धावपळीच्या जीवनशैलीमुळे हसणे हरवत चालले आहे. कामातून वेळ काढून हास्यविनोद करुन खळखळून हसण्यासाठी कोणालाच वेळ मिळत नाही. निरोगी आरोग्यासाठी फक्त शारीरिक व्यायामच नव्हे तर मानसिक आरोग्यही चांगले असणे आवश्यक असते. हसण्याचे अनेक फायदे आहेत, ते पुढीलप्रमाणे..
मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शारीरिक व्यायामाऐवजी मोठय़ाने हसणे खूप आवश्यक आहे. तसेच नेहमी आनंदी राहिल्याने शारीरिक ऊर्जा वाढते. यामुळे तुम्ही चांगले आणि अधिक काम करू शकता.
हसल्यामुळे स्टड्ढेस हार्मोन्स कार्टिसोल नियंत्रणात असतो. परिस्थिती कितीही तणावपूर्ण असू द्या. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे डोपामाइन आणि ग्रोथ हामरेन्सची सक्रियता वाढते.
हसल्याने शरीरात एंडोर्फिस हा गुड फिल करणारा घटक क्रियाशील होतो. यामुळे शरीरातील विविध भागात होणारे दुखणे कमी होते. हा रासायनिक घटक पेन किलरप्रमाणे काम करत असतो.
रक्तप्रवाह सुरळीत करण्यात हसण्याची भूमिका महत्त्वाची असते. यामुळे चेहर्यावरील टवटवीतपणा कायम राहतो. एका संशोधनानुसार मधुमेहाने पीडित लोकांनी जेवण केल्यानंतर हसल्यास किंवा कॉमेडी शो पाहिल्यास ब्लड शुगर बर्याच प्रमाणात नियंत्रणात राहते.
चिंतामुक्त राहिल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते. यामुळे विविध संसर्ग होण्यापासून तुम्ही दूर राहता. हसणे हृदयासाठी खूप चांगले आहे..
10 मिनिटे व्यायाम केल्याने जेवढी हृदयाची गती वाढते तेवढीच फक्त एक मिनिट हसल्यानेही वाढते, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
* पित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढा. हा रस पोटभर प्यावा. उलटी होऊन पित्त पडते. * गरमीवर कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखर टाकून सकाळ-संध्याकाळ घ्यावा. कसलीही गरमी असली तरी 7 दिवसात बरी होते.
* खरजेवर कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते.
* कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला लावल्यावर उवा मरतात.
* कावीळ रोगावर कडुलिंबाच्या अंतर सालीचा कपभर रस काढून त्यांत मध व थोडे सुंठीचे चूर्ण घालून द्यावे. 7 दिवसात कावीळ जातो.
* मूळव्याध, कृमी व प्रमेह यांवर कडुलिंबाची कोवळी फळे खावी.
* कडुलिंबाच्या लिंबाचा मगज काढून वातीस लावा, तिळाचे तेलाचा दिवा लावून काजळ करावे. या काजळाने नेत्रांस तेज येतो.
* पापण्यांचे केस गळत असल्यास कडुलिंबाची पाने चुरून पापण्यांस चोळावी.
सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये हातून काही अक्षम्य चुका घडतात आणि त्याचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. वाढत्या जाडीबरोबरच सुटलेलं पोट हे देखील याच चुकांची परिणती असते. वाढलेलं पोट व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम करतंच त्याचप्रमाणे आरोग्यावरही याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. वाढलेलं पोट हे अनेक समस्यांचं कारण ठरतं. म्हणूनच बेली फॅटची वेळीच दखल घ्यायला हवी.
बेली फॅटमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. आरोग्य जीवनशैलीमुळे पोटाच्या आजूबाजूला फॅय्स जमा होऊ लागतात आणि शरीरात सायटोकिन नामक रसायनाची मात्रा वाढते. हे रसायन इन्सुलिन आणि रक्तदाबावर विपरित परिणाम करतं. त्याचप्रमाणे हृदयावर याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात.
बेली फॅटमुळे डायबेटिसचा धोका वाढतो. इन्सुलिनशीसंबंधी समस्या उत्पन्न होत असल्यामुळे रक्तातील शर्करेचं प्रमाण असंतुलित होतं आणि टाईप 2 प्रकारच्या मधुमेहाचा धोका वाढतो.
पोट मोठं असेल तर निद्रेसंबंधी काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. हे लोक झोपेत खूप घोरतात. यामुळेदेखील धोका उद्भवू शकतो. काहींना निद्रानाशाचा त्रास संभवतो.
पोटाजवळील फॅट्स वाढल्यामुळे पेशींवर दबाव येतो. मोठ्या पोटामुळे पाठीच्या स्नायूंवरही अकारण ताण वाढतो. परिणामी सततची पाठदुखी मागे लागते.
- जायफळ तुपात उगाळून तयार केलेला थोडासा लेप निजण्यापूर्वी हळूहळू कपाळावर चोळल्यास गाढ झोप येण्यास मदत मिळते.
- पाव चमचा जटामांसी आणि पाव चमचा धमासा चार-पाच तासांसाठी पाण्यात भिजत घालून ठेवून झोपण्यापूर्वी गाळून घेतलेले पाणी प्यायले तर डोके शांत होऊन झोप लागणे सोपे होते.
- ज्यांच्या प्रकृतीला वांगे चालत असेल त्यांनी वांगे भाजून घ्यावे, ते थंड झाले की त्यात मध मिसळून खाण्याने झोप येण्यास मदत मिळते.
- रात्री झोपण्यापूर्वी टाळूवर तेल, कानात श्रुती तेलासारखे तेल, नाकात घरी बनविलेले साजूक तूप किंवा नस्यसॅन घृत टाकण्यानेही शांत झोप लागण्यास मदत मिळते.
- नियमित अभ्यंग तसेच पादाभ्यंग सुद्धा शांत झोपेसाठी साहायक असतात.
- शांत करणारी, मेंदूला शामक अशी काही औषधेही असतात. ब्राह्मी, जटामांसी, मंडूकपर्णी वगैरे वनस्पतींपासून तयार केलेले सॅन रिलॅक्स सिरपसारखे सिरप रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास मन शांत होऊन झोप लागते. मानसिक अस्वास्थ्यामुळे व असंतुलनामुळे झोप येत नसल्यास ब्राह्मी स्वरसाचे नस्य, क्षीरधारा, शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे उपचार करून घेतल्यासही फायदा होतो.
कोणत्याही पदार्थांला चमचमीत बनविण्यासाठी त्यात फोडणी घातली जाते ज्याने सर्व मसाल्यांचा स्वाद त्यात मिसळला पाहिजे. पण आपल्याला हे माहीत आहे का फोडणी देण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या असेच 5 फायदे:
1 फोडणीमुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि यामुळे इन्फेक्शन आणि सर्दी-खोकल्यापासून बचावा होतो. याचे मुख्य कारण यात लसणाचा वापर. लसूण आरोग्यासाठी उत्तम असतो.
2 हे आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये होणार्या वेदनांपासून मुक्ती देतं. कारण यात अख्खे मसाले, जसे लाल मिरची, काळी मिरे इतर मसाले वापरले जातात जे व्हिटॅमिन्ससह वेदनांपासून मुक्ती देतात. लठ्ठपणावर ही उपयोगी आहे.
3 फोडणीत पडणार्या मोहर्या, जिरा याने पचन संबंधी समस्या सुटतात. यासह याने स्नायू आणि हाडांमध्ये होणार्या वेदनांपासून सुटकारा मिळतो. एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉल कमी करण्यात आणि इम्यून पावर वाढवण्यात ही मदत करतं.
4 कढीपत्ता घातल्याशिवाय फोडणीला स्वाद नाही. स्वादासह पत्ता अनेक व्हिटॅमिन्स प्रदान करतं आणि पचन तंत्र व हृद्याचे आरोग्य सुरळीत ठेवण्यात मदत करतं. मधुमेहापासून बचावासाठी तसेच केस काळे ठेवण्यासाठी हा उपाय लाभदायक आहे.
5 फोडणीत हळद वापरल्याने इन्फेक्शनपासून बचाव होतो आणि अँटीबायोटिक तत्त्व, रोग प्रतिकार क्षमता वाढून आरोग्याची रक्षा होते. याने सर्दीपासून देखील बचाव होतो.