Health Tips
Stay healthy by reading wellness advice from our top specialists.

उन्हाळ्यामुळे शरीराची होणारी लाहीलाही दिवसेंदिवस वाढत आहे. या उकाड्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. तापमानाचा पारा वाढत असताना आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भारतीय आहारात शरीराला थंडावा देणारे अनेक पदार्थ आहेत. या पदार्थांचा आहारातील समावेश वाढविल्यास निश्चितच फायदेशीर ठरते. जाणून घेऊयात या पदार्थांविषयी…

गुलकंद

गुलाब पाकळ्या, साखर आणि अन्य काही वनौषधींचा वापर करून बनवण्यात येणारा गुलकंद हा उन्हाळ्यात आहारात असावा असा एक उत्तम पदार्थ आहे. उन्हाळ्याच्या दिवसात येणारा थकवा दूर करण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील टवटवीतपणा टिकून राहण्यासाठी गुलकंद उपयुक्त ठरतो. सकाळी उठल्यावर एक चमचा आणि दुपारच्या तसेच रात्रीच्या जेवणांनंतर अर्धा चमचा गुलकंद खाल्ल्यास उन्हाळ्याच्या दिवसांत होणारे उष्णतेचे त्रास कमी होण्यास मदत होते.

आंबा

फळांचा राजा हे उन्हाळ्यात येणारे खास फळ आहे. या दिवसांत आंबा खाल्ल्याने शरीरातील उत्साह आणि ताकद टीकून राहण्यास मदत होते. मात्र तो कसा खावा हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. खाण्यापूर्वी आंबा २० ते ३० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावा. चवीला हवेहवेसे वाटणारे हे फळ शरीरातील क्रिया सुरळीत होण्यासाठीही उपयुक्त असते. आंबा गोड असल्याने त्यामुळे वजन तसेच रक्तातील साखर वाढते असा आपला समज असतो. मात्र आंबा खाल्ल्याने वजन कमी होते असे काही अभ्यासांतून समोर आले आहे.

जिरे

हा पदार्थ आपण रोजच्या जेवणात वापरतो. मात्र त्याचे गुणधर्म आपल्याला माहित असतीलच असे नाही. शरीरात साठलेला मेद कमी करण्यासाठी तसेच नसांना आराम देण्यासाठी जिरे उपयोगी असते. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला हवा असलेला थंडावा मिळतो.

दही

उन्हाळ्याच्या दिवसांत बद्धकोष्ठता, गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होणाऱ्यांसाठी दही खाणे एक उत्तम उपाय आहे. मात्र हे दही घरी लावलेलं असावं. याबरोबरच दहीभाताचा जेवणात समावेश करावा, त्याचा चांगला फायदा होतो.

नारळ पाणी

उन्हामुळे या दिवसांत डिहायड्रेशनमुळे शरीराला आवश्यक असणारे अनेक घटक कमी होतात. त्याचे प्रमाण योग्य ते रहावे यासाठी नारळ पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी तसेच सतत येणारे क्रॅम्प्स आणि डिहायड्रेशन यावर नारळ पाणी उत्तम आणि सोपा उपाय होय.

कोकम सरबत

कोकम सरबत हे उन्हाळ्यातील समस्यांवर उत्तम उपाय आहे. कोकम लठ्ठपणावर मात करण्यासाठी उपयुक्त ठरते. तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ नये म्हणून तसेच इतरही अनेक समस्यांवर कोकम उपयुक्त ठरते.

उन्हाळ्यात सूर्याच्या झळांमुळे अंगाची लाही लाही होते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो. अशक्तपणा वाढतो. जेवढे काम करतो, त्यापेक्षा जास्त दमायला होते. घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. त्यामुळे थकवा अधिक जाणवतो. उन्हाळ्यात भूक कमी होते आणि अपचनाचे विकार वाढतात. त्यामुळे कफविकार वाढू न देणारे, पचन वाढविणारे आणि शरीरातील पाण्याचा समतोल राखणारे पदार्थ खायला हवेत. त्यामुळे रात्रीचे जेवण कसे असावे याविषयी थोडक्यात.

– उन्हाळ्यात रात्रीचे जेवण हलके असावे.

– जेवणात वरण -भात, तूप, लिंबू असावे.

– ज्यांना भात आवडता नाही त्यांनी पोळी भाजी, आमटी किंवा ज्वारी बाजरीची भाकरी खावी.

– शक्यतो जेवणात हिरव्या भाज्या असाव्यात.

– मूगाची खिचडी किंवा ताकही रात्रीच्या जेवणात असलं तरी चालेल.

– जेवणाच्या सुरुवातीला भाज्यांचे गरमा-गरम सूप घ्यायला हरकत नाही.

– रात्रीच्या वेळी शक्यतो मांसाहार टाळावा. जर असेलच तर तरी पचनाच्या दृष्टीने पालेभाजीही जेवणात असावी.

– साजूक तूप जेवणात वापरावं.

– जेवणानंतर लगेच आइस्क्रीम खाणे टाळावे. खायचेच असेल तर जेवण व नाश्ता यांच्या मधल्या काळात किंवा जेवण झाल्यावर किमान दीड ते दोन तासांनी खावे. आइस्क्रीम थंड असल्याने पचनक्रिया मंदावते.

Dr. Shashikant J Avhad
Dr. Shashikant J Avhad
MD - Allopathy, Obstetrics and Gynecologist, 5 yrs, Pune
Dr. Sairandhri Shinde
Dr. Sairandhri Shinde
MBBS, Gynaecologist Infertility Specialist, 10 yrs, Pune
Dr. Manna  Varghese
Dr. Manna Varghese
BAMS, Ayurveda, 4 yrs, Pune
Dr. Bhushan Chaudhari
Dr. Bhushan Chaudhari
MD - Allopathy, Addiction Psychiatrist Adolescent And Child Psychiatrist, 10 yrs, Pune
Dr. Niket Lokhande
Dr. Niket Lokhande
MDS, Dentist Root canal Specialist, 14 yrs, Pune
Hellodox
x