तज्ज्ञांच्या मते तेलकट त्वचेच्या लोकांनी सकाळी स्नान केल्यास फायदा होतो आणि त्यांची त्वचा उत्तम राहाते. पुरुषांनी सकाळी आंघोळीनंतर दाढी करणे उत्तम. कारण आंघोळीनंतर त्वचा मऊ होते. त्यामुळे दाढी चांगली होते. जे लोक सकाळी लवकर उठतात त्यांनी सकाळीच आंघोळ करावी. काही लोकांना संध्याकाळी आंघोळ केल्यास बरे वाटते. मात्र काही संशोधकांच्या मते, रात्री आंघोळ केल्यास शरीराच्या तापमानात बदल होतो त्यामुळे शरीराचे निसर्गचक्र बाधित होते. त्यामुळे झोप लागण्यात अडथळा निर्माण होतो. अशी समस्या असल्यास झोपण्यापूर्वी 2 तास आधी आंघोळ करावी.
त्वचेला सनस्क्रीन लोशन लावत असाल, मेकअप आदींचा वापर करत असाल तर रात्री आंघोळ करावी. त्यामुळे लोशन, मेकअप आदी निघून जाण्यास मदत होईल. रुग्णालये, बांधकाम साईट आदींवर काम करत असाल अथवा सातत्याने धूळ, प्रदूषण आणि घाण यांच्या संपर्कात राहात असाल तर रात्री जरुर आंघोळ केली पाहिजे. रात्री किंवा दिवसा आंघोळ करण्याचा निर्णय वैयक्तिक असला तरीही आपल्या शरीर आणि दैनंदिनीचा विचार करून याबाबतचा निर्णय घ्यावा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
थंड की कोमट : सकाळी आंघोळ करणे आवडत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करावी. त्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते. रात्री आंघोळ करत असाल तर हलक्या कोमट पाण्याने स्नान करावे. असे केल्याने दिवसभर थकलेल्या शरीराला आराम मिळतो आणि गाढ झोप लागते.
वेगवेगळ्या अभ्यासांमधून हे समोर आलंय आणि अनेक तज्ज्ञही मानतात की, गरम पाण्याने आंघोळ केल्याने अनेक नुकसान होतात. याने शरीराची वरील त्वचा कमजोर होऊ लागते. त्यासोबतच काहींना खाज आणि इन्फेक्शनचीही समस्या होऊ शकते.
इतकेच नाहीतर यामुळे टेस्टिकल्सचं तापमान वाढतं आणि त्यामुळे स्पर्म काऊंट कमी होतो. अशातच एका रिसर्चमधून समोर आले आहे की, आठवड्यातून पाच किंवा त्यापेक्षा जास्त वेळ गरम पाण्याने आंघोळ केल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक रोखण्यास मिळते.
एका संशोधनात आढळलं की, रोज 41 डिग्री सेल्सिअस गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदयासाठी चांगलं असतं. शोधकर्त्यांनुसार, नियमीतपणे गरम पाण्याने आंघोळ केल्यास हृदय चांगलं राहतं आणि ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. इतकेच नाहीतर नियमीत गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना तणावाचाही कमी सामना करावा लागतो.
काय सांगतो रिसर्च?
युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलच्या संशोधनकर्त्यांनुसार, जे लोक आठवड्यातून चार ते सात वेळ गरम पाण्याने आंघोळ करतात. त्यांच्या तुलनेत एकदा गरम पाण्याने आंघोळ करणाऱ्यांना स्ट्रोकचा धोका अधिक असतो.