आजकाल अनेक रेस्ट्रॉरंट्समध्ये खास 'तंदूर कॉर्नर' असतात. आजकाल ओव्हनमध्येही 'चारकोल इफेक्ट' दिला जातो. मात्र अशाप्रकारे कोळश्यावर बनवलेले जेवण चविष्ट लागत असले तरीही आरोग्याला मारक आहे. नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका अहावालात हा सल्ला देण्यात आला आहे.
पारंपारिक इंधन
पूर्वीच्या काळी लाकूड आणि कोळश्याचा वापर करून चुल्ही पेटवल्या जात असे. मात्र यामुळे आरोग्याला अनेकप्रकारचे धोके आहेत. श्वसनविकारासोबत हृद्यविकाराचाही धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तंदूरी खाण्याचा सतत मोह होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे.
काय आहे संशोधकांचा दावा ?
ब्रिटनमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डेरिक बेनेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा, लाकडाची चूल वापरणार्यांनी लवकरात लवकर गॅस किंवा वीजेच्या शेगडीचा वापर करायला सुरूवात करावी. लाकूड किंवा कोळसा जाळल्याने वायु प्रदूषण होते. सोबतच हृद्याचे विकार बळावण्याची शक्यता अधिक आहे. परिणामी हद्यविकाराने अकाली मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
ह्रद्यविकाराचा वाढता धोका
चीनमध्ये 2004-2008 या काळात 10 भागात 30 ते 79 वयोगटातील 3,41,730 लोकांवर प्रयोग करण्यात आला आहे. त्यांना जेवण बनवण्यासाठी कशाचा वापर करत असल्याचे विचारण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या उत्तरांनुसार जेवण बनवण्यासाठी लाकूड, कोळसा अशा घटकांचा वापर करण्यांमध्ये हृद्यविकार अधिक प्रमाणात जडल्यचे निदर्शनास आलं आहे. हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे '5' धोकादायक संकेत ...
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे, उघड्यावरचे पदार्थ खालल्याने जंतूसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ टाळले पाहिजे.
* या दिवसात सॅलेड खाणं टाळावं.
* पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या टाळल्या पाहिजेत.
* कापल्यानंतर फळं लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते.
* पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत.
* पावसाळ्यात भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगतं. त्यामुळे भात प्रमाणात खावा.
* मीठामळे पोट फुगतं आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसात मीठही कमीच खावं.
* पचनास जड असणार्या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत.
* दह्यामुळे कफ होतो.
* शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचं प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो.
सध्या सगळेच आपल्या आरोग्याबाबात जागरुक झाल्याचे चित्र आहे. यामध्ये आहाराला विशेष महत्त्व असल्याने त्याबाबत वेगवेगळे प्रयोग केले जातात. बाजारातही विविध गोष्टींचे आकर्षण दाखवून लोकांना भुलवण्याचे प्रकार केले जातात. कधी लठ्ठपणा कमी होण्यासाठी पाचक रस तर कधी मधुमेह कमी होण्यासाठी भाज्यांचा रस सर्रास घेतला जातो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या कितपत कमी होतात माहित नाही पण कोणत्याही सल्ल्याशिवाय आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे आपल्या जीवावरही बेतू शकते. पुण्यात नुकताच एका महिलेचा दुधी भोपळ्याचा रस प्यायल्याने मृत्यू झाला आहे. आता यामध्ये नेमके कोणते घटक होते किंवा भोपळा खराब होता का असे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भोपळ्याच्या गुणधर्मांविषयी जाणून घेऊया…
१. सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, मूत्राशयाशी निगडीत अडचणी तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते.
२. भोपळ्यामध्ये असणाऱ्या क्युकरबिटॅसिन एका विशिष्ट घटकामुळे कधीकधी हा रस प्रमाणापेक्षा जास्त कडू होतो.
३. या घटकामुळे काकडी, फळांचे रस, वांगे, खरबूज, लाल भोपळा या गोष्टींना कडवट चव येते.
४. भोपळ्याचा रस दिर्घकाळ बंद बाटलीत असेल आणि चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये. कारण त्यातून गंभीर इजा उद्भवण्याची शक्यता असते.
५. अशाप्रकारचा भोपळ्याचा कडू रस प्यायल्यामुळे पोटदुखी, अतिसार, उलट्या, जुलाब यांसारखे त्रास उद्भवतात. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हा त्रास २ ते ७ दिवसांसाठी होत राहतो. कडवट चव असलेला भोपळ्याचा रस प्यायल्यास पुढच्या ३० मिनिटांत ही लक्षणे दिसायला लागतात.
६. अनेकदा असा रस प्यायल्याने काही गंभीर समस्या उद्भवतात. यात जठरामध्ये रक्तस्त्राव होणे, रक्ताच्या उलट्या होणे आणि यकृताशी निगडित तक्रारी उद्भवणे यांचा समावेश असतो.
आजकाल सार्यांचेच आयुष्य धावपळीचे झाले आहे. त्यामुळे मुलांपासून घरात ऑफिसला जाणार्यांच्या डब्ब्याची सकाळी घाई नको म्हणून अनेक गृहिणी रात्रीच तयारी करतात. रात्रीच्या वेळेस तुम्ही भाजी कापून ठेवणं ठीक आहे. मात्र चपात्या किंवा पोळ्याचं कणीकही भिजवून ठेवणं आरोग्याला त्रासदायक आहे. या वस्तू फ्रीजमध्ये साठवण्याची चूक कधीच करू नका !
काय आहे वैज्ञानिकांचे मत ?
संशोधकाच्या दाव्यानुसार कणकेचं पीठ भिजवल्यानंतर त्याचा ताबडतोब आहारात समावेश करावा. मळलेलं पीठ साठवून ठेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. मळलेलं पीठ साठवून ठेवल्याने त्यामध्ये रासायनिक बदल होण्याची शक्यता असते. त्यामुळे मीठ खराब होण्यास सुरूवात होते. अशा साठवलेल्या पीठाच्या पोळ्या खाणं आरोग्याला त्रासदायाक आहे.
समज - गैरसमज
शिळ्या अन्नाबाबत आपल्या समाजात, संस्कृतीमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. मळलेलं पीठ फ्रीजमध्ये साठवणं हे पिंडाप्रमाणे असते. याचे भक्षण करण्यासाठी घरात भूत -प्रेतांचा प्रवेश होतो असे मानूनदेखील अनेकजण कणकेचं पीठ साठवणं टाळतात.
शिळ्या किंवा साठवलेल्या पीठाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
फ्रीजमध्ये साठवलेल्या पीठापासून पोळ्या केल्यास त्यामुळे पोटात गॅस होणं, पचन प्रक्रियेमध्ये बिघाड होणं, बद्धकोष्ठतेचा त्रास वाढण्याची शक्यता असते.
घरी जेवण्याचा मूड नसला, सुट्टी असली किंवा मुलांनी हठ्ठ केला की आपण लगेच पिझ्झा ऑर्डर करतो. आणि अर्ध्या तासात घरी येणारा पिझ्झा खूप चव घेऊन खातो परंतू जंक फूड म्हणून पिझ्झा धोकादायक असला तरी त्याहून धोकादायक पिझ्झा बॉक्स आहे हे जाणून आश्चर्य वाटत असलं तरी हे विचार करण्यासारखे आहे.
पिझ्झा बॉक्स कागदाने तयार केलेला असतो हा विचार करून त्याने आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकत नाही अशी आमची समजूत असते. परंतू काय आपल्याला माहीत आहे की हा बॉक्स अनेक प्रकाराच्या मटेरिअल आणि केमिकलने तयार केलेला असतो.
धोकादायक रिसाइकल्ड मटेरिअल ने तयार केलेल्या या बॉक्समध्ये गोंद, हाइज आणि विषारी शाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पिझ्झा गरम राहावा म्हणून वापरलं जातं आणि गरम पिझ्झ्यासोबत हे केमिकलही आमच्या पोटात जातात.
पिझ्झा बॉक्समध्ये ऑइल, चीज किंवा फॅट्स शोषले जाऊ नाही म्हणून एका प्रकाराची कोटिंग केली जाते. या कोटिंगमुळे ही कर्करोग होण्याची शक्यता असते. यात डीआयबीपी अर्थात डायिसोबायटील फेथलेट नावाचे केमिकल आढळतं ज्याने प्रजनन विकासावर विपरित परिणाम टाकतं. हे शरीरात एन्डोक्रायनाइनला नुकसान पोहचवतं.
विशेषज्ञांप्रमाणे या बॉक्स तयार करताना वापरण्यात येणार्या वस्तूंमध्ये परफ्लूरोकाइलिल एथिल आढळतं जे शरीरात अनेक वर्ष राहतं आणि यामुळे कर्करोग साखरे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गरम पिझ्झा खाण्याचा शौक आम्हालाच महागात पडू शकतो कारण अधिक वेळ पिझ्झा गरम राहावा यासाठी डिलेव्हरीपूर्वी त्याला 60 ते 65 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केलं जातं. गरम पॅकेजिंगमुळे यात केमिकल मिसळतात आणि पिझ्झा विषारी होऊन जातं.