उन्हाळ्यामध्ये वाढत्या उन्हामुळे लोक प्रचंड त्रासले आहेत. अशातच वातावरणातील उकाड्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करण्यात येतात. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या आणि आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या पेय पदार्थांचा आहारात समावेश करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. ऊन आणि सनस्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी बेलफळाचा रस अत्यंत फायदेशीर ठरतो. बेलफळामध्ये प्रोटीन, बीटा-कॅरोटीन, थायमीन,रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन-सी आपल्या आरोग्यासाठी गुणकारी ठरतं.
थंडावा देण्यासाठी
बेलफळाचा ज्यूस पिणं उन्हाळ्यामध्ये अत्यंत लाभदायी ठरतं. यामध्ये आढळणारी तत्व उन्हापासून बचाव करून शरीराला थंडावा देतात. याव्यतिरिक्त सनस्ट्रोकपासूनही बचाव होतो.
पोटाचे आरोग्य राखण्यासाठी
उन्हाळ्यामध्ये अनेकदा पोटाच्या समस्येचा सामना करावा लागतो. गॅस, बद्धकोष्ट, अपचन यांसारख्या समस्यांनी अगदी हैराण व्हायला होतं. या समस्यांमध्ये बेलफळाचा ज्यूस फायदेशीर ठरतो. बेलफळामध्ये असलेली पोषक तत्व आरोग्यासोबतच पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच माउथ अल्सरच्या समस्या दूर करण्यासाठीही बेलफळाचा ज्यूस मदत करतो.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलफळाचा ज्यूस अत्यंत परिणामकारक ठरतो. तसेच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत करतं. बेलफळामधील पोषक तत्व रक्त शुद्ध करण्यासोबतच निरोगी ठेवण्यासाठीही मदत करतात.
हृदयासाठी फायदेशीर
बेलफळाच्या ज्यूसमध्ये थोडसं तूप एकत्र करून प्यायल्याने हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत होते. हा पेय पदार्थ नियमितपणे प्यायल्याने हृदयाशी निगडीत आजार दूर होतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बेलफळाचा ज्यूस पिणं फायदेशीर ठरतं.
बाळंतीणींसाठी ठरतं लाभदायक
बाळंतीणींसाठी बेलफळाचा ज्यूस पिणं अत्यंत फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त बेलफळाचा ज्यूस ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन वाढविण्यासाठी मदत करतं. जे नवजात बाळाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी
बेलफळाचा ज्यूस त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर ठरतं. बेलफळाचा ज्यूस कोमट गरम करून प्यायल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. तसेच चेहऱ्यावरील डाग दूर होऊन त्वचा उजळण्यास मदत होते.
टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
आता उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अर्थातच वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. गरमीसोबतच वेगवेगळे आजारही होतात आणि त्वचेसंबंधी समस्याही होतात. पण जशी आपण त्वचेची काळजी घेतो तशी आरोग्याचीही घेतली तर तुमचाच फायदा होऊ शकतो. उन्हाळ्यात खाण्या-पिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जास्त तापमान असल्याने वेगवेगळे पदार्थ लवकर खराब होतात. अशात जर तुम्ही उन्हाळ्यात शिळं अन्न खात असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
फळं कापल्यावर लगेच खा
डॉक्टर सांगतात की, उकाड्याच्या दिवसांमध्ये ४ ते ५ तासांपेक्षा आधी तयार करण्यात आलेलं अन्न खाऊ नका. तसेच सलाड आणि फळं हे कापल्यानंतर लगेच खावीत. किंवा जेव्हा खायचं आहे तेव्हाच कापावे. जर तुम्ही शिळं अन्न किंवा फळं खाल्लीत तर वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात.
फूड पॉयजनिंग
या वातावरणात फूड पॉयजनिंगची प्रकरणे अधिक बघायला मिळतात. याचं कारण तापमान अधिक असल्याकारणाने अन्नात बॅक्टेरिया अधिक होतात आणि वाढतात. हे बॅक्टेरिया ५ जिग्री सेल्सीअस ते ६० डिग्री सेल्सीअसच्या तापमानात वेगाने वाढतात. एक-दोन तासातच बॅक्टेरियाची संख्या २ ते ३ पटीने वाढू लागते. ज्यामुळे अन्न विषारी होऊ शकतं. असं अन्न खाल्ल्यावर पोटदुखी, उलटी, फूड पॉयजनिंगची लक्षणे दिसू शकतात.
डायरिया
या दिवसात लहान मुलं-मुली डायरियाचे अधिक शिकार होतात. लहान मुलांचं पचनतंत्र हे वयस्कांपेक्षा कमजोर असतं. त्यामुळे शिळे पदार्थ खाल्ल्याने मुलांवर लवकर वाईट परिणाम बघायला मिळतो. डायरिया झाल्यावर पुन्हा पुन्हा संडास लागणे, उलटी आणि ताप येणे या समस्या होतात. तसेच या समस्येमुळे शरीरातील पाणीही कमी होतं. याने समस्या अधिक वाढू शकतं.
दुधापासून तयार पदार्थ
काही लोक दूध फ्रिजमध्ये ठेवून २ ते ३ दिवसांपर्यंत वापरत राहतात. तुम्ही जर ताजं दूध घेतलं असेल ते उकडून त्याच दिवशी संपवा. जर तुम्ही पॅकेटमधील दुधाचा वापर करत असाल तर त्यावरील एक्सपायरी डेट चेक करुन वापर करा.
कापून ठेवलेली फळं
उन्हाळ्यात अनेकजण बाहेर फिरायला जातात आणि बाहेर आधीच कित्येक तासांपूर्वी कापून ठेवलेली फळं खातात. पण ही आधीच बऱ्याच वेळापासून कापून ठेवलेली फळं खाल्ल्याने तुम्हाला गंभीर समस्या होऊ शकते.
फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न नुकसानकारक
जर तुम्ही रात्रीचं किंवा दिवसा शिल्लक राहिलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवत असाल आणि विचार करत असाल की, दुसऱ्या दिवशी हे खाऊ. तर तुमची ही सवय चुकीची आहे. फ्रिजमध्ये ताजी फळं आणि भाज्या ठेवल्या जाऊ शकतात, ज्या तुम्ही कापलेल्या नसाव्यात. पण शिल्लक राहिलेलं ठेवलं आणि ते नंतर खाल्लं तर पोटाची समस्या होऊ शकते.
उन्हाळ्याला आता चांगलीच सुरुवात झाली आहे. वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी हा फेव्हरेट काळ आहे. कारण अनेक लोकांना असं वाटतं की, गरमीमुळे जास्त घाम आल्याने वजन कमी करण्यास मदत होते. या वातावरणात अनेक जिम ट्रेनरही हे सांगतात असतील की, याचा वातावरणात तुम्ही वजन कमी करु शकता. इतकेच काय तर अनेक फिटनेस ट्रेनर्स हे लोकांना फॅन बंद करुनही वर्कआउट करण्यास सांगतात, जेणेकरुन जास्त घाम यावा.
पण खरंच जास्त घाम येण्याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते का?
जर असं असेल तर हिवाळ्यात तुमच्या शरीरातून अजिबातच फॅट बर्न होत नसेल. कारण हिवाळ्यात अजिबातच घाम येत नाही. या लॉजिकनुसार डोंगराळ भागात किंवा थंड ठिकाणांवर राहणाऱ्या लोक जाडेपणाचे शिकार व्हायला पाहिजेत. कारण त्या ठिकाणांवर फार घाम येत नाही. तसेच एका सामान्य धारणा अशी आहे की, हिवाळ्यात तुमचं वजन वाढतं आणि उन्हाळ्यात कमी होतं.
काय सांगतं सायन्स?
आपल्या शरीरात एडिपोज टिशूच्या रुपात फॅट(चरबी) जमा होते. जेव्हाही शरीराची एनर्जी गरज बाहेरुन पूर्ण होत नाही तेव्हा शरीर या जमा झालेल्या फॅटला एनर्जी मध्ये बदलतं आणि आपण फॅट कमी करतो. तुम्ही हिवाळ्यात वर्कआउट करा किंवा उन्हाळ्यात शरीरातून फॅट बर्न होण्याची प्रक्रिया एकसारखीच आहे.
घामाच्या रुपात फॅट बाहेर येतं?
असं अजिबात होत नाही. शरीराचं तापमन संतुलित करण्यासाठी घाम येतो. उन्हाळ्यात बाहेरचं तापमान इतकं जास्त असतं की, शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप जास्त घाम येतो. तेच हिवाळ्यात जेव्हा तुम्ही वर्कआउट करता तेव्हा शरीरातील तापमान कमी करण्यासाठी घाम येतो.
काय उन्हाळ्यात वजन वाढतं?
वजन वाढणं हे वातावरणावर नाही तर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर अवलंबून असतं. जेव्हा तुमच्या खाण्यात कॅलरीचं प्रमाण फार जास्त असतं तेव्हा कॅलरी फॅट स्वरुपात शरीरात जमा होतात आणि जाडेपणा वाढतो. जेव्हा शरीरात कॅलरी कमी होतात तेव्हा शरीरातील फॅट एनर्जी होऊन निघून जातं आणि याने वजन कमी होतं.
उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर फिट राहण्यासाठी आणि बॉडी शेपमध्ये ठेवण्यासाठी दररोज एक्सरसाइज करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर शरीराचं तापमान वाढतं. यामुळे एक्सरसाइज करणं आवघड होतं. जास्त घाम आल्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. अशावेळी जर एक्सरसाइज केली तर तुम्ही आजारीही पडू शकता. काही लोक जास्त उकाड्यामुळे एक्सरसाइज करण्याचं टाळतात. यामुळे त्यांची फिटनेस खराब होते. फिट रहायचं असेल तर रेग्युलर एक्सरसाइजही गरजेची आहे. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही उन्हाळ्यातही आरामात एक्सरसाइज करू शकता.
सकाळी एक्सरसाइज करा
प्रयत्न करा की, तुम्ही सकाळी 6 वाजताच तुमचं वर्कआउट करून घ्याल. बाहेरील तापमान 8 ते 9 वाजेपर्यंत फार गरम होतं. त्यामुळे सकाळी लवकर उठून एकसरसाइज करून घ्या. त्यामुळे दिवसभराची सर्व आवश्यक काम आटपू शकता.
एक्सरसाइजनंतर आंघोळ करू नका
काही लोक एक्सरसाइज केल्यानंतर लगेच बाथरूममध्ये आंघोळीसाठी जातात. परंतु एक्सरसाजनंतर काही वेळ आराम करणं गरजेचं असतं. जेणेकरून शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होईल. जवळपास एक तासानंतर आंघोळ करणं ठिक आहे.
पाणी भरपूर पिणं असतं गरजेचं
उन्हाळ्यामध्ये एक्सरसाइज करताना फार घाम येतो. एक्सरसाइज करताना मुबलक प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास पाणी पिणं गरजेचं असतं. त्यानंतर एक्सरसाइज करा. एक्सरसाइज करताना मध्येच तहान लागली तर पाणी प्या. यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होणार नाही. त्यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही.
एनर्जी ड्रिंक पिणं टाळा
व्यायाम करताना एनर्जी ड्रिंकचं सेवन करणं शक्यतो टाळा. एनर्जी ड्रिंक्समध्ये ग्लूकोज अधिक असतं. जे शरीरामध्ये जाऊन एनर्जीमध्ये कनवर्ट होतं. जर तुम्ही वजन घटवण्यासाठी किंवा बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी एक्सरसाइज करत असाल तर शरीरामध्ये जमा झालेल्या फॅट्सऐवजी शरीर एनर्जी ड्रिंक्समधून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करतात. त्यामुळे तुम्हाला एक्सरसाइजचा पूर्ण फायदा मिळणार नाही. तुम्ही एनर्जी ड्रिंकऐवजी पाणी पिऊ शकता.
सैल कपडे परिधान करा
जिम असो किंवा घर, कधीही टाइट कपडे वेअर करून वर्कआउट करू नका. सैल आणि हलक्या रंगाचे कपडे परिदान करा. कपडे शरीराला चिकटल्यामुळे प्रचंड उकडतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये एक्सरसाइज करताना सैल आणि घाम लवकर सुकेल असे कपडे वेअर करा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.
वातावरणामध्ये प्रचंड उकाडा जाणवत असून मार्च महिन्यामध्येच तापमानाने उच्चांक गाठला आहे. पारा आतापासूनच 32 आणि 40 डिग्रीपर्यंत पोहोचला आहे. अशातच उन्हाळ्यामध्ये घराचं तापमान सामान्य ठेवण्यासाठी घरामध्ये सीझनल झाडं लावणं उत्तम पर्याय आहे. वैज्ञानिकांच्या मते, या झाडांमुळे घर फक्त थंड राहत नाही तर त्यांचा गंध वातावरण शुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतो.
जॅस्मिन ग्रुपमधील फूलं
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला घरामध्ये फुलझाडं लावायची असतील तर सुगंधी आणि पांढऱ्या फुलांची निवड करा. यामध्ये बेल, चमेली, चंपा, मोगरा आणि जुईच्या फुलांचा समावेश करा. ही झाडं सुंगधी असण्यासोबतच यांचे अनेक औषधी गुणधर्मही असतात.
सूर्यफुल
सूर्यफुलाचं झाड उन्हाळ्यामध्ये अत्यंत गुणकारी ठरतं. तसेच दररोज याची काळजी घेणंही अत्यंत सोपं आहे. हे वाढविण्यासाठी 7 ते 8 तास उन्हाची गरज असते. हे झाड अस्थमा, कॅन्सर यांसारख्या आजारांवर अत्यंत फायदेशीर ठरतं.
बेल
बेलाचा वापर अरोमा थेरपीसाठी करण्यात येतो. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या घामोळ्या आणि खाजेवर हे गुणकारी ठरतं.
चमेली
आयुर्वेदामध्ये सांगण्यात आल्यानुसार, चमेलीचं फूल त्वचेसंबंधी आजार दूर करण्यासाठी उपयोगी ठरतं. तसेच पोटाच्या समस्याही दूर होतात. फुलांचा रस चेहरा चमकदार करण्यासाठी मदत करतो.
चाफा
चाफ्याचं फूल आपल्या सुगंधाने स्ट्रेस लेव्हल मेन्टेन करतो. घरामध्ये हे झाड लावल्याने उन्हाळ्यामध्ये ताजंतवाणं वाटतं.
मोगरा
मोगऱ्याचं अत्तर कानामध्ये वेदना झाल्यानंतर त्या दूर करण्यासाठी मदत करतं. तोंड आणि डोळ्यांच्या अनेक समस्यांवरही हे फूल फायदेशीर ठरतं.
जुई
जुईचा सुगंध मन शांत करण्यासोबतच थंडावा देण्यासाठीही मदत करतो.
कॉस्मॉस
कॉस्मॉस हे सीझनल झाड आहे. जे उन्हाळ्यामध्ये आणखी बहरतं. या झाडाला पांढरी, गुलाबी, नारंगी, मजेंटा आणि पिवळ्या रंगाची असतात. हे झाड 7 ते 10 दिवसांमध्ये उगवतं. यासाठी या झाडाच्या बीया जमीनीवर पसरवून हलकच झाकून टाका.
पोर्टुलाका
पोर्टुलाका हे झाड गरम किंवा कोरड्या जमिनीवर येतं. हे रंगीबेरंगी सुंदर फुलांचं झाड आहे. हे झाड कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये लावणं सहज शक्य होतं. जर तुम्ही हे झाड कुंडीमध्ये लावणार असाल तर उन्हामध्ये लावा आणि त्या कुंडीमध्ये पाणी थांबून राहिल याची काळजी घ्या.