सकाळी उठल्यावर आपण काय करतो? खातो ? आपली लाईफस्टाईल कशी आहे यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. सकाळी रिकाम्या पोटी चहा, कॉफी प्यायल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. मात्र आयुर्वेदानुसार सकाळी उठताच नाश्तापूर्वी साजूक तूप प्यायल्यास अनेक आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.
रिकाम्यापोटी साजूक तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे
1. चमकदार त्वचा
साजूक तूपामुळे त्वचेतील पेशी पुन्हा पुनरूज्जीवित होतात. यामुळे त्वचा चमकदार होते. सोबतच तूपामुळे त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
2. लठ्ठपणा
साजूक तूप शरीरातील फॅट्स कमी करण्यास मदतकरतात. नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. वजन आटोक्यात राहते. सकाळी उठल्यावर या '4' गोष्टी पाळा, वजन घटवा
3. मेंदूला अॅक्टिव्ह करण्यास मदत
सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने मेंदूच्या नसांना चालना मिळते. सोबतच यामुळे स्मरणशक्ती तल्लख राहण्यास, आकलनक्षमता सुधारण्यास मदत होते. नियमित तूप खाल्ल्याने अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी होण्यास मदत होते.
4. केस मजबूत होतात
अनेकांना केसगळतीचा त्रास जाणवतो. हार्मोनल बदल, पोषक आहाराचा अभाव, प्रदूषण, धूर, धूळ यामुळे केसांचे नुकसान होते. हळूहळू केस विरळ होतात. म्हणूनच केसांना मजबूत आणि घनदाट करण्यासाठी आहारात साजूक तूपाचा समावेश करावा.
अति तेथे माती हा नियम आहारालाही लागू आहे. त्यामुळे साजूक तूप आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारात समावेश करताना प्रमाणावर नियंत्रण ठेवणं गरजेचे आहे.
वातावरणातील बदलामुळे साथीचे रोग पसरत आहेत. डेंग्यू, मलेरिया सारखे मच्छरमुळे पसरणारे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. रक्त पिणाऱ्या या मच्छरपासून वाचण्याकरता अनेक प्रयत्न केले जातात. मात्र असं केलं तर डेंग्यूची लागण होतेच. तुम्हाला माहित आहे, जर डेंग्यूची लागण ही सुरूवातीलाच कळली तर डाएट फॉलो करून डेंग्यू घालवू शकतात.
डेंग्यू झाल्यावर ब्लड प्लेटलेट्स अगदी पटापट कमी होतात. यावेळी तुम्ही तुमच्या डाएटचा योग्य विचार केला नाहीत तर हा डेंग्यू तुमचा जीव देखील घेऊ शकतो. त्यामुळे अशावेळी कोणते अन्नपदार्थ आपल्या डाएटमध्ये असावेत ते आपण पाहू.
तज्ञांच्या माहितीनुसार, डेंग्यूच्या रूग्णांनी अशा गोष्टींच सेवन करायच्या ज्या पाण्यात लगेच उकळतील. आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या, सूप, फळ ज्यामध्ये केळ आणि सफरचंदाचा अधिक सेवन करायचं आहे.
हर्बल टी
डेंग्यूमध्ये आलेल्या अशक्तपणातून लवकर बाहेर पडण्यासाठी चहा किंवा कॉफी न घेता हर्बल टीचं सेवन करा. तुम्हाला वाटल्यास त्यामध्ये तुम्ही अद्रक किंवा वेलची टाकून वापर करू शकता. हर्बल टीमुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल.
नारळ पाणी
डेंग्यूमधील व्हायरलमध्ये सर्वात अगोदर तुमच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. हे मेंटेन करण्यासाठी नारळ पाणी घ्यावे. इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनरल्स प्यायलाने शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक राहते. यातून पोषक तत्वे मिळतात. जे शरीरात ताकद निर्माण करतात.
पाणी
डेंग्यूची लागण झाल्यावर अधिक प्रमाणात पाणी प्यावे. पाणी प्यायला त्रास होईल पण पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच ओआरएस पावड देखील पाण्यातून प्यायलास त्याचा फायदा होईल. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.
लींबू पाणी
डेंग्यू पेशंटने अधिक प्रमाणात तरल पदार्थांचे सेवन करावे ज्यामुळे शरीरात असलेला वायरस आणि विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत होईल. डेंग्यू झालेल्या लोकांकरता लींबू हे वरदान मानलं जातं. या दिवसांत लींबू पाण्याचे सेवन अधिक करता. वायरल लघवी वाटे बाहेर जाण्यास अधिक मदत करतो.
दलिया (लापशी)
डेंग्यूच्या रूग्णाने जेवणात दलियाचा वापर करावा. यामुळे शरीरात एकप्रकारची एनर्जी राहते. यामध्ये तुम्ही दलियाचा उपमा, दलियाचा पुलाव किंवा गोड दलिया म्हणजे लापशी करून खावू शकता.
प्रोटीनयुक्त पदार्थांचा वापर
डेंग्यू झाल्यावर रूग्णाने प्रोटीनने भरलेले पदार्थ अधिक खावेत. अशामध्ये त्यांनी अंड्याचा समावेश आपल्या जेवणात करावा. प्रोटीनयुक्त आहारात दूध, डेअरीच्या पदार्थाचे सेवन करावे. अशात डेंग्यू लवकर निघून जातो.
महत्वाची नोट
डेंग्यू झाल्यावर तेलकट, मसालेदार पदार्थ आणि अधिक आंबट असे पदार्थ टाळावेत. या दिवसांत तोंडाला चव नसते अशावेळी तुम्ही लिंबाचे लोणचे खावू शकता.
आपण प्रथिन स्रोताचा स्वस्त आणि सुलभपणे उपलब्ध असलेला विचार करता तेव्हा अंडी साधारणपणे आपल्या मनात येणारी पहिली गोष्ट आहे. आपण त्यांना उकडलेले, तळलेले, पांगळे ठेवू शकता किंवा त्यांना इतर पदार्थांसह जोडू शकता. ते आपल्या शरीरातील पोषण देणारे जीवनसत्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्त्वांच्या पॉवरहाऊस आहेत.
अंडी सर्वोत्तम सुपर पदार्थ मानली जातात का ते येथे आहेत:
1.अंडीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात:
अंडीमध्ये ल्यूटिन आणि झीएक्झिथिनसारखे अँटीऑक्सिडंट असतात ज्यांचे डोळ्यांना पोषण देण्यास मदत होते. काही ठराविक रोगांपासून जसे की बुरसटलेल्या अवयवांमध्ये आणि डोळ्याच्या मोतीबिंदूचा बचाव होतो.
ते पोषण पॉवरहाऊस आहेतः हृदयामध्ये निरोगी चरबी, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर ट्रेस पोषक असतात. ते फॉस्फरस, लोखंड आणि व्हिटॅमिन ए मध्ये देखील समृध्द असतात. अंड्याचा पोषणद्रव्ये असलेल्या बहुतांश घटकांमधे ते कोलेस्टरॉलच्या घटकांपासून घाबरत नाहीत.
2.ते तृप्ततेला उत्तेजन देतात:
अंडी अनावश्यक प्रमाणात कार्बोहायड्रेटची सामग्री जास्त नसल्याने, ते रक्तातील साखरेची पातळी धोक्यात असलेल्या स्पाइक्सपासून दूर करते. तसेच, अंडी उच्च प्रथिनेयुक्त सामग्री तृप्तिला प्रोत्साहन देतात. निरोगी आहाराचा एक भाग म्हणून नियमितपणे अंडी खाणे वजन कमी करते आणि चरबी कमी होण्यास कारणीभूत असते.
3.आपल्या केसांना व त्वचेसाठी चांगले आहेतः
त्यात व्हिटॅमिन बी 12 आणि सल्फरचा समावेश आहे, त्या दोघांनाही त्वचा आणि केसांपासून होणारा विघटन करणारा त्रास आहे. अंडी ही केरोटीन (नाखून आणि केसांमध्ये प्रथिने एक प्रकारचे प्रथिने समाविष्ट असलेल्या) जैव -ोपयोगी वापराच्या दृष्टीने सर्वोत्तम स्त्रोत म्हणून ओळखल्या जातात. (जैवउपलब्धता म्हणजे आपल्या शरीराद्वारे पोषण किती चांगले होते.)
4.शरीरात चांगले कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते:
नियमित अंडी खप आणि शरीरात चांगले कोलेस्टेरॉलची पातळी (एचडीएल) वाढविण्यासाठी दर्शविले गेले आहे ज्यामुळे स्ट्रोक आणि इतर ह्रदयरोगाची शक्यता कमी होते.
5.त्यात प्रथिने चांगल्या प्रमाणात असतात:
अंडी हे प्रथिनांचे सर्वात स्वस्त स्त्रोत आहेत आणि सर्वात सोयीस्कर उपलब्ध आहेत. त्यामध्ये शरीरातील आवश्यक 9 अचूक अमीनो असिड्स असतात. स्नायूंना अंडीपासून प्रोटीन म्हणून घेण्याकरिता अंडी सर्वात पसंतीचे पदार्थ आहेत ज्यामुळे शरीराद्वारे सहजपणे शोषून घेता येते. आपण कोणत्याही विशिष्ट समस्येविषयी चर्चा करू इच्छित असल्यास, आपण आहारतज्ञ-पोषणतज्ञांकडे सल्ला घेऊ शकता.
दही रोज खावे की नाही हा प्रश्न अनेक लोकांना पडत असतो तर येथे आम्ही आपल्या सांगत आहोत की दर रोज दही भात खाणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरु शकेल:
रात्री दह्याचे सेवन टाळावे. याने कफ होण्याची शक्यता असते. रात्री दह्याचे सेवन करायचे असल्यास यात साखर आणि मिरपूड टाकावी.
दररोज दुपारच्या जेवण्यानंतर काही प्रमाणात दही खायला हवे. याने आपल्याला अँटीऑक्सीडेंट, प्रॉबायोटिक्स आणि गुड फॅट मिळतील. हे केवळ पोटासाठी नव्हे तर याने मानसिक आरोग्यही सुधारतं आणि वजन नियंत्रित राहतं. ताण जाणवतं असल्यास किंवा मळमळ होत असल्यास दही भाताचे सेवन करायला हवे. हे खाल्ल्याने अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते.
का खास आहे दही-भात
याने ताण कमी होतं. तसेच तिखट खाण्याचे शौकिन असल्यास कितीही तिखट खाल्ले तरी यासोबत दही-भाताचे सेवन केल्यास काहीही नुकसान होणार नाही. याचे अल्कलाइन प्रभावामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. अॅसिडिटीची समस्या असल्यास दह्यातील पाणी काढून याचे सेवन करावे.
वजन कमी होईल
स्नेक्सऐवजी दही भात खाल्ल्याने शरीरात कमी प्रमाणात कॅलरी पोहचेल. साध्या दही-भातात, पुलाव किंवा फ्राइड राईसच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात. याने पोट भरल्यासारखे जाणवेल आणि वजन कमी होण्यात मदत मिळेल. खाण्यापूर्वी किंवा नंतर कधीही दह्याचे सेवन केलं जाऊ शकतं.
कारण
कारण दह्यात आढळणारे कॅल्शियम शरीरात फॅट सेल्स तयार होऊ देत नाही. दह्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते. एका शोधाप्रमाणे दररोज 300 ग्रॅम दही खायला पाहिजे. तसेतर हे महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात अधिक सेवन केल्या जाणार्या आहारात सामील आहे तरी पोट गडबड असल्यास, अपचन किंवा इतर आजारात गरम भातासोबत दह्याचे सेवन केल्याने आरोग्य सुधारतं. याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात. भात आणि दही मिळून शरीर थंड ठेवण्यात मदत करतं.
लेडी फिंगर म्हणून ओळख असणारी हिरवी भाजी भेंडी , भाज्यांमध्ये बर्याच लोकांना पसंत येते, तर त्याला नापसंत करणारे लोक देखील असतात. पण भेंडीच्या या फायद्यांना जाणून घेतल्यावर तुम्ही नक्कीच याचे सेवन कराल. जाणून घ्या भेंडीचे 8 अनमोल फायदे...
1) कँसर - भेंडीला आपल्या ताटात सामील करून तुम्ही कँसरला पळवू शकता. खास करून कोलन कँसरला दूर करण्यासाठी भेंडी फारच फायदेशीर असते. ही आतड्यांमध्ये उपस्थित विषारी तत्त्वांना बाहेर काढण्यास मदत करते, ज्याने तुमच्या आतड्या स्वस्थ राहतात आणि उत्तम प्रकारे काम करतात.
2) हृदय - भेंडी तुमच्या हृदयाला देखील स्वस्थ ठेवते. यात उपस्थित पॅक्टिन कोलेस्टरॉलला कमी करण्यास मदत करतो. तसेच यात असणारे विरघळणारे फायबर, रक्तात कोलेस्टरॉलला नियंत्रित करतो, ज्याने हृदय रोगाचा धोका कमी राहतो.
3) डायबिटीज - यात असणारा यूगेनॉल, डायबिटीजसाठी फारच फायदेशीर असतो. हा शरीरात ग्लोकोजच्या स्तराला वाढवण्यापासून बचाव करतो, ज्याने डायबिटीज होण्याचा धोका कमी असतो.
4) अॅनिमिया - भेंडी ऍनिमियामध्ये फारच लाभदायक असते. यात उपस्थित आयरन हिमोग्लोबिनचे निर्माण करण्यास सहायक असतो आणि विटामिन- के, रक्तस्त्रावाला रोखण्याचे काम करतो.
5) पचन तंत्र - भेंडी भरपूर फायबर असणारी भाजी आहे. यात उपस्थित लसदार फायबर पचन तंत्रासाठी फायदेशीर असतो. यामुळे पोटफुगी, कब्ज, पोट दुखणे आणि गॅस सारख्या समस्या होत नाही.
6) हाड मजबूत होतात - भेंडीत आढळणारा लसदार पदार्थ आमच्या हाडांसाठी फारच उपयोगी असतो. यात असणारे व्हिटॅमिन-के हाडांना मजबूत ठेवण्यासाठी मददगार असतात.
7)इम्यून सिस्टम - भेंडीत व्हिटॅमिन-सी असल्यामुळे एंटीआक्सिडेंटने भरपूर असते. ज्यामुळे हे इम्यून सिस्टमला मजबूत करून शरीराला आजारांपासून लढण्यास मदत करते. याला भोजनात सामील केल्याने बरेच आजारपण जसे खोकला, थंडीचा त्रास कमी होतो.
8) गर्भावस्थेत भेंडीचे सेवन लाभदायक आहे. भेंडीत फोलेट नावाचा एक पोषक तत्त्व असतो जो गर्भाच्या मस्तिष्काचा विकास करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. त्याशिवाय भेंडीत बर्याच प्रकारचे पोषक तत्त्व आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.