Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

उन्हाळ्यामुळे शरीराची होणारी लाहीलाही दिवसेंदिवस वाढत आहे. या उकाड्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. तापमानाचा पारा वाढत असताना आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भारतीय आहारात शरीराला थंडावा देणारे अनेक पदार्थ आहेत. या पदार्थांचा आहारातील समावेश वाढविल्यास निश्चितच फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात या पदार्थांविषयी…

गुलकंद

गुलाब पाकळ्या, साखर आणि अन्य काही वनौषधींचा वापर करून बनवण्यात येणारा गुलकंद हा उन्हाळ्यात आहारात असावा असा एक उत्तम पदार्थ आहे. उन्हाळ्याच्या दिवसात येणारा थकवा दूर करण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील टवटवीतपणा टिकून राहण्यासाठी गुलकंद उपयुक्त ठरतो. सकाळी उठल्यावर एक चमचा आणि दुपारच्या तसेच रात्रीच्या जेवणांनंतर अर्धा चमचा गुलकंद खाल्ल्यास उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे उष्णतेचे त्रास कमी होण्यास मदत होते.

आंबा

फळांचा राजा हे उन्हाळ्यात येणारे खास फळ आहे. या दिवसांत आंबा खाल्ल्याने शरीरातील उत्साह आणि ताकद टीकून राहण्यास मदत होते. मात्र तो कसा खावा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. खाण्यापूर्वी आंबा २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा. चवीला हवेहवेसे वाटणारे हे फळ शरीरातील क्रिया सुरळीत होण्यासाठीही उपयुक्त असते. आंबा गोड असल्याने त्यामुळे वजन तसेच रक्तातील साखर वाढते असा आपला समज असतो. मात्र आंबा खाल्ल्याने वजन कमी होते असे काही अभ्यासांतून समोर आले आहे.

जिरे

हा पदार्थ आपण रोजच्या जेवणात वापरतो. मात्र त्याचे गुणधर्म आपल्याला माहित असतीलच असे नाही. शरीरात साठलेला मेद कमी करण्यासाठी तसेच नसांना आराम देण्यासाठी जिरे उपयोगी असते. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला हवा असलेला थंडावा मिळतो.

दही

उन्हाळ्याच्या दिवसांत बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होणाऱ्यांसाठी दही खाणे एक उत्तम उपाय आहे. मात्र हे दही घरी लावलेलं असावं. याबरोबरच दहीभाताचा जेवणात समावेश करावा, त्याचा चांगला फायदा होतो.

नारळ पाणी

उन्हामुळे या दिवसांत डिहायड्रेशनमुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक कमी होतात. त्याचे प्रमाण योग्य ते रहावे यासाठी नारळ पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी तसेच सतत येणारे क्रॅम्प्स आणि डिहायड्रेशन यावर नारळ पाणी उत्तम आणि सोपा उपाय होय.

कोकम सरबत

कोकम सरबत हे उन्हाळ्यातील समस्यांवर उत्तम उपाय आहे. कोकम लठ्ठपणावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरते. तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ नये म्हणून तसेच इतरही अनेक समस्यांवर कोकम उपयुक्त ठरते.

मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट म्हणजे मसाले. या मसाल्याच्या पदार्थांमध्ये प्रामुख्याने वापरलं जाणारं आलं हे जसे पदार्थांची चव वाढवते तसेच ते आरोग्यालाही हितकारी आहे.
आलं किंवा सुकवलेलं सुंठ हे दोन्ही आयुर्वेदीक औषधांमध्ये हमखास वापरले जाते. म्हणूनच आजारपणांना दूर ठेवण्यासाठी आहारात आल्याचा नियमित वापर केल्याने कमी होईल या समस्यांचा धोका.

पित्ताचा त्रास
पित्ताचा त्रास झाल्यानंतर अनेकजण अ‍ॅन्टासिड घेतात. मात्र वारंवार अ‍ॅन्टासिड घेणेही आरोग्याला त्रासदायक ठरते. त्यामुळे पित्ताचा त्रास जाणवत असल्यास आल्याचा लहानसा तुकडा चघळत राहिल्याने आरोग्याला फायदा होतो. पित्ताच्या समस्येवर सतत अ‍ॅन्टासिड घेण्याची सवय करते आरोग्यावर 'हा' गंभीर परिणाम

दातदुखी
कच्चं आलं चावून खाल्ल्याने दातांचे आरोग्य सुधारते. दातदुखीपासून आराम मिळतो. आल्यामध्ये अ‍ॅन्टी बॅक्टेरियल एन्झाईम्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे लाळनिर्मितीला चालना मिळते. आल्याचा तुकडा चघळल्याने दातदुखी, हिरड्यांमधील सूज कमी होते. दातदुखीवर फायदेशीर ठरतील स्वयंपाकघरातील हे ४ पदार्थ!

फॅट कमी करते
आल्याचा तुकडा शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतात. यामुळे मेटॅबॉलिझम सुधारते. पचनाचा त्रास आटोक्यात राहतो.

विषारी घटक बाहेर पडतात
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी घाम हे एक माध्यम आहे. आल्याच्या सेवनामुळे घाम निर्माण होणं आणि विषारी घटक बाहेर पडणं या कार्याला चालना मिळते.

रक्तप्रवाह सुधारतो
आल्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि क्रोमियम हे घटक आढळतात. त्यामुळे आल्याच्या नियमित सेवनाने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारते. हृद्याचे आरोग्यही जपण्यास मदत होते.

रक्तदाब आटोक्यात
उच्च रक्तदाबामुळे हृद्याचे विकार जडण्याचा धोका असतो. आल्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

सर्दी - खोकल्याचा त्रास कमी होतो
आल्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. आल्याचा फयादा सर्दी खोकल्याचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. यामुळे घश्यातील खवखव कमी होते.

मासिकपाळीच्या दिवसातील त्रास कमी होतो
एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, महिलांना मासिकपाळीच्या दिवसामध्ये होणारा पोटदुखीचा, ओटीपोटाजवळ तीव्र वेदना जाणवण्याचा त्रास कमी होतो. अनेकजणी याकरिता पेनकिलर्सचा आधार घेतात. मात्र आल्याचा तुकडा चघळल्याने मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी होण्यास मदत होते. मासिकपाळीच्या दिवसातील वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर्स घेणं सुरक्षित आहे का?

डॉक्टर दीक्षित/जिचकार सरांच्या या साध्या सोप्या उपायाने शरीरात अतिरिक्त इन्सुलिनची निर्मिति होणे थांबते.त्यामुळे शरीरात पोटासारख्या चुकीच्या ठिकाणी जमा झालेली चरबी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली जाते.त्यामुळे पोट व वजन कमी होते. या उपायामुळे शरीर इन्सुलिनला अधिक संवेदनशील बनते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते किंवा मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो.

परिणाम:

वजन कमी होते, पोट कमी होते, मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो किंवा त्याची शक्यता कमी होते.

१) हा उपाय किंवा आहार योजना अठरा वर्षाखालील मुलांसाठी तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाही (मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टर दीक्षित सरांशी संपर्क साधावा व त्यानी परवानगी दिली तरच हा उपाय अमलात आणावा)

२) तुम्हाला खरी कड़क भूक केंव्हा लागते त्या दोन वेळा ओळखा. त्या दोन वेळानाच जेवण करा. ह्या वेळा व्यक्तिनुसार वेगवेगळ्या असू शकतात. सामान्यपणे सकाळी ९ व संध्याकाळी ६ किंवा दुपारी १ व रात्रि ९ अश्या भुकेच्या वेळा असतात. प्रत्येक जेवणासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५५ मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे. या वेळात तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खाऊ शकता.

३) या दोन जेवणाच्या व्यतिरिक्त जर भूक लागली तर खालील पदार्थ हवे तेवढे घेऊ शकता:

अ) पातळ ताक (हवे असल्यास चवीसाठी मीठ, जिरेपुड टाकू शकता)

ब ) २५% दूध व ७५% पाणी वापरून बनवलेला बिन साखरेचा चहा (शुगर फ्री, मध, गुळदेखील नको); ग्रीन टी/ब्ल्याक टी देखील चालेल

क) लिम्बु पाणी (विना साखरेचे)

ड) नारळ पाणी (शहाळ्यातील मलई खाऊ नका)

इ) टोमॅटो (जास्तीत जास्त १)

ई) काकड़ी तसेच ताकात किसून काकड़ी किंवा संत्र्याचा रस हे पदार्थ घेण्याची परवानगी नाही (आमच्या नविन संशोधनामुळे असा बदल करण्यात आला आहे...)

४) एकदा जेवणाच्या वेळा ठरल्या की त्या वेळानाच जेवा. पंधरा वीस मिनिटे वेळ मागे पुढे झाले तर चालते पण खूप बदल करू नका.

५) बाहेर गावी जाणे किंवा लग्न आदी समारंभ असे काही असल्यास त्या दिवशी तुम्ही या डाइट प्लॅनला सुट्टी देऊ शकता! दुसरया दिवसापासून लगेच प्रामाणिकपणे डाइट प्लान चालू करा.

६) दररोज ४५ मिनिटात ४.५ किलोमीटर चाला. हा व्यायाम आठवड्यातून पाच दिवस तरी करा.(हृदयाची गति वाढवणारा कोणताही व्यायाम करू शकता.)

७) हा उपाय सुरु करण्याच्या पहिल्या दिवशी खालील गोष्टी करा:

अ) सकाळी पोट साफ झाल्यावर वजन करा. नंतर दर महिन्याला त्याच वजन काट्यावर त्याच पद्धतीने वजन करा.

ब) बेम्बिपाशी पोटाचा घेर मोजा. दर महिन्याला पोटाचा घेर मोजा.

क) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level) तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यांनी परत करा.

ड) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन एचबीएवनसी (HbA1C) तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यानी परत करा.

८) तुमचे योग्य वजन असे काढ़ा: तुमच्या सेंटीमीटर मधिल उंचीतून १०० वजा केले म्हणजे तुमचे कमाल वजन तुम्हाला कळेल. हे तुमचे जास्तीत जास्त वजन असायला हवे. उदाहरणादाखल, एखाद्याची ऊँची १७० सेमी असेल तर त्याचे जास्तीत जास्त वजन ७० किलो असायला हवे.

९)जर या आहार योजने चे अवलंबन केल्यावर आपणास फायदा झाला तर दुसऱ्यांनाही या आहार योजनेत सहभागी होण्यास सांगा व "स्थूलत्व
आणि मधुमेह मुक्त "भारत" अभियानात सामिल व्हा.

या आहार योजनेमुळे व साध्या उपायाने खालील चार फायदे होतात:

१) वजन कमी होते

२) पोटाचा घेर कमी होतो

३) एचबीएवनसी (HbA1C) कमी होते

४) उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) कमी होते

म्हणून या उपायाने आपल्याला काय फायदा होत आहे हे कळण्यासाठी वजन आणि पोटाचा घेर दर महिन्याला मोजा तर एचबीएवनसी (HbA1C) आणि उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) दर तीन महिन्याला मोजा.

डॉक्टर दीक्षित/जिचकार सरांच्या या साध्या सोप्या उपायाने शरीरात अतिरिक्त इन्सुलिनची निर्मिति होणे थांबते.त्यामुळे शरीरात पोटासारख्या चुकीच्या ठिकाणी जमा झालेली चरबी ऊर्जा मिळवण्यासाठी वापरली जाते.त्यामुळे पोट व वजन कमी होते. या उपायामुळे शरीर इन्सुलिनला अधिक संवेदनशील बनते व त्यामुळे मधुमेह होण्याची शक्यता कमी होते किंवा मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो.

परिणाम:

वजन कमी होते, पोट कमी होते, मधुमेहाचा प्रतिबन्ध होतो किंवा त्याची शक्यता कमी होते.

१) हा उपाय किंवा आहार योजना अठरा वर्षाखालील मुलांसाठी तसेच मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाही (मधुमेहाच्या रुग्णांनी डॉक्टर दीक्षित सरांशी संपर्क साधावा व त्यानी परवानगी दिली तरच हा उपाय अमलात आणावा)

२) तुम्हाला खरी कड़क भूक केंव्हा लागते त्या दोन वेळा ओळखा. त्या दोन वेळानाच जेवण करा. ह्या वेळा व्यक्तिनुसार वेगवेगळ्या असू शकतात. सामान्यपणे सकाळी ९ व संध्याकाळी ६ किंवा दुपारी १ व रात्रि ९ अश्या भुकेच्या वेळा असतात. प्रत्येक जेवणासाठी तुम्हाला जास्तीत जास्त ५५ मिनिटांचा वेळ उपलब्ध आहे. या वेळात तुम्हाला जे खायचे ते तुम्ही खाऊ शकता.

३) या दोन जेवणाच्या व्यतिरिक्त जर भूक लागली तर खालील पदार्थ हवे तेवढे घेऊ शकता:

अ) पातळ ताक (हवे असल्यास चवीसाठी मीठ, जिरेपुड टाकू शकता)

ब ) २५% दूध व ७५% पाणी वापरून बनवलेला बिन साखरेचा चहा (शुगर फ्री, मध, गुळदेखील नको); ग्रीन टी/ब्ल्याक टी देखील चालेल

क) लिम्बु पाणी (विना साखरेचे)

ड) नारळ पाणी (शहाळ्यातील मलई खाऊ नका)

इ) टोमॅटो (जास्तीत जास्त १)

ई) काकड़ी तसेच ताकात किसून काकड़ी किंवा संत्र्याचा रस हे पदार्थ घेण्याची परवानगी नाही (आमच्या नविन संशोधनामुळे असा बदल करण्यात आला आहे...)

४) एकदा जेवणाच्या वेळा ठरल्या की त्या वेळानाच जेवा. पंधरा वीस मिनिटे वेळ मागे पुढे झाले तर चालते पण खूप बदल करू नका.

५) बाहेर गावी जाणे किंवा लग्न आदी समारंभ असे काही असल्यास त्या दिवशी तुम्ही या डाइट प्लॅनला सुट्टी देऊ शकता! दुसरया दिवसापासून लगेच प्रामाणिकपणे डाइट प्लान चालू करा.

६) दररोज ४५ मिनिटात ४.५ किलोमीटर चाला. हा व्यायाम आठवड्यातून पाच दिवस तरी करा.(हृदयाची गति वाढवणारा कोणताही व्यायाम करू शकता.)

७) हा उपाय सुरु करण्याच्या पहिल्या दिवशी खालील गोष्टी करा:

अ) सकाळी पोट साफ झाल्यावर वजन करा. नंतर दर महिन्याला त्याच वजन काट्यावर त्याच पद्धतीने वजन करा.

ब) बेम्बिपाशी पोटाचा घेर मोजा. दर महिन्याला पोटाचा घेर मोजा.

क) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level) तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यांनी परत करा.

ड) पैथोलोजी ल्याबमधे जाऊन एचबीएवनसी (HbA1C) तपासून घ्या. ही तपासणी दर तीन महिन्यानी परत करा.

८) तुमचे योग्य वजन असे काढ़ा: तुमच्या सेंटीमीटर मधिल उंचीतून १०० वजा केले म्हणजे तुमचे कमाल वजन तुम्हाला कळेल. हे तुमचे जास्तीत जास्त वजन असायला हवे. उदाहरणादाखल, एखाद्याची ऊँची १७० सेमी असेल तर त्याचे जास्तीत जास्त वजन ७० किलो असायला हवे.

९)जर या आहार योजने चे अवलंबन केल्यावर आपणास फायदा झाला तर दुसऱ्यांनाही या आहार योजनेत सहभागी होण्यास सांगा व "स्थूलत्व
आणि मधुमेह मुक्त "भारत" अभियानात सामिल व्हा.

या आहार योजनेमुळे व साध्या उपायाने खालील चार फायदे होतात:

१) वजन कमी होते

२) पोटाचा घेर कमी होतो

३) एचबीएवनसी (HbA1C) कमी होते

४) उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) कमी होते

म्हणून या उपायाने आपल्याला काय फायदा होत आहे हे कळण्यासाठी वजन आणि पोटाचा घेर दर महिन्याला मोजा तर एचबीएवनसी (HbA1C) आणि उपाशिपोटची रक्तातील इंसुलीनची पातळी (fasting insulin level ) दर तीन महिन्याला मोजा.

मुंबई : कधी हार्मोन्सच्या असंतुलित प्रमाणामुळे तर कधी त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने चेहर्‍यावर पिंपल्स येतात. एखाद्या पार्टी किंवा सोहळ्याच्या दिवसात नेमका पिंपल आला तर चिडचिड होणं स्वाभाविक आहे. पण रातोरात असा एखादा पिंपल हटवण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातीलच काही पदार्थ मदत करू शकतात.

कसा दूर कराल पिंपल्सचा त्रास ?
रातोरात पिंपलचा त्रास टाळण्यासाठी तुम्हांला मेकअप करून लपवण्याची किंवा महागड्या क्रीम्सची मदत घेण्याची काही गरज नाही. त्याऐवजी तुमच्या घरातील हे काही पदार्थ ठरतील फायदेशीर

टुथपेस्ट -
पिंपल वाढू नये म्हणून त्यावर टूथपेस्ट लावण्याचा मार्ग अनेकजणी निवडतात. मात्र ज्या टुथपेस्टमध्ये triclosan हे अ‍ॅन्टी बॅक्टेरियल असतात. त्यामुळे अ‍ॅक्नेचा त्रास वाढवणार्‍या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास मदत होते. त्यामुळे हे तपासूनच टुथपेस्ट लावा.

कसा कराल उपाय
या उपायाकरिता पिंपलवर आधी बर्फाचा तुकडा दाबा. काही वेळाने चेहरा पुसून त्यावर टुथपेस्ट लावा. 15-20 मिनिटांनी टुथपेस्ट साध्या पाण्याने स्वच्छ करा.

मात्र तुमची त्वचा संवेदनशील असल्यास किंवा त्यामध्ये इतर काही त्रासदायक घटक असल्यास त्वचेवर खाज येऊ शकते. टुथपेस्ट लावून पिंपल्स खरंच कमी होतात का ?

मध आणि दालचिनी
मध आणि दालचिनी पावडर एकत्र करा. हे मिश्रण पिंपलवर दाबा. अर्धा तासात हे मिश्रण सुकेल. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. रात्री हा उपाय केल्यानंतर सकाळी पिंपलचा आकार कमी झालेला दिसेल.

लवंग आणि लसूण
तुम्हांला लसणाच्या वासचा त्रास नसेल तर तर लसूण आणि लवंग यांची एकत्र पेस्ट रात्री पिंपलवर लावा. सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ करा.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर
कापसाच्या बोळ्यावर अ‍ॅपल सायडर व्हिनेगर लावा. यामुळे रात्री पिंपल सुकायला मदत होते. सकाळी पिंपलचा आकार कमी होण्यास मदत होते. ५ मिनिटांचा साधा उपाय आणि ब्लॅकहेड्स होतील गायब

Dr. Shivdas Patil
Dr. Shivdas Patil
BAMS, Family Physician, 8 yrs, Pune
Dr. Raveendran SR
Dr. Raveendran SR
MBBS, Chennai
Dr. Sandip Nimbhorkar
Dr. Sandip Nimbhorkar
BAMS, Ayurveda Naturopathy Specialist, 21 yrs, Pune
Dr. Minal Sapate
Dr. Minal Sapate
BDS, Dentist Cosmetic and Aesthetic Dentist, 15 yrs, Pune
Dr. Sohan Narkhede
Dr. Sohan Narkhede
MBBS, Ophthalmologist, Pune
Hellodox
x