१) जीवाणू आणि किटाणूंचा नाश करणारे अँटी बॅक्टीरियल आणि अँटी व्हायरल तत्त्व कांद्यामध्ये असतात... हे तत्त्व शरीरावर रगडल्याने जीवाणू आणि किटाणूचा नाश होतो आणि तुम्ही इन्फेक्शनच्या आजारांपासून दूर राहू शकता...
२) तुमच्या मनात आहेत तेच चेहर्यावर दिसते... तुम्ही नेहमी आनंदी राहणारे व्यक्ती असाल तर तुमचा चेहरा हसतमुख राहील आणि दिवसेंदिवस चेहर्यावरील उजळपणा वाढत राहील...
३) कॅल्शिअम शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती व शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असते... हे शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी, ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर या सर्वात असते...
४) तिळाच्या तेल्यात लसूण बारीक करुन ते गरम करून थंड झाल्यावर तेलाचे काही थेंब कानात टाकल्यास कान दुखणे थांबतो... हे जर तुम्ही नियमित केल्यास तुमची ऐकण्याची क्षमता वाढते...
५) नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप आणि फुप्फुसाशी निगडित आजारा मध्ये फायदा होतो...
६) हळद हे सगळ्यात शक्तीशाली असे नैसर्गिक कॅन्सर विरोधक आहे...
७) रात्री जेवण कमी करावं आणि फळं खावीत... सोबतच योग्य वेळी जेवणाची सवय लावाल, तर लठ्ठपणा कमी करण्यात मदत होईल...
८) जेवणात अधिक खारट पणा ची सवय आपण स्वतःच निर्माण करीत असतो... अधिक प्रमाणात मीठ/सोडियम घेतल्यास हाडे ठिसूळ होत जातात... जास्त सोडियम कॅल्शियमची कमतरता निर्माण करते...
९) वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये... आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे... वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही...
१०) साखर ही वाईट नाही... उगाच साखरेच नाव वाईट आहे... साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते... त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापर करू शकतो...
११) प्रत्येकाने व्यायाम व योगासना चा प्रकाराचा
निवड करताना तो आपल्या देहयष्टीनुसार निवडावा...
१२) सर्वच सजीवांना प्रथिनांची गरज आहे... अर्थात ही गरज प्रत्येकाचे वय, शारिरीक स्थिती, कामाचे स्वरुप यावर अवलंबून आहे...
आपल्याला अपचन झालंय. पोटात गॅस झालाय, तर ओवा खा. तुम्हाला तात्काळ आराम पडतो. पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधांमध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे.
ओवा चवीला आंबट, कडवट, उष्ण आणि थोडासा तिखट असतो. वात, तसेच कफ दोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, जंत आदींवर रामबाण ठरतो.ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये याचा वापर नियमितपणे करावा. ज्या लोकांना भूक लागत नाही, त्यांच्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कफ कमी करण्यासाठी ओवा उपयोगी पडतो. पाणी उकळून ओवाचा रस घ्यावा. मात्र तो थंड झाल्यावर सेवन करावे. यामध्ये तुम्ही साखरही मिसळू शकता.
छातीत कफ तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो. दात दुखीमध्येही ओवा हितकारक ठरतो. दात दुखी थांबविण्यासाठी लवंग तेलात ओव्याचे तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर एक-दोन थेंब टाकावे. पोटात गॅस तयार झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पानावर टाकून पोटावर ठेवावे किंवा पोटाला बांधावे. यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो.
तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर ओवा फायदेशीर ठरतो. डोकेदुखी असल्यास किंवा मायग्रेनचा झटका आल्यावर ओव्यापासून तयार केलेल्या पावडरचा वास घेतल्याने रुग्णाला आराम मिळतो. तर ज्यांना दम्याचा त्रास असेल त्यांनी ओवा गरम करून एका छोट्याशा कापडात बांधावा आणि छातीवर ठेवावा. यामुळे रुग्णाला उष्णता मिळेल आणि थंडीपासूनही बचाव होईल.
पोटाशीच्याबाबतीत काही समस्या असल्यास रुग्णाला चहामध्ये ओवा टाकून पिण्यास द्यावा. यामुळे रुग्णाचा त्रास कमी होतो. ओव्याचे सेवन केल्याने छातीतील जळजळ, डायरिया, मळमळणे, उलटी येणे आणि अॅलसिडीटीपासून सुटका होते. आर्थरायटीसमध्ये गुडघा किंवा शरीराच्या इतर सांध्यात होणा-या वेदनेतून सुटका करून घेण्यासाठी ओव्याचे तेल त्या भागावर लावल्यास उत्तम.
मुंबई : बाराही महीने मिळणाऱ्या फळांपैकी एक फळ म्हणजे केळी. केळी खाण्याचे आरोग्यदाई फायदे आजवर अनेकांनी तुम्हाला सांगितले असतील. पण, तुम्हाला माहिती आहे का, केवळ केळीच नव्हे तर, केळीची सालही तितकीच आरोग्यदाई असते. केळीच्या सालीचे फायदे तुम्ही जर जाणून घ्याल तर, केळी खाण्याऐवजी तुम्ही सालीच खाल. इतकी केळीची साल गुणकारी असते. म्हणूनच जाणून घ्या केळी खाण्याचे फायदे.......
वजन घटविण्यासाठी
केळीच्या सालीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे तुम्ही जर रोज एका केळीची साल खाल तर, एक महिन्यात तुमचे वजन २ ते ३ किलोंनी घटलेले पहायला मिळू शकते. ते सुद्धा कोणत्याही व्यायामाशिवाय. सॉल्यूबल आणि इन्सॉल्यूबल असे दोन प्रकारचे फायबर केळीच्या सालीत असतात. जे शरीरातील कोलेस्ट्रोलची मात्रा कमी करते.
दृष्टीदोषावर गुणकारी
तुमाला दृष्टीदोषाचा त्रास असेल, त्यामुळे चष्मा वापरण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ल्यूटीन असते. जे डोळयाची नजर तीक्ष्ण करण्यास मदत करते.
मन प्रसन्न करण्यासाठी
केळीच्या सालीमध्ये सेरोटोनिन असते जे तुमचे मन प्रसन्न (मूड) करण्यासाठी फायदेशीर ठरते. तैवानच्या विद्यापीठाने केलेल्या अभ्यासानुसार सलग तीन दिवस नियमीतपणे २ केळीच्या साली खाल तर तुमच्या शरीरातील सेरोटोनिनच्या हॉर्मोनची मात्रा १५ टक्क्यांनी वाढते.
झोपेवर गुणकारी
जर तुम्हाला योग्य प्रकारे झोप येत नसेल तर, केळीची साल खा. केळीच्या सालीत ट्रिप्टोफेन नावाचे एक केमिकल असते. जे तुमची झोप चांगली आणि आरोग्यदाई करण्यासाठी मदत करते.
मुंबई : खूप कमी लोकं असतील ज्यांना फणसाची मसालेदार भाजी आवडत नसेल. काही जण फणसाचा फळ समजतात तर काही भाजी. तर अनेक जण फणसाच्या भाजीला नॉनव्हेजकरता ऑप्शन म्हणून देखील समजतात. काही घरांमध्ये फणसाची भाजी तर होतेच तर काही जण याचं लोणचं, भजी आणि कोफ्ता देखील करतात. काहींना पिकलेला फणस देखील आवडतो.
फणस हा औषधीय गुणांनी भरलेलं पौष्टिक फळ
फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे.
डोळ्यांना अतिशय फायदेशीर
जर तुम्हाला पिकलेला फणस खाणं अतिशय आवडतं तर त्यातील गरे काढून पाण्यात उकळून ते प्या. असं केल्यामुले शरीरात एक प्रकारे उत्साह राहतो. फणसात विटामीन ए असल्यामुळे डोळ्यांना यामुळे अतिशय फायदा होतो. आणि त्वचा अतिशय चांगली होते.
हृदय निरोगी राहण्यास होते मदत
फणसात कॅलरीज नसतात. त्यामुळे फणस खाल्याने हृदयाशी जोडल्या गेलेल्या सगळ्या समस्यांवर याचा फायदा होतो. यामध्ये पोटॅशिअम देखील जास्त प्रमाणात असते. त्यामुळे हृदय रोगासारख्या समस्या दूर ठेवण्यास फणस मदत करते. यामुळे हाय ब्लड प्रेशर देखील कमी होते.
हाडांच्या दुखण्यापासून मिळतो आराम
फणसाच्या गऱ्याशेजारी असलेल्या सफेद भागाचं दूध काढलं. आणि ते सूज असलेल्या किंवा कापलेल्या भागावर लावल्यास फायदा होतो. तसेच हाडांच्या दुखण्यावरही फणसाचा अधिक गुणकारी उपाय आहे.
पचनशक्ती उत्तम होते
फणसाचे सेवन केल्यामुळे अल्सर आणि पचनाच्या सर्व समस्या दूर होतात. फणसाच्या पानापासून बनलेल्या चुरणाचा सर्वाधिक फायदा होतो. अल्सरच्या आजाराकरता फणसाची पानं सुकवून खाणं अधिक फायदेशीर
एडिबल फ्लावर्स म्हणजे ज्या फुलांचे आपण सेवन करू शकतो. एडिबल फुलांना कच्चे किंवा शिजवून कुठल्याही प्रकारे सॉस किंवा डिश सोबत खाऊ शकतो.
गुलाब
गुलाबाची सर्वच प्रजाती खाण्यायोग्य असते. याच्या पानांचा प्रयोग सलाड, आइसक्रीम आइसक्रीम , मिठाई, गुलाब-जल, जॅम-जेली, सरबत किंवा जेवणात गार्निशिंग करण्यात केला जातो.
मेरी गोल्ड
याला कॅडेंडुलासुद्धा म्हणतात. गोल्डन-ऑरेंज रंगाचे पान असलेले ह्या फुलांची चव चटपटी , थोडी तिखट आणि केसर प्रमाणे असते. याला तुम्ही सूप, पास्ता, भाताच्या डिशेज, सलाड इत्यादीच्या गार्निशिंगसाठी प्रयोग करू शकता.
जेस्मीन (मोगरा)
याचा पारंपरिक उपयोग चहाला सुंगधित करण्यासाठी व इत्र इत्यादीत केला जातो.
चमेली
चवीला गोड असणारे हे फूल दिसायला फारच सुंदर असतात. याचा प्रयोग शॅपेन, चॉकलेट, केक, कस्टर्ड, सरबत आणि जेली इत्यादीत केला जातो.
गुलदाउदी
लाल, पिवळे, सफेद आणि नारंगी रंगांच्या या फुलांचा प्रयोग सलाड आणि सिरक्यात फ्लेवर वाढवण्यासाठी केला जातो.
एडिबल फुलांचा प्रयोग करताना खाली दिलेल्या गोष्टींकडे लक्ष्य देणे गरजेचे आहे-
कुठल्याही फुलांचा जेवणात तेव्हाच वापर करावा जेव्हा तुम्हाला याबद्दल पूर्ण खात्री झाली असेल की ते फुलं वापरायला काहीच हरकत नाही आहे.
भोजनामध्ये प्रयोग करण्यासाठी फुलांना अशा कुठल्याही दुकानातून खरेदी नाही करावी जेथे कीटनाशक औषधांचा वापर केला गेला असेल.
जर फुलांचे सेवन पहिल्यांदाच करत असाल तर एकाच प्रकारचे फुल घ्यावे, कारण जास्त प्रकारचे फुलं घेतले तर त्याचा परिणाम तुमच्या पचन क्रियेवर होतो.
गुलाब, ट्यूलिप, इंग्लिश डेजी, मेरी गोल्ड इत्यादी फुलांच्या पानांचा पांढरा भाग कडवट असतो, म्हणून प्रयोग करण्या अगोदर त्याला काढून द्यावे.