Hellodox on Facebook Hellodox on Facebook Hellodox on linkedin Hellodox on whatsup Hellodox on Twitter
Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

Acute viral fever is a type of fever that includes various viral infections, primarily characterized by an increase in the body temperature. This disorder is very common among children and the elderly as they tend to have a weak immune system. Some common characteristics of this condition are skin rashes, body ache and headache.


Causes:

The virus that causes this disorder is transmitted from one person to the other. The usual modes of transmission include direct contact, sneezing, coughing and even talking; anything that makes you exposed to physical contact with the body fluids of the infected person. Once the virus enters your body, it can take around 20-48 hours to get activated.

Symptoms:

The symptoms of this disorder include a rise in body temperature, vomiting, weakness, loss of taste, swelling of the face. You may feel very lethargic, weak and nauseated. Apart from these symptoms, it may also cause pain in the joints and the stomach. In severe cases, this disease can lead to complications such as arthritis, pneumonia and diarrhea.

Treatment:

Antibiotics, analgesics and antipyretics are prescribed when you have viral fever. Apart from the medications, you need to increase fluid intake and take complete bed rest. The body needs to heal; hence being extremely active will be counterproductive to the healing process. Heavy antiviral treatments are prescribed only in severe cases. Apart from medications, there are certain dietary changes that you may have to make to boost the healing process. Avoid spicy and fat laden foods as the digestive system is weak and consumption of such foods may lead to stomach disorders such as diarrhea and acidity. Try keeping your diet restricted to warm soups and fruit juices. Another factor you should be aware of is dehydration, as the body tends to lose fluids during this period. Drink a lot of water and fruit juices to keep your fluid intake at optimal levels.

You can also follow some preventive measure to avoid this disorder:

1. Wash your hands with antibiotic soaps
2. Stay away from crowded places
3. Avoid touching your face with unwashed hands

Published  
Dr.
Dr. Neha Dhakad
BHMS Homeopath Family Physician 14 Years Experience, Bengaluru (Bangalore)
Consult

Do you Easily get infected and suffer from cough and cold during monsoon? than these tips will definitely help you.
In Rainy season mosquitoes can easily breed and increases the risk of mosquito transmitted infections.Malaria , Dengue , food and water poisioning , diarrhoea, vomiting , flu.
Viral infections are also common. In highly humid weather numerous one can prone to skin diseases and fungal infections.
Chronic skin conditions such as eczema, acne and psoriasis tend to worsen during the monsoon season. The climate is also favourable for fungus to thrive.
People they have problem of recurrent cough and cold or allergic cough also suffer a lot in these season because of their low immunity.

1)What You need to care about Food and drink:
* If you’re fond of street food, the rainy season isn’t the time to indulge. Pollution of water and raw vegetables is very common during rainy season. You can easily fall ill from contaminants.
*you must avoid any sort of fried food While consuming fish, make sure you eat it fresh. Cook fish properly as it is the breeding season for fishes.
*Try to avoid refrigerated food and drinks.
*Monsoons are infamously known for stomach ailments, too. Indigestion and food poisoning are mostly affect people in the months of rains.
Food items cleaned and cooked at home are any day better than frozen, pre-cooked food from the market. Warm and fresh cooked food must be given preference over cold leftovers as the former not only gives a soothing warm effect to your body it also helps in keeping away some common bacterial illnesses away. 

*A cup of hot soup is highly recommended during monsoon.  It encourages thickened secretions and helps you to get rid of bacteria and viruses from your system. 
Frequently Drink antibacterial warm herbal teas .
Take Vitamin C to boost your immune system and help fight off infections.

2)What you need to care about skin and hair:
*Number of leptospirosis cases may peak during the rainy season and outbreaks can occur following excessive rainfall or flooding. it can lead to various fungal infections of the feet and nails.
*Dry your feet whenever they get wet. Don't continue to wear wet socks or wet shoes!
*Get a good pair of waterproof shoes to protect your feet from getting wet,also they are easier to dry off and provide traction that prevents slipping.
*After getting wet in the rain take Shower.Diseases develop when your body experiences a sudden change of temperature in the rain. Taking a hot shower right after being drenched in wet clothes stabilises the cold temperature and is the best way to get rid of all the germs that you may have picked up in the rain. If you get drenched in the rain, add disinfectant to bathing water to avoid skin problems.
*Keep your skin clean by bathing twice a day. Due to humidity many toxins can buildup on the the skin.
*Avoid colds and coughs by keeping your body warm and dry.
*Children's skin is particularly vulnerable during the monsoon season. Impetigo & scabies are common during these season and produces itchy skin. It's important to visit a dermatologist to get these conditions treated before they spread.
*Avoid wearing tight clothing or clothing made out of synthetic fabric
3)What you need to take care about Enviornment around you:
*One major thing you need to make sure that there is no water-logging in and around your house. Water-logging provides shelter to mosquitoes and bacteria -- which in turns makes room for several monsoon diseases.
*If you suffer from asthma or diabetes, avoid staying anywhere with damp walls. It promotes the growth of fungus and can be especially harmful.
*Don’t enter air conditioned rooms with wet hair and damp clothes.
*keep your house clean and pest-free to prevent sickness during monsoon
*To enhance your body's natural ability to kill viruses and bacteria, including exercise in your daily routine is suggested. Physical exercises like walking, jogging , running, as a part of your daily routine will aid in healthier metabolism and prevent you from getting sick during monsoons. 
Advice :
* Get enough sleep.
*Just because you enjoy to rain,don’t just get drenched everytime.
*If you need to Venture out,carry your rain gear or umbrella to protect yourself
*In case if you are already suffering ,just consult with Homeopathic Doctor . It is best way to get ride of your health issues without side effects and improve your immunity.



कांजिण्यांचा आजार

कांजिण्या सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकतात; पण त्या मुलांमध्ये होण्याचं प्रमाण जास्त असतं. मुलांमध्ये या आजाराविरुद्धची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसते. फेब्रुवारी, मार्च महिना आला की, कांजिण्या झालेली मुलं बालरोग तज्ज्ञांकडे येण्यास सुरुवात होते.

कांजिण्या सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये होऊ शकतात; पण त्या मुलांमध्ये होण्याचं प्रमाण जास्त असतं. मुलांमध्ये या आजाराविरुद्धची प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसते. शाळकरी मुलांमध्ये (५ ते १५ वर्षं वयोगट) सर्वांत जास्त प्रमाणात कांजिण्या येताना दिसतात. नेमका हा परीक्षांचा काळ असल्यामुळे कांजिण्या झालेल्या मुलांच्या परीक्षा बुडू शकतात. प्रौढ व्यक्तींमध्ये कांजिण्या आल्यास त्या तीव्र स्वरूपात येतात.

कांजिण्या हा आजार एक प्रकारच्या सूक्ष्म विषाणूमुळे होतो. व्हॅरिसेला झोस्टर व्हायरस असं त्याचं नाव आहे. शरीरातील उष्णता बाहेर पडल्यामुळे कांजिण्या होतात, अशी एक चुकीची समजूत आहे. ती डोक्यातून काढून टाकायला हवी. हा साथीचा आजार आहे आणि तो एका मुलाकडून दुसऱ्या मुलाला संपर्कामुळे किंवा श्वासावाटे हवेतून जलद पसरतो. विषाणूंचा शिरकाव शरीरात झाल्यापासून साधारण १० ते १५ दिवसांत आजाराची लक्षणं दिसू लागतात. मुलाला प्रथम थोडा ताप येतो. डोकंदुखी होऊ शकते. तापाच्या पहिल्याच दिवशी अंगावर पुळ्या दिसू लागतात. हळुहळू त्या पाण्यानं भरतात. प्रथम त्या छाती, पोट आणि पाठीवर येतात. नंतर त्या चेहरा आणि हातापायांवर पसरतात. या पुळ्यांना खाज सुटते. आधी आलेल्या पुळ्या थोड्या सुकू लागतात, तोपर्यंत नवीन पुळ्या अंगावर इतरत्र येऊ लागतात. या पुळ्या डोक्यात, केसात, कानात, घशात आणि डोळ्यातही येतात. चार-पाच दिवसांत पुळ्या कोरड्या पडू लागतात. त्यावर काळ्या रंगाच्या खपल्या धरतात. पुढे चार-पाच दिवसात त्या खपल्या पडून जातात. कांजिण्या दिसायच्या आधीपासून ते खपल्या धरेपर्यंत हा आजार एका मुलाकडून दुसऱ्याकडे पसरू शकतो.

कांजिण्या आल्यानंतर त्या मुलाला संसर्गाच्या भीतीनं इतर मुलांमध्ये मिसळू दिलं जात नाही; परंतु कांजिण्या दिसण्यापूर्वीच हे विषाणू श्वासावाटे एका मुलाकडून दुसरीकडे पसरतात. त्यामुळे भावंडं आणि रोजच्या संपर्कातील मित्र-मैत्रिणींना आजारी मुलांपासून दूर ठेवून फारसं काही साध्य होत नाही. गोवर आणि गालगुंडाप्रमाणे या आजारातही नव्यानं संपर्कात येणारे मित्र, पाहुणी मुलं यांच्यापासून आजारी मुलाला दूर ठेवावं. म्हणजे त्यांना संसर्ग होणं टळेल.

कांजिण्यांचा आजार हा तसा फार गंभीर नसला, तरी त्रासदायक नक्की आहे. ताप येणं, खूप खाज सुटणं, डोकं दुखणं, अंगभर फोड या लक्षणांमुळे रुग्ण वैतागून जातो. शिवाय नेमकी परीक्षेच्या काळात ८-१० दिवस शाळा बुडते, ती वेगळीच. काही मुलांमध्ये क्वचित प्रसंगी गंभीर दुष्परिणामही आढळतात. उदा. छातीत न्यूमोनिया होणं, कांजिण्यांमध्ये मोठे फोड होणं, अगदी क्वचित प्रसंगी मेंदूला सूज येऊन आकडी येणं.

उपचार
कांजिण्यावर उपचार घरीच करता येतात. उपचारामध्ये ताप कमी करणे आणि बरे होण्यास मदत करणे एवढ्या दोन बाबींचा समावेश आहे. कांजिण्या हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रतिजैविके अँेटिबायोटिक्स देऊन उपयोग होत नाही. अंगावर ओल्या कापडाच्या पट्ट्या ठेवणे किंवा रुग्णास थंड अथवा कोमट पाण्याने स्नान घालण्याने अंगाची खाज कमी होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात शंभर ग्रॅम खाण्याचा सोडा ( हे प्रमाण टबभर पाण्याचेआहे ). आणि दोन कप ओट मील घालून स्नान करावे. ( भारतामध्ये बादलीभर पाण्यात एक चहाचा चमचा खाण्याचा सोडा आणि चमचाभर डाळीचे पीठ घालावे. सौम्य साबणाचा वापर करावा. अंघोळीनंतर अंग टिपून घ्यावे. पुसू नये. कॅलॅमिन सारखे लोशन लावल्यास खाज कमी होते. खाजविल्यानंतर जंतुसंसर्ग होत असल्याने रुग्णाची नखे कापून घावीत. मोठ्या वयाच्या मुलाना खाजवू नका अशी सूचना द्यावी. अगदी लहान मुलांच्या हातास मऊ कापड बांधून ठेवावे.

तोंडामध्ये पुरळ उठल्यास पाणी पिणे किंवा अन्न गिळणे कठीण होते. अशा वेळी थंड पेये, सरबते,मऊ खीर, लापशी असे सहज गिळता येतील असे पदार्थ खाण्यास द्यावेत. डॉक्टरच्या सल्ल्याने योनिमार्ग किंवा शिश्नावरील पुरळावर जंतुनाशक क्रीम लावावे. पुरळामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास प्रतिजैविके वैद्यकीय सल्ल्याने वापरावीत. ॲेसीटॅमिनोफेन किंवा इतर तत्सम ॲस्पिरिन विरहित औषधाने ताप कमी होतो. ॲयस्पिरिन किंवा इतर सॅलिसायलेट गटातील औषधे कांजिण्याच्या रुग्णाना देऊ नयेत. ॲ स्पिरिनच्या वापराने कांजिण्याच्या रुग्णामध्ये ‘ रेये सिंड्रोमची लक्षणेदिसू लागतात. रुग्णास नेमके कोणते औषध द्यावे यासाठी योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा. जन्मजात प्रतिकारशक्ती क्षीण असलेल्या रुग्णाना ॲेसिक्लोव्हिर हे विषाणूप्रतिबंधक औषध देतात. झोव्हिरॅक्स सुद्धा अपेक्षित परिणाम साधते. पण झोव्हिरॅक्स च्या सार्वजनिक वापरावर अजून तज्ञांचे एकमत झालेले नाही.

पर्यायी उपाययोजना
कांजिण्यामुळे आलेला ताप इतर त्रास यावर पर्यायी उपाय योजना करण्यात येते. थंड किंवा कोमट पाण्याने स्नान. पाण्यात रोल्ड ओटस घातल्याने त्यामधील बीटा ग्लुकॅन हे विद्राव्य तंतू पाण्यात विरघळतात. या विद्राव्य तंतूमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोल्ड ओटसची पुरचुंडी पाण्यात सोडून ठेवल्यास त्यातील विद्राव्य पदार्थ पाण्यात उतरतो. या पाण्याने खाज कमी होते. खाज कमी करण्यासाठी कोरफडीचा गर अंगावर लावतात. कॅलँडुला नावाचे होमिओपॅथीमधील एक औषध खाज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. याशिवाय एमेटिक ( ॲोन्टिमोनियम टार्टारिकम) पॉयझन आयव्ही आणि गंधकयुक्त औषधांचा चांगला उपयोग झाल्याचे आढळून आले आहे.

अनुमान
बहुतेक रुग्णामध्ये कांजिण्या आठवड्याभरात बरी होते. कांजिण्या बरी झाल्यानंतर फारशी काळजी घ्यावी लागत नाही. कांजिण्या झाल्यानंतर वीस टक्के पन्नाशीच्या पुढील व्यक्तीमध्ये दीर्घ मुदतीचे परिणाम शरीरावर शिल्लक राहतात. हर्पिस जातीच्या विषाणूचे वैशिष्ट्य म्हणजे वॅरिसेला झोस्टर विषाणू कांजिण्या ब-या झाल्या तरी शरीरातून संपूर्णपणे कधीच जात नाही. विषाणू चेता पेशीमध्ये सुप्तावस्थेमध्ये राहतो. दीर्घ काळानंतर तो पुन्हा कार्यरत हो ऊन त्या वेळी त्याचे रूपांतर शिंगल्स नावाच्या आजारामध्ये होते. प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याचे हे लक्षण आहे. अत्यंत वेदनाजन्य या आजारास हर्पिसया नावानेओळखले जाते. या आजारात चेतांचा दाह होतो. चेतादाहाबरोबर ताप , चेहरा आणि अंगावर पुरळ अशीही लक्षणे दिसतात. हा त्रास सुमारे दहा दिवस होतो. ज्याठिकाणी चेता दाह शिंगल्स मुळे झालाआहे तेथे महिनोन महिने किंवा वर्षे आजारोत्तर वेदना होत राहतात. सध्या शिंगल्स वर दोन प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. व्हॅल्ट्रेक्स आणि फॅमव्हिर. लक्षणे दिसण्यास प्रारंभ केल्यानंतर 96 तासामध्ये ही औषधे दिल्यास हर्पिस विषाणूचे विभाजन थांबते. प्रतिकार यंत्रणा क्षीण झालेल्या रुग्णामध्ये यांचा उपयोग कसा करता येतो यावर पुरेसे संशोधन झाले नाही. फॅमव्हिर अठरा हून लहान व्यक्तीस देता येत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
व्हेरिसेला झोस्टर इम्युनोग्लोबिन ‘ व्हीझीआयजी’ या नावाचे प्रथिन सध्या कांजिण्या प्रतिबंधक लस म्हणून उपस्थित आहे. लहान मुले आणि प्रतिकारशक्ती क्षीणझालेल्या रुग्णामध्ये आजाराची लक्षणे दिसायला लागल्यापासून 96 तासाच्या आत व्ही झी आयजी इंजेकशन दिल्यास याचा परिणाम दिसून येतो. 96 तासानंतर हे प्रथिन दिल्यास अपेक्षित परिणाम दिसत नाही. नुकत्याच संसर्ग झालेल्या रुग्णाच्या रक्तामधून व्हीझीआयजी गॅमा ग्लोब्युलिन प्रथिन मिळविले जाते. व्हॅरिवॅक्स ही सौम्य विषाणू लस आहे. कांजिण्यापासून 85% संरक्षण देण्यात हे सक्षम आहे. गंभीर प्रकारच्या कांजिण्यापासून 100% प्रतिबंध या लसीने झाल्याचे आढळून आले आहे. इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी एखादा पुरळ एवढीच प्रतिक्रिया शरीराची असते. सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल यांच्या सूचनेनुसार ही लस सर्व बालकाना 12-18 महिन्यात दिली पाहिजे. (अति संवेदनक्षम बालकांचा अपवाद सोडून) मीझल्स-मम्स- रुबेला लसीकरणाच्या वेळी ही लस दिलीतर योग्य. भारतात पोलिओट्रिपल च्या वेळी. बारा वर्षापर्यंत च्या मुलाना नक्की कांजिण्या आधी झाल्या होत्या की नाही याची खात्री झाली नसेल तर कांजिण्याची लस देता येते. आरोग्य कर्मचारी आणि ग्रामीण आरोग्य सेवक आणि जननक्षम माताना कांजिण्या होण्याची शक्यता अधिक असल्याने कांजिण्याची लस घेणे श्रेयस्कर ठरते. अशा पासून इतराना रोगप्रसार होण्याची शक्यताही अधिक असते. यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करावा.

बारा वर्षांच्या मुलाना कांजिण्याची लस एकदा देणे पुरेसे ठरते. त्याहूनमोठ्या मुलाना आठ आठवड्यानी आणखीएक डोस द्यावा लागतो. सन 2000 मध्ये एका दिन शाळेमध्ये पसरलेल्या कांजिण्याच्या साथीने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडालेली होती. कारण या साठीमध्ये सर्व मुलाना एकदा कांजिण्याची लस दिलेली होती. त्यामुळे 2002 पासून आणखी एकदा लस देणे सुरू झाले. लसीकरणाचे शुल्क वैद्यकीयविमा कंपन्यानी नाकारल्याने अठरा वयापर्यंतच्या मुलांचा लसीकरणाचा खर्च आता अमेरिकन शासन करते. ज्याना कांजिण्याची लक्षणे दिसायला लागली आहेत अशाना व्हेरिवॅक्स दिले जात नाही. जुनाट मूत्रपिंडाच्या –वृक्काच्या आजाराने ग्रस्त असलेल्याना ही लस देणे अपायकारक आहे अशी समजूत होती. पण अशाही मुलाना 2003 पासून ही लस सुरक्षित ठरली आहे. ही माहिती महत्त्वाची ठरण्याचे कारण वृक्क रोपणकेलेल्या रुग्णामध्ये कांजिण्याचा आजार जीवघेणा ठरत होता.

व्हेरिवॅक्स लस गरोदर स्त्रियाना देता येत नाही. लसीकरणानंतर तीन महिन्यानी स्त्रियानी गर्भधारणेचा प्लॅन करावा. कांजिण्याच्या संपर्कात आल्यानंतर जेंव्हा कांजिण्या ऐन भरातअसतो त्यावेळी लसीकरण करावे असा सल्ला दिला जातो. अशावेळी कांजिण्यापासून योग्य प्रतिबंध होतो. अमेरिकन सांसर्गिक रोग सोसायटीच्या म्हणण्याप्रमाणे ज्या प्रौढाना कधीही कांजिण्या झाल्या नाहीतअशा सर्व प्रौढानी कांजिण्याची लस घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करावेत. प्रारंभीच्या काळात लसीच्या सुरक्षिततेबद्दल आणि परिणामकारकतेबद्द्ल पालकाना शंका होत्या. जसे अधिक राज्यानी आपापल्या शाळेमधील मुलाना लस देण्याबद्द्ल आग्रह धरल्यानंतर लसीकरणाचा विरोध दूर झाला. 2001 मधील कांजिण्या लसीच्या अभ्यासानंतर लसीची परिणामकारकता आणखी एकदा तपासली गेली. सहा वर्षाच्या संशोधनानंतर कांजिण्या हा पहिला मानवी हर्पिस विषाणू लसीकरणाने आटोक्यात आल्याचे सिद्ध झाले. आधी संशय व्यक्त केल्याप्रमाणे लसीकरणानंतर शिंगल्स चा धोका असल्याचे वाटत होते. पण आता अशा रुग्णांची संख्या घटत असल्याचे घ्यानात आले आहे.

रोगलक्षणे
विषाणुची लागण झाल्यानण्तर सुमारे दोन आठवडयानंतर रोगलक्षणे उमटतात. आजाराच्या सुरुवातीच्या काळात थंडीताप, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे, इत्यादी त्रास होतो. हा त्रास एखादा दिवसच असतो. पण प्रौढ वयात हा त्रास दोन-तीन दिवस टिकतो.

ताप सुरू झाल्यानंतर एक-दोन दिवसांत अंगावर पुरळ उठतात. पुरळ बहुधा छाती, पोट यांवर जास्त असतात. पुरळांची सुरुवात लालीने होते, नंतर त्यात पाणी भरते, मग पू होतो व नंतर खपली धरते. हे सर्व बदल पाच दिवसांतच होतात.

उपचार
हा रोग विषाणुजन्य असल्यामुळे उपचार मुख्यत्वे ताप नियंत्रण व स्वच्छता यावर केंद्रित असते. तापाकरिता तापनाशक औषधे पॅरासिटॅमॉल, निमसुलाईड, व इत्यादी वापरले जातात.

प्रतिबंधात्मक उपाय
आजारी व्यक्तीच्या संपर्कात न येणे.
प्रतिबंधक लसीकरण करून घेणे.

पावसाळा आला त्यासोबत अस्वच्छता आणि त्यामधून वाढणारे साथीचे आजार बळावतात. पावसाळ्यात अस्वच्छतेमुळे डेंगी पसरण्याचा धोका बळावतो. काही वर्षांपूर्वी देशभर डेंगीच्या साथीने हाहाकार पसरवला होता. मात्र आता डेंगी अधिक गंभीर स्वरूपात पसरण्याची शक्यता असल्याचे स्वास्थ्य विभागाने सांगितले आहे. एनवीबीडीसीपीने दिलेल्या अहवालानुसार, डेंगीशी सामना करण्यासाठी आता आरोग्य यंत्रणाला अधिक सक्षमपणे लढण्याची गरज आहे.

काय आहे धोका ?

नॅशनल वेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम (NVBDCP)ने दिल्ली सरकार आणि दिल्ली नगर निगमला सावधानतेचा सल्ला दिला आहे. यंदा डेंगी अधिक गंभीर स्वरूपात समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

डेंगी दर 3 वर्षांनंतर अधिक तीव्रतेने हल्ला करतो. त्यामुळे यंदा डेंगीच्या डासांची आक्रमता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवण्याची आणि सरकारसोबतच नागरिकांनी काळजी घेण्याची गरज वाढली आहे. या '5' कारणांंमुळे विशिष्ट लोकांंनाच डास अधिक प्रमाणात चावतात !

काय आहेत उपाय ?

दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाने, दिल्लीमध्ये डेंगीशी सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी वेळोवेळी औषधांची फवारणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नक्की वाचा : ताप नेमका डेंगी की चिकनगुनियाचा, हे कसं ओळखाल ...

एडीस एजिप्टी या डासामुळे जगभरात डेंगी, झिका, चिकनगुनिया यासरख्या जीवघेण्या आजाराची साथ पसरते.लोकांमध्ये डेंगी, चिकनगुनियाच्या साथीबाबत, त्यांच्या लक्षणांबाबत सजगता वाढवण्यासाठी काम सुरू करण्यात आलं आहे. जागोजागी औषध फवारणी केल्याने डासांचे लार्वा म्हणजेच अळ्यांना वेळीच नष्ट करण्यासाठी मदत होते. त्यामुळे भविष्यातील धोका रोखण्यास मदत होणार आहे.

वातावरणामध्ये बदल झाला की लगेच आजारपण डोकं वर काढतात. अशातच रोगप्रतिकारक्षमता कमजोर असलेल्यांमध्ये व्हायरल फिव्हर जडण्याचं प्रमाण वाढतं. व्हायरल इंफेक्शनपासून दूर राहण्यासाठी अनेक अ‍ॅन्टीबायोटिक्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र त्याचा दुष्परिणाम आरोग्याला त्रासदायक ठरू शकतो. व्हायरल इंफेक्शनपासून बचावण्यासाठी प्रत्येक वेळेस औषधांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. काही घरगुती उपायांच्या मदतीनेदेखील व्हायरल इंफेक्शनचा सामना करता येऊ शकतो.

घरगुती आणि सुरक्षित उपाय -
आलं -
व्हायरल फिव्हरचा सामना करताना आल्यासोबत, हळद, काळामिरी आणि साखर मिसळून त्याचा काढा बनवा. दिवसातून तीन-चार वेळेस हा काढा प्यायल्यास ताप कमी होण्यास मदत होईल.

धने -
ग्लासभर पाण्यामध्ये चमचाभर धने टाकून पाणी उकळा. त्यानंतर पाणी गाळा. गरजेनुसार त्यामध्ये साखर/ गूळ किंवा मध मिसळून काढा बनव. चहाच्या स्वरूपात प्यायचा असल्यास त्यामध्ये दूध मिसळा. यामुळे व्हायरल फिव्हरचा सामना करण्यास मदत होते.


तुळस -
मूठभर तुळशीच्या पानांसोबत चमचाभर लवंगाची पावडर मिसळा. एक लीटर पाण्यामध्ये हे मिश्रण उकळा. काढ्याचा अर्क झाल्यानंतर दर 2 तासांनी गरजेनुसार प्यायल्यास त्याचा फायदा होतो.

मेथी -
रात्री चमचाभर मेथीचे दाणे भिजत ठेवा. सकाळी मेथीच्या दाण्यांमध्ये लिंबाचा रस आणि मध मिसळा. या मिश्रणामुळे व्हायरल इंफेक्शनचा सामना करण्यास शरीर सक्षम होते.

तांदूळ -
एक भाग तांदूळ आणि निम्मा भाग पाणी मिसळून वाफवा. तांदूळ अर्धा शिजल्यानंतर पाणी काढा. या पाण्यामध्ये मीठ मिसळा. कांजी म्हणजेच पेजेचं पाणी असेही याला म्हणतात. व्हायरल इंफेक्शनचा सामना करण्यासाठी हे फायदेशीर आहे.

लसूण -
लसूण सोलून त्यामध्ये मध मिसळा. हे मिश्रण खाल्ल्याने इंफेक्शन कमी होण्यास मदत होते.

मनुका -
रात्रभर मनुका पाण्यात भिजत ठेवा. भिजलेल्या मनुका सकाळी खाल्ल्याने व्हायरल इंफेक्शनचा त्रास कमी होतो.

Dr. Rohan Shirole
Dr. Rohan Shirole
MS/MD - Ayurveda, Dermatologist Family Physician, 4 yrs, Pune
Dr. Amruta Siddha
Dr. Amruta Siddha
MBBS, ENT Specialist, 9 yrs, Pune
Dr. Nitin Shingare
Dr. Nitin Shingare
MS/MD - Ayurveda, Ayurveda Dermatologist, 9 yrs, Pune
Dr. Sheetal Jadhav
Dr. Sheetal Jadhav
BAMS, Ayurveda Family Physician, Pune
Dr. Sachin Patil
Dr. Sachin Patil
BHMS, Family Physician Homeopath, 11 yrs, Pune
Hellodox
x