ऑफिसमध्ये अनेकदा काम करता करता झोप येऊ लागते. कॉफीवर कॉफी प्यायली जाते पण त्याचाही फार काही परिणाम होताना दिसत नाही. अशात करायचं तरी काय? कारण झोपेमुळे कामही होत नाही आणि झोपताही येत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये झोप का येते याच्या कारणांचा कुणीच शोध घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. अशाप्रकारे झोप येण्याला तुमच्या काही सवयी जबाबदार आहेत. या छोट्या छोट्या सवयी जर तुम्ही बदलल्या तर तुमची झोप काही मिनिटात उडेल.
ब्रेकमध्ये काय करता?
एका रिसर्चनुसार, जे लोक जेवताना फोनचा वापर करतात, मेल किंवा सोशल मीडिया चेक करतात त्यांना जास्त थकल्यासारखं वाटतं. सोशल मीडियाचा वापर केल्याने आपल्या मेमरीला अचानक खूप सूचना मिळतात आणि यामुळे एंग्झायटीची समस्या होते. त्यामुळे लंच ब्रेकमध्ये मेंदूला आराम द्या.
काम टाळून काय होणार?
अनेकदा अनेकजण आराम करण्यासाठी काम टाळतात. पण याने आराम मिळण्याऐवजी स्ट्रेस वाढतो. कारण पेंडिंग राहिलेलं काम पूर्ण करण्याचा तुमच्यावर दबाव राहतो. बरं होईल की, तुमची कामे काही भागांमध्ये विभाजित करा. हे काम हळूहळू पूर्ण झालं की, तुम्हाला चांगलं वाटेल आणि त्यानंतर तुम्ही ब्रेकही घेऊ शकता.
पुन्हा पुन्हा मॅगी खाणे
काम करत असतानाच अनेकांना काहीना काही खाण्याची सवय असते. अनेकजण मॅगी खातात. पण असं न करता स्नॅक्समध्ये अशा पदार्थांची निवड करा ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आणि फायबरचं बॅलन्स असेल. सोबतच काही फळंही खाऊ शकता.
सॉक्समुळेही झोप
पायांना थोडा थोडा घाम येत राहतो. अशात दुपारी सॉक्स बदला. याने तुम्हाला फ्रेश वाटेल. नवीन सॉक्स वापरण्यापूर्वी पायांना एखादं कुलिंग बाम लावा. याने तुम्हाला झोप येणार नाही.
पाण्याने मिळेल आराम
शरीरातील पाणी थोडंही कमी झालं तर शारीरिक आणि मानसिक क्षमता १० टक्के कमी होते. याचा अर्थ हा नाही की, तुम्ही एनर्जी ड्रिंक प्यावे. कारण यात फार जास्त शुगर असते. ब्लड शुगर वाढल्याने तुम्हाला आणखी जास्त आळस येईल. त्यामुळे दिवसभर थोडं थोडं पाणी सेवन करत रहावे.
बाहेर फिरून या...
ऑफिसमधील आर्टिफिशिअल लाइटचा प्रकाश नॅच्युरल लाइटपेक्षा कमी असतो. अशात स्लीप हार्मोन्सचं प्रमाण वाढू लागतं. स्वत:ला जागं ठेवण्यासाठी अधून-मधून बाहेर फेरफटका मारून यावा.
च्यूइंगम
च्युइंगम खाल्ल्याने तुम्हाला जास्त जागं राहण्यास मदत मिळेल. एका रिसर्चनुसार, च्युइंगम खाल्ल्याने हार्ट रेट वाढतो आणि मेंदूमध्ये रक्तप्रवाह सुद्धा वाढतो. याने तुम्ही अलर्ट रहाल.
एकसारखं बसून राहणे
जास्तवेळ एकाच जागी बसून राहिल्याने हार्ट रेट कमी होतो. मांसपेशींमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि आपल्याला झोप येऊ लागते. त्यामुळे कामातून ब्रेक घेऊन थोडं चालावं. शरीराची हालचाल झाल्यास झोप उडेल.
पापण्या हलवूनही जाईल झोप
एका जपानी रिसर्चनुसार, पापण्या हलवल्याने सुद्धा मेंदू सतर्क होतो अनेकदा कामात लक्ष घातल्यावर आपण पापण्या कमी हवलतो आणि हे आपल्याला माहितही नसतं. यानेही झोप येऊ लागते.
बदलती लाइफस्टाईल, कामाचा वाढता स्ट्रेस यामुळे जगभरातील लोकांना चांगली झोप न येण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. इतकेच काय तर झोप येण्यासाठी लोकांना झोपेच्या गोळ्याही घ्याव्या लागत आहेत. सोबतच झोप पूर्ण झाल्याने किंवा येत नसल्याने वजन वाढण्यासोबतच वेगवेगळे आजारही होत आहेत. मात्र, अशात एका रिसर्चमधून झोपेची समस्या असणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनसार, झोपण्याच्या साधारण १ ते २ तासआधी आंघोळ केल्याने तुम्हाला चांगली झोप लागू शकते. म्हणजे तुम्हाला झोप न येण्याची समस्या आंघोळीने दूर केली जाऊ शकते.
शरीराचं तापमान आणि झोपेचा संबंध
या रिसर्चमध्ये शरीराचं तापमान आणि झोपेची क्वॉलिटी यांचा संबंध बघितला गेला. यातून आढळलं की, जे लोक झोपेच्या १ ते २ तासआधी आंघोळ करतात त्यांना चांगली झोप येते. झोपणे आणि जागणे यात शरीराच्या तापमानाची महत्त्वाची भूमिका असते. शरीराचं तापमान झोपताना सर्वात कमी असतं. दुपारी आणि सायंकाळी शरीराचं तापमान थोडं जास्त असतं.
बॉडी क्लॉकवर तापमान अवलंबून
शरीराच्या बॉडी क्लॉकवर शरीराचं तापमान अवलंबून असतं. हे तापमान झोपण्यापूर्वी थोडं कमी होतं. झोपेत असताना तापमान सर्वात कमी असतं आणि अर्ध्या रात्री तापमान हळूहळू वाढतं. याप्रकारे आपलं शरीरच अलार्मचं काम करतं आणि सकाळी आपल्याला उठवतं. याप्रकारे टेम्प्रेचर सायकल आणि स्लीप सायकल एकमेकांशी जुळलेल्या आहेत.
हे जर समजून घेतलं तर झोपण्यापूर्वी शरीराचं तापमान कमी करून तुम्ही लवकर आणि चांगली झोप मिळवू शकता. बेडवर जाण्याच्या साधारण ९० मिनिटेआधी आंघोळ केल्यास शरीराचं तापमान कमी होऊन तुम्ही चांगली झोप घेऊ शकता.
आजची जनरेशनला रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय आहे. पण यामुळे त्यांना दिवसभर, थकवा, सुस्ती आणि कमजोरी वाटत असते. तुमच्या जवळपास देखील कोणाला असे होत असेल तर यासाठी वॉट्सएप, फेसबुक किंवा स्मार्टफोनला दोष देण्याआधी पोटॅशियमचा स्तर नक्की चेक करायला पाहिजे. कारण शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेमुळे या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
शरीरात पोटॅशियमची कमतरतेला हायपोक्लेमिया म्हणतात. निरोगी राहणे आणि आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला रोज 47000 मिलीग्राम पोटॅशियमची गरज असते. कारण पोटॅशियम हृदय, मेंदू आणि मांसपेशींच्या कार्यप्रणालीला व्यवस्थितरूपेण चालवण्यास मदत करतो. शरीरात पोटॅशियमची कमतरतेमुळे हायपोकॅलीमिया आणि मानसिक आजार होण्याचा धोका असतो. आम्ही तुम्हाला याच्या कमतरतेचे काही संकेत सांगत आहोत, ज्याच्या कमीमुळे होणार्या समस्येला तुम्ही सोप्यारित्या ओळखू शकता.
अनिद्रेची समस्या
जर तुमच्या शरीरात देखील पोटॅशियमची कमी असेल तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होऊ शकते. अशात अनिद्रेची समस्या असल्यास डॉक्टरकडून चेकअप करवणे आवश्यक आहे.
तणाव
अधिक तणाव किंवा डिप्रैशनअसणे देखील पोटॅशियमच्या कमतरतेचे संकेत आहे. एवढंच नव्हे तर पोटॅशियमची कमीमुळे होणारा ताण मानसिक समस्येचे कारण देखील बनू शकतो.
मूड स्विंग
जेव्हा शरीरात याची मात्रा कमी होऊ लागते तेव्हा हा मेंदूच्या कार्यक्षमतेला देखील प्रभावित करतो. यामुळे तुमचा मूड स्विंग अर्थात विचारांमध्ये बदल येऊ लागतात.
दिवसभर थकवा जाणवतो
शरीरात पोटॅशियमच्या कमतरतेच एक लक्षण थकवा देखील आहे. यामुळे तुम्ही थोडे देखील चालले की थकून जाता. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात उपस्थित कोशिकांना काम करण्यासाठी पोटॅशियम आणि खनिज लवणांची गरज असते पण याची पूर्ती न झाल्याने शरीरात थकवा येतो.
ऍसिड वाढणे
पोटॅशियमच्या कमतरतेमुळे शरीरात ऍसिडची मात्रा वाढून जाते, ज्यामुळे शरीरात सुस्ती, थकवा आणि कमजोरी जाणवते.
ब्लड प्रेशर अनियंत्रित होणे
पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतो. तसेच हे शरीरात सोडियमची मात्रेला कमी करून ब्लड प्रेशराला देखील कंट्रोलमध्ये आणतो. अशात याची कमी झाल्याने ब्लड प्रेशराचे वाढणे किंवा कमी होणे हा त्रास सुरू होऊ शकतो.
झोप पूर्ण न झाल्यामुळे फक्त दुसर्या दिवशी आळस व थकलेचेच वाटत नाही तर एका व्यापक दृष्टीने ते लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांसाठीही कारणीभूत ठरू शकते. एका ताज्या अध्ययनातून हा दावा करण्यात आला आहे. सायन्स डव्हान्सेस जर्नलमध्ये प्रसिद्ध या अध्ययनानुसार झोप पूर्ण न झाल्याने डीएनएच्या कार्यप्रणालीमध्ये बदल होतो. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात चरबी जमा होऊ लागते. एका रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर स्नायू छोटे होऊ लागतात आणि चरबी वेगाने जमा होऊ लागते. दुसरीकडे अनेकजण रात्री उशिरा जेवण करणे सकाळी थकव्यामुळे व्यायाम न करणे यास लठ्ठपणाचे कारण समजतात. शास्त्रज्ञांनी या आधीही अपुर्या झोपेचा वजनवाढीसोबत संबंध जोडला होता. मात्र त्यामागील मूळ कारण ते स्पष्ट करू शकले नव्हते. आता त्यास शरीराच्या जैविक घड्याळासोबत जोडून सहजपणे समजले जाऊ शकते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, ज्यावेळी शरीर थकलेले असते, तेव्हा ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकत नाही. अशा स्थितीत टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढतो. या संशोधनामुळे भविष्यात गंभीर आजारांपासून सुटका करण्याचा रस्ता खुला होईल. लठ्ठपणामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. यामुळे कर्करोग व पक्षघाताचीही शक्यता वाढते. शरीरात वाढलेली चरबी जगभरात मृत्यूचे कारण ठरत आहे व अपुरी झोप चरबीस आमंत्रण देते.
निरोगी स्वास्थ्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आवश्यक आहे. पण त्याचबरोबर पुरेशी झोप घेणे देखील गरजेचे आहे. आजकाल शांत झोप मिळणे दुर्मिळ झाले आहे. लांबलेल्या कामाच्या वेळा, ताण, तणाव यामुळे नीट झोप लागत नाही. आपल्यापैकी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. झोप न लागण्याची अनेक कारणे असतील पण त्यामुळे आरोग्यावर परिणाम होवून त्याचा समस्या उद्भवू लागतात.
अपुऱ्या झोपेमुळे कामावर देखील परिणाम होतो.
अधिक चांगले काम करण्यासाठी शांत झोपेची गरज असते. कारण त्यामुळेच मन शांत, प्रसन्न राहतं व शरीराला ऊर्जा प्राप्त होते.
म्हणून शांत झोप येण्यासाठी हा घरगुती उपाय खूपच फायदेशीर ठरतो. हा उपाय अतिशय सोपा आहे. खसखस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तव्यावर थोडी भाजून घ्या. त्यानंतर खसखस ग्राईंड करून घ्या.
मग कोमट दुधात जायफळ आणि खसखस पावडर घाला. नीट मिक्स करून दूध प्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच शांत झोप लागण्यास मदत होईल