीचा आवेग वारंवार रोखल्याचा ताण मूत्राशयावर येऊन रक्त गाळण्याच्या प्रक्रियेत बिघाड होऊ शकतो.
४) मीठ अतिप्रमाणात खाऊ नका - मिठाच्या सेवनाने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. सोडियम वाढल्यामुळे रक्तदाबाची समस्या वाढतेच, पण त्या सोबतच मुतखडा होण्याचाही संभव अधिक असतो.
५) आरोग्यदायी पेय घ्या - फळांचा ताजा रस घेणे हे किडनीचे आरोग्य सुधारण्याचा व शरीरात अधिकाधिक द्रवाचा समावेश करण्याचा एक सोपा मार्ग आहे. यामुळे पचनसंस्थेला अधिकाधिक पाणी मिळेल व त्यामुळे टाकाऊ घटक शरीराबाहेर टाकण्यास मदत होईल. ‘चहा’ व ‘कॉफी’ घेणे टाळा. यातील ‘कॅफिन’च्या घटकामुळे शरीरातील द्रवाचे प्रमाण कमी होते. जर तुम्हाला किडनीविकार असेल तर बीट व पालक या भाज्यांचा रस घेणे टाळा. या भाज्यांमुळे ‘ऑझॅलिक’ या आम्लाची (ॲसिडची) निर्मिती वाढते व त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता वाढते. आणि हो, तुम्ही शहाळ्याचे पाणी अवश्य पिऊ शकता.
६) योग्य व नियमित व्यायाम करा - लठ्ठपणाचा थेट परिणाम किडनीवर होत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. वजन नियंत्रणात नसल्यास किडनीविकार होण्याची शक्यता दुप्पटीने वाढते. योग्य व्यायाम, आहार व नियंत्रणात असलेले वजन यांमुळे किडनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच नियमित व्यायाम केल्याने तुम्ही प्रसन्न राहता.
७) मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग काबूत ठेवा - मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग यासारख्या आजारांतून ‘किडनीविकार’ बळावण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच योग्य आहार, व्यायाम व योगसाधनेने तुम्ही रक्तातील साखर,कोलेस्टेरॉल व रक्तदाब नियंत्रणातठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपोआपच किडनीविकार दूर राहण्यास मदत होईल.
८) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळा - तुम्ही घेतलेले कोणतेही औषध हे किडनीतून गाळले जाते. जर तुम्ही स्वतःच औषधांची मात्रा वाढवली किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अन्य औषधे घेतली तर त्यातील विषारी घटकांचा भार किडनीवर पडतो. म्हणूनचडॉक्टरांच्या सल्ल्यानुसारऔषधांची मात्रा घ्या वस्वतःच स्वतःची औषधे ठरवणे टाळा.
९) पूरक (सप्लिमेंटस्)व हर्बल औषधे घेण्यापूर्वी विचार करा - जर तुम्ही पूरक (सप्लिमेंटस् ) व्हिटामिन किंवाहर्बल औषधेंघेतअसाल तर त्याच्या मात्रांचा जरूर विचार करा. अतिरिक्त प्रमाणात घेतलेल्याव्हिटामिन व काही वनस्पतींच्या अर्कांचा किडनीवर विपरित परिणाम होतो. म्हणूनच अशी औषधें घेण्यापूर्वीडॉक्टरांशी त्यातून किडनीविकार उद्भवण्याच्या शक्यतेबाबत जरूर सल्ला घ्या.
१०) धूम्रपान व मद्यपान टाळा - अतिरिक्त प्रमाणात मद्यपान केल्यास शरीरात किडनीचे कार्य सुरळीत करणाऱ्या संप्रेरकांवर (हार्मोन्सवर) दुष्परिणाम होतो. धूम्रपानामुळे थेट किडनीवर परिणाम होत नसला तरीही त्यामुळे हृदयरोग बळावण्याची शक्यता अधिक असते व त्याचा अप्रत्यक्ष परिणाम किडनीच्या कार्यावर होतो.
युटिलिटी डेस्क: मोसंबीचा ज्यूस सर्व हवामानांमध्ये प्यायला जातो. मात्र उन्हाळ्यामध्ये हा ज्यूस पिणाऱ्यांची संख्या अधिक असते. कदाचित तुम्हाला मिहिती नसेल की, मोसंबीचा ज्यूस किती फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटामीन सी आणि पोटेशिअम, जिंक, कॅल्शियम, फायबर आढळतो. यासोबत यामध्ये कॉपर आणि आयरनही काही प्रमाणात असतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये कॅलोरी आणि फॅट खुप कमी असते. हे पिण्याचे खुप फायदे आहे मात्र यामध्ये आढळणारे पोषकांमुळे हे काही लोकांनी प्यायलाच हवे.
आयुर्वेदिक डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, मोसंबीचा उपयोग पोषक आहाराच्या रूपामध्ये होतो. 15 दिवसांपर्यंत फ्रिजच्या बाहेर ठेवले जावू शकते. हे लिंबूच्या प्रजातीचेच फळ आहे. मात्र, हे त्याहून अनेक पट्टींने लाभदायक मानले जाते. या ज्यूसला जर कमीत कमी साखरेशिवाय किंवा विना पाण्याविना घेतल्यास अधिक फायदेशीर ठरते. साखर टाकल्याने त्यामधील कॅलोरीजची क्वांटिटी वाढते. पोटदुखी, त्वचा संबधी आजार, सांधेदुखी ने पिडित लोकांनी प्यायला हवे. याने अपचनाचा विकारही दुर पळवला जावू शकतो.